Tuesday 26 December 2023

माहेर एक चार्जर

काल संध्याकाळी दिडतास माझ्या छायाकाकुकडे मनमुराद गप्पा झाल्या. काकु खुप ओघवत बोलत होती... आधी तीचा रिक्षाचा झालेला अपघात टाके ..  त्रास त्यातून नशीब बलवत्तर म्हणुन डोळा बचावला ... आता सांगितल तरच कळेल की लागलेलं... वगैरे... सगळं ती बोलत होती...

बोलता बोलता अचानक तीच्या शेंदूर्णीच्या घरावर विषय वळला. तीच्या आईच घर कस होतं? ओसरी पडवीवरची वर्दळ ... सगळ सांगताना ती लहानपणातच्या गावातच ऊतरली होती.
आता कोणाच वाड्याकडे पाहणं होत नाही,  शेत बघणारा होता त्याचीच पुढची पिढी नशिबवान तीच कसा ऊपभोग घेतेय... वरचा मजला पडायला आल्यान पाडावा लागला.. वर कशा खोल्या होत्या खाली कशा होत्या... दिंडी दरवाजा ते मागचा वाड्याचा भाग मी तर पूर्ण वाडा काकुबरोबर फिरूनच आले...

मी म्हटल काकु जा वाडा पडायच्या आधीच एक फोटो काढून ठेवा आठवण...

तर म्हटली आहे जुना वाड्याचा फोटो😍 आठवडाच झाला मी जुने फोटो बघताना दिसला. 
मी तीच्याकडुन ऐकलाला वाडा  कसा असेल? मला पाहायला आवडेल फोटो. मी लगेच तीला म्हटल. परत काढलास पसारा की फोन कर येईन म्हटल मी. (छाया काकूला.)

थोडाच वेळ आधी गुडघा दुखतोय फिजीओ सुरूय खाली बसायच नाहीये, खुप वेळ ऊभ राहायच नाहीये म्हणणारी काकु झपकन खाली बसली... पाय पसरले कपाटा खालुन काही तरी काढु लागली.
मी ओरडले अग बाई तु मांडी का घातलीयस? दुखतय ना तुला? तर म्हणाली दोन मिनीटानी काही होत नाही. झपकन पिशवी काढली पाय सरळ केला आणि खुर्चित बसली.
हे माहेरच्या घराच लहानपणचं चार्जिंग होतं बरका! हे मला पिशवीतला वाड्याचा फोटो काढुन दाखवला  तेव्हा समजलं.
तो सुरेख जुना वाडा अगदी तस्साच होता. तो दाखवताना काकु खुप तरूण होती...
माहेरच्या घराच माणसांच चार्जिंग कसल भारी असतं ते मी अनुभवलं.
वयाच्या या वळणावर आल की बाई माणसाला यावर विचारास वेळ मिळतो... मधलं आयुष्य नैतिक जबिबदारी विवंचना कर्तव्यात व्यस्त असतं. मग वाटल बरं झालं विषय काढला, ती केवढी फ्रेश झाली.

त्या पिशवीत चार पाच आणखी जुने फोटो होते. मला तर पर्वणीच!  चार पाच ओळखले दोन ओळखु आले नाही म्हणुन आजोळ गाठलं.

आणि काकुच्या शेंदुर्णीच्या वाड्यापासून माझ्या लहानपणच्या पावन मारूतीच्या वाड्या पर्यंत पोचले.

आज त्यामुळे मी पण माझ्या आजीच्या घरच्या आठवणीत रमले.  तेव्हाचे शेजारी नावडकर आंग्रेशी बोलण झालं. त्या दोघांना पण आनंद झाला फोटो बघुन. आजही ते संपर्कात ओहेत माझ्या.

एक चारोळी आठवली ...

आठवणींच्या देशात
मी मनाला पाठवत नाही 
जाताना ते खूष असतं
पण येताना त्याला येववत नाही 


सौ. गौरी

विदेह राजा

रामायणातील आवडलेले पात्रं "विदेह"

त्रेता युगातल्या प्रभु श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी जानकीचे पिता विदेह. विदेह राजा जनक नावानं जास्त प्रचलित आहेत. रामायणातल्या गोष्टी खरतर अगदी लहानपणा पासून घरोघरी सांगितल्या गेल्या. मलाही त्या ऐकल्याच आठवतय. 
समुद्रावरून ऊडत सीतेपर्यंत जाणारा वीर हनुमान त्यावेळी जास्त अचंबित करत असे.  जस जस मोठी होत गेले तसतसं रामायणातली विविध पात्रं समजायला लागली. प्रत्येक पात्राच महत्व तत्व ऊलगडत गेली.  लहानपणच्ये गोष्टीत नसलेली श्रीरामांची बहीण शांता समजली. वनवासात बरोभर नसुनही बरोबर असणारी उर्मिला समजली. कैकयी मंथराचा पूर्वी राग येत असे कालांतराने कर्म फल योग या गोष्टीवर विचार करू लागले. परमेश्वराच्या योजनेत कोण कोणत पात्र वठवत असतं आपण ओळखु शकत नाही.
प्रत्येक व्यक्तीला दुसरी बाजु असु शकते असा विचार मी करू लागले. या संपूर्ण रामायणात मला आवडलेलं पात्र एकच ते म्हणजे "राजा जनक" अस मी आता ठामपणे सांगु शकते. का आवडतो राजा जनक?  त्याला अनेक कारणं आहेत.  
राजा जनक यांनाच विदेह, मिथिलेष तसेच शीरध्वज नावेनं त्रेता युगात ओळखलं जातं. निमी वंशात जन्मलेले विदेह देशाचे पालक शीरध्वज जनक हे कुलनावान ओळखले जात होते. जनकपूर हे नेपाळमधील मुळ गाव त्यांच. मिथीला नावाची राजधानी त्यांनी वसवली. वैदिक साहित्याची आवड असणारे, तत्वज्ञानी तसेच संसारात राहूनही लोभ मोह काम मान घृणा क्रोध यावर मात केलेले राजर्षि जनक म्हणुन जास्त प्रसिद्ध होते. जो व्यक्ति संत ॠषी पदाला पोचतो तरो जमिनीवर राहतो तो राजर्षि म्हणवला जातो. राजर्षि जनक म्हणुन पण त्रेता युगातली त्यांची ओळख महत्वाची आहे. 
त्रेता युगात असुनही आपला वंश पुत्राच्या नावान न ओळलता जाता आपल्या पुत्रीच्या नावान अजरामर व्हावा अशी ईच्छा करणारे राजा जनक का आवडणार नाहीत? त्याकाळी मुलींना वेद पठण आदि शिक्षा याज्ञवल्क यांच्याकून देण्याच मोलाच काम त्याकाळी त्यांनी केलं. मुलीस स्वतःला पडलेले प्रश्न न डगमगता विचारण्याची तसेच तीच्या शंका निरसन करण्याची मुभा त्यांनी दिली. योग्य निर्णय घेण्याची मुलांमधली कुवत वाढवण्यासाठी केले जाणारे त्यांचे विचार बहुमूल्य होते. ते राजा असूनही युद्धाच्या विरूद्ध होते. भौतिक संपत्ती असूनही मोहात न आडकणारे म्हणुन राजा जनक ओळखले जातात. अष्टवक्र, सुलभा योगीनी तसेच गार्गी योगिनी यांच्यासारख्या ॠषी साधकांशी त्यांचे संवाद होते.  राजा जनक हो ऊत्तम पालक होते ते प्रजेला मुलासारखे जपतं. भूमिजा सीता आयुष्यात आल्यानतर तीचे संगोपन त्यांनी ईतके सुंदर पार पाडले की त्याचे दाखले योग्य निर्णय क्षमतेच्या सीता मातेच्या वागण्यात समजते.
आत्मसन्मानाची बाब असेल तर कोणतीही अग्निपरीक्षा देण्यास मागेपुढे पाहु नको म्हणणारे पिता होते ते. मुलीच्या आयुष्यात यामुळे निर्माण झालेले त्यांच्या संस्काराचे गोंदण तीच्या प्रत्येक कृतीत दिसते. आपली लेकीच्या वनवासाला पतीस सोबत करण्यापासुन ते बाळंतपणास माहेरी न येण्याच्या तीच्या निर्णयात ते सकारात्मकतेने सहभागी होते. प्रकृतीचे नियम गुणधर्मम त्यांनी तीला सुंदर रीत्या शिकवले होते. 
हे अस रामायणातल पात्र आहे की जे निश्कलंक निर्मळ प्रेमळ आणि प्रेरणादायी आहे. या पात्राला कोणतीही नकारात्मक झालर नाही आणि अशीच व्यक्तिमत्वं पडद्यामागची महत्वाची असतात आयुष्यात!
राजा जनकांचा एक तरी गुण आत्मसात करून तो जगता आला तर आपण स्वतःला भाग्यवान समजु.
त्यांचे विदेह नाव खरोखरच सार्थक आहे.
जय श्रीराम!


Thursday 7 December 2023

सुडकू आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा.

मला पूर्वी दोन तीन नावात गडबड वाटायची हे कोण ? नावात सारखेपणामुळे आदरणीय गुरूतत्व समजण्यास असक्षम होते मी. मग मी शंका निरसन करण्यासाठी आद्ध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांचा सुडकू करू म्हटल म्हणजे सगळी आद्ध्यात्मिक गुरू तत्व समजतील.

पहिला गोंधळ होत होता ते श्रीनृसिंहसरस्वती महाराज, श्रीनरसिंह सरस्वती स्वामी, शंकराचार्य आणि नरसिंह / श्रीलक्ष्मी नरसिंह यांच्यात.  लहानपणी हे सगळ गुंतागुंतीच वाटायच. जस जस वाचन वाढल तस तस समजत गेलं. कोणाच अवतार कार्य काय आहे? कोणता अवतार कोणाचा? समजत गेल आणि ऊत्सुकता वाढली. 

तसच भद्रकाली, महाकाली आणि  कालीमाता बद्दल होतं. महाकाली आणि काली ही एकाच अस्तित्वाची भिन्न व्याख्या आहेत . देवी काली ची स्वतःची अनेक रूपे असताना, महाकालीला बहुतेक वेळा अधिक वैश्विक रूप म्हणून समजले जाते जे केवळ कालीचेच नव्हे, तर तिच्या १० हातात असलेल्या सर्व हिंदू देवतांची शक्ती दर्शवते.

असच एक नोंद करून ठेवलेली असावी म्हणुन 

१) श्रीपाद श्रीवल्लभ
दत्तात्रेयांचा पहिला अवतार
जन्म
: भाद्रपद  शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, 
पिठापूर, आंध्रप्रदेश
समाधी: अवतार  समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर : गुरूद्वादशी
कार्यकाळ
१३२० -१३५०  

श्री नृसिहसरस्वती महाराज 

दत्तात्रेयांचा दुसरा अवतार

जन्मलाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८
निजानंदीगमनइ. स. १४५८
कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५९


३) श्री नरसिंहसरस्वती स्वामी 
जन्म: ज्ञात नाहीआळंदीत १८७४ ला आले
समाधीपौष शु१५१८८६ आळंदी येथे
कार्यकाळ
१८७४ ते १८८६

४) भैरवनाथ 

भैरवनाथ हे तांत्रिक गोरखनाथ यांचे शिष्य होते, ज्यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ होते, माता वैष्णो देवीने कालीचे रूप धारण केले आणि भैरवाचे मस्तक कापून टाकले आणि शेवटी त्यांना त्याचे खरे रूप कळले आणि त्यांनी क्षमा मागितली. शेवटच्या क्षणी भैरवाने क्षमा मागितली. देवीला माहित होते की भैरवाचा तिच्यावर हल्ला करण्यामागचा मुख्य हेतू आपली मुक्ती मिळवणे आहे. त्यांनी भैरवांना केवळ पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त केले नाही तर त्यांना एक वरदान देखील दिले ज्याच्या अंतर्गत प्रत्येक भक्ताला वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण करण्यासाठी पवित्र गुहेजवळ असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात जावे लागेल.


५) भैरव / कालभैरव

हिंदू धर्मात कालभैरवाला महादेवाचा पाचवा अवतार मानला जातो आणि महादेवाचा विनाशकारी  एक ऊग्र  अवतार आहे. याचे वाहन कुत्रा आहे. कालभैरवाची आठ रूपे आहेत.


६) वीरभद्र

वीरभद्र हा महादेवांच्या शूर गणांपैकी एक आणि महादेवाचा पहिला अवतार आहे. महादेवाच्या आज्ञेवरून त्याने दक्षप्रजापतीचा शिरच्छेद केला होता.


७) काली

काली, कालिका किंवा महाकाली ही हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहे. ती मृत्यू आणि परिवर्तनाची देवी आहे. आदिशक्तीचे हे सुंदर रूप म्हणजे दुर्गा देवीचे कठोर, राक्षसी आणि भयभीत रूप आहे, जिचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. रक्तबीजला मारण्यासाठी महाकालीने त्याच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब प्यायला आणि त्याच्या क्रूर प्रतिकृती नष्ट केल्या. रक्तबीजचा वध केल्यावर, काली रागाने तांडव करू लागली आणि तिला शांत करण्यासाठी भगवान महादेवाला तिच्या पायाखाली आडवे पडावे लागले. काली शांत झाली आणि पतीला पायाखाली पाहून तिने आपली जीभ बाहेर काढली अस म्हणतात.

८) भद्रकाली 

भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराची शक्ती किंवा पत्नी म्हणजे भद्रकाली तीला सहा मुलं आहेत.


९) कालरात्री

माँ दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माँ कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी साधकाचे मन 'सहस्रार' चक्रात वसलेले असते. यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विध्वंसक रूपांपैकी एक मानली जाते - काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यु - रुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा.


१०) महाकाली

महाकाली हे ते रूप आहे ज्याला दहा तोंडे, हात आणि पाय आहेत, दुर्गा सप्तशतीमध्ये तिला महाकाली म्हणतात, ज्याचा जन्म देवांच्या हाकेवर पार्वतीजींच्या शरीरातून झाला. 


११) नरसिंह / लक्ष्मी नरसिंह
हा विष्णूच्या दशावतारांपैकी मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
१२) आदि शंकराचार्य
जन्म इ. पू ५०८ कालडी केरळ
समाधी केदारनाथ, ऊत्तराखंड.
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, 
जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ, ज्योतिर्मठ
येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

१३) स्वामीनारायण
वैराग्य स्वीकारलं तेव्हा नीलकंठ वर्णी हे  नाव पडलं. रामानंद स्वामींनी दीक्षा दिल्यावर त्यानीच नीलकंठ वर्णींचं  स्वामीनारायण नाव ठेवलं.
मुळ नाव घनश्याम पाण्डे 
जन्म ३ एप्रिल १७८१ छपिया ऊत्तरप्रदेश
मृत्यु १ जुन १८३० गढडा गुजराथ
हे हिंदु धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. 
लिखाण : शिक्षापात्री व वचनामृत ग्रंथ
यांना भगवान विष्णुंचा अवतार समजतात.

१४) चैतन्यमहाप्रभु ऊर्फ गौरांग
जन्म इ.स. १८ फेब्रुवारी १४८६ नादिया पं. बंगाल
मृत्यु इ.स. १४ जुन १५३४ पुरी, ओडीसा
गौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हणत. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे  नाव त्यांनी धारण केले. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व  राधा संयुक्त अवतार मानतात. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी बंगाल-ओरिसातच नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांनी त्याकरिता स्वतः ग्रंथरचना केली नाही परंतु इतरांना काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली.

१५) नित्यानंद महाप्रभु ऊर्फ नित्याई
जन्म १४७४ बीरभूम पं. बंगाल
मृत्यु  १५४०
निताई चैतन्यमहाप्रभु यांचे मित्र होते. चैतन्य नित्यानंद यांनाच निमाई निताई   ( निमाई चैतन्यचे दुसरे नाव) किंवा गौरा निताई संबोधले जाता होते. या जोडीस श्रीकृष्ण बलरामांचा अवतार समजले जाते.
ईस्काॅन टेम्पल चैतन्य महाप्रभू नित्यानंद महाप्रभू