Thursday 31 August 2023

१२) मार्गशीर्ष (नोव्हेंबर - डिसेंबर) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका

मार्गशीर्ष महिना महत्व :
मार्गशीर्ष महिना मार्गशी नावानी दक्षिणेत ओळखला जातो. देशाच्या विविध भागांमध्ये अग्रहायण किंवा अघान नावाने पण ओळखला जातो. मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हणतात. एकूण सत्तावीस नक्षत्रतांपैकी मृगशीर्ष नक्षत्र जेव्हा चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा मार्गशीर्ष महिना सुरु होतो. या महिन्यात गीतेचे पठाण करावे अशी मान्यता आहे. कारण हा श्रीकृष्णाचे च स्वरूप आहे असा समजतात. या महिन्यापासून पुन्हा भगवान विष्णू जगाचे पालकत्व सांभाळतात. म्हणून हा केशव मास.  मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीला (चांद्र महिन्याच्या तेजस्वी अर्ध्याचा सातवा दिवस) येते. हा दिवस सूर्य देवाची (मित्र किंवा सूर्य भगवान) पूजा करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने भक्तांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी मिळते असे म्हटले जाते. याचा विचार केला तरीही, आपल्या मनाला चैतन्य आणि पुनरुज्जीवन करण्याची आणि कल्याण आणि सकारात्मक उर्जेची भावना प्रदान करण्याची शक्ती आहे. एक अत्यंत महत्त्वपूर्ण काळ मानला जातो भगवान श्रीकृष्ण म्हणतात "सामवेदात मी ब्रुहत्सम आहे, श्लोकांमध्ये मी गायत्री आहे, मीच महिन्यांत मार्गशीर्ष आहे आणि ऋतूंमध्ये मी वसंत ऋतु आहे". भगवान विष्णू, भगवान शिव किंवा तुमचे इष्टदेव यांचे ध्यान आणि उपासना करण्यासाठी हा महिना आदर्श आहे. या महिन्यात सूर्योदय होण्यापूर्वीचा काळ अतिशय पवित्र आहे. या महिन्यात जप करण्यासाठी सर्वोत्तम, सर्वात सोपा आणि सर्वात फायदेशीर मंत्र आहे :
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे रामा हरे रामा रामा रामा हरे हरे


मार्गशीर्ष महिन्यातील सण :
चंपाषष्ठी : 
सहा दिवसांचा कालावधी ‘खंडोबाचा नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. खंडोबा वर चंपक म्हणजेच फळांच्या फुलांची वृष्टी केली जाते.  म्हणून या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी असे संबोधले जाते.
मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी ही मोक्षदा एकादशी किंवा वैकुंठ एकादशी म्हणून पाळली जाते, जी वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशींपैकी एक आहे. या दिवशी, लोक धान्य आणि शेंगांपासून उपवास करतात आणि शक्य तितक्या पवित्र नावाचा जप करण्यावर लक्ष केंद्रित करतात. दक्षिण भारतातील सर्व विष्णू मंदिरे एक सुशोभित प्रवेशद्वार उभारतात जे वैकुंठाच्या प्रवेशद्वाराचे प्रतीक आहे, जिथे विश्वासू लोक फिरतात.


मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव. खंडोबाचे  मणी आणि मल्ल यांच्या वधानंतर चा हा महादेवाचं विजय सोहळाच जणू. हे घनघोर युद्ध सहा दिवस चालले. या युद्धामध्ये दोन्ही दैत्य मरण पावले. तो दिवस म्हणजेच चंपाषष्ठी चा होता.  शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीच्या खंडोबा राया यांचे पूजन केले जाते. हे पूजन चंपाषष्ठी पर्यंत केले जाते.


महाराष्ट्रातील पुण्याजवळील जेजुरी शहरात, खंडोबा (भगवान शिवाचा अवतार) म्हणून ओळखल्या जाणार्‍या भगवान मल्लहरीचा भव्य उत्सव षष्टीपासून सहा दिवस साजरा केला जातो. मंदिर असलेल्या संपूर्ण डोंगरावर आणि सर्व लोकांना एक शुभ विधी म्हणून हळद लावली जाते. 

मोक्षदा एकादशी :

नावाप्रमाणेच ही एकादशी मोक्ष मिळवून देणारी आहे. तसेच याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते, त्यामुळे या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. यामुळे व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 

मार्गशीर्ष महिन्यातील जयंती व उत्सव  :
दत्तजयंती :
या महिन्यात पौर्णिमेला मृग नक्षत्रावर संध्याकाळी भगवान श्री दत्तगुरु यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. अष्टमी या तिथी पासून पौर्णिमेपर्यंत भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. म्हणून या संपूर्ण सप्ताहाला गुरु गुरुचरित्राचे पारायण सप्ताह असे देखील संबोधले जाते.
गीता जयंती : 
 भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो.  विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. मोक्षदा एकादशीला गीता जयंतीही साजरी केली जात आहे. गीता जयंतीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मोक्षदा एकदशीचा उपवास केल्यानं पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मोक्षदा एकदाशी आणि गीता जयंती यांच्यात संबंध आहे. से मानले जाते की ज्या दिवशी भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला, त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी होती. म्हणूनच, गीता जयंती या दिवशी साजरी केली जाते.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीतेची खास उपासना केली जाते. असे मानले जाते की जेव्हा अर्जुन आपल्या प्रियजनांना रणांगणात पाहून विचलित झाले, तेव्हा श्री कृष्णाने गीतेचा उपदेश केला आणि संपूर्ण ताकदीने युद्ध लढायला सांगितले. गीतेच्या उपदेशानंतरच कौरवांना पराभूत करून अर्जुन युद्धभूमीत विजय मिळवू शकला. गीता एखाद्या व्यक्तीच्या मनाचे विचार शुद्ध करते. योग्य चुकीचा फरक गीतेमधून समजला जातो. मोक्षदा एकादशीला गीतेची उपासना करण्याची परंपरा आहे. यासह भगवान विष्णू आणि श्री कृष्णाचीही उपासना केली जाते. गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन ऐहिक आसक्तीतून मुक्त केले.  योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत :

मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर धान्य  पसरून त्यावर कलश ठेवला जातो. त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावली जातात, त्यावर श्रीफळ ठेवले जाते. त्या नारळाला देवी समजून तिला सजविले जाते. दागिने , फुलांची वेणी घातली जाते. या देवीची पूजा केली जाते. देवीभोवती आरास मांडली जाते. या व्रताचे महत्त्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवली जाते. पूजा झाल्यानंतर या पुस्तिकेत दिलेले देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन केले जाते. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळदी कुंकू केले जाते आणि त्याना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.


मार्गशीर्षातली गाणी कविता :
श्री दत्तजन्माचा पाळणा
जो जो जो जो रे श्रीदत्ता बाळा निज निज आता ॥धृ॥
 पीठापुरवासी द्विजपत्नी । पतिव्रता गुणखाणी । 
भिक्षेलागी तू मध्यान्ही । येसी तिच्या सदनी । 
भिक्षा तुज घाली ती रमणी । करिसी तिजला जननी । 
प्रेमें तुज निजवी ती सुमना । श्रीपादा गुरुनाथा ।। जो ।। १ ।।
अंबानामक ती विप्रसती । पुत्र तिचा मंदमती । 
जनापवादे ती खिन्न अति । प्राण त्यजाया सजती । 
पाहूनी निजचित्ती कळवळसी । शनिप्रदोषा कथिसी । 
ठेविसी शिरी त्याच्या निज हस्ता। सुत होय महाज्ञाता ।। जो. ।। २ ।। 
सर्वेश्वर देवा कुरवपुरी। रजक तुझी भक्ती करी । 
प्रसन्न होसी वा कृपानिधी । बसविसी त्या राजपदी । 
मार्गी चोरांनी द्विजवर्या । वधितां तुज आली दया । 
धावत आलासी जशी माता । वाचविले निजभक्ता । । जो. ॥ ३ ॥
भक्तासाठी तू भूमिवरि । होसी नरतनुधारी । 
घेऊनि दीनाचा कैवार । हरला अवनीभार । 
झाले श्रम भारी तुजलागी । आता निज सुख भोगी
होई बहु हर्ष दत्तसुता । प्रेमे तव गुण गातां । जो. ॥४ ॥


लॉजिक नवीन पिढीसाठी :

एकादशी का करतात ?एकादशी हे फक्त व्रत नसून उपासना आहे.  एक दशा म्हणजे एकादशी, इंद्रियांचा तसेच अंतःकरणाचा एकच विषय असणे ती झाली एकादशी. फक्त जीभेशी संबंध नसून तिचा सर्व इंद्रियांशी संबंध आहे. सतत भजन कीर्तन नामस्मरण पांडुरंगाचे हीच वारकरी लोकांची एकादशी. त्यामुळे जीवन आनंदित होते. एकादशी तिथी महिन्यात दोनदा येते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या चार दिवस आधी. या दिवशी भूगर्भात बरीच हलचाल असते. मानवी शरीर ७५% पाणी आहे त्यामुळे या हलचालींचा मानवाच्या शरीरावर पण परिणाम होतो. योग्य ताळमेळ निसर्गाशी जमवून मानव ठणठणीत राहू शकतो. याचा विचार  करूनच कदाचित पूर्वजांनी एकादशी चा उपवास करा असे सांगितले असावे. शरीराला एक दिवसीय लंघनानी विश्रांती लाभते. जी आवश्यक आहे. शरीर शुद्धीची हि क्रिया गरजेची आहे. 

दत्तजयंती ला पारायण का करतात ? पारायण म्हणजे नक्की काय ? :
एक वेळ ठेवून वाचन करणे, म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो, तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय.. नंतर येते एकभुक्त राहणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल, तर सातही दिवस तेच खावे. यानंतर पायात चप्पल न घालणे, सर्व दिवस काया, वाचा, मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर, सतरंजीवर झोपणे. खोटे न बोलणे. संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे. या नियमांचे पालन करणे, यात परायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेचं पारायण होय.  मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच. म्हणून करावे पारायण..! सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न व मंगलमय होते, शुद्ध होते. पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय. बाळाने कितीही हट्ट केला, तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते, तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे. पण, तेही नियमात राहून, कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व, या सर्वाचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण. मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच. म्हणून करावे पारायण..! सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न व मंगलमय होते, शुद्ध होते.

नवरात्र म्हणजे काय
संस्कृती मानवी व्यवस्थेच्या सखोल निरीक्षणांवर आणि पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि परमात्म्याच्या विविध पैलूंशी असलेल्या संबंधांवर आधारलेली आहे. आपण आपले सण कधी आणि कसे साजरे करतो यावरूनही हे दिसून येते. नवरात्रीचा शाब्दिक अर्थ "नऊ रात्री" असा होतो. या नऊ रात्री अमावस्या किंवा अमावस्या नंतरच्या दिवसापासून मोजल्या जातात. चंद्र चक्राचे हे पहिले नऊ दिवस स्त्रीलिंगी मानले जातात. देवीच्या स्त्री स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवीसाठी हा विशेष काळ आहे. नवव्या दिवसाला नवमी म्हणतात. पौर्णिमेच्या आसपासचा दीड दिवस हा तटस्थ काळ असतो. उरलेले अठरा दिवस पुल्लिंगी स्वभावाचे असतात. महिन्याचा स्त्रीलिंगी टप्पा देवीबद्दल आहे. म्हणूनच परंपरेत नवमीपर्यंतच्या सर्व उपासना देवीला समर्पित केल्या जातात. 
जेव्हा आपण "पुल्लिंगी" आणि "स्त्रीलिंगी" म्हणतो तेव्हा आपण लिंगाबद्दल बोलत नाही, तर आपण अस्तित्वातील मूलभूत गुणांबद्दल बोलत असतो, ध्रुवीयतेबद्दल बोलत असतो. जे तत्व सक्रीय ती ऊपासना प्रभावी.