Sunday, 29 June 2025

 

1 Shiv temple sutarwadi near pashan lake
2 shri someshwar temple baner
3 Siddeshwar Vruddheshwar Mandir, near savarkar bhawan shivaji nagar
4 Amruteshwar - Siddheshwar Temple, shaniwar peth
5 Shree Tarkeshwar Mandir, Yerawada
6 Panchaleshwar Mahadev Mandir, Erandwane near savarkar cloth holi
Rameshwar Mandir, Mandai
8 Shree Umamaheshwar Mahadev Temple,natu baug, shukrawar peth
9 Peshwe Kalin Mahadev Mandir, parvati paytha
10 Adinath Pimpaleshwar Mahadev Temple, swargate near vipashyana kendra
11 Shree Laxmishwar Mahadev Temple, Rasta peth

12 Shree Nageshwar Shiv Mandir, somwar peth
13 Vittahl wadi mahadev, sinhagad road
14 Baneshar mahadev baner cave

15 Pataleshwar j m road
16 Wagheshwar mahadev wagholi

निरूपण – परतवारी


निरूपण – परतवारी - सुधीर महाबळ यांचे पुसतक

सलग पाच वर्ष वारीचा एक लहानसा टप्पा पांडुरंगाच्या कृपेने केला गेला. जसं जसं वर्ष जातात तसं तसं वारी, पांडुरंग याच्यावर माझा जीव जास्त जडू लागला आहे. एक छोटा टप्पा करून, मला ओढ लागली कशी काय? काय असेत ते दिव्यत्व जेव्हा पूर्ण वारी करतात, दरवर्षी वारी करून काय वाटल मी लिहिती झाले, परंतु यावर्षी वारीच्या पूर्ण प्रवासाची त्यातील सर्व टप्पयाची, त्यात वाहत्या राहणाऱ्या वैश्णवांची दररोजची कार्य मला समजुन घेण्याची आतुरता निर्माण झाली. पुणे सासवड टप्यात तो मोठा अवाका आणि क्षमता पुसटशीच जाणवली. हो पुसटशीच कारण हे टिचभरच आहे. पूर्ण २५० कि.मी ज्या ध्यासानं  देहभान विसरून ती मंडळी जातात , चालतात, अनुभवतात त्यापुढे अगदी टिचभरच अनुभव आहे हा माझा.

रविवारी रात्री सासवडहून परतले. मनात खुप खळबळ होती. अनंत प्रश्न होते. मी क्षणभरच अनुभवलेला अनुभव अव्दितीय वाटत होता. तो किंचीतसाच आहे. मग नक्की भगवंताकडे जाण्याची वाटचाल कशी आहे? आयुष्यात टप्याटप्यान वारी करेन पांडुरंगाची इच्छा असेत तस होईलच पण आज मनात खूप कुतुहल, चुळबुळ जाणवली. सोमवारी कामाच्या प्रवाहात आले. पण मनात वारीचे अनेक प्रश्न होते. मन शांत करण गरजेच होतं आणि ती  हुरहुर पांडुरंगान जणू जाणतीच. मुमुक्षि ग्रुपवर सुधीर महाबळ यांचं परतवारी पुसक वाचा अशी रेणूची पोस्ट आली.

खलास मी शोध सुरू केला. झपाटल्यासारखा, ते शोधल आणि सुधीर महाबळांच्या नजरेत‌ली वारी अनुभवली. आज पहाटे ते पूर्ण झालं. सकाळी सातला मन ओसंडून व्हायलं, वारीचा एकेक भाग मी त्यांच्या बरोबर होते - नजर किती एमएम नी बारीक हवी हा मोलाचा धडा आज मला मिळाला. परतवारीतलं काय भिडलं ते नोंद  करत गेले. आयुष्यान जर कधी उद्‌धविग्न वाटल तर वाचायच म्हणून नोंद केली. ती अशी - 

वारीला जाताना "ऐश्वर्यकारी" आणि येताना "वैराग्यवारी" ही उपमाच मन जिंकून जाते. वारीतला माणूस स्वतः "मी"  बाहेर काढतो आणि देह नावाच यंत्र पाहू शकतो ही कल्पना भारी वाटती. बाबुरावांच्या पात्रामुळे संसार संपला ठरवायच कसं? हे खुप आवडतं भौतिकातून आध्यात्मिक होतानाची बारीक पुसट लाईन क्रॉस करतानाची संकल्पना उर्फ टिप या सदरात मी नोंदली. 

जगताना आपण आपल्यातता चंद्र आणि सूर्य कसा बघायचा ही भावना जब्रा आहे. अफाट वैराग्य आणि मनाचा तोल सांभाळतानाची अफाट ग्रहणशक्ती कमावती जाते ती वारीत. माळीणीची मानसिकता किती मोलाची होती. आपण कपड्‌याच्या मोहात कसे अडकतो, तीनं  मात्र  मातीचे पाय पुसाया स्वतःच लुगडं दिलं. का ? तर पायी वारीच्या वारकऱ्याची पायधूळ ती माऊलीच की हो! हाच विचार. ..... आपण माती लागली कि कपडे कसे झटकतो. 

वारीतील धनगर सदा जगमित्र यात मला गजर चित्रपटातल एक पात्रं आठवलं. जगात वावरताना संशय येतो पण वारी सारख्या अनोळखी अफाट जन सागरात चांगली साधी सरळ निष्कपट माणसं जगात आहेत हा विश्वास मिळतो. जगताना तो सकारात्मकतेकडची वाट दाखवतो.

वारीत कल्याणकरांचा ट्रक दोन वेळच जेवण देतो. मला तो एकदा तरी बघायचाच आहे. महाबळांनी अनेकदा भसाड्या आवाजातला कर्णा असा उल्लेवा केला आहे. पुणे सासवड टण्यात हा कर्कश भसाड्या आवजातला कर्णा चांगलाच अनुभवला आहे.

'झांबळे' हा नवीन शब्न समजता. मोलाची उच्चं बैठकीची माणसं या प्रवासात ओळखाची दृष्टी मिळते. जी दृष्टी जगताना उपयोगी पडेल, खरंच!  रात्री म्हणजे पहाटे १ वाजता उठुन १.३० वाजता चाल  सुरु करतानाचं रात्रीच नयनरम्य वर्णन मी प्रथमच समजले,  अनुभवते. हे मी परत पूर्ण लिहूनच काढणार आहे. 'जैसे चंद्रा आड आभाळ' ओवी झांबळे शब्दाचा अर्थ सांगते.  ही पूर्ण ओवी शोधणार आहे मी. पहाटेचा रस्ता आणि काळ्या रंगाच्या विविध छटांमध्ये महाबळाना सापडलेला पांडुरंग महाबळांच्या नजरेतून पाहताना वाटल की मी तो रास्तच चालत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधी बद्दलच्या नामदेवांच्या ओव्या मी शोधुन वाचणार आहे. मगच यातल वाचलेल उच्चारेन, हा माझा घराचा अभ्यास असेल. आपण घरात राहायता जागा नाही म्हणणारे पांढरपेशी पण वारीत येणाऱ्या वारकरी लोकांना एक शेतातली खोली ठेवणारं - आजीच मोलाच्या मनाचं कुटुंब जीवाला चिमटा काढून जातं. वर्ष श्राद्ध घरात पण तरी शेतावरच्या घरात वारकरी नेहमीप्रमाणे जेवणार. घराला कुरुप नसत याकाळात का? तर माऊती येतील आणि वापरून जातील. हा अनुभव खुप काही शिकवून जातो. माऊलींना पाहायची एक नाविन्यपूर्ण पद्धत समजली.  माऊली वर्षभर नजरेत भरून राहवे यासाठी दोन्ही तळहात जमिनीलगत, समांतर आणि मनगट भुवईतोवर घेत माऊलींना पाहायचं- अहाहा! सुखद अति सुखद संकल्पना.

पहाटे उठुन वारकरी चाल सुरू करतात. परतवारीतल पौर्णिमेनंतरची पहाट - वर्णन काय ? तर - 'चंद्राच्या स्वच्छ प्रकाशाचा पूर' काय ती उपमा ! कार्य ते शब्दांच वैभव!

एक बिगारी काम करणारा वारकरी रोजंदारीच काम करणारा.  आयुष्यात महिनाभर वारील राहून टिळेकरी काम करतो. जीवनाच अजब तर्कशास्त्र ते अस की दिवसात ६०रू पण वारीत टिळेकरी दिवसाला ७०० रु. कमावतो. विश्वास हा कि माऊनी महिनाभर पोट  भरतात उपाशी ठेवत नाहीत. फुकट काही करायची मागायची वेळ येऊ देत नाहीत माऊली. महाबळांच्याच शब्दात तर्क वाचावा हे खरे. वीतभर पोर आणि हातभर टिपणी मस्त जोड.

आधी भाकरी ठेवायता फडकं नव्हतं हो ... आता माऊनींची वारी करतो परिस्थिती बरी आहे. यांच्या लेखीच देवाला का मानावं हे वाचाव.  काय पद्‌धत असते ना गावातल्या लोकांची सांगायची स्तुत्य होती ती कान्होबांची बोली महाबळांच्या लेखी. देह हा तुझाच रे भगवता 'इदं न मम'. मेल्यावर देहावर तुळशीपत्रं ठेवतात, पण वारकरी आधीच तुळशीमाळ घालून ते करतात. यात येणाऱ्या घामच रूपक काटा आणणारं भाष्य वाटलं सोपानकाकांचं. म्हातारी साठी ज्ञानेश्वरी विकत घेणाच्या मारुतीच्या पूर्ण कथानकामुळे जीव कोंडतो. हुंदकाच येतो. आपण काय किंमत करतो पोथ्यांची ? सोन समोर पण बघण्याची दृष्टी गमवत चाललोय.

नीरा नदितला पादुका स्नान सोहळा मला प्रत्यक्ष पाहायचाच आहे. हरीपाठाचा  २७वा अभंग नक्की वाचणार. (झाला महार पंढरीचा हि चाल ) मला वाटत माहेरी जाऊ गं...  नामदेवाच दर्शन घेऊ गं ... 
उत्तम  (भाग - स्नेहबंध ते नादब्रहम)

विवंचना टाकून  वारकऱ्यांसारखं नाचून पहा का? ते  तेव्हाच कळेल. वरातीत नाचतो ते नव्हे. हरीनामात रमून बेभान नाचणं,  अहो भाग्य लागतं  यासाठी सहज जमत नाही ते.  पण प्रयल तर करा... वैष्णवजनच ते जे बेभान नाचतात. माऊली सदा धनगर यांचा भाग वाचण्यासारखाच. प्लॅस्टिक कागदाच महत्व वाचताना हसू आलं कारण दिवेघाटात मी ते अनुभवलं ना..  रेनकोट खिसगणतीत निघाला की.

सुखी माणसाचा सदरा वाचताना जुने काही संदर्भ आणि व्यक्ति झरकन डोळ्या समोरून गेल्या. अचानक येणारी सर गर्दी सारून रस्ता दाखवते हा अनुभव दोनदा सासवड टप्प्यात आला. सॅकची चेन उघडल्या सारखा (भा.पो.) अंथ माणसाच्या भजनाचा गजर... हे दृश्य मेंदूत कोरलं गेलं .... अहा काय शब्द..  महाबळांना साष्टांगच !

आपण इथवर आलो  पण हा नामाचा महिमा. हा मात्र आहे २८ किमी चाल  दिवेघाट यात तो समजला.  रामकृष्णहरी.... ईठोबा माऊनी तुकाराम.... हरिणामामुळे त्रास आणि वेदनेचे विचार डायव्हर्ट होतात. जगताना याचा वापर करायचा ही शिकवण....

कल्याणचे सखाराम त्यांच्याकडचे मोफत जेवण सासवडला थांबवतात. पुढे गरज नसते १००% पटलं.  'सखा आकाशा एवढा' सदरात अन्नदानाच अत्यंत सुंदर महत्व पटवल त्यांनी.  प्रत्येक प्रकारच्या दानाचा सविस्तर संदर्भ आयुष्यभर लक्षात राहील. अन्न्दान महापुण्य का ? हे कधीही विसरणार नाही.

सुखाचं मोजमाप, मांगल्य शोधण्याची सवय वारीत लागते ही बहुमूल्य लेणी अवगत झाली. वर्षभर जपलेली १० ची नोट वारीत दान केलेली माऊलींनी स्विकारली या भावनेत पावतीला नमस्कार करणारी वयस्क आजी पैशाचं आणि समाधानाचं,  मारुलीच्या प्रतीच्या ध्यासाचं मोल शिकवून जाते.

माऊली परत आळंदीत पोचतात ते वर्णन मस्तच. यात माऊलीची पण दृष्ट काढती जाते वाचतानाच टपटप टपकतं मन गालावर. वारी करताना बंधन नाही पण शिस्त पाळत क्षमतेप्रमाणे, नामाचा महिमा अनुभवत काहीही अपेक्षा न ठेवता चालत राहायच हे यात समजत. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेले भक्तांचे चार प्रकार मी मात्रं नोंद केले. 

पुणे ते सासवड पायी वारीनंतर, परतवारी पुस्तकामुळे का कोण जाणे मन शांत झाले. मला हलकं वाटायला लागलं. रेणू‌चे आणि महाबळांचे आणि यांना आयुष्यात आणणाऱ्या पांडुरंगाचे अनंत अनंत आभार. 

जय श्री कृष्ण 
गौरी पाठक 
२८ जुन २०२५

Tuesday, 24 June 2025

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा..

वारी म्हणजे नियमित पाने भगवंतास भेटायला जाणे! पंढरीची वारी म्हणजे भावपूर्ण धार्मिक आध्यत्मिक यात्राच कि... जी जीवनातील अनेक रहस्य उजागर करते. हि करायची ईच्छा मनात यावी लागते. ती मनात अनंताही तोच आणि ती पुरी करून घेणारेही तोच असतो, पांडुरंग!

मागे सलग चार वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी लाभली. या प्रवासातील मुमुक्षूनि मिळून यंदा पुणे ते सासवड टप्पा करू असा मागच्या वर्षी मनात आखलं होते. त्याचा पांडुरंगी आठवं करून दिला आणि ती पूर्ण करून घेतली. 

ai दिंडीमुळे खूप सहज सुकर झाला हा मार्ग. पहाटे ४.३० वाजता चांदणी चौकात आम्ही पोचलो. ५. ३० ला मगरपट्टा हडपसर ला पोचायचे नियोजन होते.

ai दिंडीचे सगळे जण एकत्र जमलो. कोरडा नास्ता चहा कॉफी होती. रेनकोट ताब्यात घेतले. आणि ai दिंडी पुणे सासवड पायी वारीसाठी प्रस्थान झाली. कोणी झेंडे कोणी म्युझिक सिस्टिम असे बरेच सामान घेतलेले व्हॉलेंटियर होते. सगळे एकरूप  बघताना उभारी वाटत होती. यंदाचे टोपीचे वाक्य पाहून जोश वाटत होता : रक्षण्या सिंदूर, 'वर' करी शूर. 

मगरपट्टा साऊथ गेटवर एकत्र जमून नामाचा गजर झाला. अभंग आणि माउलींचा गजर यातला सहभाग भारावून टाकणारा होता. आम्ही गाडीत बसलो तेव्हा एक सूचना मला जास्त आवडली आणि भावली सुद्धा. जेव्हा मुख्य रस्यावर लागू तेव्हा आधी त्या हमरस्त्याला नमन करा. ज्यावरून अनेक वारकरी पांडुरंगाची आस मनात घेऊन अनेक वर्ष चाल करत आहेत तो आदरणीय समजावा. त्यावरून माउली स्वतः जात आहेत अनेक वर्ष. अनेक संत मंडळींची पायधूळ त्यालाल लागली आहे. त्याला  नमस्कार करूनच आपण वारीच्या भाकीसागरात मिसळुया. काय सुरेख भावना आहेत. मनापासून आभार त्या दादांचे ज्यांनी असा सुंदर विचार दिला. कोणाला कसा दिसेल भेटेल भगवंत ते आपण सांगू शकत नाही पण मार्ग दाखवणारा पण नामांतुल्यच मानव नाही का ! 

बघता बघता हमरस्त आला. कपाळावर गंध आलं, सगळ्यांचे पिशवीतून टाळ वर आले, ai दिंडीच्या टोप्या आता डोक्यावर  स्थिरावल्या. सातच्या सुमारास ai दिंडी प्रस्थान झाले. हडपसर गाडीतळ जवळ अफाट जनसमुदाय एकत्र मिळाला. आनंदाचा पूर होता, वातावरणात भक्तीमय सूर होता. हडपसर गाडीतळ चौकात उजवीकडे वळावे असे दिशादर्शक -- दिंडीचे कार्यकर्ते मार्ग दाखवत होते. त्याशिवाय त्या प्रचंड जनसमुदायाच्या मार्ग समजणे अवघडच होते. सर्व मंडळी भेकरे नगर कडे मार्गस्थ झाली. एक ढोलकी वाले दादा ai दिंडीचा झेंडा आणि अभंग म्हणणारे एक दादा यांच्या मागे आम्ही निघालो. मस्त टाळ, मृदंग रस्ता आमी आम्ही पांडुरंगाच्या नाम गजरात निघालो. इथून पुढे सगळे जण आपापली चाल चालत होते. गट गटांनी ai दिंडीच्या माऊली पुढे सरसावताना दिसत होत्या. 

मगरपट्टा साऊथ गेट ते हॉटेल विजय एक्सझीक्युटिव्ह १३ - १४ किलोमीटर चाल होती. किलोमीटर हे मापन घरी पोचलो तेव्हा शोधलं. मुखी माऊली च नाव सोबत करायला त्याच भावाचे साथीदार असतील तर कसली आठवण येतेय बाकीची. 

या वाटेवर अनंत माऊलींचं दर्शन होतं : काही माऊली (वारकरी) सुसाट वेगानं पंढरीची वाट पकडतात ती भगवंताच्या भेटीची आस दाखवतात, काही माऊली (वारकरी) भौतिकातील वस्तू कशा क्षुल्लक आहेत याची पावती देतात, काही माऊली आपल्या ठाम भक्तीवर कसा वातावरणाचा पडसाद न पडत ती अखंड ठेवत चालायचं हे शिकवतात,  तर काही माऊली कष्टी असूनही आपण हसून राहू शकतो हे भेगांचे पाय असूनही हसतमुख चेहऱ्यातून दाखवतात, काही तर पोटाची खळगी भरायची ती तेवढीच तिचा फाफट पसारा असायची गरज नाही हे दाखवतात, काही माऊली साठवणूक करून परमार्थ करा हे शिकवतात कसं ते विचार करा. वारी करताना स्वतःच्या गरजा काय आणि किती याचा साक्षात्कार होतो. मानवाने  आध्यात्मिक व्हावं म्हणजे नेमका कसं ते यात समंजत.  आयुष्यात काय कमावलं पाहिजे म्हणजे काय गमावत नाही याची झलक मिळते. 


त्यामानाने मगरपट्टा ते दिवेघाट सुरु होण्यापूर्वीची जागा यात थोडा आता अराम करून घाट चढू असा वाटणं साहजिकच होत. सगळेजण ai दिंडीनी नियोजन केलेल्या जेवणाच्या जागेवर एकत्र जमलो. १२ वाजता विजय हॉटेल वर पोचलो. हा रस्ताभर रस्त्याचं काम सुरु असल्याने वारकरी विभागले जात होते. अरुंद पुलावरून जाताना खरी सामंजस्याची बैठक समजून आली. कोणी  नसूनही अजिबात न धक्काबुक्की करता तो भाग पुढे सरसावलो. कोणी पण पायावर पाय पडला, हेलपाडाला तरी माऊली म्हणत पुढे सरसावले जात होतो. आपोआपच ती असं लक्षात आलं. मधेच दोनदा जोरात आलेल्या पावसाच्या सरी पांगापांग करून गेलेल्या. मज्जा आली. जीवाची उलघाल जणू तो विठुराया पाहतोय आणि पाणी शिंपडत असे वाटले.  हॉटेल विजय ला थोडा विश्राम जेवण करून मग रिंगण झालं. फुगल्या झाल्या. जरा चार्ज झालो. बरोब्बर १. ३० वाजता सर्वजण दिवेघाट चढायला सुरु झाले.  मनात हाच विचार होता कि हे पंढरीनाथा किती आहे मोठा हा घाट तूच नेरे त्याच्या पार. तो चढताना लक्षात आलं कि आयुष्यात भाग्याने लाभलेला हा पुणे सासवड पायी वारीचा हा टप्पा. त्यातला दिवेघाटाचा भाग खरोखरच त्या मुख्य वारकरी मंडळींच्या साथीनं, अभंगाच्या ठेक्यानं आणि माउलींच्या घोषानं सहज पार पडला. आज शरीराचे, भक्तीचे आणि परमेश्वराच्या ओढीचे मोल समजले. आळंदी पुणे टप्प्यापेक्षा हा मोठा आहे. तो त्यांनाच पार करवला.  हे पांडुरंगा अशीच मायेची पाखर अनुभवत आपल्या सेवेत राहण्याचीबुद्धी द्या.
 
दोन्ही बाजूला हिरवा डोंगर मधे वारकरी काय सुरेख नजर होता. हिरव्यागार रस्त्यावर पारिजातकाचं जणू पायघड्या घातलाय असा तो घाट दिसत होता. कितीतरी माऊली नामाचा गाजर करताना डिसास्ट होत्या आम्ही त्यात मम म्हणत जोडले जात होतो. थोड्या वेळातच आम्ही रेनकोट काढला बेकार उकडायला लागलं होतं. आपण कल्पनाही करू शकत नाही असं सामान लादून वारकरी चढ चढतात. जवळजवळ १२ वळणं गेली मग ती विठुरायाच्या काळ्या मूर्तीची किनार दिसू लागली.



 हेच ते पठार, हाच तो विठोबा, जो पाहत घाट चढत येतो आपण आणि शारीरिक वेदना विसरून गहिवरून जातं मन... या लोभस मूर्तीची झलक दिसू लागली कि आपोआपच उभारी येते. .. मनात कालवाकालव होते...  जणु  तो आपल्याचकडे बघून मंद हसतोय असं वाटत. जेव्हा आपण अगदी समोर पोचतो त्या सावळ्या मूर्तीच्या तेव्हा ती मूर्ती नाही तो हलकासा हालत भगवंताचं भासतो... 


हि अनुभूती अंगारवर शहारा आणते, काय उच्च अनुभूती... हलकं वाटत. .. ते लोभस सावळं रूप पाहून अहा !
मागे काय झालं ? पुढे काय होईल ? कशाकशाचाही विचार येत नाही. अफाट जनसमुदायाच्या लाटेवर आपण आपोआपच पुढे जात राहतो... पावलं जड होतात, आपण मागे वळून वळून पाहत राहतो... इकडे जरा गडबड होती एक वारकरी आजी चक्कर येऊन कोसळ्याच समजलं. त्यामुळे आणखी काही क्षण तिकडे थांबायला मिळालं. डोळे भरून तो सावळा रुक्मिणीकांत हृदयात साठवला. आज जो तो बघितला तो परत नाही दिसायचा. कितीहि वेळा आले या घाटात तरी नाही. आजचा विठुराया वेगळाच. आज समजलं कि पालखी जाताना लागणाऱ्या गावाच्या नावाचा अर्थ खरंच अर्थपूर्ण आहे. प्रत्येक टप्प्यात वेगळी गुपितं लपलेली आहेत. 

घाट उतार सुरु झाला आणि मनात ज्ञानेश्वर माऊलींची पावलं पालखी आता दिसेल याचे वेध लागले. पुढे ४-५ किलोमीटर वर पंचवटी फॅमिली रेस्टोरंट मध्ये सगळ्यानी जमायचं नियोजन होत. घाट उतरताना जो गार वारा  अनुभवाला तो वेगळाच होता. त्यात आनंद होता, त्यात मनाचा हिय्या होता, त्यात भेटीची आर्तता होती, त्यात अनुभवलेली कृपेची हळुवार फुंकर होती, त्यात भगवंताच्या प्रेरणेने झालेली ईच्छा त्याच्याच मुळे पूर्ण होतानाच समाधान होत. आत्ता समोर असेल पंचवटी रेस्टोरंट म्हणत चार पाच किलोमीटर गेले असतील. त्याच्या जवळ पोचायच्या आधी मस्त थंडगार लिंबू सरबत दोनदा दिलं त्या पांडुरंगी, त्यालाच दया आली असेल कदाचित आम्हा पामरांची. 

४. ४५ ला संध्याकाळी पंचवटीला पोचलो. एकेक करत हळूहळू सगळे पोचत होते. काहीजण काळे लॉनवर पसरलो, काही जण पितळ भाकरी कडे वळलो तर काही जण पुढे सासवड ला जाताना पण दिसत होते. तासाभरात कीर्तन सुरु झालं.  आता माऊलींच्या रथाकडे डोळे लागले होते. कथेकरी महाराज खूप मौल्यवान माहिती देत होते. बाहेरचे सेवेकरींचे आवाजही खूप येत होते.  

८ च्या सुमारास तो क्षण आला. सगळी भौतिक व्यवधानं विसरून -- दिंडीचे १८०० डोळे त्या सासवडच्या वाटेवर विखुरले होते. त्या क्षणा पर्यंत त्याच्या अनमोलतेच्या दिव्यतेची कल्पनाच करत होतो. माउलींचा रथ जस जसा जवळ येऊ लागला तस तसं मन भिरभिरत होतं. ती दिव्यता जवळ येताना भासत होती. आपोआपच आसमंतात वेगळेपण येताच येत. फुलांचा सजवलेला रथ त्यामानाने जरा संथ गतीनं येत होता त्यामुळे आम्ही तो डोळे आणि मन भरून पाहू शकलो. जमिनीवर संध्याकाळचा किंचितसा अंधार तर वर आकाशातला भरून आलेला ढगांचा काळसर रंग त्यात दिव्य प्रकाश रोषणाईतील रथ हलकेच समोर आला. आतून चंदेरी प्रकाश बाहेर झेपावत होता.
 प्रत्येक मनावर तो पाखर करत होता. नंतर त्या सुंदर तेजोमय रथातली पालखी नजरेस पडली आणि जगाचं भानच राहिलं नाही. अहो माऊली आल्या होत्या... आणि नेत्रांवाटे पूर हि आला होता... का कोण जाणे उर गदगदून भरून आलं आणि चित्ती समाधान पावलं. खरंच कि रे पंढरीनाथा अजबच कि रे तुझी लीला क्षणभर दर्शनाने जीव सुखावून गेला! 
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा... गाण्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा... 
माउली दर्शनंतरच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमातील या ओळी मनाला खूप भिडल्या. भक्तीच्या आनंदाचं महत्व आयुष्यात असाच टिकवण्याची बोधी द्या पांडुरंग!

भरून पावलेली -- दिंडीची ९०० मनं सुंदर प्रवासाच्या सुगंधी आठवणीत बसनी घरी परतताना  मनात पुढच्या वर्षीच्या टप्याची चर्चा सुरु होती.. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे -
"पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे |
बहू खेचरीच रान | बघ हे वेडे होय मनं ||"

राम  कृष्ण हरी !!
सौ. गौरी पाठक 
_____________________________________

Monday, 16 June 2025

बदलाला सामोरे जाताना...

 


आज सलग २१-२२ वर्ष कामावर जातानाचा रस्ता माझा दोस्त झालाय. रोजचा सहवास माणसाला जीव लावतो खरंय. पण अनेक वर्ष सलग सतत त्याच रस्त्यावरून त्या ठराविक वेळी प्रवास करताना तो आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटकच होऊन जातो. 

मला आठवतंय : रोज सकाळी निघालं कि समोर दिसणारी फुल तोडून पिशवीत भरून जाणारी एक आजी, एक उंच माणूस तिरक्या चालीनी चालत जातानाचा, चौकात लाल दिवा लागला कि थांबल्यावर दिसणारे फुल विक्रेते, यांची तर पूर्ण परिवाराची ओळख झालेली आहे, जे लेकरू ती बाई कडेवर घेऊन फुल विकते तीच मोठी होऊन गर्भारशी होईतोवर मी बघत आले आहे, आता ती बाई फुटपाथवर बसलेली असते, यांच्यात पुरुष कधी दिसत नाहीत, ठराविक वेळेला एका देवळा समोर उभं राहून घट्ट डोळे मिटून आर्त विनवणी करणारे एक काका, जे कोडं आहेत मला कि रोज आर्ततेने हे काय मागतात?, थोडं पुढं माग झालं कि ते दिसत नाहीत मग समजायचं आज एक तर लवकर किंवा उशिरा निघाले मी. अनेक वर्ष सकाळी भेटणारी पेट्रोल पंपावरची ताई आता कुठंपण दिसली तर हसून ओळख देते, हक्कानं विचारणा होते कि ताई खूप दिवस पेट्रोल भरायला आल्या नाहीत? घरातून निघताना पासून कामावर पोचेपर्यंत चे माझे सुप्रभात चे मानकरी...  बरेच आहेत. एक आजोबा मला म्हणतात भेटलं कि - "काय ग काल सुटी होती का ? " तुझं सुप्रभात ऐकलं नाही कि सकाळची सुरुवात होत नाही. तू माझी सुप्रभात क्वीन आहेस. असा सकाळचा प्रवास असणार असेल तर कोणाचं जगणं कंटाळवाणं असेल. जिना साफ करणाऱ्या, सकाळी कामावर पोचतानाच दिसणाऱ्या रास्ता सफाई कामगार बायका, कशा विसरू शकेन मी, सणासुदीला नटून थाटून कामावर जाताना कधी त्या मला तर कधी मी त्यांना हातानं छान दिसतंय खुणावल जायचोच. कशी मौल्यवान आठवण आहे हि! गाडीवर असताना दिसणारे सम सुखी अनेक आहेत. घरी जाताना दिसणारी गजरेवाली ताई, कॅलेंडर विकणारे काका, असे अनेक अनेक आहेत.

आयुष्यात नोकरी कारण गरजेचं आहेच पण ती करताना गेले २१-२२ वर्षात असे सकाळचे संध्याकाळचे घड्याळ असणारे अपरिचित असूनही मला आपले वाटतात. कोणी कोणाला काहीही देत नाही घेत नाही फक्त हसतो, काय जादु आहे ना स्मितहास्यात !

काल अचानक मेट्रोने ये जा करायचा योग आला. तो मार्ग खरंच सोयीचा आहे. कालांतरानं तो अवलंबला जाणार आहे, ती गरज असणार आहे आणि सोय सुद्धा. याची काल हलकीशी जाणीव झाली. मी प्रथमच एकटीनं मेट्रोचा प्रवास केला. पूर्णवेळ मी काचेतून खाली पुणं बघत होते, परंतु मला माझा २२ वर्षाचा कामावर जातानाचा सगळ्या घड्याळांचाच विचार येत होता. ती वीस मिनिटं मी माझ्या आयुष्यातली २२ वर्षातली कामावर जातानाची येतानाची सगळी घड्याळं डोळ्यासमोर काचेवर पाहत होते. दुचाकी सोडून मेट्रोची प्रवासाची सुरुवात होतानाच्या बदलला सामोरं कसं जाईन याच विचारात मी होते. मन आनंदी पण होतं पण तळमळ, हुरहूर पण वाटत होती. या घड्याळांची मला खूप आठवण येईल. जर या नवीन वळणावरच्या बदलला मला समोर खरोखर जायची वेळ आली तर माझं कसं  होईल?

त्या २१-२२ वर्षातली माझी घड्याळं कालांतरानं पुसट होतील या भीतीनं आज मी लिहायला बसले आहे.  मला ती कधीही आठवतील अगदी स्पष्ट मला खात्री आहे पण तरी आज बदलला सामोरं जाताना लिहावंच असं वाटलं. आयुष्यात पुढे अनेक वळणं येणं बाकी आहे. हि तर सुरुवात आहे. नवीन घड्याळ वाट पाहत असतीलच कि... कान्हाजी म्हणतात कि आपण जिथे आहोत तिकडचे असावे. कधीही बदलाला सामोरे जाताना सकारात्मकच असायला हवं. आयुष्यातलील सुंदर अनुभवांनी शिकावं आणि चुकांनी सुधारावं. समोरच्यांचे नकारात्मक विचार पण चांगलं शोधून सकारात्मकता वाढवण्यासाठी अमलात आणायला शोधायचे हा टास्क अश्या प्रकारच्या बदलांना सामोरे जाताना खूप उपयोगी पडेल. 

मग विचार आला लग्नानंतर नवीन दिनचर्या झाली त्या बदलाला पण मी किती दृढ विश्वासाने सामोरी गेले होते. आपलच आपल्याला आठवत जातं कधी कधी. आपण केलेली डबा करून, घर आणि स्वतःला यावरून कामावरची वेळ गाठायची खटपट,  त्या गडबडीतही केली व्रतवैकल्यं, दुखणी खुपणी सगळं. जीवन किती सुंदर असत ना ... सतत काहीतरी नवीन घडत असत अवती भोवती. इतके वर्ष काम करताना जीवनात आलेले दोस्त लोकं. किती बहुमूल्य आठवणी आहेत. कोणी कोणी बरोबर कामाला नाही आता, पण १२ -१६ वर्ष एकत्र ८-८ तास जगलॊ. आनंद, दुःख, त्रागा सगळं एकमेकींना समजू लागलेलं इतकं एकमेकींना ओळखू लागलेलो. हे घड्याळ तर नशिबानीच मिळतं कि.. आयुष्यात सुंदर आईपण अनुभवलं हा सर्वात सुरेख बदल होता आज वरचा आणि वयाप्रमाणे शरीरातील बदलाला पण तर मी किती छान सामोरी जातेय.. खरंच कि...  

काल मेट्रोत बदलाला सामोरे जातानाचा जेव्हा विचार आला तेव्हा लक्षात आलं कि हा होणार बदल फारच लहान आहे. आजवर अश्या अनेक बदलांना सामोरे गेलेली आहे कि मी. पुढे अनेक बदलांना सामोरे जायचे आहेच , कदाचित त्यासाठीच कान्हाजीनी आज सिंहावलॊकन करावलं कि काय कोण जाणे. त्या योगे अनेक लोकांची आठवण झाली ज्यांना अश्या अनेक मोठाल्या बदलांना सामोरे जावे लागले आहे. शिकण्यासारखेच आहे. 

असो आज उजाळा मिळाला त्या सगळ्या घड्याळाच्या आठवणींना.... सगळ्यांना धन्यवाद.  त्यांच्यामुळे कामाचा काळ सुंदर गेला आणि थँक यु त्या छोट्या ताईला जिच्यामुळे मेट्रोचा प्रवास समजून घेताना मजा आली. मला ठाऊक आहे हे फार काही अवघड नाही असं म्हणून काही जण हसतील सुद्धा मला. परंतु माझी काही हरकत नाही कारण त्यांना तो अनुभव अजून यायचा आहे ना ! एखादी गोष्ट अनुभवली कि तिची सुलभता समजते. ते करायची क्षमता असतेच पण वेळ यावी लागते. हे समजायला अवघड आहे, बघा समजतंय का काय म्हणायचंय ते. मी मात्र आज खूप आनंदी आहे खुश आहे. कोणती पण लहानशी गोष्ट मिळाली कि तो आनंद साजरा करायचा, मी श्रीमंत झाले म्हणायचं. माझी जुनी सवय आहे. त्यामुळे पेशी पण आनंदी होतात त्यायोगे मी पण. 

Lets time to party now!

जय श्रीकृष्ण !

सौ. गौरी पाठक 

९९७०१६८०१४