Wednesday, 23 April 2025

स्वछंदाचा मार्ग मोकळा !

 स्वछंदाचा मार्ग मोकळा !

विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.

एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५

No comments:

Post a Comment