Monday 20 March 2023

४) चैत्र (मार्च - एप्रिल ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

 

चैत्र महिना माहिती 
 आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. उन्हाच्या झळा जाणवत असताना, गुलमोहराला अपूर्व ‌रक्तिमा चढते आणि तो आपल्या फुलांचे सडे घालू लागतो. चैत्राचे ऊन म्हणजे फक्त झळा असे नाही. तर, त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते. झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी. चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग ती आपणाकडे येते. 
 
सण
गुढीपाडवा  : चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे
 

चैत्र नवरात्रारंभ : महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.चैत्रांगण काढले जाते. कैरी चे पन्हे आणि डाळ याना फार महत्व आहे.  या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.
 
 
चैत्रांगण
 


१) मत्स्य जयंती
) राम नवमी :   : या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.
४) महावीर जयंती : हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो. भारतभर त्यांनी जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला . आणि  ६ वे शतक इ.स.पू. मध्ये मोक्ष प्राप्ती - महावीरांचे वर्षांच्या ७२ वयात निर्वाण झाले . अहिंसा, सत्य , अस्तेय ( चोरी न करणे), अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद (अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन) व स्याद्वाद यांचे सिद्धांत शिकवले.

५) हनुमान जयंती : चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. हनुमान हा सप्त चिरंजिवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे.
गाणी कविता :
 
नटली चैत्राची नवलाई
घालू सडा अंगणी चल ताई
सकाळ आली बाई
त्यावर काढू चल रांगोळी
ठिपके देऊ आळीपाळी
घेईन गरगर गिरक्या ताई
मी तर भवरी बाई
पूजिन तुलसीवृंदावन मी
मागीन वर लवलाही


भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे | 
वसंत वनात जनात हसे, सृष्टीदेवी जणु नाचे उल्हासे | 
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट
 
 लॉजिक नवीन पिढी साठी : 
चैत्र  नवरात्र
आता नवरात्र म्हणजे नक्की काय? तर पुरूष आणि प्रकृतीमधली प्रकृती म्हणजे स्त्री तीची महती जाणुन घेणं. तीला सलग नऊ दिवस व रात्र एकाग्रतेने पुजण हे झाल एक प्रकारच मेडीटेशनच. प्रत्येकात असलेल्या या ऊर्जेल शक्तीला समजुन घेण्यासाठी हिंदु धर्मात चैत्र व अश्विन अशी दोनदा देवीची शक्तीची आराधना करतात. 
पावसाळा संपून हराभरा परिसर झालेला असतो तो निसर्ग भरभरून देतो तेव्हा तो आनंद वाटुन सिजरा केला पाहिजे. कोणतही नवरात्र सुरू होण्याची तिथी ही तितकीच महत्वाची इणि आजच्या पिढीचूया दृष्टीनं लाॅजिकची आहे.  त्या त्या तिथीला निसर्गात होणारे बदल मानवाला वापर होऊन त्याची प्रगती होण्यासाठी काही नियम घातले आपल्या पुर्वजांनी. थोडक्यात काय तर या आठवड्यात आपल्याला ऊपयोगी अशा निसर्गाच्या ऊत्पन्नतेचा फायदा करून मन एकाग्र करून योग्य जगण्याचा मार्घ सापडण्यास मदत होऊ शकते. त्यावेळच्या समाजात हे करताना जे नियम वापरून त्याचा लाभ घेता येईल अस ते आखले गेले.  आताच्या शतकात त्यामागचा हेतु लक्षात घेऊन आपण तो निसर्गाच्या ऊधळणीचा फायदा करून घेतला पाहिजे. कोणौअयाही नवरात्रात न ऊ अःइवस त्या आराध्याला नमस्कार करून दिवा लावुन पण ते प्राप्त होईलच की जर ते केल नाही तर निसराग जे देतो ते फुकट जाईल जे ही पिढी विकत घेऊ शकत नाही. 

अक्षय तृतीया 
ज्या तिथीचा क्षय होत नाही असा दिवस. नवीन काम सुरू क,ताना ऊल्हास ऊभारी असेल तर ते काम सहज सुखर होतं. निसर्गात या दिवशी मन ऊलाहासित राहण्यासारखे वातावरण असते जे मानवाला एभारी अःएते. म्हणुन ननीन गोष्टीचा शुभारंभ या दिवशी करतात. 
आताच्या पिढीन आज आंबे निसर्गाच सर्वोत्तम गोडवा देणारं फळ अनूभवाव म्हणजे  लाॅजिक समजेल. आज आराध्याला नमस्कार करून निसर्गाचे आभार मानत आमरसावर ताव मारायचा. आपल्याला जे काधी मिळालय यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात त्यांना स्मरून कृतज्ञता म्हणुन का होईना नैवेद्य दाखवतात अस लाॅजिक लावल तरी हरकत नाही.
 
 

No comments:

Post a Comment