"ते" चार दिवस "त्या" चार आठवणी
वसंत ऋतूच्या आगमनानं कसं पालवी मार्फत निसर्गातील बदलांची चाहूल लागते. अगदी तस्सच त्या दिवसा आधी व्यष्टीच्या आतमध्ये पेशी गोल गोल फिरू लागल्याची चाहूल लागली कि समजायचं ती येतेय. तिच्या आगमनाची पावती पूर्वी त्रासदायक असायची पण व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने ती आता सहज समजते. तर अशी हि ती चार दिवस आली आणि तिच्या बरोबर चार आठवणी देऊन गेली. चार दिवस वेगळे विचार आणि अनुभव.
हल्ली ती आली कि काही वेळ आधी घुटमळते, मगच येते. पण चार दिवस छान नवनवीन अनुभव देऊन जाते. यावेळी आली ती पण थोडी घुटमळतच पण खुश होती. तिच्या व्यष्टीमधल्या सगळ्या नातलगांना सांभाळून ती आलेली. आज तिचा पहिलाच दिवस होता. तिच्या बरोबर व्यष्टीपण दिवसभर खूप आनंदात होती. तिला सकारात्मकतेने सामोरे गेल्यामुले दिवसाअखेर काय एव्हरग्रीन आहेस तू? असे कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले. तिला बरोबर घेऊनच तो दिवस वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेलाही. आईच्या भाषेत मुडद्या
यासारखी झोपही लागली.
तीनं दुसरा दिवस गाजवलाच, व्यष्टीतल्या सगळ्यांना सकाळीच बजावलं होत कि काय कोण जाणे. लवकर उठायचं भरपूर चालायचं आणि आज दिवसभर खूप कामही उरकायचीत आहेत. आणि काय आश्चर्य ! तिने व्यष्टीबरोबर जे जे काही ठरवलं होतं ते ते सर्व पार पाडलंच. आज तीच खूप खुप कौतुक वाटलं. तीन पाठ थोपटायला कोणाचीही वाट बघितली नाही. या कामासाठी तीच तिला खूप पुरेशी आहे. तू स्वतः पुरेशी आहेस यासाठी कारण तू व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवली आहेस.
तिचा आज येऊन झालेला तिसरा दिवस होता. आज सकाळपासून मनात विविध विचार होते. भावनिक कल्लोळ होता. आज व्यष्टीला वेळ हवा होता तिचा स्वतःचा असा खास. तिनं तो घेतला. ती आणि व्यष्टी मिळून अवांतर गप्पा मारल्या एकमेकींशी सुसंवाद साधला, माया केली आणि मनमुराद हवा तसा सकाळचा वेळ घालवला. तीन ठरवलं आणि विश्वानी पण मग पदर खोचून तिला साथ दिली. आज तिला तो वेळ घालवणं गरजेचं होतं कारण दिवसा अखेर तिला त्यातून चार्जरची भूमिका बजावायची होती. दुपार कामात गेली. संध्याकाळी भावनांचा न सुटू शकणारा गुंता तिला समोरा जाणार होता. तीन केलेली कामं, ती करत असलेलं कामं आणि तिला भावी आयुष्यात करावं लागणारी कामं या सगळ्याचा लेखाजोखा ती उजळणी करत होती. ती संध्याकाळी तिच्या खूप जवळच्यांना भेटली पण दिवसाअखेर तिला जड वाटत होत. व्यष्टीच्या बाह्य मनाला ते उलघाल वाटत होत. मग सातत्यान चिंत्तन करायची सवय लावलेल अंतर्मन सरसावल त्यानं गोंजारले, थोपटलं, समजावलं, हलक्या आवाजातल्या अंगाईनी ते बाह्यमन कधी झोपी गेलं समाजलच नाही. तिचा येऊन झालेला आजचा तिसरा दिवस जास्त शिकवून गेला.
ती दरवेळी येते ना तेव्हा काही ना काही वानवळा आणतेच बरोबर. यावेळी व्यष्टीमधील संप्रेरकांवर फुंकर मारून संतुलन कसं साधायचं त्याची कुपी आणली होती.
आज होता तिचा चौथा दिवस. ती सकाळपासूनच जायचं परत म्हणून आपापलं आवारतच होती, पण वानवळा खूपच मस्त असल्यानं तिची व्यष्टीशी झालेली गट्टी तिला त्यातही मदत करत होती. जे जे आज सकाळपासून केलं त्यात त्यात ती भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जगू लागलेलं दिसत म्हणा किंवा जाणवत होत. मग तिनंच सुचवलं आज जाताना चार दिवसांच कोंदण नोंदच करून टाक सं सुचवलं. कस वाटत ना! खरं तर आज तिचा वर्षातला अतिशय दुःखद दिवस पण ती सकाळ पासूनच बरीच बरी होती. हा तिच्यातला बदल होता. चौदा वर्षातला. तिनं भावनिकतेवर मात करून अनुभवाची शिदोरी कशी वापर हे वाणं जाताना पदरात घातलं होत. ती आणि व्यष्टी दोघीही खूप खुश होत्या.
ये परत वेळेवर गं ... अस म्हणत कधी दिवस संपला आणि निघायची वेळ झाली समजलच नाही. व्यष्टीन तिचे आभार मानले, तिच्यामुळे सक्रियपणे समष्टीत मुक्त संचार करू शकते याबद्दल. तसेच व्यष्टीत पण योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने व्यवस्थित ठेवली आहेस यासाठी तिनसुद्धा पाठ थोपटली. छान न्ऊहा माखू घालून ती परत जायला निघाली. जाताना Do and Don'ts ची यादी पण देऊन गेली.
ती आली आणि चार दिवस मोलाच्या आठवणी अनुभव आणि शिकवणं देऊन गेली. त्या कोणत्या? हे तीच आणि व्यष्टीचं गुपितच आहे.
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
९९७०१६८०१४
११ मे २०२६
#####
आई ची आई होताना...
आई हि आपली आई जेव्हा असते तेव्हा ती काय काय करते आपल्यासाठी. अचानक ४० वर्ष मी मागे गेले हो कारण तेच कळतं वय असत. आई जेवू घालते, केसांची निगा राखते, स्वच्छता शिकवते, चांगलं वाईट वागण्यातला फरक शिकवते, रट्टे देते, रागावते सुद्धा. आईशिवाय त्या वयात पानही हालत नाही. काहीही झालं कि आधी भडाभडा आईला सांगायचं हे वय. तिनी सांगितलेली काम करताना अनेकदा धांदरटपणा होतो तो ती निस्तरते, लेकराला कोणीही काही बोलल तर धावून जाते, कपडे कसे घालायचे? शिकायचं महत्व काय ? नातेवाईक का महत्वाचे? कोणते किती महत्वाचे ? अचानक कोण आलं घरी तर काय काय करायचं? आपली माणसं आपली का असतात यावर आईच तिच्या बरोबरीच्यांशी होणार वागणं बघून ८ वयापुढं मुलगी जगत असते. आता ती आईकडून चापून चुपून वेण्या घालायच्या वयात आलेली असते. आई खेरीच कोणाचीही घालून दिलेली वेणी तेव्हा रास्त नसते. नंतरच्या वयाच्या टप्प्यात आईचे इथंवरचे कष्ट समजू लागतात. तिची घराप्रतीची तळमळ समजू लागते. तिनी अनुभवलेल्या गोष्टीवरून सुधारित आवृत्ती ती मुलीस सांगू लागते. काळजी पोटीच म्हणा पण आता ते वय आलेले असते. नंतर येते ती पाळी, जीवणातला अत्यंत महत्वाचा टप्पा पाळी. ४० वर्षांपूर्वी मुलींना १४-१५ व्य वर्षी पाळी यायची. तेव्हा तर आईशिवाय कोणीच नकोसे वाटते. आता कपडे कोणते घालायचे यावरही संशोधन सुरु होते. पचनी पडायला जड अश्या अनंत घटना या वयात येतात, तेव्हा आई हि आई न राहता विश्वासू मैत्रीणच होते. अशा आणि अश्या अनंत गोष्टी जेव्हा एक मुलगी आईला बघताना अनुभवते. पुढे
हीच लेक कालांतरानं आई होऊ लागते.
आईची आई होतानाचे मुलींच्या आयुष्यातले हे अत्यंत महत्वाचं वळण जगताना उच्च कोटीची सहनशीलता परमेश्वर आपोआपच अंगी देतो. धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय अस होतं मुलीच आयुष्य. उतार वयातल्या आईचे कोणाही समोर काही बोलणे वागणे जेव्हा होते तेव्हा तिची बाजू सावरताना होणारी भंभेरी वर्णन करणे जगातली अश्यक्य गोष्टच आहे. हि आधी अशी नव्हती हे ती मुलगी सतत सिद्ध करू पाहू लागते. आपल्या आईला समोरचे काय म्हणतील? तीचं बोलणं वागणं कसं घेतील? तिला जे म्हणायचं तेच समजतील का? याची सिद्धता करतानाची आईची आई होतानाची लेक फार फार घामाघूम असते. "अस नसतं आई अगं " ... हे सांगताना तिला तिच्यावर ओरडावे लागतेच. यावरच त्याच दुसऱ्या क्षणी भयंकर काहूरही मनात माजते ते मात्र पाहायला कोणीच नसते. आई असतानाचा समंजस पणा, ती समोरच्याशी पारखून बोलायची वृत्ती असणारी आई आणि हि आताची आई बराच फरक असतो. अस बोलून तूच वाईट किंवा चुकीची दिसतेयस हि गोष्ट काही केल्या तिला समजत नाही. तिला त्याची गरजच नसते. यावर आजूबाजूचे अचानक "का ग आईला असं म्हणतेस?" म्हणत दुजोरा देणारे तर काळकूट विषाचे नमुनेच वाटतात तेव्हा. भिजलेला स्पंज पिळला कि कसा दिसेल तसे आतडे पिळवटून जाते तेव्हा पण त्यास कोणीही बघायला नसतेच. पण यावर उपाय नाही. आईची आई होताना हे मी बऱ्याच मुलींना बघितले आहे कि तेव्हा अचानक पोटची लेक आईला आगाऊ आहे असे वाटू लागलेलं असते. हसू नका खरय हे. या वयात तिला "हे तुला सांगतेय कारण तू तिथे गडबड करशील. आधीच कोणास बोलू नको " असे सांगणे तर महा धोक्याचे असते. कारण सगळं सोडून तेच नेमके सर्वाना सांगून झालेले असते. आईला जगात सर्वानी नीट जोखावे यासाठीच हा आईची आई होतानाचा सर्वच मुलींचा प्रयत्न ९९ टक्के फसलेलाच असतो. असे जेव्हा होते तेव्हा मी तरी मनापासून खळखळून हसलेली मला आता आठवते आहे. लोकांसमोर व्यक्त होणारी आताची वयस्क आई आणि तिला जोखणारे समोरचे पाहून होणारी आताच्या मुलीची मनातली खळबळ ती मुलगीच जाणो. ती उकळत्या पाण्यासारखी मनाची स्थिती त्या परिस्थितीतली मुलगीच फक्त समजू शकेल.
आईची आई होतानाचे हे वळणं सगळ्याच मुलींना कठीण असेल असे नाही पण सहज सुकर असेल हे पण नक्कीच नाही. वयाच्या मोठ्या टप्प्यावर असतानाच्या आईची आई होणे हे फार फार जोखमीचे काम आहे रे बाबा. यावर उपाय एकच शांतीस धरणे. जगाचे ताशेरे दुर्लक्ष करून स्मितहास्यात सर्वाना सामोरे जाणे. आता मुद्दा हा कि असे त्या वयातल्या आईला का होत असेल किंवा का वाटत असेल? बुद्धी ज्या प्रमाणात कार्यान्वयीत असेल त्यावर हे असावे. स्मरणशक्ती आणि बुद्धीचा समन्वय असेल तर या गोष्टी कमी होत असाव्यात. पण एकंदरच या वयात तीन प्रकारची भीती मनात येत असावी. एक माझं करायची वेळ आली तर कोण असेल ना? माझ्यासाठी मी जपलेली माणसं वेळ पडली तर तितक्याच संवेदनशीलतेने सहकार्य करतील ना? मी केलेलं माझ्यावर वेळ आली तर विसरणार तर नाहीत ना? यासगळ्यासाठी या वयात कदाचित मन ते सतत सिद्ध करू पाहत. काळाची गरज असेलही ती. म्हणूनच मगाशी म्हटलं कि बुद्धी आणि स्मरणशक्तीच्या समन्वयावरच हे जे काही वाटणं आहे ते अवलंबून असावं. जगात आपलं असं कोणी आहे हि भावना किती मौल्यवान आहे हे या नात्यात दिसतं. आहे तोवर भूतलावर हा या आई टू आई नात्याचा आनंद घ्यायचा मग काय तर काळान सयोर हाडामासाची आई दाखवलीय तोवरच हे मग काय आठवणीच तर असणारेत.
एकंदरच एका मुलीचं आयुष्य मुलगी ते आई / सासू जे काही असेल तोवर अनेकानेक गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्यां युक्त तसेच मल्टि टास्किंग (हो ईकडे मराठी शब्द सापडेचना)असतेच असते. हे मात्र खरे!
सौ. गौरी पाठक
९९७०१६८०१४
१२ मे २०२६