४ डिसेंबर २०२५
रोज एका शब्दाची स्वतः च्या मनची ऊकल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही *शब्दकळी सोबत लेखन उपक्रम* चला लिहूया....
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही *शब्दकळी सोबत लेखन उपक्रम* चला लिहूया....
आज पासून ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करत आहे....
यावेळी यामध्ये मी रोज एक विषय किंवा शब्द देईन त्यावरून तुम्हाला चारोळी, कविता, कथा, अलक, लेख, ललितलेख मनाला वाटेल ते काहीही लिहायचं आहे....
ज्यांना ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांनी खालील लिंक वरून हाग्रुप join करा...
अट फक्त एकच ...रोज लिहून ग्रुपमध्ये पोस्ट नाही केलं तर ग्रुपमधून न सांगता remove केलं जाईल😅
सौ शब्दकळी विजया / शब्दकळी
#######################################################################
५ डिसेंबर २०२५
एक नवी सुरुवात
काय सुंदर विचार ना 'एक नवी सुरुवात' या बीजातुन येणाऱ्या अंकुरासारखी. मनातली ईतरांबद्दलची मळभ, मळकट विचारांची आवरणं फेकून ऊभारीन तेवढ्याच ताकदीने सकारात्मक विचार करत प्रकाशाकडे झेप घ्यायची. कोण काय म्हटल? कोण कस वागल? कोणी साथ दिली नाही दिली, हे सगळ सोडून या बीजातल्या अंकुरासारखीच रोज सकाळी एक नवी सुरुवात करतच जगायच हा विचार आठवडा झाला घोळत होता हा फोटो काढल्यापासून. आणि विजयाताईनी त्याला वाचा फोडली. जगण्याचा माझा दृष्टिकोन मला असाच ठेवायचाय मी मनाला बजावत असतानाच हे वाक्य मिळालं ही त्या परमेश्वराचीच ईच्छा. या अंकुरासारखच जग सुंदर आहे असच म्हणत मी पण प्रकाशाकडे झेप घेतेय. विजयाताईला धन्यवाद आणि सर्व सख्यांना सुप्रभात.
############################################################
६ डिसेंबर
आयुष्य एक प्रवास
खरच विश्वातली सगळी सजीव तत्व हा आयुष्य एक प्रवास जगतात. प्रत्येक व्यक्तीचा/ तत्वाचा आयुष्याचा प्रवास जरी वेगवेगळा असला तरी तो त्या एकाच तत्वातच विलीन होतो. तो सुखद होण्यासाठी योग्य कर्म करायचा नाद लागला की तो आनंदमय वाटतो.
यातल्या कल-आज-कल ची वळण खुप सुंदर - मनाची श्रीमंती असलेली माणसं भेटवतात, सोसाट्याच्या वाऱ्यासारखी दु:ख पण यात येतात, यावेळी तरून नेण्यासाठी ऊभारीसाठी प्रकाशाकडे झेप घेण्यासाठी भगवंताच नामस्मरण कृतज्ञता कशी ऊपयोगी पडते हे शिकवतात. "आयुष्य एक प्रवास" हा झालेल्या चुकांपासुन पुढे सुधारणा करत जगत तसेच कोणत्याही परिस्थितीत लेट गो म्हणत सर्वांना सामावून घेत सरत त्या तत्वाकडे सुपूर्त करायचा.
आयुष्यातल हार्डवेअर (शरीर) बदलणारच आहे पण मी माझ साॅफ्टवेअर (आत्मा) मात्र योग्य कर्म करत अपडेट ठेवण केल तर मग हा प्रवास आणखी मजेदार असणार आहे हे मला समजलय. हा मार्ग न सोडता जगता याव हीच कान्हाजींना कळकळीची विनंती. आयुष्य एक प्रवास हा सुखद सोहळाच आहे अस मला वाटतं. मस्त वाटतय मला आज, मी आयुष्यात प्रथमच कल-आज-कल वर ईतका विचार केला असेल. आज सोनचाफ्याच झाड मला हेच शिकवून गेला.जय श्रीकृष्ण
###########################################################################
७ डिसेंबर
नातं आणि अपेक्षा
झेंड्याचा बारीक दोरा आणि वेलीचा वाढता भाग जसा आहे तस नातं आणि अपेक्षा यात अंतर असाव हे मी शिकलेय. दोन ठिकाणचे दोन एकत्र येतात, नातं हे असच दोन धागे जुळतात तसच निर्माण होतं. आपल समजलं की आपसुकच हक्क आला पण तो जास्त प्रमाणात आहे का तपासत राहण जमल पाहिजे. समोरच्याला तितकच वाटतय का? तपासत राहण महत्वाच हे मला वारा आला की झेंड्याचा धागा आणि वेलीच टोक सुटत होत जुळत होत यावरून सुचलं. नात असल की अपेक्षा असतेच पण ती भंग न होऊ देण म्हणजेच निष्काम कर्म करणं. वारा शिकवतो मनाला आवर घाल, प्रेम कर, जीव लाव पण अति गुंतून अपेक्षा भंग होणं टाळ. नातं तोड नाही पण त्या व्यक्तीला व्यक्त होऊन प्रतिसाद देण्यास वेळ दे. नात अपेक्षांच्या हक्कात दबु न देता जगलीस तर सुखी राहशील. आपण जितक मनापासून करतो तितकच समोरच्याची करण्याची झेप असेलच अस नाही किंवा त्याला ते गरजेच पण वाटत नसेल. एक झुळूक आयुष्यभर लक्षात राहिल. तीन मनात नातं आणि अपेक्षेमधली बारीक रेघ शिकवली. निसर्ग कमाल आहे बघु तसा दिसतो.
जय श्रीकृष्ण.
###########################################################################
८ डिसेंबर
"स्वप्नं"
मानवाला मिळालेली कल्पना करण्याची शक्ती ही या स्वप्न या गोष्टीचा स्त्रोत आहे अस मला वाटतं. आपण जो विचार करतो ती नोंद बाह्य मन करत पण स्मृतीची नोंद होऊन अंतर्मनात काम सुरू होतं. जसा विचार तशी स्मृती तशी स्वप्नं. माझ्यामते स्वप्न बघण ही कृती ध्यासाची सवय लावते कारण ती पुरी करायला आपण झगडतो. मग ध्यासाची सवय लागते. यातुन ईच्छा शक्तीच कार्य समजतं आणि मग सकारात्मकतेने स्वप्न पाहायचा नाद लागतो. आपण जे ठरवु ते होऊ शकतं हे समजल की स्वप्न ही स्वप्नं न राहता आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा साक्षात्कार वाटतो. स्वप्नं जीवनात ध्यास आणतात, ध्यास ईच्छा शक्ती प्रबळ करतो आणि जो विचार केला ती कृती होते. मस्त गणित आहे हे. ही ऊकल समजुन घेत जगायचं. माझ्या मते स्वप्नं म्हणजे परमेश्वरानी मानवास दिला पुश ऊर्फ धक्का स्टार्ट आहे. भावनांच व्यवस्थापन स्वप्न करतात हे वाक्य ऐकलय आवडल पटलं. (हे वाक्य माझं नाही.)
हे कान्हाजी माझ्याकडून योग्य विचार केला जाऊन ती योग्य स्वप्न ध्यासान पुरी व्हावी यासाठी योग्य कर्म करण्याची बुद्धी मला द्या.
जय श्रीकृष्ण
###################################################################################
९ डिसेंबर
"आठवण"
वर्तमानात जगताना सुख दुःखाला आपण सामोर जातो. त्या प्रवासात सुखद क्षणी किंवा दु:खाची झालर आली की जे आपण आपसूकच वापरतो ते टाॅनिक म्हणजे "आठवण" अस मी म्हणेन. या क्षणी झपकन माझ्या आयुष्यातील एक सुखद आठवण सांगा म्हटल तर ती माझा मातृत्वाचा अनुभव हीच ती म्हणेन आणि बाबांना जगाचा निरोप देताना स्वतः डोळ्यासमोर बघण ही दु:खद आठवण.
जुनी पत्र आणि फोटो आठवण या सदरात माझ्या आयुष्यात फार मोलाची आहेत. माझी पिढी आठवण शब्द ऊत्तम जगली, ती काढायला माणस लाभली, एकोपा लाभला. हल्लीची पिढी बघितली की वाटतं यांना हा अनुभव येईल का? यांच्या व्यवहारीक जीवनशैलीत आठवण नावाच टाॅनिक संपुष्टात येईल का? Memories नाव देत दिखावा सादर केला जातो त्यात आठवणींची किनार कमी वाटते. त्या भावनेचा गाभा नसतो. अर्थात अपवाद असतातच पण तरी.
भविष्यात आपली माणसं व आपण अनुभवलेल्या गमती यांना उजाळा देण यासाठीच हे टाॅनिक मी मात्र भरपुर वापरता याव यासाठी सुंदर क्षण जमवणार, साजरे करणार आणि करतही आलेय. यासाठी माझे "बाप माणूस" आणि "९ दिवस ९ स्रीया" लेख वाचा. विजया तू कायम आठवणीत राहशील व्यासपीठ दिल्याबद्दल.
जय श्रीकृष्ण.
##########################################################################
१० डिसेंबर
प्रेम
मानवाला सुदृढ जीवन जगण्यासाठी शरीरात संप्रेरकं परमेश्वरानी दिली आहेत, त्यातली भावना निर्माण करणार एक हे प्रेम. जे विश्वास आणि आपुलकी दाखवतं. एखाद्याला पाहुन मनाला आल्हाददायक वाटल की आपण त्या व्यक्तीच्या सहवासात राहण पसंत करतो. पण या भावनेत त्या व्यक्तीला बांधुन ठेवणं नसतं, ती दुरावण्याची भिती नसते कारण विश्वास असतो. या भावनेत मालकी हक्क नसतो निसपेक्षता असते. आपल समजल की गुण अवगुण दोन्ही सकट ती आपलीशी होते. झाली पाहिजे तरच ते प्रेम बरका!
ती व्यक्ती चार वर्षांनी भेटली तरी एक घट्ट मिठी तीच्याबद्दलच मनातल प्रेम दर्शवते. कारण ती लांब असली तरी संवादातुन मनात घर करून असते. यात कोणतही नात असु शकतं मग नवरा, बायको, भाऊ बहिण मुलगा मुलगी किंवा शेजारची किंवा लहानपणची सखी सुद्धा. तसच ती व्यक्ती कधी दिसेल न दिसेल माहित नसत पण ती आहे ती माझ्या बरोबर आहे ही खात्री असते ही आद्ध्यात्मिक भक्ति पण प्रेमच मग तो कृष्ण असो वा दुर्गा. यात समर्पणाची तीव्र भावना असते. भेटीचा नव्हे अनुभूतीचा ध्यास असतो. एखाद्याच सगळ नीट होईतोवर ऊलघाल जगणारी, एकाग्रतेने त्याच्या योग्य जीवनासाठी नैसर्गिक मातृत्वाच्या देणगीचा सकारात्मक स्पंद त्यासाठी विश्वात सोडणारी, काडीचीही अपेक्षा न करता त्या व्यक्तिला भरून जगताना फक्त बघण्याची इच्छा ठेवणारी प्रेमच तर करत असते.
जगातली सर्वात ऊच्च भावना म्हणजे प्रेम. फक्त या ऊच्च भावनेचा कडेलोट होऊ न देणं, विश्वास वासनेत न बदलु देणं, बांधुन ठेवलं त्याच बंधन न वाटु देण ही गोष्ट मात्र परमेश्वरानी मानवावर सोपवली आहे. त्यामुळे परमेश्वराची कृपा अशी समजायला हवी की या प्रेम भावनेमुळे मानव जीवन तर सुंदर जगु शकतोच आहे पण ती भावनाच जगतातील प्रत्येकाच काम झाल की परमेश्वर प्राप्तीसाठी वापरू शकेल. तीच भावना मोक्ष मिळवुन देणार आहे. मानवाला जगताना आणि नंतर मोक्ष मार्गास जाताना दोन्ही वेळी वापरायची गुरूकिल्लीच परमेश्वरानी दिली आहे हे माझे ठाम मत आहे. भौतिक जीवनातलं प्रेमाच अफाट महत्व समजलं की मगच आपण आद्ध्यात्मिक जीवनातलं त्याचं अथांग महत्व समजु शकु.
बघु जमतय का? मी पण प्रयत्न करतेय.
जय श्रीकृष्ण
* माझे लेखन कुठेही वापरू नका आणि वापरले तर नाव नंबरसहीत वापरा ही प्रेमळ विनंती
####################################################################
११ डिसेंबर
शिस्त खरंच खूप
मस्त विषय आहे.
मला या शब्दापेक्षा
अनुशासन हा शब्द
जास्त आवडतो. मला
स्वतःला अनुशासन पूर्ण जीवनक्रम
फार आवडतो. जेव्हा
मला त्याच महत्व
समजलं तेव्हा पासून
माझं मी मला
अनुशासित जीवनक्रमात ठेवलाय. लोकांना
ती कटकट वाटते
पण तीच लोक
मला परफेक्ट म्हणत
मदत घेताना मी
बघते. माझ्यामते शिस्त
बुद्धी तल्लख ठेवते आणि
वेळेचे नियोजन नीट होते.
यादोन्हीचा मला जगताना
फायदा जाणवला आणि
मी अनुशासित जगायला
प्रवृत्त झाले आहे.
माझ्या मते शिस्त
म्हणजे घरात जाताच
दार नीट लावणे,
पर्स हेल्मेट ठरलेल्या
जागी ठेवणे, बाथरूमच दार खिडकी काम
झालं कि बंद
करणे, वापरलेला पावडरचा डबा तेलाची बाटली
पर्फुमची बाटली सगळी झाकण
काम झालं कि
लगेच लावणे, दर
१५-२० दिवसांनी
स्वतःचा कंगवा धुणे, जादाच्या
गाद्या उश्या तत्सम वस्तू प्रथमदर्शनी छान
झाकून असण्याकडे माझा
कल असतो मग
ते घर कोणाचं
का असेना, केस
विचारले कि तत्काळ
आपला कचरा उचलणे, खोलीबाहेर पडताना नाइट लॅम्प बंद करणे, (लोकं साध ऊठल की खुर्चीपण नीट न ठेवता जातात) सकाळी उठलं कि
स्वतःची उशी पांघरून
नीट घडी करणे,
बेडशीट सरळ करणे,
ती घालताना अजिबात
सुरुकुत्या न ठेवता
घालणे, बाहेरून आलेले कोणतेही
सामान एकदम झोपायच्या
पलंगावर न ठेवणे, बाहेर जायच असेल तर आदल्या दिवशी कपडे दागिने वस्तू जमा करणं, स्वयंपाघरातल्या बरण्या डबे जे
ठरलेत त्यातातच वस्तू
भरणे, मसाले काम
झाले कि घट्ट
बंद आहेत ना
पाहूनच परत ठेवणे,
माझं कपड्यांचं कपाट विभागणी करून नीट
आहे का हे
दर १०-१२
दिवसात तपासणे, कोणतेच कपडे
जिकडे वळत घालणे
अपेक्षित आहे तिकडेच
घालणे, स्वतःची पर्स पण
जी गोष्ट ज्या
कप्प्यात तिकडेच असायला हवी.
अशी आणि अशी
अनेक काम मला
जिकडं हवी तिकडंच
आवडतात. वस्तू जिथल्या तिथं
असल्या कि वेळेवर
कोणीपण कुठाय विचारलं कि
सांगू शकता आला
पाहिजे. यामुळे वस्तू सापडते
आणि आपली बुद्धी
पण तल्लख राहते.
सुचत नाही आठवत
नाही असली कारण
द्यायची वेळ येऊ
देणंच मुळी मला
आवडत नाही.
मला बरेचदा घरात चक् केल जातं सारखा नीटनेटकेपणा वर फोकस जरा शांत बसत नाही. हे बंद केल नाही, ते आवरल नाही चालु असतं. पण यांना त्याचे फायदे अजुन समजलेच नाहीयेत.
मला कुठही जायच असल तर वेळेआधी १० मिनीट पोचायला आवडतं. दिलेली वेळ पाळु शकले नाही की ऊलघाल होते समोरचा ढिम्मच असतो. अनुशासित, नियोजनबद्ध जगण हे शिकवुन होत नाही ते आतुनच याव लागतं.
आता हळूहळू मी माझी शिस्त माझ्या पुरतीच ठेवण सुरू केलय. सल्ले देण बंद केलय. झाकण-दरवाजे-डबे ऊघडे ठेवा. भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरा आणि जमेल तेव्हा जागेवर ठेवा. कसय ना आपण स्वत अनुशासित जगण आपल्या हातात आहे जगाला शिस्त लावण अशक्य आहे. काही दिवस झाले मी "माझंच "शिस्तीत जगते. स्वतः चा रक्तदाब संतुलित ठेवणं यासाठी मी करते. माझ्या शिस्तीच्या रडारमधेच राहायच कारण कदाचित ईतरांना त्याच महत्व नसेल यासाठी त्यांचीही दुसरी बाजु असेल असा विचार मी हल्ली करते.
मी आहे तशी स्वयंशिस्त पाळणार जे माझ व्यक्तिमत्त्व आहे. मला कोणताही लहान कार्यक्रम असो आखणी करूनच आवडतो मी त्यातच आनंदी असते. वेळेवर ठरवु अस खुपदा कमी केल जातं. शिस्तीचा अतिरेक नसावा मला मान्य आहे पण ती असूच नये किंवा कोण येणार असलं की धाड पडल्यासारख धावुन नसावी. जीवनात प्रत्येक गोष्टीत अनुशासन हवं! शेवटी शिस्त मनाला वळण लावते आणि मला आनंदी ठेवते.
जय श्रीकृष्ण
#################################################################################
#################################################################################
१२ डिसेंबर
एकांत
एकांत म्हणजे एक असतो दुसरा कोणीही नसतो. अत्यंत गूढ अर्थ या शब्दाचा आहे. ब्रह्म विद्येच्या अभ्यासात सतत सांगतात शांततेच ध्यान करा, एकांत अनुभवा मगच ध्यान छान होतं. व. पु. काळे म्हणतात परिसराच मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असूनही पोरकं वाटणं हा झाला एकाकीपणा.
एकांत म्हणजे खरतर आगमनाची चाहुल... जी अनुभूती मी अजुन घेऊ शकलेली नाही. एकांतात राहण्याची सवय करून मग श्वासावर लक्ष केंद्रीत होत ती पायरी मी अजून गाठली नाही पण त्याविषयी कुतूहल आहे. अस बरेचदा वाटत लिहायची वही आणि काही पुस्तकं ऊचलावी आणि भिलारगावची बस पकडून आठवडाभर भूमिगत व्हावं. माझी गाडी ईच्छेपर्यंतच पोचलीय. ज्या गोष्टीमुळे आद्ध्यात्मिक जीवनपथ सुरू होतो, सिंहावलोकन करण्याची सवय जडते त्या कठिण पण आवडू लागलेल्या मार्गावर मी आहे.
एकांताच वैभव मी अजुन अनुभवण झाल नाहीये, जो अनुभवच आलेला नाही तो मी लिहू शकत नाही. फक्त तारे तोडू शकतेय.
मला यावर ईतकच आणि खरंखरं हेच वाटतय.... एकांताच्या अनुभवाच्या प्रतिक्षेतली मी...
जय श्रीकृष्ण
############################################################################
############################################################################
१३ डिसेंबर
स्विकार आणि नकार
हो किंवा नाही ठामपणे म्हणता येणं हे जबरदस्त जोखमीच काम आहे. याआधी स्वतःला स्वतः बद्दलमाहिती असण्याच काम केल पाहिजे. थोडक्यात अस म्हणायचय की आपल स्वतः च जगण्याच ध्येय ठाऊक हवं. कुठ जायचय हे ठाम हवं. कोण जवळच? कोण दुसर्या वर्तुळातल? कोणासाठी काय जबाबदारी आपण समजतो? ती त्याला अपेक्षित आहे का? हा सगळा स्वचा अभ्यास हवा मग आपण कोणतीही गोष्ट स्वीकारू अथवा नकारू शकू. बरेचदा आपल अस होतं की - जाऊ दे हो म्हटलं मी.. पर्याय नसतो कारण प्रत्येक गोष्ट समोरच्याला पण तशीच वाटेल अस नसतं. ही आजवरची परिस्थिती होती. पण हल्ली...
एखाद्याला वाटत असेल लग्न झालं मुल झाली मस्त मार्गी लागलो तर एखादा म्हणेल बरय दोघच सेट होऊ आधी मुलांच काय घेऊ दत्तक. ही वस्तुस्थिती स्विकारण पटत नसल तरी स्विकारणारी बरेच आहेत. मग आता आजकालच हे करंट अफेअर विचार करता मी म्हणेन स्वतः च जग कस हव ते आपण स्विकार - नकार मधे बसवायच. ईतरांच्या निर्णयाला कुरतडत बसायच नाही.
हे स्विकारायच की आपण ईतरांचा चांगला विचार करतो. त्यांना पटो अथवा न पटो तसेच ईतरांनी आपल्यासाठी पाठवलेली नकारात्मक विचारांची शिदोरी नाकारायची.(भगवान बुद्धांची गोष्ट आठवा.)
हे स्विकारायच की आपण आपल समजलय समोरच्यासाठी काय पण करू पण मग आपल समजतोय तर पटल नाही तर "नाही" नकार द्यायलाही माग पुढ पाहायचं नाही.
जय श्रीकृष्ण
##############################################################################
##############################################################################
१४ डिसेंबर
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
काय सुरेख संकल्पना आहे ना ही, का आणि सुचली असेल ना ती रामदास स्वामींना? जगात अवतरणारे संत महात्मे स्वतः कसं जगतात कसं वागतात त्यावरून सर्व सामान्य माणुस जगण्याची व्याख्या तयार करत आला आहे. समाज सुजाण कस जगायच शिकत आला आहे.
नुकतच एक रील बघण्यात आलं की आई कपडे घड्या घाततेय आणि मुलगी ते विस्कडतेय. पण परत ती आई घड्या घालतेय मग ती मुलगी तेच चार कपडे खोलीभर विस्कळीत करतेय. खेळ सुरू आहे आणि आई हसतेय. ईतक सुंदर ऊदाहरण आहे हे केल्याने होत आहे रे... आज या वयात ती मुलगी न समजता अर्धज्ञात मनात नक्कीच नोंद करतेय की आई घडी घालतेय आणि मी ती चवड विस्कडतेय. सुप्त मनातील ही नोंद कालांतराने आठवते आणि ती पटते की घर आवरण आपण केल तर होतं ते झालं की आपल्याला केल्याच समाधान आणि आनंद दोन्ही मिळतं. मग तो अनुभव आपण घेतलेला असतो आपण प्रगल्भता जाणवतो ती आपल्या कृतीतून दिसते.
संत आपली आईचीच भूमिका बजावतात. प्रत्येकाच्या आयुष्यात हे वळण ज्याच्या त्याच्या कर्मफलाच्या लेख्याजोख्याने होते अस मी मानते. कारण बरेचदा पटत पण केल जात नाही. साध पुरणपोळीच ऊदाहरण मी माझ आठवते. खाताना ती कशी हवी सांगण आणि ती करून बघितली की गुज ऊकलतं. कष्टाची किंमत कळते.
टेकडी चढुन मिळणारा आनंद या समर्पक चित्रात मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आपण तो आनंद ती ऊचल खाल्ली की ती शेजारच्याला दाखवली पाहिजे. चल जमेल चढु टेकडी म्हणत ही पंक्ती आपण आपसात क्रियान्वित केली पाहिजे तरच असच आपल्याला पण म्हणणारा जीवनात येईल.
आजकाल हे पुढच्या पिढीला बघता विश्वास ठेवा मग तुमच्या वर विश्वास बसेल यासाठी मी नक्की सुचवेन. यासाठी मात्र यांना झेपतील भावतील असे संत जन्माला लवकर यावेत रे बाबा...
जय श्रीकृष्ण
##############################################################################
१५ डिसेंबर
अडचणी, अडथळे, संकटे - आयुष्याचा एक भाग
जीवन जगताना आपण अनेक गोष्टींचा सामना करत जातो त्यात अडचणी संकट ही आलीच. यात मी म्हणते की तो परमेश्वर आपल्यातली सकारात्मक जगण्याची वृत्ती आपण कशी जागृत ठेवतोय ते तपासत राहतो. त्याच कारण मी अस समजते की पूर्वीच्या पुण्याईवरच आनंदी संतुष्ट मानव न राहून तो सतत तेच योग्य कर्म करत राहावी यासाठीची परमेशृवराची ही योजना असते.
लहान होते तेव्हा मी पण अडचणींकडे बघुन पोटात गोळा आला म्हणतानाची मला आठवतेय. पण जस जस मोठ होत गेले तस तर त्यावर तोडगा काढुन जगायची सवय लागली.
साध पुण्याहून मुंबईला जाताना गाडीत वाक्य कानावर आल की -"बरच ट्रॅफिक दिसतय आज" तर तत्काळ ऊत्तर निघत "सुटेल हळूहळू" क्षणभर सुध्दा विचार येत नाही की आता आपल्याला लेट होणार का?
जगताना संकट आणि अडथळे येतच असतात कधी ते समजतात तर कधी येऊन गेलेले समजत पण नाहीत बरका! हो अस पण होतं कधीकधी कोणीतरी दुत म्हणून येतोही आणि आपल्या मार्गातली अडचण दुर सारून जातोही...
गंमत सांगते ही क्षुल्लक गोष्ट पण फार मोलाची आहे रोज जगताना... भयंकर गर्दीतून गाडी काढताना एखादाच किंचीत मधे असतो त्यान गाडी फक्त दहा डिग्री तिरकी केली की आपण सहज निसटून जातो. आठवा सगळ्यांना असे लहान अनुभव आलेले असतील.
आज निघताना नाश्ता न करता निघून कामावर पोचतो भुक जाणवते पण बघु अस विचार करत पोचलो की मैत्रिणी मस्त थालीपीठ आणलय तुला पण घे पटकन म्हणते. आली होती की नाही अडचण पण झाली की नाही ऊकल. आपण पटकन म्हणतो देवासारखी आलीस.
त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी संकट अशाबद्दल जर मी विचार केला तर मी त्यावर मात केलीच आहे, कधी कधी डगमगले पण आहे - पण सहज कोणीतरी माध्यम बनुन सुटूनही गेले आहे.
आज या सत्राच्या निमित्ताने मी अशा सर्वांचे आभार मानते ज्यांच्यामुळे मी माझ्यावर आलेल्या अडचणी संकटं अडथळे सहज पार करू शकले आणि ईतक सहज ते माझ्या आयुष्यात आले की मी आभारच मानले नाहीत.
आज मी अशा सर्व सहकार्य केलेल्या व्यक्तींना मनापासून धन्यवाद देते.
कान्हाजी अशी सहज मदत करून एखाद्याला सुटण्यासाठी मी कर्म करण्याची मला बुद्धी देवोत!
शुभं भवतु!
जय श्रीकृष्ण
#############################################
१६ डिसेंबर
चुकलेल्या वाटेवर चालताना.
जय श्रीकृष्ण!
मानवाला परमेश्वरान बुद्धी दिली स्वतः चे सगळे गुण दिले परंतु या सगळ्यात प्रत्येकाची जुळी बहिणही बरोबर आलीच... जसं प्रेम दिल तसं लोभ आहेच, लक्ष्मी आहे तर अलक्ष्मी असणारच मानवान सीमा पाळली नाही तर ती घातकच.. पण परमेश्वर आपल बोट कधीच सोडत नाही. मानवाला वाटतं की आपली वाट चुकली पण खरतर परमेश्वराची कृपा असल्याने तो आपल्याला ती जाणीव देत असतो, तो सतत खुणवत असतो की अरे बा मानवा सावधान!
आपल्याला वाटत आपण चुकलो पण तस नसतं परमेश्वर आपल्यासाठी वाट निवडतो. आपल्या स्वप्नांपेक्षा परमेश्वराच आपल्यासाठीच प्लॅनिंग जबरदस्त असतं, तो सतत सूचकतेचे निर्देश पाठवत असतो. आपण ते ओळखण्यास समर्थ असण फक्त आपल काम आहे आणि ते योग्य कर्म खरत राहिल तरच समजेल.
चुकलेल्या वाटेवर चालताना मी फक्त हाच विचार करते की कान्हाजी बरोबर आहेत म्हणून अत्यंत बिकट परिस्थिती येण्यापूर्वीच मनात आल माझ्या की मी वाट चुकले आहे.
बस कृष्णार्पणमस्तू म्हणत मी योग्य वेळी योग्य मार्गावर येतेच येते. काहीही अघटित न घडता. तो तस काहीही घडूच देत नाही ऊलट मी शिकते त्यातून. चुकलेल्या वाटेवर चालताना पण मोलाची माणस पेरलेली सापडतात बर का! तो भारीच आहे.
राधेंराधें
No comments:
Post a Comment