Thursday 19 January 2023

२) माघ ((जानेवारी - फेब्रुवारी ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

माघ महिन्याचे महत्व :

हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. माघ महिन्यात स्नान, दान आणि उपासनेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात सूर्यदेवाचे विशेष महत्त्व आहे. कल्पवास माघ महिन्यात केला जातो. भगवान विष्णूचे सान्निध्य मिळवण्यासाठी माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. ही ऊर्जा अनेक प्रकारच्या आजारांपासूनही बचाव करते. या काळात शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब केल्यास अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. 

माघ महिन्यातील सण :
वसंत पंचमी : या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते. वसंत पंचमी च्या मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात येतात. देवतांनी या दिवशी शंकर पार्वतीचा विवाहपूर्व तिलक केला.  हा  दिवस वसंत ऋतूचा आगमन दिवस होता, तेव्हा पासून वसंत पंचमी आनंदाचा, उत्साहाचा सण साजरा होऊ लागला. 


 रथसप्तमी :  हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. वर्षभर सूर्यप्रकाश देणार्या सूर्याप्रती कृतज्ञता मानण्यासाठी सूर्याची या दिवशी पुजा करतात.

 
महाशिवरात्र :  माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. या दिवशी महादेव पार्वती माता यांचा विवाह संपन्न झाला. 
 


भीष्म अष्टमी  : माघ शुक्ल पक्ष अष्टमी ला पितामह भीष्म यांचे निर्वाण झाले.  उत्तरायणच्या कालावधीला सकारात्मकतेच प्रतीक मानलं जात. उत्तरायणात मनुष्याला मृत्यू आला तर सद्गती प्राप्त होते, तो जन्म मृत्यु च्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच पितामह भीष्म यांनी  इच्छा मरणाच वरदान असल्याने उत्तरायण सुरु झाल्यावर प्राण सोडला. 

 
महिन्यातील यात्रा, जयंत्या :
 १) गणेश जयंती   : तिलकंद चतुर्थी : माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते.
 

२) नर्मदा जयंती : माघ शुक्ल पक्ष सप्तमी नर्मदा नदीचा प्रकट दिवस हा तिची जयंती म्हणून साजरा केला जातो. अमरकंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थानी आणि मध्य प्रदेशातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. होशंगाबाद येथील घाटांवर दिवसभर हा उत्सव साजरा होतो. नदीच्या घाटांवर अनेक भाविक दिवे लावतात आणि नदीच्या पात्रात सोडतात. वशिष्ठ ऋषींच्या मते माता नर्मदा माघ शुक्ल सप्तमी, अश्विनी नक्षत्र, मकरशिगत सूर्य, रविवारी प्रकट झाली. म्हणून या दिवशी “नर्मदा-जयंती” माता नर्मदाची जयंती म्हणून साजरी केली जाते. भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्त्व आहे.
अमरकंटक, नर्मदा नदी


३) जया एकादशी व भागवत एकादशी
 ४) गजानन महाराज प्रकट दिन   : माघ वद्य सप्तमी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. शेगाव ला श्री गजानन महाराजांचा मठ प्रसिद्ध आहे. 
 
५) गुरूप्रतिपदा  : माघ कृष्ण प्रतिपदेला दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी अवतार कार्य कर्दळीवनी संपवले.

 
गीते, कविता, गाणी :
रथ सप्तमी  दोहा:

भानु चालीसा प्रेम युत, गावहिं जे नर नित्य।
सुख सम्पत्ति लहै विविध, होंहि सदा कृतकृत्य।।
कनक बदन कुंडल मकर, मुक्ता माला अंग।
पद्मासन स्थित ध्याइए, शंख चक्र के संग।।

सरस्वती वंदना
या कुन्देन्दुतुषारहारधवला
या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा
या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
 

श्री नर्मदाष्टकम
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे।
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम।
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम।।
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे।
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।।

 शिव रूद्राष्टकम

नमामीशमिशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद: स्वरुपम् ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाश मकाशवासं भजेऽहम्‌ ॥

निराकामोंकारमूलं तुरीयं गिरा ध्यान गोतीतमीशं गिरिशम ।
करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसारपारं नतोअहम ॥

तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरम् ।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारू गंगा लासद्भाल बालेन्दु कंठे भुजंगा ॥

चलत्कुण्डलं शुभ नेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकंठ दयालम ।
मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं प्रिय शंकरं सर्वनाथं भजामि ॥

प्रचण्डं प्रकष्ठं प्रगल्भं परेशं अखण्डं अजं भानु कोटि प्रकाशम ।
त्रयशूल निर्मूलनं शूल पाणिं भजेऽहं भवानीपतिं भाव गम्यम ॥

कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सच्चीनान्द दाता पुरारी ।
चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥

न यावद् उमानाथ पादारविन्दं भजन्तीह लोके परे वा नराणाम ।
न तावद् सुखं शांति सन्ताप नाशं प्रसीद प्रभो सर्वं भूताधि वासं ॥

न जानामि योगं जपं पूजा न तोऽहम्‌  सदा सर्वदा शम्भू तुभ्यम् ।
जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं, प्रभोपाहि आपन्नामामीश शम्भो ॥

रुद्राष्टकं इदं प्रोक्तं विप्रेण हर्षोतये
ये पठन्ति नरा भक्तयां तेषा शंभो प्रसीदति ॥

॥ इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम् ॥

लॉजिक नवीन पिढी साठी :

रथसप्तमीला सूर्याची पूजा करायची कारण हा दिवस सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. निसर्गाचे आभार मानायचे हेच आपली संस्कृती शिकवते. जे जे मिळते त्याचे त्याचे आभार मानले पाहिजेत. जीवन साठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. शरीरास पोषक असे सूर्य किरण या दिवशी असावेत जेणे करून त्याचा मानव जातीने लाभ घ्यावा असा पण हेतू आढ्यातिमिक वैज्ञानिकांचा असू शकतो.  सूर्याचा जन्म देखील हा दिवस चिन्हांकीत करतो. ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरु होण्याचे प्रतीक आहे रथ सप्तमी. केलेल्या कष्टाचे फळ म्हणजे पीक आल्याने मानव आनंदी असतो. पीक येण्यासाठी पूरक अश्या सूर्यदेवतेचे आभार मानाने हाच या पूजेचा मानस असावा.  आपण यथासांग पूजा जरी करू शकलो नाही तरी तो मौल्यवान सूर्यप्रकाश फुकट घेतो त्यामुळे  ठणठणीत राहतो म्हणून त्या सूर्यदेवाचे आभार मानलेच पाहिजेत. 

महाशिवरात्रीला पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, आपल्या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. तो महाशिवरात्रीचा दिवस. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.  हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. तसेच हा हलाहल प्राशन  दिवस पण आहे. 

2 comments:

  1. खूप छान माहिती दिलीत गौरी ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे आपल्या मराठी महिन्यांची आणि त्यात येणार्‍या सणांची छान माहिती मिळते 👍🙏Thank you

    ReplyDelete
  2. छान माहिती आहे माघ महिन्याची. त्यात येणारे सण आणी जयंत्या यांचे महत्त्व कळले. चित्रा द्वारे माहिती स्पष्ट कळली

    ReplyDelete