Sunday, 29 June 2025

 

1 Shiv temple sutarwadi near pashan lake
2 shri someshwar temple baner
3 Siddeshwar Vruddheshwar Mandir, near savarkar bhawan shivaji nagar
4 Amruteshwar - Siddheshwar Temple, shaniwar peth
5 Shree Tarkeshwar Mandir, Yerawada
6 Panchaleshwar Mahadev Mandir, Erandwane near savarkar cloth holi
Rameshwar Mandir, Mandai
8 Shree Umamaheshwar Mahadev Temple,natu baug, shukrawar peth
9 Peshwe Kalin Mahadev Mandir, parvati paytha
10 Adinath Pimpaleshwar Mahadev Temple, swargate near vipashyana kendra
11 Shree Laxmishwar Mahadev Temple, Rasta peth

12 Shree Nageshwar Shiv Mandir, somwar peth
13 Vittahl wadi mahadev, sinhagad road
14 Baneshar mahadev baner cave

15 Pataleshwar j m road
16 Wagheshwar mahadev wagholi

निरूपण – परतवारी


निरूपण – परतवारी - सुधीर महाबळ यांचे पुसतक

सलग पाच वर्ष वारीचा एक लहानसा टप्पा पांडुरंगाच्या कृपेने केला गेला. जसं जसं वर्ष जातात तसं तसं वारी, पांडुरंग याच्यावर माझा जीव जास्त जडू लागला आहे. एक छोटा टप्पा करून, मला ओढ लागली कशी काय? काय असेत ते दिव्यत्व जेव्हा पूर्ण वारी करतात, दरवर्षी वारी करून काय वाटल मी लिहिती झाले, परंतु यावर्षी वारीच्या पूर्ण प्रवासाची त्यातील सर्व टप्पयाची, त्यात वाहत्या राहणाऱ्या वैश्णवांची दररोजची कार्य मला समजुन घेण्याची आतुरता निर्माण झाली. पुणे सासवड टप्यात तो मोठा अवाका आणि क्षमता पुसटशीच जाणवली. हो पुसटशीच कारण हे टिचभरच आहे. पूर्ण २५० कि.मी ज्या ध्यासानं  देहभान विसरून ती मंडळी जातात , चालतात, अनुभवतात त्यापुढे अगदी टिचभरच अनुभव आहे हा माझा.

रविवारी रात्री सासवडहून परतले. मनात खुप खळबळ होती. अनंत प्रश्न होते. मी क्षणभरच अनुभवलेला अनुभव अव्दितीय वाटत होता. तो किंचीतसाच आहे. मग नक्की भगवंताकडे जाण्याची वाटचाल कशी आहे? आयुष्यात टप्याटप्यान वारी करेन पांडुरंगाची इच्छा असेत तस होईलच पण आज मनात खूप कुतुहल, चुळबुळ जाणवली. सोमवारी कामाच्या प्रवाहात आले. पण मनात वारीचे अनेक प्रश्न होते. मन शांत करण गरजेच होतं आणि ती  हुरहुर पांडुरंगान जणू जाणतीच. मुमुक्षि ग्रुपवर सुधीर महाबळ यांचं परतवारी पुसक वाचा अशी रेणूची पोस्ट आली.

खलास मी शोध सुरू केला. झपाटल्यासारखा, ते शोधल आणि सुधीर महाबळांच्या नजरेत‌ली वारी अनुभवली. आज पहाटे ते पूर्ण झालं. सकाळी सातला मन ओसंडून व्हायलं, वारीचा एकेक भाग मी त्यांच्या बरोबर होते - नजर किती एमएम नी बारीक हवी हा मोलाचा धडा आज मला मिळाला. परतवारीतलं काय भिडलं ते नोंद  करत गेले. आयुष्यान जर कधी उद्‌धविग्न वाटल तर वाचायच म्हणून नोंद केली. ती अशी - 

वारीला जाताना "ऐश्वर्यकारी" आणि येताना "वैराग्यवारी" ही उपमाच मन जिंकून जाते. वारीतला माणूस स्वतः "मी"  बाहेर काढतो आणि देह नावाच यंत्र पाहू शकतो ही कल्पना भारी वाटती. बाबुरावांच्या पात्रामुळे संसार संपला ठरवायच कसं? हे खुप आवडतं भौतिकातून आध्यात्मिक होतानाची बारीक पुसट लाईन क्रॉस करतानाची संकल्पना उर्फ टिप या सदरात मी नोंदली. 

जगताना आपण आपल्यातता चंद्र आणि सूर्य कसा बघायचा ही भावना जब्रा आहे. अफाट वैराग्य आणि मनाचा तोल सांभाळतानाची अफाट ग्रहणशक्ती कमावती जाते ती वारीत. माळीणीची मानसिकता किती मोलाची होती. आपण कपड्‌याच्या मोहात कसे अडकतो, तीनं  मात्र  मातीचे पाय पुसाया स्वतःच लुगडं दिलं. का ? तर पायी वारीच्या वारकऱ्याची पायधूळ ती माऊलीच की हो! हाच विचार. ..... आपण माती लागली कि कपडे कसे झटकतो. 

वारीतील धनगर सदा जगमित्र यात मला गजर चित्रपटातल एक पात्रं आठवलं. जगात वावरताना संशय येतो पण वारी सारख्या अनोळखी अफाट जन सागरात चांगली साधी सरळ निष्कपट माणसं जगात आहेत हा विश्वास मिळतो. जगताना तो सकारात्मकतेकडची वाट दाखवतो.

वारीत कल्याणकरांचा ट्रक दोन वेळच जेवण देतो. मला तो एकदा तरी बघायचाच आहे. महाबळांनी अनेकदा भसाड्या आवाजातला कर्णा असा उल्लेवा केला आहे. पुणे सासवड टण्यात हा कर्कश भसाड्या आवजातला कर्णा चांगलाच अनुभवला आहे.

'झांबळे' हा नवीन शब्न समजता. मोलाची उच्चं बैठकीची माणसं या प्रवासात ओळखाची दृष्टी मिळते. जी दृष्टी जगताना उपयोगी पडेल, खरंच!  रात्री म्हणजे पहाटे १ वाजता उठुन १.३० वाजता चाल  सुरु करतानाचं रात्रीच नयनरम्य वर्णन मी प्रथमच समजले,  अनुभवते. हे मी परत पूर्ण लिहूनच काढणार आहे. 'जैसे चंद्रा आड आभाळ' ओवी झांबळे शब्दाचा अर्थ सांगते.  ही पूर्ण ओवी शोधणार आहे मी. पहाटेचा रस्ता आणि काळ्या रंगाच्या विविध छटांमध्ये महाबळाना सापडलेला पांडुरंग महाबळांच्या नजरेतून पाहताना वाटल की मी तो रास्तच चालत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधी बद्दलच्या नामदेवांच्या ओव्या मी शोधुन वाचणार आहे. मगच यातल वाचलेल उच्चारेन, हा माझा घराचा अभ्यास असेल. आपण घरात राहायता जागा नाही म्हणणारे पांढरपेशी पण वारीत येणाऱ्या वारकरी लोकांना एक शेतातली खोली ठेवणारं - आजीच मोलाच्या मनाचं कुटुंब जीवाला चिमटा काढून जातं. वर्ष श्राद्ध घरात पण तरी शेतावरच्या घरात वारकरी नेहमीप्रमाणे जेवणार. घराला कुरुप नसत याकाळात का? तर माऊती येतील आणि वापरून जातील. हा अनुभव खुप काही शिकवून जातो. माऊलींना पाहायची एक नाविन्यपूर्ण पद्धत समजली.  माऊली वर्षभर नजरेत भरून राहवे यासाठी दोन्ही तळहात जमिनीलगत, समांतर आणि मनगट भुवईतोवर घेत माऊलींना पाहायचं- अहाहा! सुखद अति सुखद संकल्पना.

पहाटे उठुन वारकरी चाल सुरू करतात. परतवारीतल पौर्णिमेनंतरची पहाट - वर्णन काय ? तर - 'चंद्राच्या स्वच्छ प्रकाशाचा पूर' काय ती उपमा ! कार्य ते शब्दांच वैभव!

एक बिगारी काम करणारा वारकरी रोजंदारीच काम करणारा.  आयुष्यात महिनाभर वारील राहून टिळेकरी काम करतो. जीवनाच अजब तर्कशास्त्र ते अस की दिवसात ६०रू पण वारीत टिळेकरी दिवसाला ७०० रु. कमावतो. विश्वास हा कि माऊनी महिनाभर पोट  भरतात उपाशी ठेवत नाहीत. फुकट काही करायची मागायची वेळ येऊ देत नाहीत माऊली. महाबळांच्याच शब्दात तर्क वाचावा हे खरे. वीतभर पोर आणि हातभर टिपणी मस्त जोड.

आधी भाकरी ठेवायता फडकं नव्हतं हो ... आता माऊनींची वारी करतो परिस्थिती बरी आहे. यांच्या लेखीच देवाला का मानावं हे वाचाव.  काय पद्‌धत असते ना गावातल्या लोकांची सांगायची स्तुत्य होती ती कान्होबांची बोली महाबळांच्या लेखी. देह हा तुझाच रे भगवता 'इदं न मम'. मेल्यावर देहावर तुळशीपत्रं ठेवतात, पण वारकरी आधीच तुळशीमाळ घालून ते करतात. यात येणाऱ्या घामच रूपक काटा आणणारं भाष्य वाटलं सोपानकाकांचं. म्हातारी साठी ज्ञानेश्वरी विकत घेणाच्या मारुतीच्या पूर्ण कथानकामुळे जीव कोंडतो. हुंदकाच येतो. आपण काय किंमत करतो पोथ्यांची ? सोन समोर पण बघण्याची दृष्टी गमवत चाललोय.

नीरा नदितला पादुका स्नान सोहळा मला प्रत्यक्ष पाहायचाच आहे. हरीपाठाचा  २७वा अभंग नक्की वाचणार. (झाला महार पंढरीचा हि चाल ) मला वाटत माहेरी जाऊ गं...  नामदेवाच दर्शन घेऊ गं ... 
उत्तम  (भाग - स्नेहबंध ते नादब्रहम)

विवंचना टाकून  वारकऱ्यांसारखं नाचून पहा का? ते  तेव्हाच कळेल. वरातीत नाचतो ते नव्हे. हरीनामात रमून बेभान नाचणं,  अहो भाग्य लागतं  यासाठी सहज जमत नाही ते.  पण प्रयल तर करा... वैष्णवजनच ते जे बेभान नाचतात. माऊली सदा धनगर यांचा भाग वाचण्यासारखाच. प्लॅस्टिक कागदाच महत्व वाचताना हसू आलं कारण दिवेघाटात मी ते अनुभवलं ना..  रेनकोट खिसगणतीत निघाला की.

सुखी माणसाचा सदरा वाचताना जुने काही संदर्भ आणि व्यक्ति झरकन डोळ्या समोरून गेल्या. अचानक येणारी सर गर्दी सारून रस्ता दाखवते हा अनुभव दोनदा सासवड टप्प्यात आला. सॅकची चेन उघडल्या सारखा (भा.पो.) अंथ माणसाच्या भजनाचा गजर... हे दृश्य मेंदूत कोरलं गेलं .... अहा काय शब्द..  महाबळांना साष्टांगच !

आपण इथवर आलो  पण हा नामाचा महिमा. हा मात्र आहे २८ किमी चाल  दिवेघाट यात तो समजला.  रामकृष्णहरी.... ईठोबा माऊनी तुकाराम.... हरिणामामुळे त्रास आणि वेदनेचे विचार डायव्हर्ट होतात. जगताना याचा वापर करायचा ही शिकवण....

कल्याणचे सखाराम त्यांच्याकडचे मोफत जेवण सासवडला थांबवतात. पुढे गरज नसते १००% पटलं.  'सखा आकाशा एवढा' सदरात अन्नदानाच अत्यंत सुंदर महत्व पटवल त्यांनी.  प्रत्येक प्रकारच्या दानाचा सविस्तर संदर्भ आयुष्यभर लक्षात राहील. अन्न्दान महापुण्य का ? हे कधीही विसरणार नाही.

सुखाचं मोजमाप, मांगल्य शोधण्याची सवय वारीत लागते ही बहुमूल्य लेणी अवगत झाली. वर्षभर जपलेली १० ची नोट वारीत दान केलेली माऊलींनी स्विकारली या भावनेत पावतीला नमस्कार करणारी वयस्क आजी पैशाचं आणि समाधानाचं,  मारुलीच्या प्रतीच्या ध्यासाचं मोल शिकवून जाते.

माऊली परत आळंदीत पोचतात ते वर्णन मस्तच. यात माऊलीची पण दृष्ट काढती जाते वाचतानाच टपटप टपकतं मन गालावर. वारी करताना बंधन नाही पण शिस्त पाळत क्षमतेप्रमाणे, नामाचा महिमा अनुभवत काहीही अपेक्षा न ठेवता चालत राहायच हे यात समजत. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेले भक्तांचे चार प्रकार मी मात्रं नोंद केले. 

पुणे ते सासवड पायी वारीनंतर, परतवारी पुस्तकामुळे का कोण जाणे मन शांत झाले. मला हलकं वाटायला लागलं. रेणू‌चे आणि महाबळांचे आणि यांना आयुष्यात आणणाऱ्या पांडुरंगाचे अनंत अनंत आभार. 

जय श्री कृष्ण 
गौरी पाठक 
२८ जुन २०२५

Tuesday, 24 June 2025

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा..

वारी म्हणजे नियमित पाने भगवंतास भेटायला जाणे! पंढरीची वारी म्हणजे भावपूर्ण धार्मिक आध्यत्मिक यात्राच कि... जी जीवनातील अनेक रहस्य उजागर करते. हि करायची ईच्छा मनात यावी लागते. ती मनात अनंताही तोच आणि ती पुरी करून घेणारेही तोच असतो, पांडुरंग!

मागे सलग चार वर्ष पांडुरंगाच्या कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी लाभली. या प्रवासातील मुमुक्षूनि मिळून यंदा पुणे ते सासवड टप्पा करू असा मागच्या वर्षी मनात आखलं होते. त्याचा पांडुरंगी आठवं करून दिला आणि ती पूर्ण करून घेतली. 

ai दिंडीमुळे खूप सहज सुकर झाला हा मार्ग. पहाटे ४.३० वाजता चांदणी चौकात आम्ही पोचलो. ५. ३० ला मगरपट्टा हडपसर ला पोचायचे नियोजन होते.

ai दिंडीचे सगळे जण एकत्र जमलो. कोरडा नास्ता चहा कॉफी होती. रेनकोट ताब्यात घेतले. आणि ai दिंडी पुणे सासवड पायी वारीसाठी प्रस्थान झाली. कोणी झेंडे कोणी म्युझिक सिस्टिम असे बरेच सामान घेतलेले व्हॉलेंटियर होते. सगळे एकरूप  बघताना उभारी वाटत होती. यंदाचे टोपीचे वाक्य पाहून जोश वाटत होता : रक्षण्या सिंदूर, 'वर' करी शूर. 

मगरपट्टा साऊथ गेटवर एकत्र जमून नामाचा गजर झाला. अभंग आणि माउलींचा गजर यातला सहभाग भारावून टाकणारा होता. आम्ही गाडीत बसलो तेव्हा एक सूचना मला जास्त आवडली आणि भावली सुद्धा. जेव्हा मुख्य रस्यावर लागू तेव्हा आधी त्या हमरस्त्याला नमन करा. ज्यावरून अनेक वारकरी पांडुरंगाची आस मनात घेऊन अनेक वर्ष चाल करत आहेत तो आदरणीय समजावा. त्यावरून माउली स्वतः जात आहेत अनेक वर्ष. अनेक संत मंडळींची पायधूळ त्यालाल लागली आहे. त्याला  नमस्कार करूनच आपण वारीच्या भाकीसागरात मिसळुया. काय सुरेख भावना आहेत. मनापासून आभार त्या दादांचे ज्यांनी असा सुंदर विचार दिला. कोणाला कसा दिसेल भेटेल भगवंत ते आपण सांगू शकत नाही पण मार्ग दाखवणारा पण नामांतुल्यच मानव नाही का ! 

बघता बघता हमरस्त आला. कपाळावर गंध आलं, सगळ्यांचे पिशवीतून टाळ वर आले, ai दिंडीच्या टोप्या आता डोक्यावर  स्थिरावल्या. सातच्या सुमारास ai दिंडी प्रस्थान झाले. हडपसर गाडीतळ जवळ अफाट जनसमुदाय एकत्र मिळाला. आनंदाचा पूर होता, वातावरणात भक्तीमय सूर होता. हडपसर गाडीतळ चौकात उजवीकडे वळावे असे दिशादर्शक -- दिंडीचे कार्यकर्ते मार्ग दाखवत होते. त्याशिवाय त्या प्रचंड जनसमुदायाच्या मार्ग समजणे अवघडच होते. सर्व मंडळी भेकरे नगर कडे मार्गस्थ झाली. एक ढोलकी वाले दादा ai दिंडीचा झेंडा आणि अभंग म्हणणारे एक दादा यांच्या मागे आम्ही निघालो. मस्त टाळ, मृदंग रस्ता आमी आम्ही पांडुरंगाच्या नाम गजरात निघालो. इथून पुढे सगळे जण आपापली चाल चालत होते. गट गटांनी ai दिंडीच्या माऊली पुढे सरसावताना दिसत होत्या. 

मगरपट्टा साऊथ गेट ते हॉटेल विजय एक्सझीक्युटिव्ह १३ - १४ किलोमीटर चाल होती. किलोमीटर हे मापन घरी पोचलो तेव्हा शोधलं. मुखी माऊली च नाव सोबत करायला त्याच भावाचे साथीदार असतील तर कसली आठवण येतेय बाकीची. 

या वाटेवर अनंत माऊलींचं दर्शन होतं : काही माऊली (वारकरी) सुसाट वेगानं पंढरीची वाट पकडतात ती भगवंताच्या भेटीची आस दाखवतात, काही माऊली (वारकरी) भौतिकातील वस्तू कशा क्षुल्लक आहेत याची पावती देतात, काही माऊली आपल्या ठाम भक्तीवर कसा वातावरणाचा पडसाद न पडत ती अखंड ठेवत चालायचं हे शिकवतात,  तर काही माऊली कष्टी असूनही आपण हसून राहू शकतो हे भेगांचे पाय असूनही हसतमुख चेहऱ्यातून दाखवतात, काही तर पोटाची खळगी भरायची ती तेवढीच तिचा फाफट पसारा असायची गरज नाही हे दाखवतात, काही माऊली साठवणूक करून परमार्थ करा हे शिकवतात कसं ते विचार करा. वारी करताना स्वतःच्या गरजा काय आणि किती याचा साक्षात्कार होतो. मानवाने  आध्यात्मिक व्हावं म्हणजे नेमका कसं ते यात समंजत.  आयुष्यात काय कमावलं पाहिजे म्हणजे काय गमावत नाही याची झलक मिळते. 


त्यामानाने मगरपट्टा ते दिवेघाट सुरु होण्यापूर्वीची जागा यात थोडा आता अराम करून घाट चढू असा वाटणं साहजिकच होत. सगळेजण ai दिंडीनी नियोजन केलेल्या जेवणाच्या जागेवर एकत्र जमलो. १२ वाजता विजय हॉटेल वर पोचलो. हा रस्ताभर रस्त्याचं काम सुरु असल्याने वारकरी विभागले जात होते. अरुंद पुलावरून जाताना खरी सामंजस्याची बैठक समजून आली. कोणी  नसूनही अजिबात न धक्काबुक्की करता तो भाग पुढे सरसावलो. कोणी पण पायावर पाय पडला, हेलपाडाला तरी माऊली म्हणत पुढे सरसावले जात होतो. आपोआपच ती असं लक्षात आलं. मधेच दोनदा जोरात आलेल्या पावसाच्या सरी पांगापांग करून गेलेल्या. मज्जा आली. जीवाची उलघाल जणू तो विठुराया पाहतोय आणि पाणी शिंपडत असे वाटले.  हॉटेल विजय ला थोडा विश्राम जेवण करून मग रिंगण झालं. फुगल्या झाल्या. जरा चार्ज झालो. बरोब्बर १. ३० वाजता सर्वजण दिवेघाट चढायला सुरु झाले.  मनात हाच विचार होता कि हे पंढरीनाथा किती आहे मोठा हा घाट तूच नेरे त्याच्या पार. तो चढताना लक्षात आलं कि आयुष्यात भाग्याने लाभलेला हा पुणे सासवड पायी वारीचा हा टप्पा. त्यातला दिवेघाटाचा भाग खरोखरच त्या मुख्य वारकरी मंडळींच्या साथीनं, अभंगाच्या ठेक्यानं आणि माउलींच्या घोषानं सहज पार पडला. आज शरीराचे, भक्तीचे आणि परमेश्वराच्या ओढीचे मोल समजले. आळंदी पुणे टप्प्यापेक्षा हा मोठा आहे. तो त्यांनाच पार करवला.  हे पांडुरंगा अशीच मायेची पाखर अनुभवत आपल्या सेवेत राहण्याचीबुद्धी द्या.
 
दोन्ही बाजूला हिरवा डोंगर मधे वारकरी काय सुरेख नजर होता. हिरव्यागार रस्त्यावर पारिजातकाचं जणू पायघड्या घातलाय असा तो घाट दिसत होता. कितीतरी माऊली नामाचा गाजर करताना डिसास्ट होत्या आम्ही त्यात मम म्हणत जोडले जात होतो. थोड्या वेळातच आम्ही रेनकोट काढला बेकार उकडायला लागलं होतं. आपण कल्पनाही करू शकत नाही असं सामान लादून वारकरी चढ चढतात. जवळजवळ १२ वळणं गेली मग ती विठुरायाच्या काळ्या मूर्तीची किनार दिसू लागली.



 हेच ते पठार, हाच तो विठोबा, जो पाहत घाट चढत येतो आपण आणि शारीरिक वेदना विसरून गहिवरून जातं मन... या लोभस मूर्तीची झलक दिसू लागली कि आपोआपच उभारी येते. .. मनात कालवाकालव होते...  जणु  तो आपल्याचकडे बघून मंद हसतोय असं वाटत. जेव्हा आपण अगदी समोर पोचतो त्या सावळ्या मूर्तीच्या तेव्हा ती मूर्ती नाही तो हलकासा हालत भगवंताचं भासतो... 


हि अनुभूती अंगारवर शहारा आणते, काय उच्च अनुभूती... हलकं वाटत. .. ते लोभस सावळं रूप पाहून अहा !
मागे काय झालं ? पुढे काय होईल ? कशाकशाचाही विचार येत नाही. अफाट जनसमुदायाच्या लाटेवर आपण आपोआपच पुढे जात राहतो... पावलं जड होतात, आपण मागे वळून वळून पाहत राहतो... इकडे जरा गडबड होती एक वारकरी आजी चक्कर येऊन कोसळ्याच समजलं. त्यामुळे आणखी काही क्षण तिकडे थांबायला मिळालं. डोळे भरून तो सावळा रुक्मिणीकांत हृदयात साठवला. आज जो तो बघितला तो परत नाही दिसायचा. कितीहि वेळा आले या घाटात तरी नाही. आजचा विठुराया वेगळाच. आज समजलं कि पालखी जाताना लागणाऱ्या गावाच्या नावाचा अर्थ खरंच अर्थपूर्ण आहे. प्रत्येक टप्प्यात वेगळी गुपितं लपलेली आहेत. 

घाट उतार सुरु झाला आणि मनात ज्ञानेश्वर माऊलींची पावलं पालखी आता दिसेल याचे वेध लागले. पुढे ४-५ किलोमीटर वर पंचवटी फॅमिली रेस्टोरंट मध्ये सगळ्यानी जमायचं नियोजन होत. घाट उतरताना जो गार वारा  अनुभवाला तो वेगळाच होता. त्यात आनंद होता, त्यात मनाचा हिय्या होता, त्यात भेटीची आर्तता होती, त्यात अनुभवलेली कृपेची हळुवार फुंकर होती, त्यात भगवंताच्या प्रेरणेने झालेली ईच्छा त्याच्याच मुळे पूर्ण होतानाच समाधान होत. आत्ता समोर असेल पंचवटी रेस्टोरंट म्हणत चार पाच किलोमीटर गेले असतील. त्याच्या जवळ पोचायच्या आधी मस्त थंडगार लिंबू सरबत दोनदा दिलं त्या पांडुरंगी, त्यालाच दया आली असेल कदाचित आम्हा पामरांची. 

४. ४५ ला संध्याकाळी पंचवटीला पोचलो. एकेक करत हळूहळू सगळे पोचत होते. काहीजण काळे लॉनवर पसरलो, काही जण पितळ भाकरी कडे वळलो तर काही जण पुढे सासवड ला जाताना पण दिसत होते. तासाभरात कीर्तन सुरु झालं.  आता माऊलींच्या रथाकडे डोळे लागले होते. कथेकरी महाराज खूप मौल्यवान माहिती देत होते. बाहेरचे सेवेकरींचे आवाजही खूप येत होते.  

८ च्या सुमारास तो क्षण आला. सगळी भौतिक व्यवधानं विसरून -- दिंडीचे १८०० डोळे त्या सासवडच्या वाटेवर विखुरले होते. त्या क्षणा पर्यंत त्याच्या अनमोलतेच्या दिव्यतेची कल्पनाच करत होतो. माउलींचा रथ जस जसा जवळ येऊ लागला तस तसं मन भिरभिरत होतं. ती दिव्यता जवळ येताना भासत होती. आपोआपच आसमंतात वेगळेपण येताच येत. फुलांचा सजवलेला रथ त्यामानाने जरा संथ गतीनं येत होता त्यामुळे आम्ही तो डोळे आणि मन भरून पाहू शकलो. जमिनीवर संध्याकाळचा किंचितसा अंधार तर वर आकाशातला भरून आलेला ढगांचा काळसर रंग त्यात दिव्य प्रकाश रोषणाईतील रथ हलकेच समोर आला. आतून चंदेरी प्रकाश बाहेर झेपावत होता.
 प्रत्येक मनावर तो पाखर करत होता. नंतर त्या सुंदर तेजोमय रथातली पालखी नजरेस पडली आणि जगाचं भानच राहिलं नाही. अहो माऊली आल्या होत्या... आणि नेत्रांवाटे पूर हि आला होता... का कोण जाणे उर गदगदून भरून आलं आणि चित्ती समाधान पावलं. खरंच कि रे पंढरीनाथा अजबच कि रे तुझी लीला क्षणभर दर्शनाने जीव सुखावून गेला! 
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवाळावा... गाण्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा... 
माउली दर्शनंतरच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमातील या ओळी मनाला खूप भिडल्या. भक्तीच्या आनंदाचं महत्व आयुष्यात असाच टिकवण्याची बोधी द्या पांडुरंग!

भरून पावलेली -- दिंडीची ९०० मनं सुंदर प्रवासाच्या सुगंधी आठवणीत बसनी घरी परतताना  मनात पुढच्या वर्षीच्या टप्याची चर्चा सुरु होती.. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे -
"पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे |
बहू खेचरीच रान | बघ हे वेडे होय मनं ||"

राम  कृष्ण हरी !!
सौ. गौरी पाठक 
_____________________________________

Monday, 16 June 2025

बदलाला सामोरे जाताना...

 


आज सलग २१-२२ वर्ष कामावर जातानाचा रस्ता माझा दोस्त झालाय. रोजचा सहवास माणसाला जीव लावतो खरंय. पण अनेक वर्ष सलग सतत त्याच रस्त्यावरून त्या ठराविक वेळी प्रवास करताना तो आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटकच होऊन जातो. 

मला आठवतंय : रोज सकाळी निघालं कि समोर दिसणारी फुल तोडून पिशवीत भरून जाणारी एक आजी, एक उंच माणूस तिरक्या चालीनी चालत जातानाचा, चौकात लाल दिवा लागला कि थांबल्यावर दिसणारे फुल विक्रेते, यांची तर पूर्ण परिवाराची ओळख झालेली आहे, जे लेकरू ती बाई कडेवर घेऊन फुल विकते तीच मोठी होऊन गर्भारशी होईतोवर मी बघत आले आहे, आता ती बाई फुटपाथवर बसलेली असते, यांच्यात पुरुष कधी दिसत नाहीत, ठराविक वेळेला एका देवळा समोर उभं राहून घट्ट डोळे मिटून आर्त विनवणी करणारे एक काका, जे कोडं आहेत मला कि रोज आर्ततेने हे काय मागतात?, थोडं पुढं माग झालं कि ते दिसत नाहीत मग समजायचं आज एक तर लवकर किंवा उशिरा निघाले मी. अनेक वर्ष सकाळी भेटणारी पेट्रोल पंपावरची ताई आता कुठंपण दिसली तर हसून ओळख देते, हक्कानं विचारणा होते कि ताई खूप दिवस पेट्रोल भरायला आल्या नाहीत? घरातून निघताना पासून कामावर पोचेपर्यंत चे माझे सुप्रभात चे मानकरी...  बरेच आहेत. एक आजोबा मला म्हणतात भेटलं कि - "काय ग काल सुटी होती का ? " तुझं सुप्रभात ऐकलं नाही कि सकाळची सुरुवात होत नाही. तू माझी सुप्रभात क्वीन आहेस. असा सकाळचा प्रवास असणार असेल तर कोणाचं जगणं कंटाळवाणं असेल. जिना साफ करणाऱ्या, सकाळी कामावर पोचतानाच दिसणाऱ्या रास्ता सफाई कामगार बायका, कशा विसरू शकेन मी, सणासुदीला नटून थाटून कामावर जाताना कधी त्या मला तर कधी मी त्यांना हातानं छान दिसतंय खुणावल जायचोच. कशी मौल्यवान आठवण आहे हि! गाडीवर असताना दिसणारे सम सुखी अनेक आहेत. घरी जाताना दिसणारी गजरेवाली ताई, कॅलेंडर विकणारे काका, असे अनेक अनेक आहेत.

आयुष्यात नोकरी कारण गरजेचं आहेच पण ती करताना गेले २१-२२ वर्षात असे सकाळचे संध्याकाळचे घड्याळ असणारे अपरिचित असूनही मला आपले वाटतात. कोणी कोणाला काहीही देत नाही घेत नाही फक्त हसतो, काय जादु आहे ना स्मितहास्यात !

काल अचानक मेट्रोने ये जा करायचा योग आला. तो मार्ग खरंच सोयीचा आहे. कालांतरानं तो अवलंबला जाणार आहे, ती गरज असणार आहे आणि सोय सुद्धा. याची काल हलकीशी जाणीव झाली. मी प्रथमच एकटीनं मेट्रोचा प्रवास केला. पूर्णवेळ मी काचेतून खाली पुणं बघत होते, परंतु मला माझा २२ वर्षाचा कामावर जातानाचा सगळ्या घड्याळांचाच विचार येत होता. ती वीस मिनिटं मी माझ्या आयुष्यातली २२ वर्षातली कामावर जातानाची येतानाची सगळी घड्याळं डोळ्यासमोर काचेवर पाहत होते. दुचाकी सोडून मेट्रोची प्रवासाची सुरुवात होतानाच्या बदलला सामोरं कसं जाईन याच विचारात मी होते. मन आनंदी पण होतं पण तळमळ, हुरहूर पण वाटत होती. या घड्याळांची मला खूप आठवण येईल. जर या नवीन वळणावरच्या बदलला मला समोर खरोखर जायची वेळ आली तर माझं कसं  होईल?

त्या २१-२२ वर्षातली माझी घड्याळं कालांतरानं पुसट होतील या भीतीनं आज मी लिहायला बसले आहे.  मला ती कधीही आठवतील अगदी स्पष्ट मला खात्री आहे पण तरी आज बदलला सामोरं जाताना लिहावंच असं वाटलं. आयुष्यात पुढे अनेक वळणं येणं बाकी आहे. हि तर सुरुवात आहे. नवीन घड्याळ वाट पाहत असतीलच कि... कान्हाजी म्हणतात कि आपण जिथे आहोत तिकडचे असावे. कधीही बदलाला सामोरे जाताना सकारात्मकच असायला हवं. आयुष्यातलील सुंदर अनुभवांनी शिकावं आणि चुकांनी सुधारावं. समोरच्यांचे नकारात्मक विचार पण चांगलं शोधून सकारात्मकता वाढवण्यासाठी अमलात आणायला शोधायचे हा टास्क अश्या प्रकारच्या बदलांना सामोरे जाताना खूप उपयोगी पडेल. 

मग विचार आला लग्नानंतर नवीन दिनचर्या झाली त्या बदलाला पण मी किती दृढ विश्वासाने सामोरी गेले होते. आपलच आपल्याला आठवत जातं कधी कधी. आपण केलेली डबा करून, घर आणि स्वतःला यावरून कामावरची वेळ गाठायची खटपट,  त्या गडबडीतही केली व्रतवैकल्यं, दुखणी खुपणी सगळं. जीवन किती सुंदर असत ना ... सतत काहीतरी नवीन घडत असत अवती भोवती. इतके वर्ष काम करताना जीवनात आलेले दोस्त लोकं. किती बहुमूल्य आठवणी आहेत. कोणी कोणी बरोबर कामाला नाही आता, पण १२ -१६ वर्ष एकत्र ८-८ तास जगलॊ. आनंद, दुःख, त्रागा सगळं एकमेकींना समजू लागलेलं इतकं एकमेकींना ओळखू लागलेलो. हे घड्याळ तर नशिबानीच मिळतं कि.. आयुष्यात सुंदर आईपण अनुभवलं हा सर्वात सुरेख बदल होता आज वरचा आणि वयाप्रमाणे शरीरातील बदलाला पण तर मी किती छान सामोरी जातेय.. खरंच कि...  

काल मेट्रोत बदलाला सामोरे जातानाचा जेव्हा विचार आला तेव्हा लक्षात आलं कि हा होणार बदल फारच लहान आहे. आजवर अश्या अनेक बदलांना सामोरे गेलेली आहे कि मी. पुढे अनेक बदलांना सामोरे जायचे आहेच , कदाचित त्यासाठीच कान्हाजीनी आज सिंहावलॊकन करावलं कि काय कोण जाणे. त्या योगे अनेक लोकांची आठवण झाली ज्यांना अश्या अनेक मोठाल्या बदलांना सामोरे जावे लागले आहे. शिकण्यासारखेच आहे. 

असो आज उजाळा मिळाला त्या सगळ्या घड्याळाच्या आठवणींना.... सगळ्यांना धन्यवाद.  त्यांच्यामुळे कामाचा काळ सुंदर गेला आणि थँक यु त्या छोट्या ताईला जिच्यामुळे मेट्रोचा प्रवास समजून घेताना मजा आली. मला ठाऊक आहे हे फार काही अवघड नाही असं म्हणून काही जण हसतील सुद्धा मला. परंतु माझी काही हरकत नाही कारण त्यांना तो अनुभव अजून यायचा आहे ना ! एखादी गोष्ट अनुभवली कि तिची सुलभता समजते. ते करायची क्षमता असतेच पण वेळ यावी लागते. हे समजायला अवघड आहे, बघा समजतंय का काय म्हणायचंय ते. मी मात्र आज खूप आनंदी आहे खुश आहे. कोणती पण लहानशी गोष्ट मिळाली कि तो आनंद साजरा करायचा, मी श्रीमंत झाले म्हणायचं. माझी जुनी सवय आहे. त्यामुळे पेशी पण आनंदी होतात त्यायोगे मी पण. 

Lets time to party now!

जय श्रीकृष्ण !

सौ. गौरी पाठक 

९९७०१६८०१४


Saturday, 31 May 2025

भुंगा - उडून गेलेला !

भुंगा 


लगोरी नावाची मराठी मालिका होती ना तश्शीच आमची हि लगोरी टीम. आज लगोरी टीमचा ग्रुप कॉल आला. (चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .)

एक : हॅलो ! आलात का सगळ्या ? आज जरा संध्याकाळी भेटूयात का ?
दोन : हो पण काय झालं ग ? anything serious?
एक : नाही पण भुंगा लागलाय डोक्याला तो समजेना का लागलाय ? मग म्हटलं जरा बोलावं.
तीन : चालेल पण आज गुरुवार आहे ग शुक्रवारी भेटू रात्री म्हणजे जरा निवांत असू ना..
चार : खरंय पण ये थोडा वेळ, आवरून ये लागेल तर.
पाच : वेळ सांगा मी पोचते.
एक : ऑफिस नंतर पुलावर या.
तीन : ओके ओके येते.
एक : लव्ह यु गर्ल्स.

अशा बरेचदा भेटी होतात. मैत्री नातंच अस असतं ना कि बोलावलंय आणि जायला जमत नाही असं करूच शकत नाही. तर त्या दिवशी संध्याकाळी हा मुद्दा होता कि एकाच प्रकारचा प्रश्न असेल तरी समान का तोललं जात नाही 
जगात? 

एक : आपल्या आजूबाजूला आपले समजतो ते लोक  असतात. आपण त्यांना जीवापाड जपतो. वेळ पडली  तर त्यांच्या वतीनं इतरांशी भांडतो पण. मग तुम्हाला कधी असं झालाय का?  कि अश्या लोकांबरोबर असताना तुम्हाला गरज आहे तेव्हा त्यांनी  तुमची बाजू घेतली नाही.

दोन : होऊ शकत त्यांना तेव्हा ती गोष्ट झेपलीच नसेल. जर ती तुझी माणसं आहेत तर ती तुझ्या बरोबरच  असणारेत. 

तीन : तू एकटी पडलीस असा वाटलं का तुला तेव्हा ? हं... मला झालेलं अस एकदा कि सगळे माझे, मी सगळ्यांची,
पण एक वेळ अशी आली की माझी बाजू घेणार  कोणीच नव्हतं. नंतर अस व्हायला हवं, तसं हव  म्हणतात. काय उपयोग? तेव्हा माझी बाजू घेतली असती तर मला जास्त आधार वाटलं असता. असं झालेलं  माझ्या बाबतीत पण. नंतर मला समजावलं गेलं कि जाऊ दे बोलून उपयोग नाही तू तुझं बीपी वाढवू नको. 
तीच्या / त्याच्या बाबतील काही बोलत जाऊ नको.

चार : कदाचित त्या व्यक्तीशी त्यांना संबंध न बिघडवता दिवस छान पार पडला जावा वाटलं असेल. 

पाच : हो ते सगळ्यांनाच असत. पण हीच गोष्ट ते तिकडे बोलून हि  करू शकले असते कि - 
उदाहरणार्थ: तुम्हाला जे वाटतंय तस नाही बर का, तिला वेगळं म्हणायचंय तुम्ही वेगळं समजताय. 
हे मी माझ  मत दिलं कारण मला असाच अनुभव आला मागच्याच महिन्यात. 
मी अपसेट होते तरी आवरून कार्यक्रमात गेले घरच्याच बरका तिकडे मी नेहमी सारखी नव्हते. मला ठाऊक नव्हत की माझा चेहरा बोलतोय की मी मारून  मुटकून आलेय किंवा त्रस्त आहे. माझे वाटणारे सगळे होते पण एकानही, "का ग गुमसुम आहेस?  नेहमीसारखी वाटत नाहीस?" अस विचारल नाही. पण तिकडे आलेल्या तिराईत बाईन मला विचारल,"काय ताई आज का शांत शांत?"  तेव्हा मला फार वाईट वाटलेल की माझे वाटणारे असुनही मला कोणी काय झालं पण विचारल नाही. त्यांना  मला का विचाराव वाटल नाही? आपल माणूस अस्वस्थ चलबिचल दिसल तर आपण  बाजुला घेऊन विचारतोच ना? मग माझी वाटणारी ही  माणसं माझी नाही त का?

एक : तेच तर ! मला असच / हेच म्हणायचंय कि माझं म्हणणं जर बरोबर होत हे पटत होत तर तेव्हा मम तरी  म्हणावं ना, नंतर काय उपयोग? ती व्यक्ती सुनावून गेली सगळ्यांमध्ये आणि माझी माझी म्हणत असलेली  माझी वाटणारी ती माणसं चकार शब्द बोलली नाहीत तिकडे? लहान नाही मोठी नाही कोणीच ? का ? 
म्हणजे ती माझी नाहीत का ? चुटपुट भुंगा लागलाय याचाच कि मला वाटतंय कि माझी खूप जोडलेली माणसं  माझ्या मागे  आहेत मग ती मला हवं तेव्हा का नव्हती ? मग ती माझी नाहीत का ?

दोन : सुचलं नसेल त्यावेळी कोणाला काय व्यक्त व्हावं? लगेच टोकाचा विचार करू नको. 

तीन : प्रत्येकाची सपोर्ट करायची पद्धत वेग वेगळी  असते. तू विचार करू नकोस. 

चार : कदाचित नक्की काय झालय हे समजायला पण  वेळ लागतो गं, खूप जण असाल ना तिकडे? 

पाच : आपल्या समजणाऱ्या व्यक्तीला कोणी काही म्हटलंय तर त्यात विषय खोल समजून मग बाजू का  घ्यावी लागावी ? ठाम विश्वास हवा ना कि हि अशी नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे. 
तिला अस म्हणायचं नसणारे.

एक : बघ कि ग !

दोन : त्या व्यक्तीकडून आधी पोळलेले असतील कदाचित म्हणून मध्ये पडत नसतील. 

तीन : मग त्यांनी "एक" कडून पण त्यांच्या वेळी हि मध्ये पडेल अशी अपेक्षा ठेवु नये.. 
तेव्हा मात्र हि असली कि चिंता नाही, ते निर्धास्त. 

चार : तुम्ही दोघी खूप नकारात्मक वळण घेत आहात. उलट अशा लोकांपासून दूर राहा हे शिका. 
ज्यांच्या  जवळीकीनी किंवा ज्यांच्या बद्दल बोलुन आपले वाटणारे पण चिडीचूप होतात अशा मुद्द्यांपासून.  आता चार हात दूर राहा.  तुमच्या वेळी कोण खमक उभं होत पाठीशी हे न बघता यातून धडा शिका.  कोणाच्या किती जवळ जायचं? कोण किती बरोबर चुक हे सांगायला जायच की नाही? 
परंतु यामुळे तुम्ही जशा आहेत त्यात बदल करू नका. तुम्हाला वाटलं कि एखाद्या साठी खमकं उभं  राहावं -  राहा, पूर्वग्रह ठेवून जगू नका. "मला नाही आलात ना पाठीशी आता बसा मी पण नाही येत लक्षात ठेवेन " असा नका करू.

पाच : हो म्हणजे तुझं नेहेमीच पालुपद, सोडून द्या आणि जगा.

एक : नाही मी तशी वागुच शकत नाही कारण मी आपल समजल की आपली फळी तुटू द्यायची नाही. कारण जग वाटच बघत असत फुट पडते कधी आणि मजा येते कधी. मला माझी आपल वाटतात त्या 
माणसांची फळी कायमच तटबंदीचीच ठेवायला आवडतं. म्हणून तर तुम्हाला मनातल बोलले.
(चारचा हात धरून) सगळं समजतंय ग पण भुंगा हा लागला कि सोयीसोयीनी का वागतात? हिच व्यक्ती त्यांना सोयीचं वागली बोलली तरी ती तुमची, 
पण तिला गरज असेल तेव्हा त्यांना :- कधी सुचत नाही, तर कधी आता कस बोलावं बाई मधेच? अस वाटत, तर कधी घरात मोठे आहेत ते बघतील असं वाटत, नाहीतर अस परत होऊ नये याचाच विचार करत बसतात. (जी नंतरची गोष्ट आहे.) हे का पण ?

चार : एक मिनिट तू शांत हो. 

दोन : तू जस इतरांशी वागतेस ते तसेच तुझ्याशी वागवेत हा हट्ट नको करू. 

तीन : म्हणजे आला का तुझा कृष्ण परत कर्म कर फल कि अपेक्षा उस पे छोड । हे पण मान्य आहे पण आत्ता ती दुखावलीय त्याच काय?  अचानक आपल कोणी नाही अस मनाला लागलय तीच्या... साधू संत नाही आपण पटकन सोडून द्यायला. 

पाच : ऐका ना आता एक मुद्दा मला पण पटलंय कि आपण जगाला बदलायला जायचं नाही तर, आपण आपलं  सांभाळून जगायचं, वाटलं मदत करावी करायची, नाही वाटलं नाही करायची. Any time available राहण अति नको, विचारू दे समोरच्याला, मदत हवीय म्हणू दे, ready reckoner आपणहून न बनणे म्हणजे त्रास होणार नाही.

दोन : करेक्ट 

तीन : पूर्णपणे तसं नाही पण तसेच काहीसं. पण पूर्वग्रहदूषित नक्कीच जगायचं नाही हे मात्र १००% पटलंय. 

चार : गुणाच्या माझ्या त्या !  इतरांकडे कस असायला हवं? किंवा त्यांनी कसं असावं किंवा करावं हे त्यांना ठरवू द्यायचं आणि लागेल ती सांगतील ती मदत करायची.  
आपल्याबाजूने कोणी बोलो न बोलो स्वतः समर्थ राहायचं जगायला. आपल्यात क्षमता आहे म्हणून तो परमेश्वर आपल्याकडून इतरांसाठी करून घेतो. जे योग्य वागलो त्याचं योग्य वेळी योग्य फळ मिळेल.  ते त्याच प्रकारे परत मिळेल अस नाही. सिम्पल. 

एक : समजायला सोपंय पण झेपायला वेळ लागेल. पण याच व्यक्तींना त्या आहेत तसं म्हटलेलं पण आवडत नाही. लगेच स्पष्टीकरण देतात. कबुल करावं आहेत तश्या स्वतः ला.

दोन : हेच म्हणतेय मी असच त्यांना पण झेपायला वेळ लागला असेल असं कशावरून नाही. त्यांना तेव्हा तुझ्या बाजूनी बोलू शकतो नाही याची खंत असेल असं पण असू शकत. चुकलच, खंत वाटतेय असा सहज कोणी सांगत किंवा कबुल होत नाही. तू झालीस तू होतेस आभार मान. त्यांचं मन त्यांना खात असेलच नक्कीच. 

पाच : Oh! Yes इसमें दम  है ।

तीन : सोड आता खंत बिंत. उडून गेला बघ तो भुंगा... लांबवर...  आपलं ठरलय ना, आनंदी जगायचं, मुक्तं जगायचं, मनात काही जड होईतोवर ठेवायचं नाही. म्हण "जग गेलं उडत, मी आनंदी आहे."

चार : खरंय ग ..

तीन : किती वाजले ? बाई ग दिड तास झाला ? मी पळते तुम्ही बसा. 

चार : जा जा. शब्दाला मान देऊन आलात धन्यवाद !

दोन : मारा ग हिला ... 

एक : मिठी मारत हसत हसत मी पण मारणारे थांबा. 

पाच : चल मी सोडते तुला जाताना. 

आणि नंतरच्या अडीच मिनिटात पाचही जणी गायब. स्वतःच्या विश्वात परत भिरभिरायला याच खात्रीनं कि 
अडकलाच पाय तर चौघी आहेत बाहेर काढायला. 
भुंगा काय कधीच उडून गेलेला दिसला का तुम्हाला ? हा ! हा! हा!
लगोरी उगाच नाव नाही ग्रुपचं!

गौरी पाठक 
१६ मे २०२५
९९७०१६८०१४


Wednesday, 23 April 2025

स्वछंदाचा मार्ग मोकळा !

 स्वछंदाचा मार्ग मोकळा !

विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.

एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५

Monday, 21 April 2025

चोर पोलिस

चोरपोलिस
ती : अगं काल तू कुठे होतीस? सगळ्या भेटलो तुझी खूप आठवण झाली. 
मी : गावाकडे वास्तुशांत होती माहेरच्या शेजारी होत्या त्यांच्याकडे. . 
ती : अच्छा ! कशी झाली ? गावाकडचं वातावरण दोन दिवस मस्त गेले असतील. 
मी : खरंय! मुख्य शहर ते गाव प्रवास अनुभव मस्त होता. काही घ्याव अस आणि काही आपलं बरय रे बाबा असं होतं.
ती : भर उन्हाळ्यात विदर्भात गावी जायचं सोपं नाही. 
मी : मी त्यांच्या गावी प्रथमच गेले. फार जायची वेळ आलीच नाही कधी. एप्रिल चा उन्हाळा बघून आले. ४३-४५ डिग्रीच्या झळा अंगावर घेतल्या अनेक वर्षांनी.

पुण्यातल्या बस आणि गावातल्या एसटीतला जबरदस्त फरक बघून आले. महिलांच्या राखीव जागा पण पुरुष बसतात. दोन दोन तास दूर असल तरी अगदी सामान्य वर्गातली बाई आणि कलेक्टर ऑफिस ची बाई पण एसटीतूनच प्रवास करताना दिसली. मुंबईच्या मेकअपच्या बायका  आठवल्या या पण तश्याच आवरून मुख्य शहरात मीटिंग साठी जायला बसमध्ये होत्या. आधी मला वाटलं लग्नाच्या गडबडीत आहेत. त्यांना ते उकाड्यातलं बसनी ये जा नेहेमीच असावं. दोन तास उभं राहून एसटीतून जायची हि पहिलीच वेळ असेल माझी. विविध नमुने अनुभवले. कोणी निरखून पाहत होतं, तर कोणी डोळे मोठे करून. आपण शहरी लगेच ओळखू येतो. त्यात एका माणसांनी सहानुभूती दाखवली दोन सीटवर मला तिसरीला बूड टेकायला तरी जागा दिली. कान्हजी त्यांना सुखी ठेवो. आपण छान हसून बघितलं बोललो कि सगळं सहज होतं हे मला जाणवलं. 

किती का तापेना डोक्याला पंचा बांधून सायकलवर, दुकानात, एस टी स्टॅडवर शो मस्ट गो ऑन म्हणत काम करणारे दिसले. नेहमीपेक्षा वेगळ जग बघितलं. फरक काही नाही नैतिक जबाबदारीत अडकलेलेच सगळे जीव खर तर!

आपण कुठही गेलो तरी घरातल मोठ माणूस समोर बघितलं की छान वाटतं. तशीच आत्त्या सामोर आली.
पाणी द्या गss, चहा मांडा, पांघरूण दिल का सगळ्यांना?, झोप लागली का? अशा अनेक गोष्टी जातीन तपासणारी पिढी संपुष्टात येऊ लागलीय याची तीव्रतेने जाणीव झाली. आपल्या पिढीला ही दिसली पण पुढच्या पिढीला सगळ्यांना ही दिसेल का? हा प्रेमळ अनुभव त्यांना मिळेल का? मिळाला तर त्याची त्यांना कदर असेल का? अनेक प्रश्न समोर फिरत होते.
आपण कस असल पाहिजे याच्या चेकलीस्टमधे मनात नोंदी झाल्या.

मला आवडेल म्हणून चांगला वास असलेलं कढीपत्ता झाडाच रोप एकान आणलं, एकिन ते मातीत बांधून दिलं, नंतर पुढे एकीन जाईतोवर मोकळ करून ठेऊ म्हणत पाणी शिंपडलं, ते बघुन बाबांचे शब्द आठवले. आपल्यासाठी कणभर का होईना कोणी दिल ना तरी मणभर प्रेमान ते जपायच अस बाबा मला सांगायचे. गावाला अस देण्याची पद्धत असतेच ठाऊक आहे पण मी पण ते पुण्यापर्यंत जपलं. प्रत्येकात काही तरी चांगल शोधावं तस मी त्यात फक्त माया बघितली. बघु वाढत कस ते?

एक गोड अनुभव सांगते. पोचले तिकडच्या घरी एक लहान मुलगा आणि मुलगी होती. सगळे कामात व्यस्त होते. संध्याकाळी मी तेनाली रामा २ चा कालचा भाग फोनमध्ये बघू अश्या विचारानी  फोन हातात घेतला सोनीवर तेनाली ऊघडलं. ते एका लहानगीन बघितलं. ती मुलगी आनंदून म्हटली, "अरे काकू तेनाली रामा पाहतायत." मी म्हटलं, "हो मला आवडतंच ते." तर मला टाळी देत ती खुश होऊन म्हटली, "हो मी पण बघते काकू, आज बुडल आठ वाजत लागत ते." मी म्हटलं, "झालेलं पण पाहत येतं कि चल टीव्ही वर पाहू." पण नाही अस दिसत नाही बरोब्बर आठला ते दिसतं असा पटकन ती म्हटली. मग समजलं कि गावात केबल वर जुने एइपिसोड दिसत नाहीत. किती छान सवय होती वेळेत पाहायची. आपण शहरी लोक कालचे पण पाहू शकतो त्यामुळे वेळेची किंमतच नाही आपल्याला. ते लेकरू खूप आश्चर्यात विचारात होतं कि काकू तुमच्याकडे असं कधी पण दिसत का ? किती निरागस मन असतं लहान मुलांचं. मी पटकन म्हटलं,  "तुमचच बरय वेळ पाळून बघायचं."  तीच्या डोळ्यातली ती चमक वेगळीच होती. मला आनंद हा होता कि गावात असूनही ती तेनाली रामा बघायची आवड बाळगून होती. खूप खूप आनंद झाला. बाकीचे दोघे आमच्या भोवती घुटमळत होते. त्यांना काही इंटरेस्ट नसावा. त्यांना आश्चर्य हे होत कि शहरातली काकू पण बघते याचंच. मी म्हटलं, "ते मस्तच असतं" तर ती मुलगी काय म्हणावी त्यांना ठाउकें का ? सी आयडी सारखा जुन्या काळी  चतुर म्हणून ओळखले जायचे तेनाली रामा. हे ऐकून तर मला आनंद झालाच कि इतक्या खेडेगावात राहून पण इतकी माहिती असून हे लहान लेकरू त्यात इंटरेस्ट दाखवत त्याच महत्व तिच्या बरोबरीच्यांना सांगत होतं. पुढच्या पिढीला हे माहित आहे, ते पण गावातल्या हे बघून मन भरून आलं.  दुसरी म्हणाली, "ठीके आता ते उद्या बघ ग." आणि  मला म्हणाली, "चार जण लागतात चोर पोलीस खेळायला, काकू तुम्ही आमच्या बरोबर खेळता का?" मी म्हटलं, "इकडे लपायची जागा मला माहित नाही ग?" मला झपकन लहानपण आठवलं. वयानी काय वेळ आणली चोर पोलीसला नाही म्हणतोय आपण जरा हसू आलंच. तर मला म्हणते कि "अहो काकू कागदातला चोर पोलीस खेळायचं." " ते कसं ? मला माहित नाही ग." मी बाळबोधपणे विचारलं. मला खूप हसल्या दोघी. मला त्यांना बघुन भारी वाटलं. हो शहरात हे खेळत नाहीत ? मला काय ठाऊक खेळाच नाव वेगळय, पण हरकत नाही ही माघार घेण आवडलं मला. मी म्हटलं शहरातले काहीही शिकायला केव्हाही तयार असतात. शिकवलं तर खेळेन. मस्त शिकवणी झाली आणि तासभर खेळ झाला. तो तास बालपणात रमून गेले मी. चिठ्ठी घेतानाच आनंद, चिठ्ठ्या फ़ेकतानाचा आनंद मनमुराद घेतला. कार्यक्रम काय होता हे मला तेव्हा महत्वाचं नव्हतं. आला क्षण आनंदी जगायचं, हे मी नुसतं म्हणत नव्हते तर तो जगत होते. खेळताना केलेला डॅंबिसपणा ती खुणवाखुणवी मला समजत होती. पण ती पण माझ लहापण आठवून गेली. मुख्य शहरापासून लांबच्या गावातल्या अशा मुलांना जवळून पाहता आलं. काय सुरेख योग होता. ज्या कामासाठी मी गावाला गेले होते ते झालच होतं. पण तेनाली रामा आवडतं अशी एक छोटुशी मैत्रीण पण मिळाली होती. चार लहानांत लहान होऊन मला खेळता आलं. मस्त वाटलं. 

दुसऱ्या दिवशी रिक्षा बोलावली होती मी निघाले होते. रिक्षातून ती मला दिसली. मला न समजताच मी तीला पटकन टाटा केला. तिनी पण तितक्याच आपुलकीनं चाललात काकू ? अशा म्हणत हात वर हलवत  टाटा केला, सायंकावरून थांबत. किती क्षणिक भेट पण मला ती जवळची वाटून गेली. त्या चारही लेकरांना कान्हजी भरभरून प्रेम देतो आणि योग्य मार्ग दाखवित हीच मनापासून इच्छा !

याच टीमला काल संध्याकाळी भातुकली खेळताना मी दुरून पाहत होते. मला माझी लहानपणची जिन्यातली भातुकली आठवली. आजकाल शहरात भातुकली खेळ दिसतच नाही. इकडे तो बघून मनातला एक कप्पा उघडला होताच तो निघताना परत आणखी आठवणींनी भरून बंद केला आणि परत आले. 

सगळ्यात आनंददायक गोष्ट ही वाटली की त्यांना मला खेळायला बोलवावं वाटलं. भले घरात गडबड केली म्हणून काकुला विचार खेळते का? अस ही असेल. मला माहित नाही पण त्यांना मी खेळायला चालणार होते चौथी सवंगडी म्हणून याचा मला फार आनंद झाला.

ती :  खरच तु खुप छान अनुभवलस. जे दिसेल ते वेगळ्या नजरेनं पाहायला तु शिकवलस. 
मी : धन्यवाद सुंदरी!  खर सांगू तशा खुप गोष्टी बघितल्या पण मांडून ठेवण्यासारख मात्र मांडलच. तुझ्यामुळे त्याला व्यक्त रूप आलं हे छान झालं. माझही मन हलकं झालं.
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
२१ एप्रिल २०२५

Monday, 7 April 2025

मनातलं माझ्या


अनुक्रमणिका 
१) नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.
२) वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ
३) कंगोरे
४) कंपन
५) चेपलेली मधली फळी
६) नक्की चुकतंय कुठं?
७) गुजगोष्टी
८) नजर
९) सल
१०) माझी प्रिय सखी
११) ऊत्तर 
१२) प्रश्न 
१३) स्वच्छंदाचा मार्ग मोकळा
१४) मार्ग 


***************

१) नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.

आज काल समोर चुका सांगितल्या तर त्या समजत तरी नाहीत किंवा त्या चुका वाटत पण नाहीत किंवा त्यांना त्यात पडायचं पण नसतं - हो आपण बरं आणि आपलं घर बरं असा दृष्टिकोन असतो बरेच जणांचा. 

पण धकाधकीच्या या जीवनात काल असे दोन किस्से घडले कि मनावर हळुवार फुंकर घातली गेली.  जणू काही कान्हाजीनी सुचवलं कि दूरवर पाहायला शिक न समजणारी लोकं, तस वागताना निबर जगणारी माणसे  विसरून जायला शिक. 

काल मी माझा आवडता गर्द हिरवा पंजाबी ड्रेस घातला होता. दिवस खूप छान सुरु झाला होता. कामावर पण नेहमीप्रमाणेच वेळेत निघाले होते. माझी रुपेरी ज्युपिटर आणि मी सिग्नल ला उभे होतो. उजवीकडे एक सोज्वळ पंचविशीतली मुलगी पण मागून आली. डावीकडे फटफटीवर कानात हेडफोन घालून त्रासात चिंतेत असलेले तरुण मुलगा होता. जगाचं भानच त्याला नव्हतं. त्याच्या अगदी जवळ बस आली आणि क्षणात सिग्नल तोंडाला बसनी. ती बस त्याच्या इतक्या जवळून गेली कि उजवीकडचे आम्ही सगळे आता काय होतंय याच ?? असच बघत डोळे मोट्ठे करून आं वासून होतो. मोठा सुस्कारा सोडत सगळे काय बसवाला आहे ? कशी नेली गाडी देवा रे! असे बोलत होतो. यात तो मात्र अनभिज्ञ होता. शेजारची आणि मी बोललो काय मुलगा आहे हा.... काय बेतलं होतं आज याच्यावर याची काहीच कल्पना नाही याला. तरी याचे वादाचे हो हो तसे नाही असेच सुरु होते. इतक्यात उजवीकडची मुलगी मला म्हटली कि तुमचा ड्रेस खूपच मस्त आहे ताई. आश्चर्याने मी झपकन खाली बघितलं कि कोणता ड्रेस आज घातलाय ते. ती म्हणाली कि पॅटर्न पण मस्त शिवलाय तुम्ही. मी धन्यवाद म्हटलं. दोघी पण खूप छान हसलो. या पाच सात मिनिटात इतका काही शिकवलं कान्हाजीनी काय सांगू.  टाटा करत सिग्नल सुटल्यावर आम्ही पुढे गेलो. 

दोन चौक झाल्यावर एक अनारकली घेराचा ड्रेस घातलेली मुलगी माझ्या पुढे मला दिसली. मी माझ्याच विचारात होते. वीस बावीस वर्ष कामावर जातानाचा रास्ता पाठ होऊन जातो. आपोआपच आपण पोचतो. इतकयात माझ्या लक्षात आलं कि तिचा ड्रेसचा घेर चाकात जाणार आहे. ती खूप घाईत दिसली. मी मागून खूप हॉर्न वाजवला. काही क्षणात तिला ते  समजलं. मी हेल्मेटमधून डोळे गाडीच्या खाली बघ असे निदर्शनास आणून दिले. तिनीपण मन हलवून समजल्याची खूण पटवली. तत्क्षणी तो फलकार सावरत परत गाडीच्या आरशातून मला डोळ्यांनी भुवयांच्या ओके आहे ना? असा विचारलं. मी पण पटकन मान डोलावली. त्याच आरश्यातून तिनं डोळे मिटून मान खाली करत धन्यवाद पोचवलेलं पण मला समजलं. माझ्याकडून पण प्रतिक्षिप्त क्रिया झाली मान डोकावण्याची. 

काय म्हणावं याला सांगा बरं ? विना शब्द डोळ्यातून हे सगळं झाला. दोघीनी हेल्मेट घातलेलं होत. दोघीनाही कामावर पोचायचं होत. दोघीही भर रहदारीच्या कर्वे रोडवर मागे पुढे होतो. तरी संवाद झाला. धन्यवाद पण झाले. न बोलता इतकं सगळं झालं. 

मग विचार आला कि ज्यांना समजून घ्यायचाय ते कसेही घेतातच, तस करायचं तर समोरचा काय सांगतोय त्यावर ऐकून घेणं हवं.  काल परवा पर्यंत जो विचार आला होता त्यावर हळुवार फुंकर घालून दिली यांच्या मार्फत कान्हाजीनी. 

का? आणि कशी ? करा विचार तुम्हीच. 

मी मात्र जगण्याचाही कला अवगत केली. जगताना वापरता येतेय का बघु...

जय श्रीकृष्ण!

सौ. गौरी पाठक
२२.०८.२०२४

#####
२) वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ

काल एकीच्या घरी भिशी होती. योगायोगानं आणखी दोघी तिघी पण भेटल्या. मस्त सात आठ जणी खूप दिवसांनी भेटू शकलो. 
नुकताच कोरोना गेलेला त्यामुळे भेटी गाठी परत सुरु झाल्या. त्यामुळे खूप खूप बोलायचं होतं सगळ्यांनाच. 

 *एक म्हणाली :* हा घरून काम करतोय अजूनही त्यामुळे मुलाला सोडणे आणणे बाहेरची काम पण करायला मदत होतेय पण माझं बाहेर जाणंच होत नाहीये त्यामुळे. (दु:खी  चेहरा) त्याला कामात ब्रेक असेल तेव्हा हाच म्हणतो हे मी करून येतो, ते मी करतो. माझ रूटीनच बदलुन गेलय.

 *दुसरी म्हणते :* बरय कि तेवढंच तुला निवांतपणा. (पण तिला तो निवांतपणा नको होता असा बोलण्यातून जाणवलं.)

 *तिसरी म्हणाली :* मग तू पण काहीतरी आवडीचं काम सुरु कर कि तसही तू पण आधी काम करताच होतीस कि. (पण हे बोललेलं  पण तिला आवडला नाही. )

 *पहिली  :* करायची तेव्हा केली कि कामं, (रागवून) नोकरी केली म्हणजेच  सगळं असत असा नाही. घरी असणारी स्त्री पण कमी काम करत नाही. 

 *तिसरी :* अग तूच तर म्हटलंस ना कि नवरा घरून काम करतो त्यातून ब्रेक असेल तेव्हा तोच बाहेरची बरीच काम करतो तुला तुझं बाहेर जाणं भेटणं इतर होत नाही. म्हणून मी म्हटलं.

घर सांभाळताना पण तर तू खुश नाही असाच अर्थ झाला ना म्हणजे. घर सांभाळणारी आणि नोकरी करून घर सांभाळणारी दोन्हीही तितक्याच महत्वाचं आहेत हे मला पण ठाऊक आहे. पण आपण ज्यात आहोत म्हणजे नोकरीच्या किंवा घर सांभाळणाऱ्या यात समाधानी असं महत्वाचं आहे. 

 *पहिली :* नोकरीच्या बायकांना नेहेमीच त्या ग्रेट वाटतात. (कुत्सित)

 *चौथी :* असा समज चुकीचा आहे. आपणच आपलं ठरवतो. नाही एखादीला अधिपत्या खाली काम करायला आवडत ती नाही करू शकत नोकरी. याचा अर्थ नोकरीच्या स्त्रियां बद्दल असा विचार नसावा. तू तर दोन्ही स्त्रीचे आयुष्य जगली आहेस ना !

 *पाचवी :* बरोबर.

 *तिसरी :* तेच म्हणायचं होतं मला कि असा कोणत्याच स्त्रीने मग - ती नोकरीची असो व घर सांभाळणारी, दुसरी बद्दल विचार करायला नको. 
तसही अपवाद असतीलच कि म्हणजे घरी राहणारी स्त्री पण अधिपत्याखालीच असत नाही अस नाही आणि नोकरीवालीला विचारणारं कोण नसेल असही नाही.

समाजात आपलं अस्तित्व टिकवून परंपरेने असलेले सगळे करून नवीन पिढी घडवणं हे सर्व स्त्रियांचं काम आहे ते करताना जिला जो मार्ग सोपा वाटतो तो ती निवडते. (हे काम करण्याची क्षमता स्त्रीयांमधेच असते. यावर दुमत नसावं.)

 *दुसरी :* खूप शिकलेल्या स्त्रिया पण घर सांभाळतात तसेच कमी शिकूनही नोकरी करून घर  सांभाळणारी पण असतेच की.

 *पहिली :* पण समाजात घर सांभाळणारी कमी लेखतात. 

 *तिसरी :* असं कोण म्हणतं ? ज्याची त्याची क्षमता असते ती. त्यात महत्वाचं म्हणजे कमी लेखतात हा विचार का करायचा. हा विचार करूनच मन दूषित करतो आपण. 

 *पाचवी :* दोन्ही प्रकारच्या स्त्रियांनी एकमेकींना तितकीच किंमत दिली पाहिजे. 

 *तिसरी :* सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखण आधी बंद करा. 

 *पहिली :* म्हणायला सोप्पंय ग, पण अनुभव येतात ना तसे. 
 *तिसरी :* दुर्लक्ष करायचं मग. ते आपोआपच बंद होतं.  मी पण इकडून बाहेर पडताना या वाक्यावर दुर्लक्ष  करणार आहे ते हे :  "नोकरीच्या बायका स्वतःला फार शहाण्या समजतात."

 इकडे बोलले कारण मी तुम्हाला आपलं समजते. आपणच आपल्या सख्यांचं मन स्वच्छ ठेवायला मदत करायची मग मैत्रिणी का म्हणून घ्यायचं एकमेकींना?

 *चौथी  :* एकदम बरोब्बर !

 *पहिली :* हं... प्रयत्न करेन ... दुर्लक्ष करण्याचा.. 

 *सहावी  :* बरोब्बर ! मी तेच करते. असले टोचणारे विषय आले कि शांत बसते. मी पण या दोन्ही स्त्रिया जगले आहे. जे जमत नाही त्या बद्दलची रुखरुख कमी होते अशानी. उभारी येते ती वेगळीच. 

 *तिसरी :* ज्या प्रकारचे जगायचे आहे ती काळाची गरज पण असू शकते. सगळंच मनाप्रमाणे करता येतेच असे नाही. आत्ता सर्वात महत्वाचे हे कि जे करू ते आनंदात राहून करूया. आपल्या शरीराला त्याची गरज आहे. मग ती नोकरीची स्त्री असो व घर सांभाळणारी. एकमेकींवर डागण्या डागण्यापेक्षा मिळून उपाय शोधू ,समजून घेऊ, उभारी देऊ. 

 *सगळ्या :* १००% खरय ग !

 *सातवी :* हं ! (कशातच मत न देणार व्यक्तिमत्व )
००----------००

गौरी पाठक 
२१.०८.२०२४


अभिप्राय 

+-+-++-+-++-+-++-+-+
३) कंगोरे

नेहमी पाऊणतासात घरी पोचते मी. कधी कधी मधे काम करून तासाभरात जास्तीत जास्त.  नोकरी करत असल तरी घरची ओढ मला नेहमीच वाटते. 

आज घराजवळ एक मैत्रीण भेटली, खर तर रोज दिसते ती. घड्याळं असतात आयुष्यात काही लोकं. ऑफिसला जाताना - येताना दिसली नाही ही मंडळी की समजायच आज ऊशिर झाला आहे.

पण आज मनापासून वाटल थांबुन बोलुच.  ती पण थांबली. दोनच वर्ष झाली दोस्तीला, पण छान वाटत तीला भेटुन. डोक्यात मधुरिमाला लेख पाठवलेला विषय होताच. 

मी : कशी आहे लेक?
ती : मस्त! हल्लीच्या मुली पटकन सेट होतात.
मी : करमत का ग?
ती : आता हळूहळू सवय होतेय. पण फोन मुळे हव तेव्हा बोलण होतं. तीला हव ते ती विचारते. सुरूय..
मी : मस्त. हे मी माझ्या मैत्रिणीला सांगणार आहे. तीचा लेक परप्रांतीय सुन आणतोय. ती खुप हौशी आणि कायम आनंदी पण पुढच सगळ कस जमेल विचारात आहे. 
ती : परप्रांतीयांना पण आपली संस्कृती खुप आवडते. तीला सांग की योगायोगानं श्रावण आहेच, सगळे सण व्रत समजवत करत रहा.
मी : मग काय तर. मी म्हटलच कर तिकडेच केळवण, जिवतीची पुजा घरच्या घरी जमतय तसं.
ती :  आपल्याला वाटत पण आपण करत राहिलेल मुलांच्या मनात नोंद होत असतं. ही बघ की ईकड बघायची पण एकटी परदेशात आहे तर सगळं पाळते. अगदी रामनवमी अयोध्या देवळाच्या दिवशीच पण भारतासारख तिकडे चार पाच का होईना जमुन केलं.
मी : ( मनात... आजच लेख पुरा केला तो आशय वास्तविक दिसतोय समोर... मनभावन सावन वाचा लेख माझा. त्या दिवशीच तो फायनल करून पाठवला होता.) मला हेच वाटत आपण करत राहायच.  शिकवत राहायच. आपण सांगितल नाही अस व्हायला नको.
ती : अगं अनुभव हा आहे की परप्रांतीय मुली पण आजकाल आपणहून सगळ हौशीन करू लागल्या आहेत. आनंद आपल्यातल्याच मुलींचा आहे. पण वेळ आली की करतात हा पण अनुभव आहे. 
मी : हेच म्हणते मी की, या पिढीतल्यांची शिक्षणाची वर्ष वाढली, अपेक्षा वाढल्या, प्रलोभनं वाढली, कर्तव्याची व्याख्या बदलली. त्यांना अनुभव येण्याच्या वयात अंतर वाढलं. तरी संस्कृती संस्कार कानावर पडतच ठेवले की ते कधी ना कधी ऊमजतीलच.
ती : खरय! आपल्या पिढीनं  करत राहायच आणि आनंदी राहायच.
मी : महत्वाच म्हणजे  या पिढीला जेव्हा खरी गरज असेल जे त्यांच्या आत्ता लक्षात येत नाहीये, तेव्हा काहीही झालं तरी मदत करायची. ती कोणतीही असू शकेल. सांस्कृतिक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा.
ती : प्रश्नच नाही ग. आपलीच लेकरं ती. तसही पिढीत बदल होऊन होऊन असा काय होईल? परत जुन्या फुग्याच्या बाह्यांची फॅशन आलीच ना! तसच होईल.
मी : खळखळाट हसत.... हो तेव्हा आपण आजी गटात मोडू मग नातवंडं येतील, आईला काही माहितीच नसतं ...आजीलाच विचारू.
ती : भन्नाट 
मी : पळा घरी, अंधार पडला की..
ती : नंतर काय झाल सांग ग. मी पण पळते.

अशा प्रकारे गप्पा दिड तास झाल्या. घरी पोचायला साडे आठ. पण न ठरवता झालेल्या गप्पांमध्ये मजा आली. खुप कंगोरे बोलायचे राहुन गेले खरे पण मन हलकं झालं. गपचुप आईंनी केलेलं जेवले. 

सौ. गौरी पाठक
२३.०८.२०२४
+++++

४) कंपन

काल ट्रेनमधुन येताना अचानक चार मैत्रिणी झाल्या.  छान वाटत अस अचानक भेटी झाल्या की. त्यातली एकच आधीची शाळेतली मैत्रिण निघाली. बाकी सहप्रवासी च होतो. पण मनमोकळ्या असल्यान ओळखी केल्या गेल्या. पण फारशी  एकमेकींची मत ठाऊक नव्हती. तीन परिवारच होतो. 

सगळ्या जणी वयाच्या पाच वेगळ्या वयोगटातल्या होतो.  मस्त पुण नागपुर गप्पांचा बेत रंगत होता. मंदा, संध्या, कुंदा, नंदा आणि मी. मंदाच्या लेकीच नाव वधुवर सुचक मधे नोंदवल अस तीनं सांगितलं. तिकडून विषयाला सुरुवात झाली.

मंदा : आणखी कोणती संस्था आहे का गं नावनोंदणीची?

संध्या : मला तरी कल्पना नाही. अजुन तरी मला वेळ यायचीय, आम्ही आत्ता दहावीची पायरी चढतोय.

कुंदा : आम्ही ऊतरलो यंदा या पायरीवरून. हुश्श!

नंदा : आहेत संस्था पण "माहेर" संस्थाच जास्त  खात्रीची आहे.

मी : माझ्या मैत्रिणीला विचारेन, तीनं नुकतच मुलीच नाव नोंदवल आहे. ती सांगत होती की आधीपेक्षा चार पाच मुद्दे जास्तीचे नोंदणीत लागतात. जे असतील अस आजवर वाटलं नव्हतं.

मंदा : हो आणि विषेश म्हणजे वय वर्ष २५  असल तरच नोंदवा म्हणतात. हल्ली २९-३० शिवाय लग्न करतच नाही कोणी.

कुंदा : सत्य परिस्थिती आहे मी अनुभवलेल सांगते. माझ्या नात्यातल एक लग्न (लवकर ठरवलेल बरका?) म्हणजे २४-२५ वय साधारण, स्थळ ओळखीतला मुलगा म्हणुन चौकशीला आले.  समोर दिसतो रोज, वागणं बोलणं छान आहे म्हणुन म्हटलं आम्ही‌ छान आहे मुलगा. जवळ जवळ मध्यस्थच झालो.  सहा महिन्यात भांडणं घेऊन आले पालक बघा जरा समजवुन म्हणतं.

काय समजवायचं या पिढीला? थोड तुझं थोड माझं ची तयारीच नाही. कस बसं निभलय आत्ता. पण आधीसारखं जगात नाही राहिलं.

संध्या : मला तर हल्ली वाटतं की लिव्ह ईन मधे राहुन पटल तरच करावं लग्न.
नुसत स्थळ बघुन समजणं अशक्य आहे, कोणाची खात्रीच ऊरलेली नाही.

मंदा : अस काही गरजेच नाही कारण शिक्षण ते नोकरी पाच वर्षांत जवळजवळ सहवासातच असतात ही मुलं. बघ की विचार कर भटकंतीच जास्त असते. नाईट आऊट, लेट नाइट पार्टी बघता किरकोळ तासच घरी असतात की. त्याला लिव्ह ईन कशाला हवय? 
आणि काही खात्री नाही लिव्ह ईन नंतर पण घटस्फोट होणार नाही काय खात्री?

मी : खरय तुझं. पूर्वजांनी विवाह संस्था नियोजनबद्ध जीवनासाठीच आखली असणार ते चुकीच कस होईल. काही तरी विचार करूनच सोळा संस्कारात आहे ना लग्न घटक.

नंदा : दोघांच्या समजुन घेण्याच्या क्षमतेवरच टिकत लग्न. नाहीतर पाच वर्षानंतर पण चांगला संसार करून लग्न मोडलेली ऊदाहरणं आहेत.

कुंदा : कोणीच परिपूर्ण नसत हे समजुन जगणं आपल्या पिढीपर्यंत समजलय. पुढच अवघड आहे.

मंदा : पण अशातही घरच्यांनी स्थळ पहा असच होतय. आपापल बघुन आणलय हे हळूहळू कमी होतय म्हणजे आत्ता एक टक्का म्हणु.

संध्या :  पण कायद्यान पण हो म्हटलय लिव्ह ईन ला.

मी : लग्न करून नंतर समजुन घ्या वर्षभरात. आधीची पिढी अशीच जगली आणि ती आनंदी आहे. कायदा आला म्हणुन पाळाच अस नसावं गं.

नंदा : खरय आत्ताच वेळ आहे संस्कृती जपण्याची या पिढीला शेवटचा चान्सच जणू.

मी : हो ग अगदी खरं. आत्ता सकारात्मक विचार करण्याची गोष्ट मंदानी म्हटल ती ही आहे की ते एक प्रमाणाचा टक्का वाढेल हळूहळू असच म्हणुया. 

पण जोडीदार स्वसंमतीन असला की तो आपल्या घरात, आपल्या मनात हक्कान ठाम ऊभा राहतो. काळ कोणताही असो मानसिक भक्कम आधार वाटतो. हीच तर शिकवण दिलीय पूर्वजांनी विवाहसंस्थे विषयी.

संध्या : हं... नि:शब्द ..

मंदा कुंदा नंदा मी : विचारात....

अचानक ब्रेक लागला, गपकन गाडी कुईईई आवाज करत थांबली. दौंड आलं होतं. आमच्या चर्चेला पण ब्रेक लागला कारण वाफाळता चहा घेऊन दादा आले.
मजा आली पण गप्पा मारताना.

 एक छान झाल नवख्या होतो सगळ्या मनातल बोलल तरी गेलं. मनातली कंपन लहरी बाहेर पडल्या, जगातली परिस्थिती समजली. मग पाचही जणींनी सेल्फी काढला. शास्त्रं असतं ते. 

झाल की मग कुठ पोचली गाडी फोन सुरू... बॅक टु करंट पोझिशन...
 मग काय तर... आयुष्यात येणारं सगळ सकारात्मकपणे झेलायला तयार झालो आणि ते पण कंपनरहित!

सौ. गौरी पाठक
२६.०८.२०२४
********

५) चेपलेली मधली फळी

अगदी अचानक वन डे पिकनीक ठरली. दोन समविचारी जोडया पण तयार झाल्या. वयाच अंतर (पाच- दहा वर्ष) असलं तरी मनाच नसल्याने फार छान दिवस गेला. पिकनीक स्पाॅटवर एक कुटुंब सहपरिवार (कुत्रं पण बरं का!) दिसलं आणि कुत्रं घरात असावं का असा विषय निघाला. 

एक : कुत्रं असण आजकाल फॅमिली चा चौथा मेंबरच झालय.

दोन : हो ना! घरात वयस्क नसतील पण कुत्री मांजरी असतीलच. असच चित्र सगळीकडे आहे.

तीन : सगळेच वयस्क सारखे नसतात. माझा अनुभव आहे की काही वरिष्ठांना त्यांच्या चाकोरीबद्ध जीवनात ढवळाढवळ नको असते म्हणून ते नसतात. अश्यात घरातल्या एकाच मुलाला / मुलीला आपलं म्हणुन जीव लावला जातो ते मुक्या प्राण्यामुळेच की.

चार : सगळ्या बाबतीत अपवाद आहेतच....  असे बरेच वयस्क बघितलेत की राहतात पण हक्क वसुली असते तुम्ही मुलं आहात आमच केलच पाहिजे. खुप कमी जणं सुनेला मुलगी समजुन राहतात. 

एक : आपली पिढी खरच चेपलेली मधली फळीच आहे. आधीच्या पिढीला धरून ठेवावं मन सांगतं कारण ते संस्कार मनावर लहानपणी झालेत तसच पुढच्या पिढीला सोडून पण द्यावं लागतं कारण त्यांनाच बघत पुढच आयुष्य आनंदात घालवायचय!

दोन : आपल्या पिढीलाच ही चेपी का पण? विचार करण्याची गोष्ट आहे.

तीन : अस ठरवुन नाही ते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपण तो कसा घेतो यावर ते आहे.

चार : हो खरय पण सुनेचे वडिल ८० वयात काम करतात पण सासरे चालते फिरते असुनही मुलाला पायदुखी सांगुन त्रस्त करतात. एकाच कौतुक आणि ठणठणीत आहेत म्हणून एकाला गृहित का धरायच?  असं नसावं ना पण मग. 

दोन : अस नसतं माझ्या मते वय सेम असल तरी शारीरिक फरक असू शकतोच. हे थोड वेगळ वाटलं.

एक : अस असत बरेचदा आधीच्या पिढीला आजही कोणाच्या ही माहेरचे तुच्छच अशी भावना असतेच हे पण असच फरक समजुनच म्हणायचं का? मग हाच फळी चेपीचा मुद्दा आहे. अस म्हणायला हरकत नाही.

पाच : हो मला असच वाटतं. यात आणखी एक आहे की एकत्र राहणारे आणि विभक्त राहणारे..

एक : दोन्ही मधे प्रत्येकाची बाजु असेलच पण खापर फोडणारे मला आवडत नाहीत. उदाहरणार्थ घरी सासु आहे म्हणून जमल सगळं तुम्हाला... परंतु ती नसणारे पण जमवतात की सगळं. आताच्या साठीतल्यांना हा ईशु जास्त आहे कारण ते हम दो हमारे दो मधले आहेत जास्त करून.

सहा : खरय आताचे पन्नाशीतले साधारण एकच बास मधले आहेत. तर पालक गावीच राहण पसंत करणारे असतात. एकंदर काय परिस्थिती कोणतीही असो प्रश्न असणारच आहेत.

पाच : आपली पिढी चेपलीय खरय पण आपण चेपलोय अशी भावना न ठेवता जगायचा प्रयत्न करायचा.
मी ठरवलय घरातील वरिष्ठांना त्यांच्याच चौकटीत ठेऊन आपण आपलं जेवढं जमेल तेवढं जग अनुभवुन घ्यायचं ते पण कनिष्ठ पिढीला चौकटीत हलकीशी मुभा देऊन. 

सहा : यात एक करायच सतत "जग गेल चुलीत" म्हणजे कोण काय म्हणेल का? ईकडं लक्ष न देता दुर्लक्षायनम: म्हणायच! 

एक : आयडिया भारीय. गरजेच्या ऊपस्थितीत चौकटी फिट. 

दोन : खरय यामुळे आता परत गरजेची वाटणाऱ्या  (किंवा वाढीस लागणाऱ्या ) अशा  हम दो हमारे दो पद्धतीला सहकार्य दिलं जाईल आणि धर्मही टिकेल. समाज संस्था भक्कम राहिली की विश्व स्थिरावेल आनंदेल.

चार : आनंदी राहायचं आता आपल्याला महत्वाचं आहे. घराचे लोन, शिक्षणाचे लोन, इतर जबाबदारीतून जरा फील घेऊया निवृत्तीचा. हो फील  म्हटलंय मी कारण आपली पिढी   कधीही निवृत्त होणे नाही. 

एक : असाच भेटत राहून मन हलकं करायचं आणि कर्तव्याला उभं राहायचं ! हेच या सर्व प्रश्नांना उत्तर.... 

चार : हा हा हा!!! चला आवरा निघु या आणि हो त्या कुत्र्याचे आभार माना!

(हशा पिकला खरा पण सहा मनं हलकी होऊन ऊडतच निघाली म्हणायला हरकत नाही.)

सौ. गौरी पाठक 
१२. ११. २०२४

*****"
६) नक्की चुकतंय कुठं?

चला तुळशीच लग्न झालं काल मस्त. आता लग्न सराई सुरू असा विचार करतच होते, तर जुन्या एका मैत्रिणीने मुलीच्या लग्नाचा मुहूर्त करायचाय म्हणून बोलवलं. मस्तच ना!  मी गेले मुहूर्त फक्कड झाला. विविध ग्रुपच्या मैत्रिणी तीनं बोलवल्या होत्या. अनेक ओळखी झाल्या आणि फराळ करताना या पिढीला दिलेली मुभा यावर विविध अंगी चर्चा झाली ती अशी-

चिंगी : आजकाल लग्नाला हो म्हणायला खुप ऊशिरा करतात मुलं.

पिंगी : अग हो पण नोकरी शिवाय कस हो म्हणतील आणि शिक्षणच किती लांबलचक झालय.

मिंगी : सगळ नीट होईपर्यंत काळजीच वाटते हल्ली बिभत्स झालय सगळं.

टिंगी : रेप काय आणि लग्नानंतर आणि आधीची अफेअर्स काय! विवाहसंस्थेचा पायाच यात डगमगलाय.

फिंगी : खरय ग... यात आपलं लेकरू नीट असेल पण संगतीच कस कंन्ट्लोल करणार आपण. सगळ्या माता भगिनी समान तराजुत आहेत.

पिंगी : २००% बरोबर हे टेन्शन मी अनुभवलय.

चिंगी : ठराविक वयात पालक होण्यात निसर्ग साथ देतो तेव्हा ही पिढी म्हणजे मुलं मुली दोन्ही बरका पदवीधारकीच्याच उंबरठ्यावर असतात. मग चुकतय कुठं? असा प्रश्न पडतो.

मिंगी : एकनिष्ठ राहणं हा विवाहसंस्थेचा गाभाच यांना पटत नाही हल्ली. ऐच्छिक आहे ते म्हणे. काय तर तो माझा / आमचा वैयक्तिक अधिकार आहे. डोंबल...

टिंगी : अशाच ऐच्छिक अधिकाराच्या गोष्टींमुळे बिभत्सता वाढते त्यात सहज उपलब्ध असणारी दुरदर्शन तत्सम ऊपकरणं घरबसल्या  बघायला आहेतच.

पिंगी : हे मात्र पटल बघ... काय काय सिनेमे असतात अररर .. "शील" नावाची गोष्ट विसरतेय ही पिढी आधुनिकतेच्या नादात.

मिंगी : आकर्षण आणि प्रेम भावनांचा गदारोळ झालाय. चिंगी चा प्रश्न खरोखरच तगडा आहे. पण हा प्रश्न आहे असं याना वाटतच नाही. 

चिंगी : मला मान्य आहे की विवाहसंस्था होती तरी बिभत्सवृत्ती होती, नव्हती अस नाही पण तीला धाक होता.

मिंगी : हो, धाक होता, मर्यादा आणि शब्दाला किंमत होती. पण येईल लवकरच ही वेळ यांना समजण्याची असच म्हणुया.

पिंगी : चुकतय कुठं मग? असा प्रश्न सुटेल हळूहळू. अस म्हणुया. एकंदर आपण जे बोललो ते ऐकून वाटतय की चुक कोणा एका व्यक्तीची किंवा पिढीची नाही. तर ती परिवर्तनाची म्हणायला हरकत नाही. ऊंच शिखर गाठुन आपटुन लाट जशी ऊभी राहते तसच येईलच नक्की परिवर्तन विचारात. बघु.

चिंगी : let's keep our fingers crossed. 

पिंगी : आपण फक्त आपल्यापरीने या पिढीला जपायचं. शिकवत राहायचं. त्यांच्या गरजेला ऊभं राहायचं.
तेवढ्यात लेक (होणारी नवरी) आली "आई झाल ना सगळं सोडु का साडी?"

फिंगी : खळखळाट हसत.. "घ्या! तासभरात कंटाळली साडीला"

अशाप्रकारे आम्ही भानावर आलो आणि  नक्की चुकतय कुठं? विचारा ऐवजी  आत्तातरी आपली जबाबदारी काय हे मनाशी घोकत आणि रिटर्न गीफ्ट आवडल्याच्या आनंदात बाहेर पडलो.

सौ. गौरी 
१५.११.२०२४
*****

७) गुजगोष्टी. 
(२३.०२.२०१४)

नुकताच प्रेम दिवस म्हणजेच व्हेलेंटाइन के होऊन गेला. बरेच छान छान लेख वर्तमान पत्रात आले. तो साजरा करावा का नाही यावर नेहमी प्रमाणे चर्चा वाचली. तेव्हा मनात विचार आला प्रेम हे इतर दिवशी पण असत त्यासाठी एक दिवस कशाला हवा? पण माझ्या मते जगात विविध रुपात विविध नात्यात प्रेम असते. ते व्यकत करण्यासाठी एक दिवस पाश्चात्य देशात साजरा करतात तो आपणही का करू नये. हरकत नाही. पण जसे बर्गरला आपलसं कराल तसं आपल्या वडापावला  इतरांना  करायला सांगा. 

कोणतेही राष्ट्र कोणतीही संस्था, धर्म यामध्ये जर घेण्यासारखं असेल तर का घेवू नये. परंतु त्याचा अतिरेक मात्र होता कामा नये. त्यामागची भावना स्वच्छ, निर्मळ सुंदर असली पाहिजे, तसेच आपल्या संस्कृतीचे पण सण उत्सव जे पूर्वापार चालत आले आहेत ते चालु ठेवले पाहिजेत. ते पण ईतरांना महत्वासकट समजवुन सांगता आलं पाहिजे. त्याचं भान आजकाल राहिलेले नाही. परदेशी साजरे होणारे दिवस साजरे करावेतच पण मंगळागौरी, वटसावित्ती, घरात चालत आहेत ते कुळकुळाचार याचा पण विसर पड्डू देवू नये. आजकाल पॅंट सर्वत्र सहज घालून मुली वावरतात पण साडी घालता येत नाही आणि सांभाळता त्याहून नाही. माझ्यामते बर्गरला जवळ करावं पण वडापावला  विसरू नये. आपली संस्कृती पण पाळा.  हेच आजकाल जर परदेशी युवती पाहाल  तर साधी काय नऊवार पण नेसून चक्क गणपतीच्या मिरवणुकीत दिसतात आणि आपण गणपती पाहायला पॅंटमध्ये.

 माझा मुद्दा सतत साडी नेसावी असा नाही. अथवा सतत देवासमोर बसा असाही नाही. पण जे समाधान घरातली पुजा, घरातल्या लोकांच समाधान सांभाळून हे आपले सांस्कृतीक दिवस साजरे करण्यात आहे ते कशातच नाही. स्वतःचा धर्म संस्कृती उत्तम सांभाळून इत्तरांची आत्मसात करण्याचे पाहावे असे एकच म्हणणे आहे.  सगळं करावं, गुडीपाडवा सणाचा आनंद घ्यावाच , हौस तसेच जरा विरंगुळा म्हणून ३१ डिसेम्बर पण  साजरा करावा. 

"काय गं झालं का तुझं संक्रांतीच हळदीकुंक?"  "छे! छे। मी कधीच नाही करत." हे म्हणणारी युवती फ्रेंडशीप डे व्हॅलेंटाईन डे ला मात्र सगळ्यात आधी हातात गुलाब घेवून फिरताना दिसेल. मैत्री दिवस प्रेम दिवस  साजरा करावा. काही वेळा जवळच्या प्रेमाच्या व्यक्तिलाच बरेचदा भावना सांगायच्या राहून जाऊ शकतात. या दिवसानिमित्त नुसता मित्र असणारा उत्तम मित्र होवू शकतो.

परंतु त्याच बरोबर हळदीकुंकु करणे ही आपली संस्कृती आहे. (हे एक फक्त ऊदाहरण आहे.) पूर्वजांनी काहीतरी विचार करून पद्‌धती सुरु केल्या असतील. त्याला पण मान दिला पाहिजे. अस जर झालं तर सर्वत्र उत्तमच होईल असा माझा विश्वास आहे.

दुसयांची संस्कृती नक्कीच आत्मसाद करा पण स्वतःची न विसरता !

सौ. गौरी पाठक
१४.०२.२०२५
ता.क.

माझ्या मताशी सर्वजण सहमत असतील असे नाही. पण विचार नक्की करा. एखाद्या विधानामुळे नकळत कोणाच्या भावना दुखावत्या असतील
तर क्षमस्व ।
*****

८) 'नजर' ३०.२०.२०२०

पर‌मेश्वरानी दिलेले एक सर्वोत्तम ज्ञानेंद्रीय डोळा, त्याची जरब कळते ती या नजरेतुन!  मनातल्या भावना तंतोतंत भिडतात त्या या नजरेतुनच. आज का वाटलं मला कोण जाणे की नजर या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. मग आठवलं योगेश सोमण सरांचा एक लेखनाचा वर्क शॉप केला होता. त्यात नजरेच महत्व त्यांनी  सहज एका अनुभवाचा दाखला देताना  सांगितला होता. वैशिष्ट्यपूर्ण सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ती गोष्ट अंर्तमनात ठसली.
अचानक काही दिवस कामाला जाताना एका ठराविक सिग्ननलला सत्तरीतले एक भिकारी गृहस्थ थांबलेल्या वाहनांपुढे हात पसरवताना दिसु लागले.
रोजचे ते आजोबा जसे मला पाठ झाले होते, तसे मी त्यांना पाठ होणे शक्य नव्हतं - ते मास्क, स्कार्फ आणि हेल्मेटमुळे. पेहरावामुळे खरतर तर ते भिकारी अजिबात वाटत नव्हते. त्यांच्या कृतीमुळे ते भिकारी आहे याची खूण पटवून देत होते. पांढरा स्वच्छ झब्बा, धोतर, पंचा डोक्यावर गुंडाळलेला हातात स्वच्छ काठी, दणकट चपला सुस्थितीतला चष्मा म्हणजे मुळातला टापटीपीचा माणुस असावा असाच तो होता.
जवळ जवळ पंधरा दिवस रोज सिग्नला ते आजोबा दिसू लागले. मनात विचार आला की - वाटत तर भिकारी नाहीत, हे मग काय असे घडले असेल यांच्या आयुष्यात की यांना हिनदिनपणे हात पसरावे लागत असावेत. सिग्नल सुटला विचार खुंटला.
एक दिवस सिग्नलजवळ मी व अजुन एक टूव्हीलर दोनच गाड्या होत्या. आजोबा त्यामानाने बरेच जवळ आले, हात पसरले, हिनदीन पणे हात हलवु लागले. भुकेची तमा अशी खुण समजावी. पण आज काठी नव्हती आणि एकदम अचानक नजर चमकली माझी. अंतर्मनातून सोमण सरांनी नजरेच उदाहरण दिलेला किस्सा आठवला. तडक तो सल्ला अमलात आणला गेला. चेहऱ्याचे हावभाव न बदतता का अस वागताय आजोबा ? या भावनापूर्ण डोळ्यांनी मी न डगमगता थेट आजोबांचे डोळे गाठले. भुरकट पिवळसर झाक असलेले डोळे त्यांचे- भिरभिरू लागले. मला त्यांना जाब अजिबात विचारायचा नव्हता परंतु माझे डोळे त्यांच्या कृतीच काय कारण असेल? याचा शोध घेऊ लागले होते.
त्यांना ते काही क्षणात जाणवलं. भिरभिरती नजर खाली जाऊ लागली. अजुनही काही हालचाल न करता मी थेट त्यांचे डोळेच तपासत होते. काही क्षणात् त्यांचे पसरणारे हात शांतम पापम् सारखे गालाला लावले गेले. त्यांनी नजर चुकवत ईतरत्र पाहण्यास सुरुवात केली. त्यांचं नजरेला नजर भिडवू शकणं कमी पडु लागलं होतं. त्यांनी परत माझ्याकडे बघितलं आणि शेजारच्या गाडीसमोर बघुन झपकन माझ्याकडे पाहिलं. खरतर मी काहीच केलं नव्हतं पण बरच काही डोळे करून गेले होते. ठणठणीत प्रकृती स्वच्छ कपडे घालणारा माणूस भिक का मागत असेल? एवढाच प्रश्न मला होता. कोणीच कोणाला बांधिल नव्हतं - ते उत्तर द्यायला आणि मी त्यांना जाब विचारायला. माझ्या डोळ्यातून आजोबांना तो प्रश्न कळवा असावा कारण त्यांची देहबोली अचानक गोंधळुन गेलेली मला जाणवत होती. 
शेजारच्या टु व्हीलर जवळ हात न पसरता आजोबा मान नकारात्मक हलवत फुटपाथवर चालत जाताना मी बघितले. सिग्नल सुटला. न बोलता माझा त्यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यांनी न बोलता तेवढ्यापुरत का असेना निघुन जाताना तो समजल्याची पावती दिलीच. ती पण नजरेतून!
पुढे दोन आठवडे तो सिग्नलवर दिसलेच नाहीत. परत येणार नाहीत वगैरे ठाऊक नाही  पण मला हे समजले की आपण पडणारे प्रश्न फक्त त्या भावनेने पाहुन विचारू शकतो. जो चुकत असेल पण (काही कारणाने का होईना त्याला बोलूनच व्यकत होऊन जाब विचारण) अथवा अन्यायाला सहन करणे हे फक्त नजरेतूनही होऊ शकते. काही वेळा शब्द गरजेचे नसतात. प्रत्येक वेळी तीव्र भावनेची कृती गरजेची असते 'नजर' माणसांना डायरेक्ट हृदयाची भाषा पोचवते. सरांनी सांगितलेल उदाहरण आज अनुभवले. भिकारी आजोबांची दुसरी बाजु कशी का असेना? त्यात मला फार पडायच नाही पण त्यांची कृती, तो मार्ग योग्य वाटला नाही हे त्यांना नजरेतून पोचलं.
सोमण सरांनी आज मला एक नजर दिली. शब्दानी घायाळ न करता नजरेची भाषा आपण कधी वापरायची हे समजलं.
सोमण सरांचा अनुभव ऐकला होता आज तो बरच सांगुन गेला शिकवुन गेला.
धन्यवाद!
सौ. गौरी पाठक
*********

९) सल

काल अचानक काॅलेजच्या तिघी घनिष्ठ मैत्रिणी भेटलो. "त"वरून ताकभात अशा आम्ही तिघी‌. खूप दिवसांनी भेटलो कि मनातली मळभं दूर होतात. मैत्री थेरपीचा फार फायदा असतो. प्रत्येकजण आपले अनुभव सांगत  आणि  योग्य ते घेऊन नको ते बाजूला सरायचं शिकतो. 
पहिली : आपण सगळ्याच तारेवरची कसरत करत जगतोय सद्धया. हो कि नाही? 
दुसरी : खरंय !
पहिली : तरीपण आपल्या सारख्या काही जणी त्यांना जे जमत नाही त्याबद्दल स्वतः काही करायच्या ऐवजी इतरांवर कुरघोडी करतात असा माझ्या लक्षात आलंय काही दिवसात. 
तिसरी : अगं यात नवल ते काय ? अश्या ढिगांनी असतात आजूबाजूला.  त्यांना ढिगातच राहू द्यायचं सुंदरींनो. 
पहिली : म्हणजे?
दुसरी : हो आणि त्यांना आपण गावभर उधळतो असा पण वाटतं. (हा हा हा हसत ) आणि त्यांना समजत नाही पण त्यांचा चेहरा सगळं सांगतो कि हिला कसं सगळं जमत?  वेळ मिळतो कसा?
पहिली : आवड असली कि मगच सवड मिळते. यावर त्यांना अस ठामपणे म्हणायचं असत कि आम्हाला किती कामं असतं त्यात घरी असतील तर मग काय विचारता!
त्यांना त्या खूप बिझी आहेत हेच सांगायचं असतं. 
तिसरी : असतीलही, सांगावं का लागावं पण?
दुसरी : आपल्यासारखीला जर तो आनंद मिळतो तर खुश व्हावं ना ते नाही. सल दिसते डोळ्यात त्यांच्या कि मला हे मिळालं नाही मी हे करू शकले नाही. 
तिसरी : तेच तर आपण अशा ढीगभर बायकांचा विचार असाच करायचा कि त्यांना आपण सगळं सांभाळून आपला आनंद पण मनमुराद लुटतो तसे जमत नाही म्हणून त्या असा म्हणतात. जाऊ दे. 
पहिली : तेच तर करतो आपण. सोडून देणं...
दुसरी : आपला आनंद बघून आनंदी होतात ती मनं आणि कुत्सित मनं ओळखण्या इतके आपण प्रगल्भ नक्कीच आहोत. 
तिसरी : काही म्हणा बाकी समोर बोलायची हिम्मत नसते त्यांच्यात!
पहिली : आपण आपलं आनंदी जगायचं आणि आनंद वाटायचा. घेणाऱ्याच्या नजरेच आपण ठरवू शकत नाही. 
दुसरी : खूप जणींना सांगता येत नाही कि आपलं जगण नक्की त्यांना आवडत कि कोड वाटत.? काही निर्मळ मनाच्या असतात विचारतात सध्या कुठे दौरा गं  ? काही नुसतं म्हणातात काय ग? इतक्यात कुठं गेली नाहीस वाटतं ? काही म्हणतात तुमचे  फुलपाखरू जगतानाचे फोटो पाहून मन आनंदित होते अश्याच भिरभिरत राहा !
तिसरी : मला एक तर असा अनुभव आहे- "आनंदाच जगणं संसर्गजन्य आहे तो तुम्ही मस्त पसरवता ! मी कधी बोलत नाही पण बघून खूप छान वाटतं. 
पहिली : स्वतःच्या जीवनाचा गाभा समजला कि मग फालतू प्रश्न पडत नाहीत. समोर जे दिसतं त्यातलं चांगलं शोधायची वृत्ती वाढते. मत्सर वाटत नाही आणि मग आपण जे छान पेरतो ना तेच उगवत. 
दुसरी : काही अश्या पण आहेत कि आनंदी जगतात पण जगासमोर दाखवायला घाबरतात. एक तर नजर लागेल हि एक भयानक अंधश्रद्धा मनात असते नाहीतर कशाला गावभर सांगत फिरायचं? असा संकुचित हेतू असतो. 
तिसरी : परिस्थितीने अशी मनं बनतात त्यात चूक मानणं अगदी बरोबर नाही पण तरी ती तुमची बाजू झाली. नका डंका पिटू. इतरांना तर छान म्हणा!
पहिली : मग का चार चौघीत स्वतःला सिद्ध करत फिरावं त्यांनी? मला पण येतं, मी पण करते, मी पण केलं असत पण जमलं नाही, तुला काय घरून सपोर्ट असतो बाई ... हि असली आगाऊ कारण देतात आणि हेवा करत बसतात. 
दुसरी : मग काय तर. आपण आपलं जीव सांभाळून, नैतिक जबाबदारी सांभाळून आनंदी आयुष्य जगायचं जमावतोय. झालेला आनंद स्वतःपुरता न ठेवता  तो पसरवतोय, जेणे करून तो इतरांनी पण घ्यावा. पण नाही... 
तिसरी : आता एकच करायचं कि कुत्सित बोलणाऱ्या सर्वाना मागे सोडून स्मितहास्यानं  पुढं जात राहायचं. वाद घालत बसून वेळ वाया घालवायचा नाही. 
पहिली : हा हा हा !!!!  आणि आनंद साजरा केल्याचे फोटो पाठवत राहायचं. 
दुसरी : कुढायचं कि फुलायचं ते ज्याचं त्यांनीच ठरवायचं !
तिसरी : बरोब्बर! तुम्ही आमचा आनंद बघा नका बघू , आमचे फोटो पहा नका पाहू, आम्हाला छान म्हणा नका म्हणू तो तुमचा प्रॉब्लेम आहे. 
दुसरी : एकंदरच आनंदी जगण या सगळ्या पेक्षा नक्कीच सोप्पय.
पहिली :  ऐका  ना, मस्त सेल्फी घेऊ चला ना, lets capture the moment now, chill babies... update it soon...
आला दिवस आपल्याला आनंद वाटेल तसा जगायचा, अर्थातच नैतिक जबाबदाऱ्या पार पाडत बर का! असं  एकमेकींना सांगत मस्त वडापाव वर ताव मारत तीन फुलपारखं मार्गस्थ झाली, ती पण हलकी होऊनच!
गौरी पाठक 
०७.०४.२०२५
+++++++




१०) माझी प्रिय सखी : तीच नाव गुपितच ठेवणे उचित राहील असे वाटते आहे. 
माझ्या मते आपल्या छान मैत्रिणी तर असतातच. पण सहज कधी कधी सहवासात येणारी पण व्यक्ती आपली मैत्रीण असू शकते. आपल्याला काही वेळा ठाऊकच नसत कि इतकं प्रेमान आपल्याकडे कोणा तिऱ्हाईताच आपल्याकडे लक्ष आहे. 
आपल्या भोवतीच्या सर्कल मध्ये परिवार, मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी असे अनेक सर्कल असतात. एकदम पाचव्या सहाव्या सर्कलमधलं कोणी आपल्याकडे व्यक्त होत काय...आणि आपण कसे आहोत समाजत काय.. भन्नाट अनुभव असतो. 
मी जे काही करत आले, जे काही माझे राहणीमान आहे, जी काही माझी वागण्याची पद्धत आहे त्यावरून आजवर अनेकजण माझा हेवा वाटणारे मला समजले आहेत. ते सांगत नाहीत पण बोली भाषा किंवा शुभेच्छांची पद्धत किंवा आपल्याशी वागतानाचे देहबोली हावभाव या वरून ते समजत.
"मला पण हेच करायचं होत पण मला ना अजिबात वेळच मिळत नाही. "
"मला हे येतच पण तुझ्यासारखा सपोर्ट नाही घरून म्हणून ग "
"मला वाटत कि हे करण्यापेक्षा घरी जास्त वेळ दिला पाहिजे, हे करायला आयुष्य पडलय कि."
"मला अशीच साडी घ्यायचीय .... कुठून घेतलीस ग?"
"मी अशीच होते दुसरं मुलं झाल्यावर आयुष्य बदललच म्हणून बाकी काही नाही."

अशी अनंत वाक्य मी आजवर माझ्याशी बोलताना ऐकली आहेत. पण मला अश्यांचा कधी राग आला नाही. तो येऊ न नये यासाठी त्या त्या वेळी योग्य अनुभवी व्यक्ती कान्हाजीनी माझ्या बरोबर ठेवल्या होत्या. ठेवतोच. हि जाणीव मला काल झाली.  

तर काल असं झालं - ती अचानक भेटली. सहजच अगदी न ठरवता. तिला माझ्याकडून जी माहिती मिळाली त्यावर तिला असा वाटलं कि देवानेच मला तिच्यासाठी पाठवलाय. 

ती, "तुझं कौतुक करू तेवढ थोडय ग. मला कधी कधी तुझा हेवाच वाटतो. " 
मी, "अगं हरकत नाही मला सवय आहे."
ती, "नाही गं .... पण मला अस वाटायला नको. मला अस वाटत नेहेमी त्याच मला वाईट वाटतं. "
मी, ..."निशःब्द " (मनात - माझा हेवा वाटतो हे मलाच समोर सांगणारी आणि त्याच वाईत वाटणारी व्यक्ती पण जगात आहे ! मला खूप अचंबित झाल्यासारखं वाटलं.)
ती, "तू अशीच रहा गं पण, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस."
मी, (फक्त हसले, कारण विचार चक्र सुरु झाल होत डोक्यात.)

तर अशी हि माझी माहित नसलेली मैत्रीण. 
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
८ मे २०२५
******
११)  ऊत्तर 
पण का हेवा असे जाणून घ्यावासा nahi वाटल तुम्हाला?  असा खुप जणींना प्रश्न आहे 
👇🏻
सुरवातीला नव्हत वाटत कारण समज नव्हती. नंतर वाटल होत परंतु तेव्हा कारण आणि परिणाम यांची श्रृंखला समजुन घेत होते... 

एखादी गोष्ट आपल्या कडे हवी अस वाटण साहजिकच स्वभाव आहे. पुतळ्यावर साडी कशी दिसते बघुन आपण घेतोच. मग नंतर वाटायच देणगी आहे ही मला दिलेली कान्हाजींनी. मी सतत आभार मानले पाहिजेत त्यांचे. मलाही अस वाटायच की पण ते व्यक्त व्हायची सकारात्मकपणे व्यक्त व्हायची लकब दिली होती. हा थोडाफार आई बाबांकडचा अनुवंशिक गुणही असेल. मी पटकन अनोळखी ला पण मस्त दिसतय हे अस म्हटल जातच.. हसतात मला...आणि ती व्यक्ती ते खरेदी पण करते हा पण अनुभव येतो. मग मी हसते...
हे का? कस होतं? ठाऊक नाही. माझी वस्तू आवडली अस म्हटल तर पटकन घाल की एकदा ही सवय वाडा संस्कृती मधे वाढल्यानं लागलेली. वाड्यातल्या एका काकु ला सासरी लग्नाला जाताना हक्कान हातच्या पाटल्या बांगड्या विश्वासान देतानाची "मस्त ठसठशीत मिरव बरं का! " पिढी मी बघितली आहे. आपण जे पाहतो ते आपलं अंतर्मन नोंद करत हे मला पटलय. ते कधीतरी पेरलेल ऊगवत हाच तो कारण आणि परिणाम अभ्यास असावा.
पण हा प्रश्न विचारला म्हणून धन्यवाद मला हे कधी सांगाव लागलच नसत मी विचार केलाच नसता.

धन्यवाद गं.
गौरी

कृपया साकारात्मकपणेच वाचावे..... कोणाबद्दलही मनात अढी नाही. पण खरं बोलायला "तुझा हेवा वाटतो सांगायला" धैर्य लागतं हेच मुख्यता निदर्शनास आणतेय असेच पाहावे. 
******
१२) प्रश्न 
गौरी एक विचारायचं होत की तु सगळयांशी सारखं वागू शकते? का म्हणजे असं की आपण खुप वाचतो, लिहतो.. आणि म्हणतोय पण की लेट गो करायचं.. इन general विचारत आहे..पण काही बाबत आपलं नाही जमत. 
....
एक आठवडा झाला हा प्रश्न मला विचारून तीला. मलाच इतर नैतिक जबाबदारीच्या नादात उत्तर देणं मागे पडलं. पण मनाच्या कोपऱ्यात विचार मात्र सुरूच होता. आज निवांत सविस्तर मला काय वाटतं ते लिहायचाच अस ठरवलं. 

खरा सांगू बरेचदा नाही जमत हे खरंय. अशा केसमध्ये माझ्याकडून आपल्याला आवडेल, खटकणारी नाही इतकाच करायचं किंवा केलं जातं. फार काही नाही तर त्या व्यक्तीपासून थोडं दूर राहायचं असा मी वागलं जात. लेट गो करायचं हाच विचार मनात ठेवतेच पण मी अजून तरी काही साधू संत नाही असा मी मनाला सांगते. पण हा विचार करायला हवा हे समजतंय हेच खूप आहे असा ब्रह्मविद्येच्या शिक्षिका नेहेमी सांगतात. ते आठवून शांत होते. 

ज्या व्यक्तीच्या सहवासातून संतापचा माथी येतो ती मी जरा टाळते. मग मला असा अनुभव आहे कि तीच मला मिस करते. अशी व्यक्ती आहे जिला सोडू शकत नाही आणि धरून पण मलाच त्रास होतो. तीला मी  ऑपशनला टाकलीय. हाक आली तर जायचं नाहीतर ती आयुष्यातच नाही असाच जगायचं. याला १० वर्ष झाली मी ते पाळतेय.

ज्या सखींनी हा प्रश विचारलाय ना ती मला अश्या वेळी भेटली कि मी जे लोकांना सांगत होते कि आयुष्य साध आहे ते आनंदानं जगायचं. मन स्थिर ठेवणं फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. पण एक वेळ अशी आली होती कि मीच डळमळले होते. तेव्हा या नवख्या सखींनी मला ती वाक्य पाठवली. मला कान्हाजींचे अनंत आभार या साठी मानायचेत कि मी आनंदी आहे मला आनंदी वाटत आहे असा मला सांगायला तिला पाठवली. 

माझ्या मनात कुठेतरी काही तरी आहे जे मी मनाला लावून घेत आहे असे तिला वाटले ते बरोबर होते. कारण मला त्या दिवशी खूप हार्ट बिट हाय झालेले जाणवत होते. मनात काही अनेक दिवसाचे आहे का? ते काढून टाक असे ती म्हटली. पण मनात हेच होते कि मला धडधड का होतेय.  त्याच दिवशी मी तात्काळ वाक्य लिहिली : मी आनंदी आहे मला आनंदी वाटते आहे आणि संध्याकाळी डॉक्टर म्हटले "काहीही झालेले नाही गौरी तुला फक्त पोट बिघडलाय आणि हीट मुळे होतंय." काय जादू आहे पहा! 

माझ्या मनात काय आहे ते कान्हाजीनी ओळखून सखीला माध्यम म्हणून पाठवले आणि मीच जे माध्यम होऊन इतरांना सांगते तेच मला कानावर घातले. आहे कि नाही पेराल ते उगवते. 

आता मुद्धा हा कि " गौरी एक विचारायचं होत की तु सगळयांशी सारखं वागू शकते?"
तर नाही वागू शकत अजुनतरी. हेच ऊत्तर आहे.

पण अचानक मला याच ऊत्तर सापडलय.
"जगात व्यक्ती तितक्या प्रकृती ! 
पिंडे पिंडे मतिर्भिन्न : 😊 
हे मर्म समजून उमजून तू वागतेस👍🏻 "

हे याचे उत्तर जे मला माझ्याच एका सखींनी योगायोगानं ओघाने दिले परवा एका लेखावर दिलं. जे मी करतेय वागतेय आणि म्हणूनच आनंदी जगतेय.

आणि मला सखीच्या प्रश्नाचे उत्तर आपोआपच सापडले. जे मी जगात होते जशी मी आहे त्यातच तर उत्तर होते. 

कस वागायच? याच ऊत्तर तीच तीच्या जवळ आहे परंतु माझ यावरच मत तीला हवं होतं. ते मला पण सापडलं आणि तीच्यामुळे हा विचार केला गेला. हे एक भारी घडलं आयुष्यात.

प्रश्न विचारलेल्या सखीला पण अनंत धन्यवाद आणि सहज उत्तर दिलेल्या सखीला पण अनंत धन्यवाद !

हळू हळू माझी आणखी खात्री पटत चालावी आहे कि आपल्या लेकरांकडे कान्हाजी बारीक लक्ष ठेऊन आहेत. 

जय श्री कृष्ण 
सौ. गौरी 
१३. ०५. २०२५
*****

१३) स्वछंदाचा मार्ग मोकळा !
विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.
एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५

******************************

१४) मार्ग 

आपण जस जस विविध ठिकाणी जातो तस तस आपण वेगवेगळ्या जीवनपद्धती पाहतो. त्या बघुन आपण शिकतो. जगतानाच्या गरजा राहणीमान जीवनाविषयी अपेक्षा यावरही प्रकर्षाने चढ उतार जाणवतात. आपलं ध्येय काय आहे? आपण त्यानुसार जीवनपद्धती अवलंबली पाहिजे.  आजुबाजुला बघितल तरच आपल्याला आपला मार्ग बरोबर आहे की मार्गावर राहण्यासाठी कमतरता आहेत हे समजेल अस मला वाटलं. त्याअनुषंगाने माझा बारकाईनं पाहण्याचा हेका  नेहेमीच असतो. 

काल असच एका कोळश्याच्या खाणीतील स्टाफच्या गावतल्या आयुष्याची जीवनचर्या जवळून बघण्याचा योग आला. खाणींच्या जवळच वसाहती असतात. येण्याजाण्याचा वेळ वाचतो. सुविधा भरपूर असतात  हे दिसलं. पण त्या जपून वापरणं दिसलं नाही, ते वागणं फार काही वावगं नाही असं त्यांच्या वागण्यातून दिसलं. आहे त्या दोन खोल्यात हे सुखानं संसार थाटताना बघितलं. ३०० फुट खोल खाणीत घरचा माणूस मस्त डब्याची पिशवी मिरवत जातो. येताना काळाकुट्ट होऊन येतो. यांच्या राहत्या घरा खाली ठराविक फुट खोलवर खाण आहे, पोकळ आहे. रोज चार ते सहाच्या मधे  पुंगळी खाणीत काही अंतराच्या सेकंदाला जाते तेव्हा ते इतक लांब असूनही हादरतं तरी ते आनंदाने राहतात. लढायला जाताना जसे पूर्वीच्या लोकांना माघारची चिंता नसते तसेच हे खाणीत जातात. परिस्थिती माणसाला कणखर बनवते. काही इमानदार असतील काही नसतीलही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती !
आपण शहरात काय करतो तर सिमेंटच्या जंगलात, प्रदूषणाच्या विळख्यात हायजीनीकली बेस्ट टिफीन घेऊन जातो अगदी तस्सच ते खाणीत जातात . जीवाची काळजी खाणीत काय आणि मोठाल्या हायवेवर काय? आहेच की.  खाणी खूप लांब डोंगराळ भागात असतात त्यामुळे त्याच्या वसाहती पण अश्याच गावाबाहेर असणारचशिफ्टनी होणारे काम त्यात तब्येती जपायच्या. मुलांची शिक्षणं घराची दुखणी खुपणी एक ना दोन आहेच कि. म्हणजे विवंचना कोणासही सुटत नाहीत हेच खरे. 

एक गोष्ट मात्र त्यांची आवडली जस असेल तसे आनंदानी राहतात, त्यात घराबद्दलच्या फार नीटनेटकेपणाच्या अपेक्षा त्यांच्यात दिसल्या नाहीत. जेवणाच्या सुंदर असण्याबद्दलचा हट्ट पण दिसला नाही. अन्न वस्त्र निवारा घराबाहेर दोन चार झाडे त्याच्याजवळ एक खाट आणि एक दुचाकी! बस इतकंच, कोणत्याची गोष्टीच्या लाईफ लॉँग असण्याची धडपड अजिबात नाही. शेजार पाजाऱ्यांच्यात एकी मात्र जबरदस्त  दिसली. आपण ठणठणीत राहावं याबद्दलच्या व्याख्या तर अबब ! पण त्याच बरोबरीनं आलेल्याच आदरातिथ्य पण छान करतात. शहरातील लोंकाच्या दिसण्या वागण्याबद्दल जरा शंका घेत  घेतच बोलतात अस वाटलं. घराच्या लेकरांनी नीट शिकावं हा अट्टाहास आहे पण ध्यास कमीच. तो चूक नसावा कदाचित नाण्याची दुसरी बाजू असेल काहीतरी. 

बोली भाषेतील फरक मात्र खूप आहे. कोशिंबिरीस चटणी तर आमटीला वरण असे नावाचे गफले खूप झाले. खूप हसलो. मजा आली. मसालेदार तिखट भाज्यांचे कौतुक झाले मग मी पण शेपूचे ताशेरे ओढले. लहान मुलं तर फार भारी होती. एकदम  एनर्जेटिक वाटली. या कोवळ्या हातानं वेळीच छान वंगण मिळालं तर आणखी उज्वल भविष्याचे मानकरी होतील हे निश्चितच

माझ्या सुडौल योजनाबद्ध आखून जगत असलेल्या शहरी आयुष्यात मी खूप आनंदी आहेच, पण या कोळसा खाणकामगारांच्या जीवनपटातून मी हे नक्की टिपले कि, कमीत कमी गरजांमध्ये राहायची जास्तीत जास्त सवय सतत करत राहायला हवी.  दोन आयुष्य वेगवेगळीच आहेत, त्यांचे आपापले नियोजन असणे बरोबरच आहे कारण जगताना काय लागेल  ते त्याच जगाच आयुष्य जगूनच समजतं. 

एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगताना पाहून आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव होते आणि आपोआपच परमेश्वराचे आभार मानले जातात. आपुलाची मार्ग भाला रे बाबा!