Wednesday 21 August 2024

मनातलं माझ्या

नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.

आज काल समोर चुका सांगितल्या तर त्या समजत तरी नाहीत किंवा त्या चुका वाटत पण नाहीत किंवा त्यांना त्यात पडायचं पण नसतं - हो आपण बरं आणि आपलं घर बरं असा दृष्टिकोन असतो बरेच जणांचा. 

पण धकाधकीच्या या जीवनात काल असे दोन किस्से घडले कि मनावर हळुवार फुंकर घातली गेली.  जणू काही कान्हाजीनी सुचवलं कि दूरवर पाहायला शिक न समजणारी लोकं, तस वागताना निबर जगणारी माणसे  विसरून जायला शिक. 

काल मी माझा आवडता गर्द हिरवा पंजाबी ड्रेस घातला होता. दिवस खूप छान सुरु झाला होता. कामावर पण नेहमीप्रमाणेच वेळेत निघाले होते. माझी रुपेरी ज्युपिटर आणि मी सिग्नल ला उभे होतो. उजवीकडे एक सोज्वळ पंचविशीतली मुलगी पण मागून आली. डावीकडे फटफटीवर कानात हेडफोन घालून त्रासात चिंतेत असलेले तरुण मुलगा होता. जगाचं भानच त्याला नव्हतं. त्याच्या अगदी जवळ बस आली आणि क्षणात सिग्नल तोंडाला बसनी. ती बस त्याच्या इतक्या जवळून गेली कि उजवीकडचे आम्ही सगळे आता काय होतंय याच ?? असच बघत डोळे मोट्ठे करून आं वासून होतो. मोठा सुस्कारा सोडत सगळे काय बसवाला आहे ? कशी नेली गाडी देवा रे! असे बोलत होतो. यात तो मात्र अनभिज्ञ होता. शेजारची आणि मी बोललो काय मुलगा आहे हा.... काय बेतलं होतं आज याच्यावर याची काहीच कल्पना नाही याला. तरी याचे वादाचे हो हो तसे नाही असेच सुरु होते. इतक्यात उजवीकडची मुलगी मला म्हटली कि तुमचा ड्रेस खूपच मस्त आहे ताई. आश्चर्याने मी झपकन खाली बघितलं कि कोणता ड्रेस आज घातलाय ते. ती म्हणाली कि पॅटर्न पण मस्त शिवलाय तुम्ही. मी धन्यवाद म्हटलं. दोघी पण खूप छान हसलो. या पाच सात मिनिटात इतका काही शिकवलं कान्हाजीनी काय सांगू.  टाटा करत सिग्नल सुटल्यावर आम्ही पुढे गेलो. 

दोन चौक झाल्यावर एक अनारकली घेराचा ड्रेस घातलेली मुलगी माझ्या पुढे मला दिसली. मी माझ्याच विचारात होते. वीस बावीस वर्ष कामावर जातानाचा रास्ता पाठ होऊन जातो. आपोआपच आपण पोचतो. इतकयात माझ्या लक्षात आलं कि तिचा ड्रेसचा घेर चाकात जाणार आहे. ती खूप घाईत दिसली. मी मागून खूप हॉर्न वाजवला. काही क्षणात तिला ते  समजलं. मी हेल्मेटमधून डोळे गाडीच्या खाली बघ असे निदर्शनास आणून दिले. तिनीपण मन हलवून समजल्याची खूण पटवली. तत्क्षणी तो फलकार सावरत परत गाडीच्या आरशातून मला डोळ्यांनी भुवयांच्या ओके आहे ना? असा विचारलं. मी पण पटकन मान डोलावली. त्याच आरश्यातून तिनं डोळे मिटून मान खाली करत धन्यवाद पोचवलेलं पण मला समजलं. माझ्याकडून पण प्रतिक्षिप्त क्रिया झाली मान डोकावण्याची. 

काय म्हणावं याला सांगा बरं ? विना शब्द डोळ्यातून हे सगळं झाला. दोघीनी हेल्मेट घातलेलं होत. दोघीनाही कामावर पोचायचं होत. दोघीही भर रहदारीच्या कर्वे रोडवर मागे पुढे होतो. तरी संवाद झाला. धन्यवाद पण झाले. न बोलता इतकं सगळं झालं. 

मग विचार आला कि ज्यांना समजून घ्यायचाय ते कसेही घेतातच, तस करायचं तर समोरचा काय सांगतोय त्यावर ऐकून घेणं हवं.  काल परवा पर्यंत जो विचार आला होता त्यावर हळुवार फुंकर घालून दिली यांच्या मार्फत कान्हाजीनी. 

का? आणि कशी ? करा विचार तुम्हीच. 

मी मात्र जगण्याचाही कला अवगत केली. जगताना वापरता येतेय का बघु...

जय श्रीकृष्ण!

सौ. गौरी पाठक
२२.०८.२०२४

#####
वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ

काल एकीच्या घरी भिशी होती. योगायोगानं आणखी दोघी तिघी पण भेटल्या. मस्त सात आठ जणी खूप दिवसांनी भेटू शकलो. 
नुकताच कोरोना गेलेला त्यामुळे भेटी गाठी परत सुरु झाल्या. त्यामुळे खूप खूप बोलायचं होतं सगळ्यांनाच. 

 *एक म्हणाली :* हा घरून काम करतोय अजूनही त्यामुळे मुलाला सोडणे आणणे बाहेरची काम पण करायला मदत होतेय पण माझं बाहेर जाणंच होत नाहीये त्यामुळे. (दु:खी  चेहरा) त्याला कामात ब्रेक असेल तेव्हा हाच म्हणतो हे मी करून येतो, ते मी करतो. माझ रूटीनच बदलुन गेलय.

 *दुसरी म्हणते :* बरय कि तेवढंच तुला निवांतपणा. (पण तिला तो निवांतपणा नको होता असा बोलण्यातून जाणवलं.)

 *तिसरी म्हणाली :* मग तू पण काहीतरी आवडीचं काम सुरु कर कि तसही तू पण आधी काम करताच होतीस कि. (पण हे बोललेलं  पण तिला आवडला नाही. )

 *पहिली  :* करायची तेव्हा केली कि कामं, (रागवून) नोकरी केली म्हणजेच  सगळं असत असा नाही. घरी असणारी स्त्री पण कमी काम करत नाही. 

 *तिसरी :* अग तूच तर म्हटलंस ना कि नवरा घरून काम करतो त्यातून ब्रेक असेल तेव्हा तोच बाहेरची बरीच काम करतो तुला तुझं बाहेर जाणं भेटणं इतर होत नाही. म्हणून मी म्हटलं.

घर सांभाळताना पण तर तू खुश नाही असाच अर्थ झाला ना म्हणजे. घर सांभाळणारी आणि नोकरी करून घर सांभाळणारी दोन्हीही तितक्याच महत्वाचं आहेत हे मला पण ठाऊक आहे. पण आपण ज्यात आहोत म्हणजे नोकरीच्या किंवा घर सांभाळणाऱ्या यात समाधानी असं महत्वाचं आहे. 

 *पहिली :* नोकरीच्या बायकांना नेहेमीच त्या ग्रेट वाटतात. (कुत्सित)

 *चौथी :* असा समज चुकीचा आहे. आपणच आपलं ठरवतो. नाही एखादीला अधिपत्या खाली काम करायला आवडत ती नाही करू शकत नोकरी. याचा अर्थ नोकरीच्या स्त्रियां बद्दल असा विचार नसावा. तू तर दोन्ही स्त्रीचे आयुष्य जगली आहेस ना !

 *पाचवी :* बरोबर.

 *तिसरी :* तेच म्हणायचं होतं मला कि असा कोणत्याच स्त्रीने मग - ती नोकरीची असो व घर सांभाळणारी, दुसरी बद्दल विचार करायला नको. 
तसही अपवाद असतीलच कि म्हणजे घरी राहणारी स्त्री पण अधिपत्याखालीच असत नाही अस नाही आणि नोकरीवालीला विचारणारं कोण नसेल असही नाही.

समाजात आपलं अस्तित्व टिकवून परंपरेने असलेले सगळे करून नवीन पिढी घडवणं हे सर्व स्त्रियांचं काम आहे ते करताना जिला जो मार्ग सोपा वाटतो तो ती निवडते. (हे काम करण्याची क्षमता स्त्रीयांमधेच असते. यावर दुमत नसावं.)

 *दुसरी :* खूप शिकलेल्या स्त्रिया पण घर सांभाळतात तसेच कमी शिकूनही नोकरी करून घर  सांभाळणारी पण असतेच की.

 *पहिली :* पण समाजात घर सांभाळणारी कमी लेखतात. 

 *तिसरी :* असं कोण म्हणतं ? ज्याची त्याची क्षमता असते ती. त्यात महत्वाचं म्हणजे कमी लेखतात हा विचार का करायचा. हा विचार करूनच मन दूषित करतो आपण. 

 *पाचवी :* दोन्ही प्रकारच्या स्त्रियांनी एकमेकींना तितकीच किंमत दिली पाहिजे. 

 *तिसरी :* सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखण आधी बंद करा. 

 *पहिली :* म्हणायला सोप्पंय ग, पण अनुभव येतात ना तसे. 
 *तिसरी :* दुर्लक्ष करायचं मग. ते आपोआपच बंद होतं.  मी पण इकडून बाहेर पडताना या वाक्यावर दुर्लक्ष  करणार आहे ते हे :  "नोकरीच्या बायका स्वतःला फार शहाण्या समजतात."

 इकडे बोलले कारण मी तुम्हाला आपलं समजते. आपणच आपल्या सख्यांचं मन स्वच्छ ठेवायला मदत करायची मग मैत्रिणी का म्हणून घ्यायचं एकमेकींना?

 *चौथी  :* एकदम बरोब्बर !

 *पहिली :* हं... प्रयत्न करेन ... दुर्लक्ष करण्याचा.. 

 *सहावी  :* बरोब्बर ! मी तेच करते. असले टोचणारे विषय आले कि शांत बसते. मी पण या दोन्ही स्त्रिया जगले आहे. जे जमत नाही त्या बद्दलची रुखरुख कमी होते अशानी. उभारी येते ती वेगळीच. 

 *तिसरी :* ज्या प्रकारचे जगायचे आहे ती काळाची गरज पण असू शकते. सगळंच मनाप्रमाणे करता येतेच असे नाही. आत्ता सर्वात महत्वाचे हे कि जे करू ते आनंदात राहून करूया. आपल्या शरीराला त्याची गरज आहे. मग ती नोकरीची स्त्री असो व घर सांभाळणारी. एकमेकींवर डागण्या डागण्यापेक्षा मिळून उपाय शोधू ,समजून घेऊ, उभारी देऊ. 

 *सगळ्या :* १००% खरय ग !

 *सातवी :* हं ! (कशातच मत न देणार व्यक्तिमत्व )
००----------००

गौरी पाठक 
२१.०८.२०२४


अभिप्राय 
+-+-+
कंगोरे

नेहमी पाऊणतासात घरी पोचते मी. कधी कधी मधे काम करून तासाभरात जास्तीत जास्त.  नोकरी करत असल तरी घरची ओढ मला नेहमीच वाटते. 

आज घराजवळ एक मैत्रीण भेटली, खर तर रोज दिसते ती. घड्याळं असतात आयुष्यात काही लोकं. ऑफिसला जाताना - येताना दिसली नाही ही मंडळी की समजायच आज ऊशिर झाला आहे.

पण आज मनापासून वाटल थांबुन बोलुच.  ती पण थांबली. दोनच वर्ष झाली दोस्तीला, पण छान वाटत तीला भेटुन. डोक्यात मधुरिमाला लेख पाठवलेला विषय होताच. 

मी : कशी आहे लेक?
ती : मस्त! हल्लीच्या मुली पटकन सेट होतात.
मी : करमत का ग?
ती : आता हळूहळू सवय होतेय. पण फोन मुळे हव तेव्हा बोलण होतं. तीला हव ते ती विचारते. सुरूय..
मी : मस्त. हे मी माझ्या मैत्रिणीला सांगणार आहे. तीचा लेक परप्रांतीय सुन आणतोय. ती खुप हौशी आणि कायम आनंदी पण पुढच सगळ कस जमेल विचारात आहे. 
ती : परप्रांतीयांना पण आपली संस्कृती खुप आवडते. तीला सांग की योगायोगानं श्रावण आहेच, सगळे सण व्रत समजवत करत रहा.
मी : मग काय तर. मी म्हटलच कर तिकडेच केळवण, जिवतीची पुजा घरच्या घरी जमतय तसं.
ती :  आपल्याला वाटत पण आपण करत राहिलेल मुलांच्या मनात नोंद होत असतं. ही बघ की ईकड बघायची पण एकटी परदेशात आहे तर सगळं पाळते. अगदी रामनवमी अयोध्या देवळाच्या दिवशीच पण भारतासारख तिकडे चार पाच का होईना जमुन केलं.
मी : ( मनात... आजच लेख पुरा केला तो आशय वास्तविक दिसतोय समोर... मनभावन सावन वाचा लेख माझा. त्या दिवशीच तो फायनल करून पाठवला होता.) मला हेच वाटत आपण करत राहायच.  शिकवत राहायच. आपण सांगितल नाही अस व्हायला नको.
ती : अगं अनुभव हा आहे की परप्रांतीय मुली पण आजकाल आपणहून सगळ हौशीन करू लागल्या आहेत. आनंद आपल्यातल्याच मुलींचा आहे. पण वेळ आली की करतात हा पण अनुभव आहे. 
मी : हेच म्हणते मी की, या पिढीतल्यांची शिक्षणाची वर्ष वाढली, अपेक्षा वाढल्या, प्रलोभनं वाढली, कर्तव्याची व्याख्या बदलली. त्यांना अनुभव येण्याच्या वयात अंतर वाढलं. तरी संस्कृती संस्कार कानावर पडतच ठेवले की ते कधी ना कधी ऊमजतीलच.
ती : खरय! आपल्या पिढीनं  करत राहायच आणि आनंदी राहायच.
मी : महत्वाच म्हणजे  या पिढीला जेव्हा खरी गरज असेल जे त्यांच्या आत्ता लक्षात येत नाहीये, तेव्हा काहीही झालं तरी मदत करायची. ती कोणतीही असू शकेल. सांस्कृतिक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा.
ती : प्रश्नच नाही ग. आपलीच लेकरं ती. तसही पिढीत बदल होऊन होऊन असा काय होईल? परत जुन्या फुग्याच्या बाह्यांची फॅशन आलीच ना! तसच होईल.
मी : खळखळाट हसत.... हो तेव्हा आपण आजी गटात मोडू मग नातवंडं येतील, आईला काही माहितीच नसतं ...आजीलाच विचारू.
ती : भन्नाट 
मी : पळा घरी, अंधार पडला की..
ती : नंतर काय झाल सांग ग. मी पण पळते.

अशा प्रकारे गप्पा दिड तास झाल्या. घरी पोचायला साडे आठ. पण न ठरवता झालेल्या गप्पांमध्ये मजा आली. खुप कंगोरे बोलायचे राहुन गेले खरे पण मन हलकं झालं. गपचुप आईंनी केलेलं जेवले. 

सौ. गौरी पाठक
२३.०८.२०२४
+++++

कंपन

काल ट्रेनमधुन येताना अचानक चार मैत्रिणी झाल्या.  छान वाटत अस अचानक भेटी झाल्या की. त्यातली एकच आधीची शाळेतली मैत्रिण निघाली. बाकी सहप्रवासी च होतो. पण मनमोकळ्या असल्यान ओळखी केल्या गेल्या. पण फारशी  एकमेकींची मत ठाऊक नव्हती. तीन परिवारच होतो. 

सगळ्या जणी वयाच्या पाच वेगळ्या वयोगटातल्या होतो.  मस्त पुण नागपुर गप्पांचा बेत रंगत होता. मंदा, संध्या, कुंदा, नंदा आणि मी. मंदाच्या लेकीच नाव वधुवर सुचक मधे नोंदवल अस तीनं सांगितलं. तिकडून विषयाला सुरुवात झाली.

मंदा : आणखी कोणती संस्था आहे का गं नावनोंदणीची?

संध्या : मला तरी कल्पना नाही. अजुन तरी मला वेळ यायचीय, आम्ही आत्ता दहावीची पायरी चढतोय.

कुंदा : आम्ही ऊतरलो यंदा या पायरीवरून. हुश्श!

नंदा : आहेत संस्था पण "माहेर" संस्थाच जास्त  खात्रीची आहे.

मी : माझ्या मैत्रिणीला विचारेन, तीनं नुकतच मुलीच नाव नोंदवल आहे. ती सांगत होती की आधीपेक्षा चार पाच मुद्दे जास्तीचे नोंदणीत लागतात. जे असतील अस आजवर वाटलं नव्हतं.

मंदा : हो आणि विषेश म्हणजे वय वर्ष २५  असल तरच नोंदवा म्हणतात. हल्ली २९-३० शिवाय लग्न करतच नाही कोणी.

कुंदा : सत्य परिस्थिती आहे मी अनुभवलेल सांगते. माझ्या नात्यातल एक लग्न (लवकर ठरवलेल बरका?) म्हणजे २४-२५ वय साधारण, स्थळ ओळखीतला मुलगा म्हणुन चौकशीला आले.  समोर दिसतो रोज, वागणं बोलणं छान आहे म्हणुन म्हटलं आम्ही‌ छान आहे मुलगा. जवळ जवळ मध्यस्थच झालो.  सहा महिन्यात भांडणं घेऊन आले पालक बघा जरा समजवुन म्हणतं.

काय समजवायचं या पिढीला? थोड तुझं थोड माझं ची तयारीच नाही. कस बसं निभलय आत्ता. पण आधीसारखं जगात नाही राहिलं.

संध्या : मला तर हल्ली वाटतं की लिव्ह ईन मधे राहुन पटल तरच करावं लग्न.
नुसत स्थळ बघुन समजणं अशक्य आहे, कोणाची खात्रीच ऊरलेली नाही.

मंदा : अस काही गरजेच नाही कारण शिक्षण ते नोकरी पाच वर्षांत जवळजवळ सहवासातच असतात ही मुलं. बघ की विचार कर भटकंतीच जास्त असते. नाईट आऊट, लेट नाइट पार्टी बघता किरकोळ तासच घरी असतात की. त्याला लिव्ह ईन कशाला हवय? 
आणि काही खात्री नाही लिव्ह ईन नंतर पण घटस्फोट होणार नाही काय खात्री?

मी : खरय तुझं. पूर्वजांनी विवाह संस्था नियोजनबद्ध जीवनासाठीच आखली असणार ते चुकीच कस होईल. काही तरी विचार करूनच सोळा संस्कारात आहे ना लग्न घटक.

नंदा : दोघांच्या समजुन घेण्याच्या क्षमतेवरच टिकत लग्न. नाहीतर पाच वर्षानंतर पण चांगला संसार करून लग्न मोडलेली ऊदाहरणं आहेत.

कुंदा : कोणीच परिपूर्ण नसत हे समजुन जगणं आपल्या पिढीपर्यंत समजलय. पुढच अवघड आहे.

मंदा : पण अशातही घरच्यांनी स्थळ पहा असच होतय. आपापल बघुन आणलय हे हळूहळू कमी होतय म्हणजे आत्ता एक टक्का म्हणु.

संध्या :  पण कायद्यान पण हो म्हटलय लिव्ह ईन ला.

मी : लग्न करून नंतर समजुन घ्या वर्षभरात. आधीची पिढी अशीच जगली आणि ती आनंदी आहे. कायदा आला म्हणुन पाळाच अस नसावं गं.

नंदा : खरय आत्ताच वेळ आहे संस्कृती जपण्याची या पिढीला शेवटचा चान्सच जणू.

मी : हो ग अगदी खरं. आत्ता सकारात्मक विचार करण्याची गोष्ट मंदानी म्हटल ती ही आहे की ते एक प्रमाणाचा टक्का वाढेल हळूहळू असच म्हणुया. 

पण जोडीदार स्वसंमतीन असला की तो आपल्या घरात, आपल्या मनात हक्कान ठाम ऊभा राहतो. काळ कोणताही असो मानसिक भक्कम आधार वाटतो. हीच तर शिकवण दिलीय पूर्वजांनी विवाहसंस्थे विषयी.

संध्या : हं... नि:शब्द ..

मंदा कुंदा नंदा मी : विचारात....

अचानक ब्रेक लागला, गपकन गाडी कुईईई आवाज करत थांबली. दौंड आलं होतं. आमच्या चर्चेला पण ब्रेक लागला कारण वाफाळता चहा घेऊन दादा आले.
मजा आली पण गप्पा मारताना.

 एक छान झाल नवख्या होतो सगळ्या मनातल बोलल तरी गेलं. मनातली कंपन लहरी बाहेर पडल्या, जगातली परिस्थिती समजली. मग पाचही जणींनी सेल्फी काढला. शास्त्रं असतं ते. 

झाल की मग कुठ पोचली गाडी फोन सुरू... बॅक टु करंट पोझिशन...
 मग काय तर... आयुष्यात येणारं सगळ सकारात्मकपणे झेलायला तयार झालो आणि ते पण कंपनरहित!

सौ. गौरी पाठक
२६.०८.२०२४