Monday, 17 February 2025

लाॅजिक एकवीसाव्या शतकासाठी...

जुनं ते सोनं 
मराठी महिन्यातले सण का साजरे करायचे?  असे प्रश्न माझ्या लेकाचे बाल निरागस मन सतत विचारत असायचे. त्याला कारण शोधुन सांगताना सवय लागलेली की भारतीय सण उत्सव साजरे करण्यामागे काय शास्त्रीय दृष्टीकोन असेल...  या पिढीला लाॅजिक समजल तरच ती ते मान्य करेल आणि थोड फार आचरणात आणेल. पटल तर करणारी ही पिढी, मग म्हटलं आपल्याला पण हे अस का करतात? च ऊत्तर देता यायला हवं आणि मग ठरवलं जमेल तस सगळ नोंद करत गेले. (काम सुरूच राहील हे, ... दिनदर्शिकेचे काम जोरात सुरु आहेच...)

मराठी महिन्यातले सण आणि त्यामागचे पूर्वजांचे लाॅजिक  दिनदर्शिका २०२३ चा हा एक प्रयत्न माझ्या समाधानासाठी.. दर मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी  त्या त्या महिन्याची दिनदर्शिका अपडेट करून पाठववायचा मानस आहे.  सद्ध्या तरी ब्लाॅगवर ठेवेन आणखी माहिती ऊपलब्ध झाली तर पानात भर पडेल हा विचार करून छापिल आवृत्ती केली नाही. 

त्या त्या महिन्याची अशी काही माहिती, लाॅजिक आपल्याला ठाऊक असेल तर ब्लाॅगवरच्या  प्रश्न ऊत्तरात द्या. (मला योग्य वाटल तर) मी ती नोंद करेन. सोबत फोटो असतीलच त्या शिवाय तर मजा नाहीच🤗....

जे जे वाचनात आलं, लहानपणा पासून ऐकत आले, गुगुलवर शोधलं तसं तसं नोंद करत गेले. या कामात माध्यम ठरलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मनातील प्रश्न उत्तर शोधात गेले आणि नोंदी वाढत गेल्या. 

काही कारण असेना हेतू हाच कि माझ्या पिढीला आणि पुढच्या पिढीला हिंदू धर्माचे , सणांचे महत्व समजावे. हिंदू  संस्कृतीचे  महत्व समजून घेऊन आत्मसात केले तरच पुढची पिढी उज्वल बनेल आणि हिंदू धर्म अखंड राहील. 

सौ. गौरी अनिरूद्ध पाठक
********
असच काहीसः ....
*******

अनुक्रमणिका 

मंगल प्रसंगी आंब्याच्या पानाचच तोरण दारावर लावतात
रोजची पूजा का महत्त्वाची?
मुंज करण गरजेच का  मुंज म्हणजे काय?
दारासमोरच तुळस का लावायची?
वडीलधाऱ्यांच्या पाया का पडायचे?
पिंपळच झाड का लावावी?
कपाळाला कुंकु का लावायच?
हिंदु संस्कृतीत कान टोचण्याची पद्धत का आहे?
जमिनीवर बसुन एकत्रच का जेवले पाहिजे?
१०
दक्षिणेला डोक करूनच का झोपायचे?
११
ऊपवास का करायचे पूर्वीचे लोक?
१२
परमेश्वर सर्वत्र आहे म्हणता मग मूर्ती पुजा का करायची?
१३
बांगड्या भरण्याची पद्धत का असेल?
१४पुजेत  मंगलकार्यात नारळच का वापरतात?
१५
सणासुदीला तसेच शुभ प्रसंगी देवळात जायच अस का म्हणतात?
१६
जानवं का घालायच?
१७
नवरात्र कोणत पण असो  दिवसच का असतं?
१८
आपण १०८ वेळा मंत्र का पाठ करतो?
१९
औक्षण करण्याचे महत्त्व काय ?
२०
देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
२१
गौरीहार का पुजायचा?
२२
पूजेमध्ये विड्याच पानाचे महत्त्व?
२३
नवरात्रीचा उपवास का?
२४
आंघोळ करूनच पुजा का करतात?
२५
पुजेची काही तयारी आंघोळी आधी  काही नंतर चालते अस का?
२६
आता फुल पारोशान तोडतात मग ती  धुता वाहायची चालतात ?
२७
भारद्वाज पक्षी दिसला की शुभ का मानतात?
२८
पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस का घेतात?
२९
)  सोडमुंज का करायची असते?
३०) मासिक पाळीत महिलांनी पुजा का करू नये ?
३१) हिंदु धर्मात विवाह का असतात?
३२) विवाहात विधी का असतात?
३३) एकादशीचा ऊपवास का करतात?
३४) आषाढी एकादशी चा ऊपवास द्वादशीला का सोडतात?
३५) हिंदु संस्कृतीत हातावर पायावर जास्त करून महिला मेहूंदी का काढतात?
३६) सोयर का पाळायच? 
३७) 
रांगोळी सांडली कि अपशकुन का मानत होते ?
३८) 
गाय पांढरी, तपकिरी, काळी असते पण  म्हैस काळीच का असते?
३९) मु़जमुलाचा ऊजवा अंगठाच महत्वाचा का असतो?
४०) 
श्रावणात मंगळागौरी का करायची? 
४१) 
श्रावणात उपासना का करावी? त्याचे महत्त्व काय आहे? ४२) श्रावणात दार शुक्रवारी जिवतीची पूजा का करायची?

४३) श्रावणातला शनिवार उपासनेत का घेतात?
४४) श्रावण महिन्यात कहाण्या का वाचायच्या? त्याचा जेन झेड ला काय फायदा?
४५) शिवामूठ का वाहावी? लॉजिक काय ?
४६) अनुराधा नक्षत्राला गौरी आव्हाहन का असतेया नक्षत्राचा आणि गौरी उर्फ​​महालक्ष्मी आवाहन यांचा कोणताही विशिष्ट संबंध काअनुराधा नक्षत्रातच गौरी आवाहन का?

*************************************

१) मंगल प्रसंगी आंब्याच्या पानाचच तोरण दारावर लावतात? 
ताज्या हिरव्या आंब्याच्या पानांनी दारावरचे तोरण बनवलं जातं कारण ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडू शकतात. यामुळे आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि ताजे राहण्यास मदत होते.
पान सुकताच, प्रकाशसंश्लेषण कार्य करत नाही. त्याच वेळी, कीटक पानांकडे आकर्षित होतात. त्यामुळे ते अतिशय स्वस्त आणि सुरक्षित कीटकनाशक म्हणून काम करते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्मांव्यतिरिक्त, आंब्याची पाने मोठ्या धार्मिक मेळावे आणि उत्सवादरम्यान तोरण किंवा बंधनवार म्हणून वापरली जातात, कारण अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शोषण्याची त्यांची अद्वितीय क्षमता आहे.

२) रोजची पूजा का महत्त्वाची?
आयुष्यभर, दररोज उपासनेसाठी हा वेळ बाजूला ठेवल्याने भक्ताला नेहमी परमात्म्याचे स्मरण करण्यासाठी आणि शेवटी सर्व गोष्टींमध्ये आणि सभोवतालच्या प्राण्यांमध्ये परमात्मा पाहण्यास मदत होते.

३) मुंज करण गरजेच का व मुंज म्हणजे काय?
 गृह्यसूत्रोक्त कर्माने बाळाला वेदाध्ययनासाठी गुरूजवळ नेले जाते त्याला "उपनयन" असे म्हणतात. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. मुंज म्हणजेच उपनयन म्हणजेच गुरूच्या जवळ जाणे. गुरूजवळ राहुन नियमांनी बांधुन घेऊन एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे असते. या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधुन घेणे तोच व्रतबंध. हिंदू धर्मात ऋषीमुनी शेंडी डोक्यावर ठेवत. आजही लोक ती ठेवतात. मेंदू च्या सर्व नसा शेंडी ठेवलेल्या ठिकाणी येऊन मिळतात. यामुळे मन स्थिर राहून व्यक्तीला राग येत नाही, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणुन मुंजीत शेंडी ठेवतात.

४) दारासमोरच तुळस का लावायची?
घरातील तुळशीचे रोप त्या घरातील रहिवाशांच्या मनाला शांती आणि आनंद देऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी लागवड करत आहात ती जागा नीटनेटकी आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. वनस्पती रोग आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आहे आणि अशा प्रकारे, सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि आपल्याला मानसिक शांती देते. प्रवेश करतानाच व्यकती नकारात्मक भावनेत असली तरी प्रसन्न मनान आत येते. तुळशीच्या रोपाची पूजा करावी. कारण ती पुजली तरच संपुष्टात येणार नाही.   रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोणत्याही आजारावर पटकन गुणकारी तुळस झपकन दारामोर असली की तत्काळ ऊपयोगी पडते.

५) वडीलधाऱ्यांच्या पाया का पडायचे?
थोरा मोठ्यांच्या  पायाला स्पर्श का करायचा याचे तर भारतीयांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखादी व्यक्ती नतमस्तक होऊन आपल्या वडिलांच्या  थोरामोठ्यांच्या चरणांना स्पर्श करते तेव्हा त्यांचा अहंकार दडपला जातो कारण हा हावभाव ज्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श केला जातो त्या व्यक्तीचे वय, अनुभव, कर्तृत्व आणि शहाणपणाचा आदर करतो. त्यानंतर मोठी व्यक्ती त्या व्यक्तीला त्यांच्या हातांनी डोक्यास स्पर्श करून आशीर्वाद देते. तेव्हा सकारातामक स्पंद आपण ग्रहण करतो. हिंदू धर्मात, ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करणे हा आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, त्याला चरणस्पर्ष' / प्रणाम / नमस्कार असेही म्हणतात. हे काय सूचित करते? पायाला स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कुटुंबासाठी मिळालेले किंवा शिकलेले मूल्य (संस्कार) देखील दिसून येते.

६) पिंपळच झाड का लावावी?
पिंपळाचे  झाड लावल्याने दुष्ट आत्मा भूत प्रेत पळून जातात अस पूर्वी सांगितल जायच जेणे करून ती झाडं लावली जावी व वाचावीत. वैज्ञानिक तर्क हा लोकांच्या मनात या झाडाबद्दल आदर वाढावा आणि ते तोडू नयेत म्हणून त्याची पूजा केली जाते. पिपळ हे एकमेव झाड आहे जे रात्री देखील ऑक्सिजन सोडते.

७) कपाळाला कुंकु का लावायच?
स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या कपाळावर कुंकुम किंवा तिलक लावतात. लाॅजिक हे की  डोळ्यांच्या मधोमध कपाळापर्यंत रक्तवाहिनी जाते. ती पिनीअल ग्र॔थी. कुंकुम किंवा तिलक लावल्याने त्या ठिकाणची उर्जा टिकून राहते. कपाळावर कुंकु लावताना अंगठा किंवा बोटाने दाब आल्यास चेहऱ्याच्या त्वचेला रक्तपुरवठा करणारे स्नायू सक्रिय होतात. यामुळे चेहऱ्याच्या पेशींपर्यंत रक्त चांगले पोहोचते. ते शरीराचे आद्ध्यात्मिक केंद मानले जाते.  हळदीकुंकवाला बोलवण्यामागे पर हाच ऊद्देश असावा.

८) हिंदु संस्कृतीत कान टोचण्याची पद्धत का आहे?
तत्ववेत्त्यांचा असा विश्वास आहे की तसं करण्याने विचार करण्याची शक्ती वाढते. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की त्या मुळेभाषण सुधारते आणि कानातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीचे रक्त परिसंचरण नियंत्रित राहते.

९) जमिनीवर बसुन एकत्रच का जेवले पाहिजे?
भारतीय संस्कृतीनुसार जमिनीवर बसून खाणे ही चांगली गोष्ट आहे. मांडी घालुन बसणे हे एक प्रकारचे योग आसन आहे. या स्थितीत बसल्याने मेंदू शांत राहतो आणि जेवताना मन शांत राहिल्यास पचनक्रिया चांगली होते. या स्थितीत बसताच मेंदूकडून पोटात आपोआप एक सिग्नल जातो, की ते अन्नासाठी तयार झाले पाहिजे. एकत्र जेवल्याने घरातील मंडळींचा एकमेकांशी संवाद होतो, सहवास वाढला की प्रेम वाढतं. तसेच अन्न ऊरत नाही व वाया जात नाही.

१०) दक्षिणेला डोक करूनच का झोपायचे?
जेव्हा आपण आपले डोके उत्तरेकडे ठेवून झोपतो, तेव्हा आपले शरीर पृथ्वीच्या चुंबकीय लहरींच्या अनुषंगाने येते, शरीरातील लोह मेंदूच्या दिशेने वाहू लागते. यामुळे अल्झायमर, पार्किन्सन्स किंवा मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. हे फक्त नाही, रक्तदाबही वाढतो. शारीरिक समतोल साधण्यासाठी, तुम्ही झोपत असताना तुमचे डोके पृथ्वीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पुलाच्या अनुषंगाने दक्षिणेकडे निर्देशित केलेले पाहिजे.

११) ऊपवास का करायचे पूर्वीचे लोक?
कोणतीही पूजा किंवा सण असला की लोक उपवास करत. आयुर्वेदानुसार, उपवास केल्याने पचन सुधारते आणि फळे घेतल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते, म्हणजेच त्यातून वाईट घटक बाहेर पडतात. संशोधकांच्या मते, उपवासामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार, मधुमेह इत्यादीही लवकर दिसत नाहीत. आजकाल यालाच डाएट म्हणतात.

१२) परमेश्वर सर्वत्र आहे म्हणता मग मूर्ती पुजा का करायची?
हिंदू धर्मात मूर्तीची पूजा केली जाते. पूजा करताना समोर कोणतीही गोष्ट ठेवली नाही तर तुमचे मन वेगवेगळ्या गोष्टींवर भटकते. जर तुमच्या समोर मूर्ती असेल तर तुमचे मन स्थिर होईल आणि तुम्ही एकाग्रतेने योग्य प्रकारे पूजा करू शकाल. परमेश्वरापर्यंत / परमेश्वरी शक्ती पर्यंत पोचण्या साठी देव आहेत.

१३) बांगड्या भरण्याची पद्धत का असेल?
एक बांगडी घालणे / बांगड्या भरणे, भारतीय स्त्रिया हातात बांगड्या घालतात कारण 
 हातात बांगड्या धारण केल्याने त्वचा आणि बांगड्यामध्ये घर्षण होते तेव्हा त्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रित करते. तसेच भरपूर बांगड्या असल्यामुळे ती ऊर्जा बाहेर जाण्याऐवजी शरीरात जाते. देवीला ओटी भरायला गेल की बांगड्या भरत असत त्यामागे पूर्वजांचे स्त्रीच्या शारीरिक स्वास्थ्याचाच विचार सापडतो.

१४) पुजेत  मंगलकार्यात नारळच का वापरतात?
संस्कृतमध्ये ते श्रीफल म्हणून ओळखले जाते ज्याचा अर्थ देवाचे फळ आहे तो नारळ. सर्वात सामान्य. मंदिरातील अर्पण म्हणजे नारळ म्हणुनच तो सर्वात सामान्य माणसाला पण प्रसाद अथवा पुजेसाठी घेण परवडु शकतं हा पण ऊद्देश असावा तसेच लग्न, सण, नवीन वाहन किंवा नवीन घर प्रवेश करणे यांसारख्या प्रसंगी देखील ते अर्पण केले जाते. नारळ हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळालाच ब्रम्हा विष्णु महेशाचे प्रतिक मानल जातं. नारळेस कल्पवृक्ष कारण आतुन गोड व बाहेरून विविध वापरास ऊपयुक्त. 

१५) सणासुदीला तसेच शुभ प्रसंगी देवळात जायच अस का म्हणतात?
देऊळ / मंदिर एक अशी जागा आहे जिथे सकारात्मक ऊर्जा सतत वाहते. मंदिराचे गर्भगृह हे असे स्थान असतं जिथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी जास्तीत जास्त असतात आणि तेथून ऊर्जेचा प्रवाह जास्तीत जास्त असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही ही ऊर्जा स्वीकारली तर तुमचे शरीर निरोगी राहते. मेंदू शांत राहतो. अशा योग्यतेचीच जागा देवळासाठी संशोधन करून निवडलेली असते.

१६) जानवं का घालायच?
जानवे म्हणजे तीन धागे असलेला धागा. ब्राह्मणांच्या यज्ञात पवित्र धागा धारण करण्याचे निर्देश वेदांमध्ये दिलेले आहेत. त्यात  तीन पदर आहेत, म्हणजे सत्त्व, रज आणि तम. लांब धागा कोठेही न तोडता तिप्पट केला जातो आणि यज्ञउपवीत किंवा जानव बनवण्यासाठी बहु-गाठीने बांधला जातो. तीला ब्रह्मगाठ म्हणतात
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना 'यज्ञोपवीत संस्कार' म्हणजेच जानवे घालण्याची  परंपरा आहे. जानवं एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट सूत्र लिहून तयार केला जातो. जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो, दुसरयावर अग्नी असतो, तिसरयावर नवनाग असतो, चौथ्यावर सोम, पाचव्यावर पितर, सहाव्यावर प्रजापती, सातव्यावर वायू आठव्यावर सूर्यनारायण नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दौरे असतात
लघवी विसर्जन आणि मलविसर्जनाच्या वेळी दोन ते तीन वेळा गोलाकार कानावर गुंडाळला  जातो. असे मानले जाते की हे धारण केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, एसीडीटी, पोटाचे आजार, मूत्रमार्गाचे आजार, रक्तदाब, हृदयविकार आणि इतर संसर्गजन्य रोग होत नाहीत. 
हा पवित्र धागा धारण करण्याचा मंत्र आहे. हे तीन पवित्र  सुती धागे हे अध्यात्म, त्याग, आदर्श इत्यादींचे प्रतीक आहेत. डाव्या खांद्यावर जानवं परिधान करणे हे हिंदू धर्माच्या तीन मुख्य कल्पनांचे प्रतिनिधित्व करते, आध्यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करते. ह्रदयावर पडणारं हे जानवं शरीरास ऊत्तम. शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जानवे कानावर बांधल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते आणि पोट रोगमुक्त राहते. हे देखील दर्शवते की जे जानवं परिधान करतात त्यांना ते न घालणार्‍यांना रक्तदाबाशी संबंधित आजार होत नाहीत.
जानवं परिधान करणार्‍याचे शब्द, विचार आणि कृती यांच्या शुद्धता असख्खल मानली जाते. उपनयनम सोहळ्याद्वारे, मुलाला ब्राह्मण संकल्पनेची ओळख करून दिली जाते आणि म्हणून तो मनुस्मृतीच्या नियमांनुसार ब्रह्मचारी जीवन जगण्यास पात्र बनतो. गोष्टी न्याय्य पद्धतीने पाहण्याच्या पवित्र दृष्टीचे प्रतीक जानव्यास मानले जाते.

१७) नवरात्र कोणत पण असो ९ दिवसच का असतं?
हिंदू धर्मात १०८ चे महत्त्व आहे
० हे सर्व गणितीय शक्यतांचे मॅट्रिक्स -+१ इ. किंवा -१ इत्यादी सूर्याचे (शून्य) ग्राफिकल प्रतिनिधित्व आहे. ब्राह्मण किंवा युनिफाइड फील्ड हे सूर्य म्हणून ओळखले जाते.
१ = वैयक्तिक जीव
८ = मृत्यू किंवा नश्वरता दर्शवते.
१+८=९-एक संख्या, ज्याचा कोणत्याही अंकाने गुणाकार केल्यावर आणि बेरीज केल्यावर नेहमी ९ मिळते. हे काळाचे वर्तुळाकार आणि संसाराचे चक्र दर्शवते. म्हणूनच सर्व प्रमुख मंदिर उत्सव ९ दिवस (नवरात्री) शेवटचा दिवस किंवा १० वा दिवस मुक्तिचा सर्वोच्च विजय (विजया दशमी) दिवस असतो.

१८) आपण १०८ वेळा मंत्र का पाठ करतो?
वेगवेगळ्या लोकांद्वारे आणि परंपरांद्वारे भिन्न संख्यांना भिन्न महत्त्व दिले जाते आणि म्हणून मी या प्रश्नाचे एकमेव आणि अंतिम उत्तर असल्याचा दावा करणार नाही. तथापि, भारतातील ऋषीमुनींनी आणि धर्मग्रंथांनी १०८ या संख्येच्या महत्त्वासाठी आणि मंत्रांचे किमान १०८ वेळा किंवा या संख्येच्या गुणाकार का पाठ केले जातात यापैकी एक स्पष्टीकरण मी तुमच्याबरोबर सामायिक करू शकतो. वैदिक परंपरेत सृष्टीमध्ये उपस्थित असलेल्या कंपने आणि शक्तींवर प्रभाव टाकण्याचे साधन म्हणून मंत्रांना खूप महत्त्व दिले जाते. मंत्र हे ध्वनी स्पंदने आहेत आणि आधुनिक विज्ञान आता आपल्याला (क्वांटम फिजिक्स) शिकवते म्हणून ही संपूर्ण सृष्टी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये कंपन करणाऱ्या ऊर्जेपासून बनलेली आहे. घन पदार्थ असे काहीही नाही, कारण अगदी अणू आणि प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्ग्स इत्यादि सुद्धा स्पेस आणि उर्जेपेक्षा जास्त काही नसतात जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कंपन करत असतात.
 प्राचीन वैदिक परंपरेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पंदनांचे वर्गीकरण केले ज्याचा आपल्यावर आणि आपल्या पर्यावरणावर विशिष्ट प्रभाव पडतो देवता किंवा देव/देवदूत - म्हणूनच असे म्हटले गेले की देवतांचा मंत्र शरीरा आहे, म्हणजे त्यांचे शरीर (शरीर) बनलेले आहे. कंपनांचे (मंत्र). वैदिक विज्ञान देखील आपल्याला शिकवते की वेगवेगळ्या ग्रहांचा आपल्यावर आणि आपल्या पर्यावरणावर काही प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, चंद्र. आपल्या शरीरावर आणि मनावर, तसेच पाण्यावर थेट प्रभाव पडतो (तो चंद्र आहे जो महासागरांना ओहोटी आणि भरतीस कारणीभूत ठरतो). चंद्राचाही आपल्या मनावर परिणाम होत असल्याने, जे मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात त्यांना पौर्णिमेच्या वेळी अधिक प्रभावित होतात आणि त्यांना वेडे (लुना मून) म्हणतात. त्याच प्रकारे, इतर ग्रहांचा देखील आपल्या शरीराच्या काही भागांवर, आपल्या मनावर आणि आपल्या वातावरणावर विशिष्ट प्रभाव पडतो. 
काही स्पंदने संतुलित करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी मंत्रांचा जप केला जाऊ शकतो, ग्रहांच्या या प्रभावांमुळे होणारे कोणतेही नकारात्मक प्रभाव संतुलित करण्यासाठी किंवा सुसंवाद साधण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो, तसेच यामुळे होऊ शकणारे कोणतेही सकारात्मक प्रभाव वाढवण्याचा मार्ग मानला जातो. आणि ९ ग्रहांच्या (नवग्रह) प्रणालीवर आधारित १२ नक्षत्रांमध्ये फिरत असताना, यामुळे आपल्याला ९ x १२ = १०८ भिन्न ग्रहांची स्थिती किंवा प्रभाव/प्रभाव मिळतो ज्यांना एकसंध किंवा शांत करणे आवश्यक आहे. या कारणास्तव किमान १०८ वेळा मंत्रांचा जप करावा असे सांगण्यात आले.

१९) औक्षण करण्याचे महत्त्व काय ?
औक्षण करतांना तबकातील दिव्याच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या किंवा ग्रहण केल्या जाणार्या लहरींचे, औक्षण करवून घेणार्या जिवाच्या देहाभोवती गतीमान संरक्षक-कवच निर्माण होते. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे. पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी ही पूजेच्या वेळी ते ते तत्त्व आकृष्ट करून पूजास्थळ शुद्ध करण्याच्या उद्देशाने व्यापक भावाच्या स्तरावर दिलेली आहे. यात तबकामध्ये समाविष्ट घटक हे रंग आणि गंध कण यांच्याशी संबंधित असल्याने या सर्वांमध्ये शक्तीवर्धक कार्यकारी रजोगुणी सगुणत्व त्यातल्या त्यात हळद-कुंकू यांच्याकडे संक्रमित झाल्याने त्यांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे, तर कनिष्ठ स्तरावरील औक्षणाच्या तबकात सुपारी आणि अंगठी या घटकांचा समावेश झाल्याने ते ते कार्यत्व हळद-कुंकू या घटकांपेक्षा कनिष्ठ स्तरावर कार्य करणार्या रजोगुणाकडे संक्रमित झाल्याने हळद-कुंकू जिवाच्या डाव्या बाजूला सरकवून अंगठी अन् सुपारी या प्राबल्याने कार्यरत असणार्या रजोगुणी घटकांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. त्या त्या विधीतील कार्यरत रजोगुणी उद्देशाप्रमाणे तो तो घटक जिवाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दर्शवला आहेऔक्षण करतांना वातावरणात अधिक प्रमाणात सात्त्विकता निर्माण झालेली असते. सात्त्विक वातावरणामुळे जागृत झालेली आत्मशक्ती दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी ब्रह्मरंध्रावर पवित्र आवरण घालायचे असते; म्हणून औक्षण करतांना टोपी किंवा वस्त्र डोक्यावर परिधान करावे.

२०) देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?
नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते. हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.’ देवीला अर्पण केल्या जाणार्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजेआपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.

२१) गौरीहार का पुजायचा?
शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाहप्रसंगी नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी 'गौरीहार' पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी हे व्रतानुषंगाने योजलं असेल.

२२) पूजेमध्ये विड्याच पानाचे महत्त्व
पूजेसाठी विड्याची पान वापरतात कारण हिंदूंचा असा विश्वास आहे की  विड्याच्या पानात विविध देवता वास करतात. विड्याची पाने कोणत्याही नात्यातील समृद्धी आणि नवीन सुरुवात दर्शवतात. विड्याची पान ताजेपणा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अमृत पूजेमध्ये याचा वापर केला जातो याचे मुख्य कारण हेच आहे.  अशा प्रकारे: पानाच्या वरच्या भागात इंद्र आणि शुक्र असतात देवी सरस्वती मधल्या भागात देवी महालक्ष्मी वास करतात खालच्या टोकाला ज्येष्ठा लक्ष्मी वास करतात जे सुपारीच्या पानांना देठाशी जोडतात त्या भागात भगवान विष्णू पानाच्या आत वास करतात. आणि पानाच्या बाहेर कामदेव वास करतात, पार्वती आणि मांगल्या देवी डाव्या बाजूला राहतात पृथ्वी माता किंवा भूमिदेवी उजव्या बाजूला पानभर भगवान सूर्यनारायण आहेत. कामदेव - प्रेमाची देवता - पानाच्या बाहेरील भागावर वास करते. काही ठिकाणी लोक कलशाच्या भांड्याचे तोंड सुशोभित करण्यासाठी विड्याची पाने देखील वापरतात हिंदू विधींमधील सर्वात महत्वाची पूजा सामग्री म्हणजे विड्याची पाने, विशेषतः दक्षिण भारतीय पूजांमध्ये. भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये याला पान, नागवे, वेट्टा किंवा वेट्टीला असे म्हणतात. विड्याच्या ज्या पानांना छिद्रे असतात, वाळलेली असतात आणि मधूनच फाटलेली असतात ती पूजेसाठी वापरली जात नाहीत.  शिवाय, विड्याच्या पानामध्ये समृद्ध हर्बल गुणधर्म आहेत. हे स्फूर्तिदायक आणि उत्साहवर्धक आहे, जंतू आणि जीवाणूंचा नाश करणारा आणि सर्दी दूर करणारा आहे. पान खाण्यापूर्वी देठ कापून कडा छाटून घ्याव्या लागतात आणि शिरा खरवडून घ्याव्या लागतात कारण त्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते.

२३) नवरात्रीचा उपवास का?
आपल्या घरात, संस्कृतीत आणि दैनंदिन व्यवहारात स्त्रीलिंगी जाणीवपूर्वक आणणे खूप महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीने प्रक्रिया, विधी आणि इतर अनेक उपकरणांची संपूर्ण शृंखला तयार केली जेणेकरून तुम्ही यातून योग्य प्रकारे जा. नवरात्री आहे याची तुम्हाला जाणीव नसेल, म्हणून त्यांनी तुम्हाला या नऊ दिवसांत उपवास करण्यास सांगितले. जेंव्हा पोटात अन्न असते तेंव्हा कोणता दिवस आहे हे तुम्ही विसरता, पण जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला तो दिवस कोणता आहे याची जाणीव असेल. नवव्या दिवशी येईपर्यंत तुम्ही अचेतन व्हाल! म्हणून, तुम्हाला खूप जागरूक करण्यासाठी आणि शरीरात एक विशिष्ट पातळी शुद्ध करण्यासाठी, तुम्ही उपवास केला पाहिजे.

२४) आंघोळ करूनच पुजा का करतात?
पूजेपूर्वी स्नान करण्याची परंपरा आहे कारण ती आपल्या शरीराशी संबंधित आहे. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या सभोवतालची नकारात्मकता आपल्याला घेरते. पूजेदरम्यान हे नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी आपण सकाळी स्नान करतो, याशिवाय आतील चैतन्य जागृत व्हावे म्हणून पूजेपूर्वी स्नानही केले जाते. पूजेपूर्वी आंघोळ केल्याने मेंदूची प्रणाली उघडते. मन चैतन्य येते.  असे मानले जाते की हे केवळ स्वच्छतेबद्दल नाही तर पूजेपूर्वी स्नान करण्याचे इतर पैलू देखील आहेत.
स्नानानंतर पूजा करताना ही जाणीव आपल्याला अध्यात्माकडे प्रवृत्त करते.आळसामुळे आपले लक्ष पूजेपासून विचलित होऊ नये म्हणून पूजेपूर्वी आंघोळ केली जाते.
सकाळी शरीर आळस आणि अस्वच्छतेने भरलेले असते. शरीरात ऊर्जा नसते. अशा परिस्थितीत हा आळस आणि अस्वच्छता दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्नान.
जागृत चेतनेने मंत्राचा जप केल्यानेश मंत्राचा प्रभाव अधिक खोलवर जातो. मंत्राचा मन, मेंदू आणि सभोवतालच्या ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मकता जाणवते.
यामुळेच पूजेपूर्वी अन्न खाण्यास मनाई आहे. जेणेकरून शरीरात आळस येणार नाही, नकारात्मकता घेरणार नाही आणि मन उपासनेत एकाग्र होऊ शकेल.

२५) पुजेची काही तयारी आंघोळी आधी व काही नंतर चालते अस का?
खर तर पुजा करतानाची भावना महत्वाची परंतु काही सामान / वस्तु आंघोळीआधी जमा केल्या जातात. ऊदा. पाट, ताट, पळी भांडे, ताम्हन, फुलं, नाणी, सुपारी, गंध अक्षत, सत्यनारायण पुजा असेल तर चौरंगाचे खुंट, दाराला तोरण, आसनं इत्यादी. पुर्वी ही कोरडी तयारी म्हणायचे जी करण्या आधी जागा स्वच्छ करणे रांगोळी काढणे तसेच पुजा करताना ऊठाव  न लागणारी तयारी करून स्नान आटोपुन मग तेल तुप पंचामृत पानं फुल सावरणं प्रसाद करण ही ताजी तयारी म्हणत.
खाद्य पदार्थ प्रसाद पंचामृत सुचीर्भूत होऊन केल की त्यात सकारात्मक आनंदी स्पंद मिळतात. तसच ते आधी ठेवले तर हलण सांडण किंवा काही पडण टाळाव म्हणुन असावेत. तेलाचा दिवा तुपाचा दिवा आधी करायच म्हणजे वाती मुरतात व दिवा  जास्त छान प्रज्वलित होतो असा हेतु असावा.

आताच्या पिढीला सांगायच तर कोरडया तयारीच वर्गीकरण घराघरात बदललेत आढळतं. आपण आपली सोय पाहायची.पूर्वी घरातील बायका तयारी करून देत मग घरचा पुरुष पुजा करायचा. पुरूषांना ईतकी तयारी करण जमण शक्य नसेल , तेव्हा पद्धतच नव्हती म्हणा.
माझ्या मते तयारीचे दोन भाग यामुळे च पडले असावेत.

२६) आता फुल पारोशान तोडतात मग ती न धुता वाहायची चालतात ?
 फुले स्वतःमध्ये पवित्र आणि शुद्ध असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या शुद्धतेची आवश्यकता नसते. ती आधी तोडायची कारण हे काम सूर्योदय समयी अथवा आधी असते ती वेळ झाडं जागी असण्याची वेळ. तेव्हा ती टवटवीत असतात. कोणत्याही सजीवास  जीव असतो त्याला सोईच असताना काम करण योग्य. तसच आंघोळी नंतर मातीत जाण होण टाळलं असावं. वनस्पती विश्व सतत आहुती देतच असत परंतु मानवान योग्य प्रकारे ते घेतलं असावं ईतकच. 
परत हेच की भावना महत्वाची कारण ऊद्याची पुजा असते तेव्हा आफण आदल्या दिवशी फुल पान आणुन ठेवतोच की. 
झाडे विश्रांती घेतात आणि टवटवीत होतात, ज्यामुळे त्यांच्या नैसर्गिक चक्राचा आदर करणे महत्त्वाचे होते. या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून, आम्ही सर्व सजीवांच्या परस्परसंबंधांना मान्यता देतो आणि त्यांच्याशी सुसंवाद साधतो. संध्याकाळी झाडांना हलवु नये फुलं तोडु नये यात हेच लाॅजिक असावं की ती तेव्हा ती झोपलेली असतात. पुजेला सडा पडलेली फुल वापरत नाही त यात हेच कारण असावं.
फुलं ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहेत. फुलांचा सुगंध पूजेच्या ठिकाणी सकारात्मक आणि सौंदर्यपूर्ण वातावरण देतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास आणि पूजेसाठी एक आदर्श वातावरण तयार करण्यात मदत करतो.
काहीजण तोडलेली फुलं वाहण्यापूर्वी पाणी शिंपडत कारण असे असावे की फुले अर्पण करण्यापूर्वी ती ताजेतवानी वाटावी तसेच , फुले कीटक किंवा जंतुंपासून मुक्त आहेत याची खात्री केली जात असावी.फुलं त्याच्या  शुद्ध स्वरूपात सादर केली जावीत हा निखळ निर्मळ हेतु असावा.
पूर्वजांच्या प्रत्येक कृतीत रहस्य लपलेल आहे आपण समजण्यास कमी पडतो.
पूजेसाठी फुले घेणे ही केवळ धार्मिक प्रथा नाही तर भक्ती आणि शरणागतीची गहन क्रिया आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे प्रामाणिकपणाने आणि आदराने पालन केल्याने, तुम्ही पूजेचे पावित्र्य वाढवू शकता आणि परमात्म्याशी सखोल संबंध प्रस्थापित करू शकता. तुमच्या फुलांचे अर्पण प्रेम, पवित्रता, आणि आध्यात्मिक महत्त्वाने मनापासून ओतले जाऊन, तुमचा आध्यात्मिक प्रवास समृद्ध व्हावा हाच हेतु फुल वाहण्यात असावा.

२७) भारद्वाज पक्षी दिसला की शुभ का मानतात?
भारद्वाज पक्ष्यास भगवान श्रीकृष्णाचा पुनर्जन्म मानतात म्हणुन तो दिसला की श्रद्धेने नतमस्तक होण्याची प्रथा आहे.
कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा गोष्टीत या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे. कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे ठाऊकच आहे. सुदाम्याच्या त्या मळक्या पिशवीमधले मूठभर पोहे कृष्ण खातो तेव्हा  सुदाम्याचं घर संपत्तीने भरुन गेलेलं म्हणुन अगदी पार त्या काळापासून सकाळी भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं गेलं असावं. भारद्वाज दर्शन झालं की श्रीकृष्ण दर्शन घडते ऊर्फ शुभ घडते. असा अर्थ लाऊ शकतो.
आता त्यात लाॅजिक अस की तो तो छोटेमोठे किडे, अळ्या, सापसुरळ्या, छोटे बेडूक, सरडे, पाली, इ. मोठ्या आवडीने खातो. क्वचित कधी मोठे साप पकडून खातानाही तो दिसलेला आहे. त्याच्या दोन इंची नख्या सरळधोप आणि अत्यंत तीक्ष्ण असतात. अवतीभवती भारद्वाज दिसला की आपण निर्धोक व्हावं. सापाचं, विंचूकाट्याचं भय त्याच्या हद्दीत तरी नक्कीच नसतं. सरपटणारा तमाम प्राणीवर्ग त्याला जाम घाबरतो.
आता त्याकाळी जे पटणार होत ते समाजमानसात पटवलं परंतु श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे.
आपण भारद्वाज दिसला की मनानं आनंदतो ते त्याच राजस रूप बघुन आणि ते शुभ असतं म्हणून मग जर आपण असा विचार केला तर तो विचार भावना निर्माण करते आणि मग आपलैतल्या पेशी कार्य करतात. जसा विचार तशी भावना तशीच क्रिया या सुत्रानुसार आपोआपच आपला दिवस शुभ जातो. आहे का नाही गंमत.

२८) पंढरीच्या वारीत डोक्यावर तुळस का घेतात?
पंढरीनाथ हे विष्णुचच रूप आहे. तुळस ही वृंदा आहे म्हणजे लक्ष्मीचच रूप की. संताघरी माऊली असेल तर तुळस हवीच. जेव्हा लोहदंड तीर्थाची पंढरी निर्माण केली तेव्हा कलीचा जोर वाढत होता परंतु भगवान विष्णूच्या विठ्ठल अवतारासमोर त्याच काही चालत नव्हतं. नामाच महत्व परमेश्वर जगतात पटवत होते. तरी सत्यभामेला कलीची बाधा झाली ती ऊतरवण्यासाठी भगवंतांनी युक्ति केली माऊली भक्तांच रिंगण केलं आणि आळीपाळीन तुळशीवृंदावन शेजारच्याकडे डोक्यावर जाईल अस बघितलं. ज्या क्षणी सत्यभामेन रिंगण घालताना तुळशीवृंदावन डोक्यावर घेतल त्क्षणी कलीप्रभाव नष्ट झाला ही तुळशीची ऊर्फ वृंदेची ऊर्फ लक्ष्मीची किमया होती. वृंदाच पतिव्रता असणं काय करू शकतं हेतर सर्वजण जाणतात मग कलीची काय कथा. तुळशीवृंदावन वारीत किंवा रिंगण घालत डोक्यावर घेतला तर कलीचा प्रभाव नष्ट होईल असा ऊल्लेख आढळतो.
तुळशीबाबत आताच्या पिढीला काय लाॅजिक सांगगयच तर हे‌ की  वारीच्याबाबत बोलायचं झालं तर लाखो वारकरी रोज पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. अशात लाखो श्वासोच्छवास दर सेकंदाला होत असतात. यात उच्छवासाने हवेतली ऑक्सिजनची पातळी कमी होते. मग हीच ऑक्सिजनची पातळी संतुलीत राखली जाते ती या तुळशीने. डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या २० ते २५ फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते असं सांगितलं जातं. म्हणजे भगवंतांनीच किती छान परंपरा लावछन दिली आहे अस म्हणायला हरकत नाही. "माऊली माऊली, तू संतांची सावली, दारी तुळस लावावी"

२९)  सोडमुंज का करायची असते?
ब्रह्मचर्यव्रत धारण केलेल्या विद्यार्थ्याने गुरुगृहातून स्वगृही परत येणे, याससमावर्तनकिंवासोडमुंज’, असे म्हणतात. समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत.  मुलगा गृहस्थाश्रमात परत येणार असल्याने गृहस्थाप्रमाणे रहाणे त्याला या विधीद्वारे शिकविले जाते. शिक्षण संपल्याची अंतिम अधिकृत परवानगी म्हणूनही या संस्काराकडे पाहिले जायचे. या समयी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करत असत गृहस्थाश्रम प्रवेश करण्यासाठी प्रेरित करतात.
सोडमुंज केली कि मगच लग्न करतात. मुंज ते सोडमुंज १२ वर्षाचा कालावधी असतो. जबाबदारीची जाणीव करून देतो सोडमुंज संस्कार. आजकाल मुंज खूप आवडीनं केली जाते त्यातच दुसऱ्या दिवशी सोडमुंज उरकतात. तसे करू नये. सोडमुंज योग्य वयातच करावी. लहानपणी मुंज केली असते परंतु लग्नाच्या वयात मुले परदेशी असतात. त्यांना सोडमुंज संस्कार महत्व समजावून सांगितले पाहिजे तर ते नक्कीच करतील.
मुंज करताना होम हवनात इंद्र आणि ऋषी  तत्वांची पूजा होते ती तत्व त्या वयास योग्य, तसेच लग्नाला आलेल्या मुलाच्या सोडमुंजीत केलेल्या हवनात त्या वयास अनुरूप तत्वांची म्हणजे विश्वकर्मा आणि प्रजापतीची पूजा होते. विश्वकर्मा हा पृथ्वीचा निर्मितीकर्ता तसेच पालन पोषण करणारा तो प्रजापती, पुढे गृहस्थाश्रमात युवकाला हेच काम करायचे असते. उर्जारूपी ताकद मिळावी यांचे आशीर्वाद लाभावे हा हेतू. बटु पासून स्नातक असे रूपांतर आहे. लहानपणीच बागडणाऱ्या मनाच्या बालकास येणाऱ्या जबाबदारीची जाणीव हा पूर्वजांचा हेतू या सोडमुंजी संस्कारात असावा. 

३०) मासिक पाळीत महिलांनी पुजा का करू नये ?
मासिक पाळी हे पुनरुत्पादक आरोग्याचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवु शकतो. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते.त्यामुळेच कदाचित या काळात पुजा करण्यास मनाई केली जायची.
देऊळ हे असे ठिकाण आहे जे सकारात्मक उर्जेने भरलेले असते आणि जेव्हा मासिक पाळीच्या काळातली महिला प्रवेश करते तेव्हा ते ऊर्जा प्रवाहामध्ये असंतुलन निर्माण करते. देवळाच्या प्राणाचा परिणाम सुक्ष्म शरीरावर होतो. मासिक पाळीच्या वेळी स्त्रीची उर्जा खालच्या दिशेने जाते, तर देवळात उर्जा वर जाते.
सनातन धर्म मासिक पाळी आणि मासिक पाळी स्त्रियांना गलिच्छ, अस्वच्छ, अशुद्ध मानत नाही.
जे लोक असे करतात  त्यांना सनातन धर्म अजिबात समजलेला नाही. अशा स्त्रीयांना कुत्सित वागणुक देऊ नये. 
 'पंच-वायु' किंवा मानवी शरीरातील ५ आवश्यक तत्वे असलेल्या या आयुर्वेदिक संकल्पनांची माहिती असणे गरजेच आहे.
१) प्राण: छाती व डोके : हृदयाचे ठोके आणि श्वास. प्राण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि रक्ताभिसरण प्रणालीद्वारे प्रत्येक पेशीमध्ये पाठविला जातो.
२) उदान: गळाबोलणे, गाणे, हसणे आणि रडणे याप्रमाणे स्वरयंत्राद्वारे ध्वनी निर्मिती. तसेच ते अस्तित्वाच्या हेतूशी संबंधित स्वरध्वनी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागरूक उर्जेचे प्रतिनिधित्व करते. म्हणून उदानावरील संयम उच्च केंद्रांना शरीरावर संपूर्ण नियंत्रण देते.
३) समान: नाभि :अन्नाचे पचन आणि पेशी चयापचय (म्हणजे नवीन पेशींची दुरुस्ती आणि निर्मिती आणि वाढ). समानमध्ये शरीरातील उष्णता नियंत्रित करणाऱ्या प्रक्रियांचाही समावेश होतो.
४) व्यान: संपूर्ण शरीर : ऊर्जा जी सर्वत्र पसरते
शरीर (म्हणजे अभिसरण). शरीराचा विस्तार आणि आकुंचन प्रक्रिया, उदा. ऐच्छिक स्नायू प्रणाली.
५) अपान: गुदद्वार ओटीपोट:  फुफ्फुस आणि उत्सर्जन प्रणालीद्वारे शरीरातून टाकाऊ पदार्थांचे उच्चाटन.
यातील शेवटचे - अपान वायु - जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा सर्वात प्रमुख असते. म्हणजेच खालचा वायु सर्वात सक्रिय असतो. 
मन आणि चेतना या ५ वायुंशी  कमी-अधिक सुसंगत असल्याने  मासिक पाळीत, अपान वायु मनावर सर्वात जास्त प्रबळ असतो आणि चेतना अक्षरशः खाली  खाली खेचली जाते, म्हणजे बाहेर पडणे. देवळे धार्मिक स्थळे आणि प्रथा यांचा मूळ उद्देश चैतन्य किंवा मनाला आत्म्याकडे किंवा भौतिकतेपासून दूर करणे हा आहे. अशा ठिकाणी ऊर्जेचा जोरदार संचित नमुना असतो.
त्यामुळे साहजिकच आणि स्वाभाविकपणे - मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अशा ठिकाणी राहायचे असते किंवा अध्यात्मिक कार्यात गुंतायचे असते पण परिणामी मनावर प्रचंड ताण पडतो - त्यामुळे ५ वायुंवर  विशेषत: अपानावर - त्यामुळे नियमित जैविक क्रियाकलापांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येतो. 
मन आणि मनाचा कल यामुळे वायुच असंतुलन देखील होते आणि त्यांच्या नैसर्गिक सुसंवादात अडथळा येतो ज्यामुळे जैविक संतुलन बिघडते. प्राचीन काळी स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी स्वयंपाक करण्याची परवानगीही याच कारणास्तव नव्हती - अग्नी ही उर्जेचा जोरदार ऊर्ध्वगामी नमुना होता. शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते, याकाळात तीचे लक्ष धार्मिक कार्यात लागणार नाही यासाठी तीला आराम शांतता गरजेची होती ती दिली गेली परंतु ही पद्धत पाळताना विटाळ भावना का आली असेल हे मात्र शोधतेय मी.
(आता कालानुरूप कस कराव हा विचार करण्याचा आपापला भाग झाला. शास्त्रीय कारण मात्र विचार करण्यासारखे आहे.)

३१) हिंदु धर्मात विवाह का असतात?
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुसरून विविध पद्धतीनी पतिपत्नीमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात या नात्यास लग्नगाठ म्हणतात लग्न हे पवित्र बंधन आहे.
विविध विधीचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे. धार्मिक विधी ‌द्वारे त्याला सामाजिक सहमती प्रदान कण्यात येते. वैवाहिक विधीचा मुख्य उद्देश नवीन संबंधाची माहिती देणे, त्याला सुखमय बनवणे तसेच नानाप्रकाराचे अनिष्टांपासून त्याचे रक्षण करणे आहे.
विवाह संस्कार वा विधीमध्ये विस्मयकारक वैविध्य आढळते. ह्या संस्कारात चार पायऱ्या असतात. पहिली पायरी हा वधूच्या स्थितीमध्ये होणाऱ्या परिवर्तन सुचित करणारी विधि आहे. दुसरी पायरी ही विवाहामध्ये कन्यादान करून कन्येच्या पित्याकडून पतीच्या नियंत्रणात जाण्याची स्थिती घोषित करते. तिसरी पायरी ही उर्वरताची प्रतीक आणि संतानसमुद्रीची कामना सूचित करते. चौथ्या पायरीवरच्या विधी वधु-वराचे ऐक्य आणि अभिन्नतेला सूचित करते. 
विवाहात विधींचे महत्त्व मोलाचे आहे.  एकमेकांना समजुन सांभाळून घेण्यासाठी केलेल्या वचनांची नोद आहे. परत ईकडे निसर्गाच्या नियमाची आठवण होते ती हीच की विचार भावना क्रीया. या विधीद्वारे एकमेकांना आपल मानुन तारून नेण्याचा विचार करून ते विधी केल्यानं तो नोंद केला जाते जेणेकरून तो पाळण्याची क्रिया व्हावी. हिंदू संस्कृतीनुसार कुटुंब व्यवस्था नीट जपली जाण्यासाठी खुप विचार करून यांची आखणी केली गेली असावी. विवाह विधी हा संस्कार आहे यात प्रेम आत्मियता जाणवेल. परंतु करारात व्यवहाराची झालर येते. जी कुटुंब व्यवस्थेसाठी ऊपयोगी नाही.

३२) विवाहात विधी का असतात?
कन्यादानाचा विधी वधूच्या पालकांकडून केला जातो. दोन्ही कुटुंबे जोडप्याच्या मिलनासाठी करत असलेल्या बांधिलकीची कबुली देण्यासाठी सर्व आमंत्रित पाहुण्यांसमोर हा विधी केला जातो. वधूच्या कल्याणाची जबाबदारी वराकडे हस्तांतरित करण्याचाही तो संकेत आहे. कन्यादान हे सुनिश्चित करण्यासाठी केले जाते की वराने सर्व पाहुण्यांसमोर आपल्या वधूची काळजी घेण्याचे कर्तव्य स्वीकारले आहे, ज्यामुळे त्याची जबाबदारी वाढते.
लाजा होम : भारतीय स्त्रीचा मनाचा मोठेपणा आणि अंतःकरणाचा दिलदारपणा या लाजासमर्पणातून व्यक्त होतो. स्वतःच्या सुखापेक्षाही इतरांचे सुख मोलाचे आहे. आपण आनंदी राहण्यापेक्षा इतरांना आनंदी ठेवणे, ही आत्मसमर्पणाची भावना स्त्री या विधीच्या माध्यमातूनच सुरू करते. आजपासून तू मला पितृकुळापासून वेगळे कर, पण पतिकुळापासून कधी विभक्त करू नकोस. ही प्रार्थना आहे अर्यमा देवासाठी अर्यमा म्हणजेच न्यायव्यवस्थेला सांभाळणारा. यम-नियमांपासून कधीच वेगळा न होणारा. अशा या न्यायकारी देवाजवळ केली गेलेली प्रार्थना सफल ठरेल व तो निश्चितच स्त्रीशक्तीला योग्य तो न्याय देत राहील. तो न्यायशील ईश्वर स्त्रियांच्या त्याग व समर्पण भावनेला वैवाहिक जीवनात योग्य ती दिशा देत राहील. यामुळे श्वसुरगृहाशी त्यांची इतकी एकरूपता वाढेल की, या कुळापासून त्या दूर राहणार नाहीत. तिच्या या मंतव्यातून भविष्यातील उज्ज्वल यश दृष्टिपथात येत आहे. यामुळे पतिकुळासह पितृकुळसुद्धा सुखी व आनंदी राहील. वैदिक विवाह संस्कारातील प्रत्येक विर्धीची भावना इतकी उदात्त, उदार व दिव्य आहे की, तिची बरोबरी इतर कोणत्याच विवाह पद्धर्तीशी होऊ शकत नाही. अशा विविध मौलिक विधीप्रसंगांतून उच्च आदर्शाची पेरणी होऊन समाजाची नवनिर्मिती होण्यास मदत मिळते. लाजाहोम हा त्यांपैकीच एक महत्त्वाचा मानला जाणारा विधी, जो की उत्कट हृदयस्पर्शी आणि उच्च आदर्शाना अभिव्यक्त करणारा आहे
मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी ‌द्यावयाच्या आशीर्वचनात आहे. पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची प‌द्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे. प्राचीन काळी नोंदोंगी वगैरे नसल्यामुळे लग्न सार्वजनिक करण्यासाठी हारांची देवाणघेवाण "जय माला" हा एक पारंपारिक भारतीय विवाह विधी आहे ज्यामध्ये वधू आणि वर एकमेकांच्या स्वीकृती आणि आदराचे प्रतीक म्हणून फुलांच्या हारांची देवाणघेवाण करण्यासाठी जातात. सर्व जाती- पंथांमध्ये विवाह हा धार्मिक, पवित्र आणि अत्यंत शुभ मानला जातो कारण दोन व्यक्ती कायमचे बंधनात बांधणार आहेत. हारांची देवाणघेवाण करण्याची कृती आध्यात्मिक महत्त्व दर्शवू शकते आणि विवाहातील दोन आत्म्यांच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करू शकते. इतरांसाठी. ही एक महत्त्वाची आध्यात्मिक अर्थ नसलेली सांस्कृतिक परंपरा आहे, जय माला समारंभाला अध्यात्माची जोड आहे की नाही हे सहभागी व्यक्तीच्या दृष्टिकोनावर आणि विधीचे पूर्ण महत्त्व समजून घेण्यावर अवलंबून असते.
मंगळसूत्र म्हणजे वराने वधूला दिलेले वचन, विनंती, आशीर्वाद आणि वचनबद्धता आहे. नुसते मंगळसूत्र बांधून लग्न पूर्ण होत नाही. वर आणि वधू यांनी मिळून सप्तपदी नावाची खालील ७ व्रते घ्यावीत
गठबंधन हे दोन व्यक्तीमधील अतूट बैबाहिक बंधनाचे प्रतीक आहे. गाठ बांधणे म्हणजे काहीही सुरक्षित करणे. खरे तर असे मानले जाते की या विधीने वधू-वरांचे नाते कायमचे सुरक्षित होते. वधू आणि बर जेव्हा त्यांच्या संबंधित कपड्यांसह गाठ बांधतात तेव्हा ते प्रतीकात्मकपणे एकमेकांशी जोडलेले असतात लग्न समारंभात, वधूची चुनरी आणि वराचा पटका म्हणजेच दुपट्टा एकत्र जोडला जातो. जो एकता आणि सौहार्दाच्या बंधनाचे प्रतीक मानला जातो. होय आणि म्हणूनच या विधीला गठबंधन म्हणतात 

३३) एकादशीचा ऊपवास का करतात?
एकादशी व्रत ज्यांची श्रद्धा आहे आणि भगवान विष्णूची उपासना करण्यावर विश्वास आहे  त्यांच्यासाठी आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात फलदायी व्रतांपैकी एक मानला जातो. एकादशी व्रतामुळे  तुमच्यात शांती, सौहार्द आणि समृद्धी येउ शकते. उपवास तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाला जाऊ देतो आणि तुमचा जागरूक आत्मा शुद्ध करतो. या तिथीला वैज्ञानिक दृष्टीने कमी व योग्य जेवणे शरीरार उपयुक्त आहे.
एकादशीचे व्रत केवळ तुमचा आत्मा स्वच्छ करत नाही तर तुमचे शरीर विषमुक्त करते आणि शरीरातील चयापचय चांगले करते. भगवान विष्णूच्या उपासकांना एकादशीच्या व्रताची जाणीव आहे. परम मोक्ष, समृद्धी आणि धार्मिक श्रद्धा हे काही एकादशी व्रताचे फायदे आहेत.

३४) आषाढी एकादशी चा ऊपवास द्वादशीला का सोडतात?
द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो. एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जाऊन उपवास सोडतात. 
याची कथा अशी की अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत. एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन ते नदीवर गेले. सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला.
अखेर त्यांनी थेंब भर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले. अंबरीश ऋषींना १० जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतार घेतले, परमेश्वरान आपल्या भक्तासाठी हे केलं तसेच या दिवशी भगवान विष्णु अवतरले. अशी मान्यता वारकरी सांप्रदायात आहे.

३५) हिंदु संस्कृतीत हातावर पायावर जास्त करून महिला मेहूंदी का काढतात?
मेहंदीचा रंग नैसर्गिक असतो. लग्न असो वा सण, मेहंदी लावण्याची प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे. 
महत्वाच कारण हे की मेहंदी तणाव कमी करण्यात मदत करते. मेहंदी हे औषध आहे. लग्नाच्या वेळी वातावरण तणावपूर्ण असते, त्यामुळे ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळेच लग्नाला उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच स्त्रिया वधू-वर मेहंदी काढतात. हाताच्या दोन्ही बाजूंना मेहंदी लावल्याने हाताच्या दोन्ही बाजूंना असणारे पिगमेंटेशन नियंत्रित होते. त्यामुळे तणाव नियंत्रित राहतो. पायातही तत्सम पेशी आढळतात. त्यामुळे पायाला मेंदी लावल्याने परिस्थितीही बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. विज्ञानही हे मान्य केलय.
यातला सर्वात चांगला भाग म्हणजे त्याचा वास, सुंदर सागरी रंग आणि मेंदीमुळे मिळणारे आरोग्य फायदे. शिवाय मेहेंदीचा सुगंध बरेच दिवस टिकतो. यामुळे लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रेम वाढण्यास मदत होते. निसर्गाच्या सहकार्यास दादच दिली पाहिजे.
इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता.
हिंदू धर्मात १६ अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. म्हणुनच कदाचित 
मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.

३६) सोयर का पाळतात?
नवीन बाळ घरी आल ते चांगल ना? तरी का सुतका सारखं वागायच. प्रश्न चांगला आहे.

जेव्हा एखादी बाई बाळंत होते तेव्हा तीच आणि बाळाच लक्ष पूर्वक सगळ करणं काम पण घरातल्या बायकांचच असतं. ते त्याच मायेन करू शकतात. कारण त्यांनी ते अनुभवल असतं. पूर्वीच्या काळी बरीच घरची कामं बायकाच करत. कोणती कामं ते सांगायला नको . मग बाळाची काळजी घेणं, स्वच्छता राखणं, जंतु संसर्ग टाळण ही जादाची काम वाढतात. त्या बाईच्या शरीराचा  ऱ्हास झालेला असतो. पाळीच्यागोष्टी (अशुद्ध रक्त बाहेर पडणं वगैरे) तसेच दुखण, जखम भरून येण यावर लक्ष देण महत्वाचं असतं. महिनाभर कमी अधिक रक्तसत्राव होऊ शकतो. ती आनंदी असतेच पण याच दिवसात सकस खाणं, नीट झोपण तीला गरजेच असतं. आपल्या पूर्वजांनी विचार करूनच यावर स्त्रीयांचा विचार करून सोयर पाळायला समाजात मान्यता दिली असणार.

सोयर आहे म्हटल की त्या घरी हात पाय धुवून जाण, बाळ बाळंतिणीच्या सोईन घरात वातावरण राहण गरजेच असतं. नवीन बाळामुळे नवी सोयरीकच निर्माण होते म्हणून सोयर म्हटल गेल असावं. या दिवसात रीतीप्रमाणे देवा धर्माच करणं अशक्य असणार म्हणून पण घरच्या बाईची काळजी यात दिसते. 

याकाळात शेक शेगळी घेणे पोट पट्टा बांधणे अशा गोष्टी अनुभवी बाई माणसांकडून करून घेतल जात होतं. बाळंतीणीच घरदार कामात व्यस्त असतं. 

जन्माला आलेल्या बाळाचा ऊर्जा देह तयार होण सुरू असतं अस ते पहिल्या १०-१२ दिवसात शास्त्रांत ऊल्लेख आढळतो. सोयर पाळताना बाहेरच्या व्यक्ती ला हात पाय धुण का तर तो ऊर्जा देह तयार होत असताना बाहेरच्या कोणत्याही व्यक्ती च्या ऊर्जेचा प्रभाव तयार होत असलेल्या ऊर्जा देहाकडून आकर्षित केला जातो. मग तो चांगला वाईट कोणताही असू शकतो. म्हणून आई बाळ घरीच असण गरजेचं. नामकरण पण १२ व्या दिवसा नंतरच असतं ते याच कारणानं.

ज्या वेळच्या समाजात योग्य ते साध्य करण्यासाठी जे पटेल तस ते समजून केल गेल असावं. कधी ऊर्जा देह योग्य तयार होणं, स्त्रीची कामं कमी होणं किंवा हल्ली infection न होण्यासाठी. काळानुसार बदल असेल.

आताचा विचार करता हेच लाॅजिक लागू होतं. आई दमलेली असते. हल्ली बरेच सिझर असतात त्यांची आणखी काळजी घ्यावी लागते. नसेल जरी रोज पूजा होत तरी त्या काळातली मोठी धार्मिक कार्य सण न करण योग्य. याकाळात बाळ आणि आईकडेच पूर्ण फोकस असण खुप गरजेच. पिढी कोणतीही असो बाळंतीणीच घर गडबडीचच असतं. आता माणस कमी असतात घरच्या पुरूषांना पण मदत करावी लागते. सोयर म्हणजे वृद्धी, वंश वाढणे. महत्वाचं हेच की जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी सोयर पाळले जातं. थोडक्यात बाळ - बाळंतिणीला क्वारंटाईनच ठेवायचं. .
म्हणून सोयर पाळायचं. बाळ झाल्यावर हवे तसे कपडे घालता यावे, शरीर निरोगी राहावं म्हणून जे पूर्वी बायका पाळत ते पाळल्यानं फायदाच होणार.

+++

३७) रांगोळी सांडली कि अपशकुन का मानत होते ?
सर्वात आधी रांगोळी चे महत्व माहित करून घेऊ. मगच ती सांडली कि अपशकुन का समजाला जात होता हे समजणे सोपे जाईल.

रांगोळी काढणे ही हिंदूसंस्कृतीची परंपरा आहे आणि ती समाजात एकतेची भावना वाढवते.
रांगोळी काढताना एकाग्रता आणि शांतता लागतेज्यामुळे मन शांत होतेजी एका स्त्रीमध्ये असते आणि ती एका जागी केंद्रित झाली कि त्या स्त्रीला फायदाच होतो, घरच्या स्त्रीला झाला कि घराला आपोआपच होतो.
रांगोळ्या काढत असताना बायकांना वाकावे लागते. त्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहण्यास मदतच होते. त्यांच्या पोटाचे स्नायू आणि पाठ लवचिक होतात. दारातली रांगोळी घराची स्थिती दर्शवते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भेटायला येणारे लोक रांगोळी पाहूनच घरातील वातावरण समजतात.
रांगोळी काढण्यासाठी लवकर उठावे लागतेघर स्वच्छ करावे लागते त्यामुळे घरात एक प्रकारची शिस्त आपोआपच येतेमुख्य दारासमोर नीट आवरलेले राहते.
या गोष्टीमुळे नकळतपणे कोणत्यातरी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला जातो.
घरात आणि आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरवून वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखल्या जातात. हे घराच्या आरोग्यासाठी लाभदायक असते
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कीटकांना घरात येऊ नये म्हणून त्यांना आवश्यक असलेले अन्न दाराच्या प्रवेशद्वारावर रोखले जाते.
आता मुद्दा हा कि रांगोळी सांडली कि अपशकुन का मानत असावेत? : रांगोळी काढताना स्त्रीला एकाग्रता आणि  शांतता लागते. ती नसेल तर रांगोळी नीट काढली जाणार नाही. ज्या अर्थी ती सांडली या अर्थी घरातील स्त्रीचे मन अस्थिर आहे.रांगोळीतून अवतारणारी सकारात्मक ऊर्जा ती सांडल्याने विखुरली जाते. ती जाऊ नये यासाठी त्या काळच्या समाजमनस जे पटेल ते सांगणे गरजेचे असेल. घरातील स्त्रीची एकत्रित एकाग्रता ऊर्जा विखरू नये यासाठी कदाचित असे सांगितले जात असावे. ज्यामुळे कदाचित त्या काळच्या स्त्रिया मनातील नकारात्मकता झटकून उत्साहानं सकारात्मकतेस सामोऱ्या जात असाव्यात. सावध राहून मनातील मरगळ टाकून उत्साहाने कामाला लागत असाव्यात. घरच्या लक्ष्मीच्या मनाची उभारी राहावी यासाठी असेल अस म्हणायला हरकत नाही. स्त्री मुळातच समृद्धी, शालीनता, शांततेचे प्रतीक आहे. पूर्वजांचा हाच हेतू असावा कि घरची लक्ष्मी मनानं शांत प्रसन्न राहावी/असावी. रांगोळी काढण्यातून येणारी साकारतवमक ऊर्जा घरात राहावी. परंतु त्यामागे रांगोळी नकारात्मक होत नाही, ती सांडली तरी असा कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता ती लगेच पूर्ववत करून एकाग्रतेने शांतमनाने परत काढायची. पूर्वजांनी जर कोणती गोष्ट सांगितली असेल तर त्याला काही ना काही सकारात्मक पैलू असतोच असतो, आपण तो शोधला पाहिजे. आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवला पाहिजे.

त्या काळातील घरातील स्त्रीच्या लक्षमीच्या मनास उभारी देण्याचा हा उपाय असावा असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

+++

३८) गाय पांढरी, तपकिरी, काळी असते पण  म्हैस काळीच का असते?

म्हशींमध्ये, विशेषतः पाण्यातील म्हशींमध्ये, मेलेनिनने समृद्ध असलेल्या जाड बाह्यत्वचे असते, ज्यामुळे त्यांना त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण काळा किंवा गडद राखाडी रंग मिळतो. मेलेनिन अतिनील किरणे शोषून घेते आणि पसरवते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.  म्हशी बहुतेकदा पाण्यात आणि चिखलात किंवा त्याच्या जवळ राहतात, ज्यामुळे त्यांना अतिनील किरणांच्या उच्च पातळीला सामोरे जावे लागू शकते. गडद रंगद्रव्य नैसर्गिक सनस्क्रीन प्रदान करते. दुसरे कारण म्हणजे गायींइतके त्यांचे संकरित प्रजनन (क्रॉस ब्रीडिंग ) होत नाही / केले जात नाही.  काळा रंग ऊष्णता शोषणास मदत करते त्यामुळे म्हशीचे शरीर थंड राहते.

३९) मुंज मुलाचा ऊजवाच अंगठा महत्वाचा का असतो? त्याची पुजा करून सगळे पाणी का पितात?
उजव्या पायाची पूजा करणे हे "पादसेवन"  दर्शवते की जे भक्तीचे एक प्रमुख रूप आहे, ज्यामध्ये भक्त मुक्तीच्या शोधात आपल्या अहंकाराचे समर्पण करतो. विष्णूचा उजवा पाय, विशेषतः अंगठा आणि तळवा, अत्यत शुभ मानला जातो कारण असे मानले जाते की त्यावर पवित्र चिन्हे आहेत. त्यातून दैवी ऊर्जा उत्सर्जित होते आणि ते भक्तासाठी अंतिम आश्रयस्थान आहे. विष्णू पदामध्ये, उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मुळाशी असलेले चिन्ह है एक चक्र आहे, जे भक्तांना दुष्ट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे. विष्णूच्या (आणि कृष्णासारख्या त्याच्या अवतारांच्या) चरणकमलांना सामान्यतः सर्वोच्च आश्रयस्थान मानले जाते, जे भक्ताना भौतिक जगाच्या दुःखांपासून वाचवून मुक्ती देते.

वामन एका तरुण, वि‌द्वान ब्रह्मचारीच्या रुपात, हातात काठी आणि पाण्याचे भांडे घेऊन भिक्षा मागण्यासाठी प्रकट झाला. एका निष्काळजी बालपणातून शिस्तबद्ध अभ्यासू जीवनाकडे होणाऱ्या संक्रमणाचे प्रतीक आहे

हिंदू संस्कृतीत, उपनयन संस्कारहा एक महत्त्वाचा संस्कार आहे, ज्यामध्ये मुलाला ब्रह्मचारी वि‌द्यार्थी जीवनाची दीक्षा दिली जाते आणि गायत्री मंत्राचा जप केला जातो. हा बदल आध्यात्मिक पुनर्जन्म आणि वामन अवताराशी घनिष्ठपणे जोडलेला आहे.

त्या बालकाला वामन अवतार का मानले जाते आणि त्याच्या पायांचे पाणी शुभ का समजले जाते कारण सांसारिक जीवनाचा त्यागः ज्याप्रमाणे वामन (भगवान विष्णूचा अवतार) राजा बलीकडून तिन्ही लोक परत घेण्यासाठी एका तरुण बुद्धिमान ब्राह्मण बह्मचारी (बटू) रुपात अवतरला, त्याचप्रमाणे दीक्षा घेतलेल्या मुलाला संन्यासी मानले जाते तो बालपणीची बेजबाबदारी सोडून ज्ञानपाप्ती आध्यात्मिक शिस्त आणि आत्मसंयमावर लक्ष केंद्रित करण्याचा टप्पा तो स्विकारतो.

पुनर्जन्म दुसरा जन्म म्हणून बटुला मानतात. वामनाप्रमाणेच तो मुलगा आता जीवनाची उच्च तत्त्वे समजण्यास सक्षम मानला जातो.

उजव्या पायाच्या अंगठ्याला पाणी लावल्यानंतर ते शुभ का मानले जाते?

विष्णुपदी संबंध भागवत पुराणानुसार, वामन अवताराच्या वेळी, भगवान विष्णूनी आपल्या डाव्या पायाच्या बोटाने विश्वाचे आवरण भेदले, ज्यामुळे कारणसागराचे पवित्र पाणी आत शिरले, जे त्याच्या पायांना स्पर्शून पवित्र गंगा नदी बनले (विष्णुपदी, "जी विष्णूच्या पायर्यातून वाहते). चरणामृत (चरणांतील अमृत)ः ब्रह्मचारी (वामन अवस्थेत असलेल्या) व्यक्तीच्या चरणांना स्पर्श केलेले पाणी है चरणामृत मानले जाते. असा विश्वास आहे की, ईश्वराच्या चरणांतून साधकाकडे आशीर्वाद देवत्व आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. अहंकाराचे समर्पणः उजव्या पायाला विशेषतः उजव्या पायाच्या अंगठ्‌याला स्पर्श करणे हे स्वतःच्या अहंकाराचे (कनिष्ठ स्वत्वाचे) अध्यात्मीकृत व्यक्तीच्या (ब्रह्मचारी किंवा गुरु) उच्च ऊर्जा ज्ञान आणि आशीर्वादांना समर्पण करण्याचे प्रतीक आहे.
शुद्धता आणि ऊर्जा परिपथः योगामध्ये, शरीराच्या उजव्या बाजूला सकारात्मक ऊर्जा असते उजव्या पायाला स्पर्श केल्याने ऊर्जेचा एक पूर्ण परिपथ तयार होतो. ज्यामुळे पायाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शुभ स्पंदने आणि आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की यामुळे पापाचे क्षालन होते आणि पुण्य प्राप्त होते.
आपल्या संस्कृतीत लहान लहान गोष्टीत कल्याणाची गुपिते दडलेली आहेत.

४०) श्रावणात मंगळागौरी का करायची? 
'मंगल'या शब्दाचा अर्थ शुभ आहे आणि 'गौरी' म्हणजे पार्वती, जी सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. शास्त्रानुसार, देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली. श्रावण महिन्यातील मंगळवार हा पूर्णपणे तिच्या दिव्य स्त्रीशक्तीला समर्पित असतो.

. हा एक मानसिक आरोग्य आणि समवयस्क आधार गट आहे : यामागील तर्क: शतकांपूर्वी, नवविवाहित मुलींना फोन, इंटरनेट किंवा मन मोकळे करण्याचे कोणतेही साधन नसताना पूर्णपणे नवीन घरांमध्ये आणि शहरांमध्ये जावे लागत असे.  मंगलागौरी हे मूळ 'गर्ल्स नाईट आऊट' होते. याने तरुण स्त्रियांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, जाचक सासरच्या लोकांशी सामना करण्याच्या पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर समवयस्क-आधार प्रणाली तयार करण्यासाठी एक सुरक्षित, नि:पक्षपाती जागा निर्माण केली.
. नाईट गेम्स हा एक उच्च-तीव्रता अंतराल व्यायाम (HIIT) आहे  यामागील तर्क: फुगडी, झिम्माआणि भेंड्यायांसारख्या रात्रभर खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांसाठी तीव्र शारीरिक चपळता, मुख्य स्नायूंची सहनशक्ती आणि लयबद्ध श्वासोच्छ्वास आवश्यक असतो.   हा मुळात एका विधीच्या रूपात सादर केलेला एक मजेदार, लयबद्ध एरोबिक्स/HIIT क्लास आहे. यातील शारीरिक श्रमामुळे एंडोर्फिन ("आनंदी संप्रेरके") स्रवतात, हृदयाची सहनशक्ती सुधारते आणि तणाव कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरतो.
. ते शाश्वत संसाधन व्यवस्थापन शिकवते यामागील तर्क: या पूजेमध्ये विशिष्ट स्थानिक वनस्पतींचा वापर अनिवार्य आहेज्यात १६ प्रकारची विशिष्ट पाने, हंगामी फळे आणि गहू तांदूळ यांसारखी घरगुती धान्ये यांचा समावेश होतो: हे लोकांना थेट स्थानिक जैवविविधतेशी जोडते. हे खाद्यपदार्थ गोळा करण्याच्या परंपरांचा आदर करते आणि पावसाळ्याच्या ऐन हंगामात स्थानिक वनस्पती प्रजाती ओळखण्यास, त्यांचे वर्गीकरण करण्यास आणि त्यांचे जतन करण्यास समुदायाला प्रवृत्त करते.

. हेतुपुरस्सर प्रकटीकरणाची शक्ती  यामागील तर्क: शांत बसणे, उपवास करणे आणि जोडीदाराच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने मनाला निःस्वार्थ सहानुभूतीचा सराव होतो.: हा सजगता आणि "प्रकटीकरणाचा" एक सक्रिय सराव आहे. नात्यांकडे व्यक्तिवादी दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, हा विधी मेंदूला सकारात्मक ऊर्जा, प्रेम आणि संरक्षण जाणीवपूर्वक आपल्या जीवनसाथीकडे प्रवाहित करण्यासाठी तयार करतो.

४१) श्रावणात उपासना का करावी? त्याचे महत्त्व काय आहे?

उपासना म्हणजे फक्त देवाकडे काही मागणे नाही; ती स्वतःला pause करून reset करण्याची एक पद्धत आहे.” Mind reset: रोजच्या धावपळीत काही वेळ शांत बसणे, मंत्र म्हणणे किंवा पूजा करणे म्हणजे mindfulness सारखा एक ritual. Focus & discipline: आठवड्यातील ठराविक दिवशी उपासना केल्याने routine आणि self-discipline तयार होते. Gratitude: “मला हे मिळू दे” एवढंच नाही, तर “माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद” अशी भावना निर्माण होते. Connection: कुटुंबासोबत पूजा करण्यामुळे traditions आणि family bonds टिकतात. Values: देवतेच्या रूपातून आपण काही मूल्ये आठवतो—बुद्धी, संयम, ज्ञान, कृतज्ञता, करुणा इ. Digital detox: थोडा वेळ फोन, social media आणि बाहेरच्या noise पासून दूर जाण्याची संधी Inner check-in: “मी काय करतोय? माझ्या priorities काय आहेत? मला कुठे सुधारायचं आहे?” असा स्वतःशी संवाद. मग बुधवार आणि गुरुवार का?  बुधवार: “Pause. Think. Use your बुद्धी wisely.” गणपतीच्या उपासनेतून बुद्धी, विवेक आणि अडथळ्यांवर मात करण्याची आठवण ठेवता येते. गुरुवार: “Pause. Learn. Be grateful. Grow.” गुरुवारची उपासना ज्ञान, गुरु/मार्गदर्शन, कृतज्ञता आणि आध्यात्मिक वाढ यांच्याशी जोडून पाहता येते. आपण पूजा करतो कारण देव घाबरतो म्हणून नाही; आपण स्वतःला आठवण करून देण्यासाठी करतो की life मध्ये फक्त बाहेरची success नाही, तर inner peace, discipline, gratitude आणि good values सुद्धा महत्त्वाचे आहेत.”


४२) श्रावणात दार शुक्रवारी जिवतीची पूजा का करायची?
जिवती पूजा म्हणजे नेमकं काय? आई आपल्या मुलांच्या सुरक्षित आणि निरोगी आयुष्यासाठी केलेली symbolic prayer.” पूर्वीच्या काळात मुलांचे आरोग्य आणि बालमृत्यूचे धोके आजच्या तुलनेत खूप मोठे होते. वैद्यकीय सुविधा, लसीकरण, स्वच्छता, antibiotics यांचा अभाव होता. त्यामुळे आईची मुलांबद्दलची काळजी आणि असहायता एका धार्मिक ritual मधून व्यक्त होत असे. म्हणून जिवती पूजेकडे आपण दोन स्तरांवर पाहू शकतो. श्रद्धा: “देवी माझ्या मुलांचे रक्षण करो.”Practical meaning: “माझ्या मुलांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे.” आज आपण म्हणतो: “Manifestation + mindfulness + family tradition.” जिवती पूजा म्हणजे आईने  आपल्या मुलांसाठी intention ठेवणे. ti positive spandan atyant prabhavi asatat. आजच्या आईकडे मुलाच्या health साठी: vaccination आहे  डॉक्टर आहेत  nutrition आहे safety measures आहेत  education आहे पण तरीही ती मुलासाठी प्रार्थना करते. कारण science आपल्यालाकाय करायचंसांगते; prayer आपल्यालाकशासाठी करतोययाची जाणीव करून देते. आणि “फक्त बायका का करतात? परंपरेत आईला ही जबाबदारी दिली गेली, पण आज तिचा अर्थ “फक्त स्त्रियांनीच करायची पूजा” असा घेण्याची गरज नाही. मुलांच्या wellbeing ची responsibility आई आणि वडील दोघांचीही आहे. म्हणून आजच्या काळात बाबा जिवती पूजा करतात, आईसोबत सहभागी होतात किंवा दोघे मिळून मुलांसाठी prayer करतात — यात परंपरेचा भाव कमी होत नाही; उलट तिचा अर्थ अधिक inclusive होतो.  जिवती पूजा म्हणजे देवीला घाबरून केलेली पूजा नाही. ती आपल्या पूर्वजांनी मुलांबद्दलच्या प्रेमाला आणि काळजीला दिलेली एक सांस्कृतिक expression आहे. पूर्वी मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या हातात आजसारखी medical आणि scientific साधने नव्हती, म्हणून त्यांनी प्रार्थना, उपासना आणि rituals च्या माध्यमातून ती काळजी व्यक्त केली. आज आपल्याकडे science आहे—म्हणून vaccination, nutrition, healthcare आणि safety आपण करायची; आणि जिवती पूजा करायची असेल तर ती आपल्या मुलांसाठी प्रेम, gratitude आणि protection ची prayer म्हणून करायची.” आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट: जिवती पूजा केल्यामुळे मुलाला आजार होणार नाही किंवा काही वाईट घडणार नाही, असा वैज्ञानिक दावा करू नये. पूजा ही श्रद्धा आणि संस्कृतीचा भाग आहे; मुलांचे प्रत्यक्ष संरक्षण करण्यासाठी आरोग्यसेवा आणि सुरक्षिततेच्या उपायांची गरज असते. परंपरा “blind belief” म्हणून नाही, तर “meaningful tradition with a modern interpretation” म्हणून करायची. 

४३) श्रावणातला शनिवार उपासनेत का घेतात?
शनीची भीतीयापेक्षा discipline, responsibility, humility आणि कर्म या ideas शी जोडला तर त्याचा अर्थ खूप सुंदरपणे समजतोश्रावणातील शनिवार का महत्त्वाचाशनिवार म्हणजे भीतीचा दिवस नाही; स्वतःच्या कर्मांकडे प्रामाणिकपणे पाहण्याचा दिवस.” Karma = Accountability :मी जे करतो त्याची जबाबदारी माझी.” शनीची संकल्पना आपल्याला आपल्या actions आणि consequences ची जाणीव करून देते. Discipline over instant gratification आजच्या मला लगेच result पाहिजे संस्कृतीच्या विरुद्ध, शनी आपल्याला सांगतो: Do the work. Be patient. Let results take their time. Humility पैसा, status, power कायमचे नसतात. त्यामुळे यश मिळालं तरी grounded राहा. Respect for people who struggle : शनीशी जोडलेल्या कथांमध्ये दुर्बल, गरीब आणि कष्टकरी लोकांविषयी संवेदनशीलतेचा संदेशही घेता येतो. Hanuman connection = courage + self-control :  शनिवारी मारुतीची उपासना करणाऱ्या परंपरेतून आपण धैर्य, संयम, loyalty आणि inner strength यांचा अर्थ घेऊ शकतोआजच्या जीवनात Saturday Upasana म्हणजे काय? पूजा केली तर उत्तमपण त्यासोबत एक छोटासा “Saturday challenge” ठेवता येईल: एखादं pending काम पूर्ण करणे  कोणाशी केलेलं वचन पाळणे  घरातील/समाजातील एखाद्या व्यक्तीला मदत करणे unnecessary खर्च टाळणे 20 मिनिटे शांत बसणे किंवा self-reflection आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारणे कष्ट करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर दाखवणे म्हणजे पूजा + action = परंपरेचा modern अर्थश्रावण शनिवार आपल्याला शनीची भीती शिकवत नाही; तो आपल्याला शिकवतो की आपल्या कर्मांची जबाबदारी घ्या, discipline ठेवा, ego कमी करा आणि कठीण काळातही योग्य मार्ग सोडू नका. आणि इथेही एक महत्त्वाची distinction: पूजा केल्याने वाईट घटना निश्चितपणे टळतात किंवा शनीदंडदेतो, असा वैज्ञानिक दावा नाही. ही धार्मिक-सांस्कृतिक श्रद्धा आहे. तिच्यातला self-discipline, accountability आणि humility हा संदेश आजच्या पिढीसाठी स्वतंत्रपणेही खूप relevant आहे.
४४) श्रावण महिन्यात कहाण्या का वाचायच्या? त्याचा जेन झेड ला काय फायदा?
श्रावण महिन्यात कहाण्या वाचण्याची परंपरा केवळ धार्मिक नसून, त्यामागे मानसिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. आजच्या तरुण पिढी साठी या जुन्या कथा कशा फायदेशीर ठरू शकतात, याचे सोप्या भाषेत विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:
मानसिक शांतता: श्रावणात पावसाळ्यामुळे बाहेरचे वातावरण ढगाळ असते, ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. कहाण्या वाचल्याने मन एकाग्र होते आणि सकारात्मकता वाढते.
नियम आणि शिस्त: पूर्वीच्या काळी श्रावणात विशिष्ट व्रेत-वैकल्ये केली जायची. यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि जीवनात शिस्त राहण्यास मदत व्हायची.
संस्कृतीचे जतन: पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान, रीतीरिवाज आणि नैतिक मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे.
कहाण्या वाचण्यामागे काय 'Logic' आहे? : मानवी मेंदूला कोरड्या उपदेशांपेक्षा गोष्टींच्या स्वरूपात सांगितलेल्या गोष्टी लवकर समजतात आणि लक्षात राहतात.
निसर्गाशी जवळीक: श्रावणातील कहाण्यांमध्ये झाडे, प्राणी, नद्या आणि निसर्गाची पूजा करायला सांगितली आहे. हे मानवाला निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठीचे प्राचीन पर्यावरणशास्त्र (Ecology) आहे.
आरोग्य आणि आहारशास्त्र: या काळात पचनशक्ती कमकुवत असते. कहाण्यांच्या माध्यमातून उपवास करण्याचे आणि हलका आहार घेण्याचे नियम सांगून आरोग्याची काळजी घेतली गेली आहे.

जुन्या कथा वाचून तरुण पिढीला  काय फायदा?
डिजिटल डिटॉक्स (Digital Detox): स्क्रीन टाईम कमी करून काही वेळ पुस्तकात मन रमवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
भावनांवर नियंत्रण (Emotional Intelligence): या कथांमध्ये सुख-दुःख, त्याग, आणि कठीण प्रसंगात संयम कसा ठेवावा हे शिकवले जाते. यामुळे आजच्या पिढीला मानसिक कणखरता मिळते.
मूळ संस्कृतीशी जोडणी (Root Connection): जागतिकीकरणाच्या काळात स्वतःची ओळख आणि सांस्कृतिक पाळेमुळे (Roots) घट्ट ठेवण्यास मदत होते.
भाषा सुधारते: मराठी भाषेतील जुने शब्द, म्हणी आणि शुद्ध उच्चार शिकायला मिळतात, ज्यामुळे संवाद कौशल्य (Communication Skills) सुधारते.
सर्जनशीलता (Creativity): काल्पनिक आणि बोधप्रद कथा वाचल्याने विचार करण्याची क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढते.
निसर्गाशी जवळीकपर्यावरण भान: श्रावणातील बहुतांश कहाण्या झाडेप्राणीनद्या आणि निसर्गाची पूजा करायला शिकवतातयामुळेइकोफ्रेंडली  जीवनशैलीची प्रेरणा मिळतेथोडक्यात सांगायचे तरया कहाण्या म्हणजे जुनाट विचार नसूनआधुनिक आयुष्यात 'Mental Peace' आणि 'Life Lessons' देणारे सोपे मार्ग आहेत. 

थोडक्यात सांगायचे तर, श्रावणातील कहाण्या म्हणजे केवळ जुन्या चालीरीती नसून, तो 'जीवन जगण्याचा सोपा मार्ग' (Art of Living) आहे, जो आजच्या आधुनिक पिढीलाही तितकाच लागू पडतो.
श्रावण महिन्यात कहाण्या वाचण्याची परंपरा केवळ धार्मिक नाही, तर त्यामागे मानसिक आणि सामाजिक कारणेही आहेत. आजच्या 'Gen Z' (नव्या पिढीला) या जुन्या कथांमधून अनेक आधुनिक फायदे मिळू शकतात.
श्रावण महिन्यात कहाण्या का वाचायच्या? मानसिक शांतता: पावसाळ्यातील निसर्गासोबत मन शांत ठेवण्यास मदत होते. संस्कृतीचे जतन: पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. एकत्र येण्याची संधी: पूर्वी एकत्र बसून कहाण्या ऐकल्याने कौटुंबिक बंध घट्ट व्हायचे. सकारात्मक ऊर्जा: या कथांमधील व्रतवैकल्ये संयम आणि सकारात्मकता शिकवतात.

४५) शिवामूठ का वाहावी? लॉजिक काय ?
श्रावणी सोमवार हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भाविक कडक उपवास करतात आणि महादेवाला 'शिवमूठ' (विविध प्रकारची धान्ये) अर्पण करतात.
शिवामूठ वाहण्यामागचे महत्त्व आणि कारणे:
कृषी संस्कृतीशी जोडलेली परंपरा: श्रावण महिना हा पावसाचा आणि नवीन पीक येण्याचा काळ असतो. नवीन धान्याची पहिली मूठ देवा चरणी अर्पण करून "घरात धनधान्याची समृद्धी आणि पिकांची भरभराट होऊ दे", अशी प्रार्थना शेतकरी कुटुंबातील महिला करतात
दानधर्माची
भावना: शिवलिंगावर वाहिलेले धान्य नंतर गोळा करून गरजूंना किंवा पशू-पक्षांना खाऊ घातले जाते. यामुळे समाजात दानशूरता आणि परोपकाराची भावना वाढीस लागते.
why wasting the grains? असा विचार काहींना येतो.  ते धान्य वाया जात नाही, 'दान' केले जाते मंदिरात पिंडीवर वाहिलेले धान्य पुजारी गोळा करतात. त्यांचा उदरनिर्वाह यावरच  चालतो. पूर्वीची  पद्धत  होती जर तुम्ही घरी पूजा करत असाल, तर वाहिलेली शिवामूठ बाजूला काढून ठेवू  शकतो  कि.हे सर्व जमा झालेले धान्य अनाथालयांत, आश्रमांत किंवा गरजू लोकांना खाण्यासाठी दिले जाऊ शकते कि  मुठमुठ करून जमा झालेले धान्य एकत्र आल्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नाची गरज भागवते. यात एकाग्रता, देण्याचीसवय जास्तीत जास्त परमेश्वराचा  सहवास हा हा शुद्ध हेतू  असावा. आपुलकी आपल्यातील प्रेम वाढण्याचे हेच बीज असते. हल्ली  हे प्रश्न पडतात जोडीदारांनी सहकार्य ? पूर्वी असे पडत नसावेत कारण आपल्यासाठी नियमाने मनोभावे कोणी काही करतय. हे दिसलं समजलं कि प्रेम वाढणारच. तसेच या परमेश्वरी तत्वाची पण ओळख होतेच ना.

दानाचा संस्कार: "आपल्याकडे जे आहे, त्यातील थोडा भाग समाजाला देणे" हा त्याग आणि दानाचा गुण लहानपणापासून अंगी बाणावा, हा यामागचा हेतू आहेऋतू आणि पिकांची ओळख: श्रावण हा पावसाळ्याचा आणि नवीन पिकांच्या वाढीचा काळ असतो. धान्यांचे वर्गीकरण: दर सोमवारी वेगळे धान्य वाहून (उदा. तांदूळ, तीळ, मूग, जवस/जव) निसर्गात मिळणाऱ्या विविध पोषणमूल्यांची मानवाला जाणीव करून दिली जाते.

आरोग्याचे महत्त्व: या ऋतूत पचनक्रिया मंद होते. त्यामुळे हलके आणि पौष्टिक धान्य (जसे की मूग, तीळ) आहारात वापरण्याचा संदेश यातून मिळतो.शिवामूठ वाहणे म्हणजे अन्न कचऱ्यात फेकणे नव्हे, तर "निसर्गाने आपल्याला जे दिले, ते देवाचे नाव घेऊन गरिबांपर्यंत पोहोचवणे" ही एक सुंदर व्यवस्था आहे. आपण ही शिवामूठ वाहून ते धान्य कचऱ्यात जाता गरजूच्या पात्रात जाईल याची काळजी नक्की घेऊ शकतोशिवपूजेचे विशेष धार्मिक महत्त्व मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत मिळते. आरोग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण लाभते. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना अत्यंत फलदायी मानला जातो. श्रावणात भगवान शिवांना काय अर्पण करावे? शुद्ध जल आणि गंगाजल बेलपत्र दूध, दही, मध, तूप आणि साखर (पंचामृत) धतूरा आणि आकाची फुले (परंपरेनुसारपांढरी फुलेभस्म आणि चंदन 


श्रावणी सोमवार: हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो कारण : 
निसर्गाची अनुभूती: श्रावणात येणारा पाऊस आणि हिरवळ मनाला शांतता देतात, जी शिवउपासनेसाठी आणि ध्यानासाठी उत्तम अनुकूल वातावरण तयार करते
चंद्राचा
प्रभाव: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार हा मनाचा कारक असलेल्या चंद्रदेवाचा दिवस आहे आणि शिव हा 'सोमनाथ' आहे.
भगवान शिव... ज्यांचा उल्लेख जरी झाला तरी मन:शांती मिळते, त्यांचे नामस्मरण केल्यास अवघे जीवन मंगलमय होते.. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा दिवस चंद्रदेवाशी (सोम) संबंधित मानला जातो. पुराणानुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतींच्या शापामुळे तेज कमी होऊ लागले. त्या वेळी चंद्रदेवाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवांनी चंद्राला आपल्या जटांवर स्थान दिले. त्यामुळे शिवांना 'चंद्रशेखर' हे नाव प्राप्त झाले आणि सोमवार हा दिवस शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जाऊ लागला. याशिवाय 'सोम' या शब्दाचा अर्थ शांती, शीतलता आणि अमृत असाही होतो. शिव हे शांत, करुणामय आणि कल्याणकारी देव असल्याने सोमवारचा दिवस त्यांच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. सोमवार हा दिवस चंद्रदेवाशी असलेल्या त्यांच्या विशेष संबंधामुळे आणि धार्मिक परंपरेमुळे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. श्रद्धेने आणि भक्तीभावाने केलेली शिवपूजा मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते.


४६) अनुराधा नक्षत्राला गौरी आव्हाहन का असते? या नक्षत्राचा आणि गौरी उर्फ ​​महालक्ष्मी आवाहन यांचा कोणताही विशिष्ट संबंध का? अनुराधा नक्षत्रातच गौरी आवाहन का?

अनुराधा नक्षत्र : हे वैदिक ज्योतिषातील १७वे नक्षत्र आहे. याचा संबंध मैत्री, भक्ती, शिस्त, समर्पण आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्याची क्षमता यांच्याशी जोडला जातो. राशी: वृश्चिक  स्वामी ग्रह: शनि  देवता: मित्र देवमैत्री आणि सहकार्याचे प्रतीक  नक्षत्राचे चिन्ह: कमळ  मुख्य गुण: संयम, निष्ठा, मेहनत, आध्यात्मिकता आणि मैत्रीभाव  स्वभाव: अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती सामान्यतः लोकांशी चांगले संबंध निर्माण करणाऱ्या, विश्वासू आणि ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मानल्या जातात.  आध्यात्मिक अर्थ: अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि शिस्तीने पुढे जाण्याची शक्ती. आव्हाने: कधी कधी अतिसंवेदनशीलता, भावनिक ताण, संशय किंवा मनातील गोष्टी स्वतःपुरत्या ठेवण्याची प्रवृत्ती दिसू शकते.  विशेष अर्थ: अनुराधा म्हणजे अनुसरण करणारी/राधेच्या जवळ जाणारी असा अर्थही घेतला जातो. त्यामुळे भक्ती, प्रेम, समर्पण आणि एखाद्या ध्येयाशी निष्ठा हे या नक्षत्राचे महत्त्वाचे पैलू मानले जातात.
अनुराधा नक्षत्र आणि ज्येष्ठा गौरी/महालक्ष्मी आवाहन यांचा खूप विशिष्ट संबंध आहे. हा केवळ योगायोग नाही. मात्र हा संबंध समजून घेताना गौरीही महाराष्ट्रातील परंपरेनुसार महालक्ष्मी/शक्तीच्या रूपात पूजली जाते, हे लक्षात घ्यावे. ज्येष्ठा गौरी उत्सव हा साधारणपणे भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्राशी जोडलेला नक्षत्रप्रधान उत्सव आहे. काही परंपरांमध्ये अनुराधा नक्षत्राच्या दिवशी गौरीचे आवाहन, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी मुख्य पूजन, आणि पुढे विसर्जन असा क्रम आढळतो.  म्हणजेच अनुराधागौरीचे आगमन/आवाहन, ज्येष्ठागौरीचे मुख्य पूजन यामुळेच याला ज्येष्ठा गौरी असे नाव मिळाले असे समजले जाते. मग अनुराधा आणि महालक्ष्मीमध्ये काय कनेक्शन? इथे एक सुंदर प्रतीकात्मक संबंध दिसतो. अनुराधा नक्षत्राची देवतामित्र आहे. “मित्रम्हणजे मैत्री, संबंध, एकत्र येणे, बंध आणि सौहार्द. अनुराधेचा एक अर्थ राधेचे अनुसरण करणारी असाही दिला जातो. ज्योतिषपरंपरेत अनुराधेला समृद्धी देणाऱ्या शक्तीशीही जोडले जाते.  आणि गौरी-महालक्ष्मीचे आवाहन म्हणजे काय? देवी, आमच्या घरात ये, वास्तव्य कर, कुटुंबात सौख्य, समृद्धी आणि मंगलता आण.” म्हणून घरात देवीचे स्वागत आणि अनुराधेचीबंधन/संबंध/समृद्धीदर्शवणारी प्रतीकात्मकता यांच्यात सुंदर साम्य दिसते. पण एक महत्त्वाची गोष्ट: शास्त्रीय ग्रंथांमध्येअनुराधेची अधिष्ठात्री देवता महालक्ष्मी आहेअसे थेट सांगणारा संबंध नाही. अनुराधेची देवता मित्र आहे. गौरी-महालक्ष्मीचा अनुराधेशी संबंध हा मुख्यतः ज्येष्ठा गौरी उत्सवाच्या कालपरंपरेतून येतो.
ज्येष्ठाआणिकनिष्ठागौरीचा आणखी रोचक अर्थ : काही परंपरांमध्ये दोन गौरी असतातज्येष्ठा आणि कनिष्ठा. उपलब्ध परंपरागत वर्णनांनुसार काही ग्रंथपरंपरांमध्ये ज्येष्ठेला अलक्ष्मी आणि कनिष्ठेला लक्ष्मी मानून प्रथम ज्येष्ठेचे आणि नंतर कनिष्ठेचे पूजन केले जाते. यामागे अशुभ/दारिद्र्य दूर करून लक्ष्मीचे, म्हणजे समृद्धीचे, स्वागत असा प्रतीकात्मक अर्थ लावला जातो. म्हणून हा उत्सव फक्तगौरी म्हणजे पार्वतीएवढाच सरळ विषय नाही. महाराष्ट्रातील विविध घराण्यांत गौरी = महालक्ष्मी, पार्वती, गणेशाची बहीण किंवा घरची कुलपरंपरागत देवी अशा वेगवेगळ्या रूपांत परंपरा आढळतात. तर थोडक्यात: अनुराधा हे गौरीचेआवाहनकरण्याचे नक्षत्र आहे; ज्येष्ठा नक्षत्राशी मुख्य गौरीपूजेचा संबंध आहे आणि महालक्ष्मीशी जोडलेला अर्थ म्हणजे घरात देवीचे आगमन, सौभाग्य, ऐश्वर्य, धान्य-संपन्नता आणि स्थैर्य यांचे स्वागत.

अनुराधाज्येष्ठाकनिष्ठामहालक्ष्मीही संपूर्ण पौराणिक कथा आणि प्रतिकवाद खूप सुंदर  त्यात अलक्ष्मीला आधी का पूजतात? हा खूप रोचक भाग आहे. हा विषय खरंच सुंदर आहेआणि ज्येष्ठा गौरीच्या परंपरेतअनुराधाज्येष्ठालक्ष्मी/समृद्धीअसा एक प्रतीकात्मक प्रवास दिसतो. मात्र वेगवेगळ्या महाराष्ट्रातील घराण्यांच्या परंपरांमध्ये कथा आणि पूजा-विधी थोडे बदलतात.
अनुराधा देवीला घरात आणण्याचा दिवस अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे. “मित्रम्हणजे संबंध, मैत्री, जोडणी आणि सौहार्द. म्हणून अनुराधेच्या दिवशी गौरीचे आवाहन म्हणजे देवीला आपल्या घरात येण्याचे निमंत्रण असे प्रतीकात्मकपणे पाहता येते. ही केवळ मूर्ती आणणे नसून: “हे देवी, आमच्या घरात ये, येथे वास्तव्य कर आणि घराला मंगलता दे.” असा भाव असतो.

मगज्येष्ठागौरी का? इथे एक सुंदर भाषिक आणि धार्मिक संबंध आहे. ज्येष्ठा नक्षत्र आणि ज्येष्ठा गौरी यांचा थेट उत्सवी संबंध आहे. अनुराधेनंतर ज्येष्ठा नक्षत्र येते. म्हणून पारंपरिक क्रम असा समजला जातो : अनुराधा नक्षत्रगौरी आवाहन ज्येष्ठा नक्षत्रज्येष्ठा गौरी पूजन यामुळेचज्येष्ठा गौरीहे नाव आणि ज्येष्ठा नक्षत्र यांचा संबंध महत्त्वाचा आहे.

अलक्ष्मीम्हणजे केवळ एखादी वाईट देवी असा साधा अर्थ घेऊ नये. ती प्रतीकात्मकपणे दर्शवते. दारिद्र्य  कलह  अस्वच्छता  दुःख  असमाधान  घरातील अशांती . तर लक्ष्मी दर्शवते: धन  धान्य  सौभाग्य  आरोग्य समाधान  घरातील समृद्धी. म्हणून काही परंपरांमध्ये आधी ज्येष्ठा/अलक्ष्मीचे पूजन करून तिचा निरोप, आणि नंतर लक्ष्मीचे स्वागत असा प्रतीकात्मक अर्थ लावला जातो. याचा संदेश खूप सुंदर आहे: घरात समृद्धी यावी असे वाटत असेल तर आधी घरातील कलह, अस्वच्छता, दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर करावी.

गौरी = महालक्ष्मी हा संबंध कुठे येतो? महाराष्ट्रातील काही परंपरांमध्ये गौरीला स्पष्टपणे महालक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे गौरी आवाहनाचा भाव असा होतो: देवी लक्ष्मीस्वरूपाने आमच्या घरी ये.” आणि म्हणूनच गौरीच्या समोर अनेक ठिकाणी धान्य, फळे, सोन्या-चांदीचे दागिने, वस्त्र आणि घरातील संपत्तीचे प्रतीक ठेवले जाते. याचा अर्थ फक्त पैसा नाही. घर पूर्ण असावे, अन्नधान्य भरपूर असावे, नाती टिकावीत, स्त्रियांचे सौभाग्य राहावे आणि घरात समाधान असावेही व्यापक समृद्धी आहे.

अनुराधेचा इथे एक सूक्ष्म अर्थ : 
अनुराधा = संबंध टिकवणे
गौरी
= घरात येणारी देवी
ज्येष्ठा
= जुने/अशुभ दूर करण्याचा संक्रमणबिंदू
लक्ष्मी
= समृद्धीचे आगमन
म्हणजे एक प्रकारचा आध्यात्मिक क्रम: संबंधदेवीचे आगमनशुद्धीकरणसमृद्धी आणि अनुराधेची देवता मित्र असल्यामुळे  घरातील नाती, एकता आणि सौहार्दहा भाव गौरी उत्सवाशी खूप सुंदरपणे जुळतो.

प्रथम घरातील नकारात्मकता आणि कलहाला निरोप, आणि त्यानंतर लक्ष्मीस्वरूप गौरीच्या रूपाने मंगलता, सौख्य आणि समृद्धीचे स्वागत आणि म्हणूनच गौरी आवाहनाच्या दिवशी घर सजवणे, देवीला माहेरवाशीण मानणे आणि तिचे प्रेमाने स्वागत करणे याला इतके महत्त्व आहे.
एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी ज्येष्ठा = अलक्ष्मीआणिगौरी = महालक्ष्मीहे सर्व महाराष्ट्रातील परंपरांत एकसारखे मानले जात नाही. काही घरांत गौरी पूर्णपणे पार्वतीस्वरूप मानली जाते. 

अनुराधाज्येष्ठामूळ हा क्रम? हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. तीन दिवसांची रचना स्वतःच खूप जुनी नक्षत्राधारित धार्मिक पद्धत असल्याचे दिसते: अनुराधादेवीचे आगमन ज्येष्ठादेवीचे पूजन मूळदेवीचे विसर्जन. महाराष्ट्र विश्वकोशात हीच परंपरा नोंदलेली आहे. आणि ही पद्धत आजचीच आहे असेही नाही—१९४८ च्या पंचांग नोंदीतही अनुराधा नक्षत्राशी गौरी आवाहन, त्यानंतर ज्येष्ठा गौरी पूजा आणि पुढे विसर्जन याच क्रमाने दिलेले दिसते. म्हणजे किमान विसाव्या शतकाच्या मध्यापूर्वी तरी ही नक्षत्राधारित पद्धत प्रचलित होती, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.






Tuesday, 11 February 2025

बाबा


"बाबा"

क्षण
( ११ मे २०१२ सकाळी ७ वा. घटना स्थळ हॉस्पीटल, ती वय ३३वर्ष आणि आई ५६ वर्ष)
हॉस्पीटलच्या दारासमोर रीक्षा थांबली. मी लगबगीने पाकिटातुन पैसे दिले. उरलेले परत घ्यायचही न पाहता धाव ठोकली ती जीन्याकडे. तीन मजले जीव धडधडत असतानाही चार चार पायऱ्या झपाझप चढत होते. म्हणून इतर लोकच बाजुला सरकत वाट आपल्या जीवाची काळजीनी देत होते कदाचित. कधी खांदयावरची पर्स सावरत तर कधी खांदयावरची ओढणी सावरत मी विचाराच्या वेगासारखीच धावतच तिसरा मजला गाठत ब्रेक लागल्यासारगी धापा टाकत पोचले.
अतिदक्षता विभागा बाहेर आई जीन्यावर पाय जमतील तीतके जवळ घेत तोंडाला खांदयावरचा पदर लावुन बसवी होती. मी थबकताच तीनं वर पाहिलं आणि जोरात हुंदका देत दाराकडे बोट दाखवलं. इतक्यात दार उघडले माझा हात आपसुकच छातीवर गेला. आई ताडकन उठुन उभी राहिती आपल्या माणसासाठी तुटणारा जीव, असहाय्यता, काहुर भिरभिरणारे मन सगळं सगळं तरळत होतं तीच्या चेहऱ्यावर. माझा चेहरा घामाने डबडबला, दोन्ही हात एकमेकांत वर खाली होऊ लागले. ती नर्स दूसरीकडे निघुन गेली. मी जीन्याच्या बारला धरलेल सोडलं आणि अतिदक्षता विभागाच दार उघडून आत डोकावलं. आई सरळ खाली बसली तीन तोंड दोन्ही पायात खुपसलं होतं हे मी बघितलं.
मी आत गेले. सर्वत्र शांतता. एक लहानसा टपटप आवाज तर मधेच स्ट्रेचर हलवल्याची करकर. बाबांच्या पलंगाजवळ मी पोचले. हिरवा कपडा छातीपर्यंत पांघरला होता. (शांत मुद्रा गार शरीर) मी हाताला हात लावला तो बर्फासारखा थंडगार होता. नकळून टपाटप अश्रू माझ्या हातावरून त्यांच्या हातावर पडू लागते. नर्स आत आली तीनं ईसीजी मशिनकडे बोट दाखवतं. हलकेच डोळे बंद करत पाठ थोपटतली, सलाईनच काहीतरी केलं आणि मागच्या टेबलजवळ बसली. इतक्यात काहीतरी कुई कुई  आवाज आला. माझ्या हृद‌याची धडधड वाढली आणि ईसीजी मशिनवर बाबांची कमी होताना दिसु लागली. माझा हात बाबांच्या छातीवर डोक्यावर झरझर फिरू लागला. देवाचा जप आपोआप मी पुटपुटु लागते. नर्स धावत आली. तीन त्या मशिनवर चे आकडे पाहिले सलाइनच बटण बंद केले. माझी बाबांचा हात चोळण्याची गडबड चालूच होती. तीन मला थांबवलं, मी थबकले, असहाय्य केविलवाण्या नजरेन मी तीच्याकड़े बघितलं. तीनं डोळे खाली करून नकारार्थी मान डोलावतली. निर्जीवपणे पटापट ती मशिन बंद करू लागती. मला मोठा हुंदका आला गपकन खाली खुर्चीत बसले. दोन्ही हातांनी मी माझा चेहरा झाकला ढसाढसा रडू लागले. नर्सनी बाबांचे होन्ही हात पण त्या हिरव्या पांघरुणात घातले तशी मी सावरले, झपकन तीन बाबांचा चेहरा झाकण्या आधी दोन्ही हातांनी त्यांचा चेहरा कुरवाळला, तीनं मला थोपटलं बाजुला केलं आणि त्यांनी हिरव्या पांधरुणात स्वतःला झाकुन घेतलं. बाहेर धाव घेतली.
मी धडपडत अडखळत अतिदक्षता विभागाबाहेर धाव घेतली.
गौरी
११ जुन २०१२

++++++++

आदरणीय ताईस मनापासून नमस्कार मागच्या आठवड्यात बाबांच कळलं मन सुन्न झाल. प्रत्येकाच्या आयुष्यात बाबा या व्यक्तिचं एक वेगळच स्थान असतं. ती जागा भरून काढणं खुपच कमींना जमत. आयुष्यातली जवळ जवळ २२-३३ वर्ष जे आपले आधार, हक्क, आणि बरच काही असणारे आता पुन्हा दिसणार नाहीत हे पचवण फारच जड असतं. मी यातून नुकतीच गेल्यामुळे समोर येवून तुला भेटणं मला शक्यच नाही.
माझे बाबा गेले त्याच्या आधी मी एक दोन जवळचे नातेवाइक गेले त्यांच्या आप्तांना भेटायला गेले होते. मला त्याच्याविषयी प्रेम आपुलकी आत्मियता होती. त्याची त्यांनाही जाणीव होती, कोणाकडू‌नही सहाज म्हटल जाइत तेच मी पण मृणाले होते. "काळजी घे, तुझे दुःख मी समजू शकते. सावर स्वतःला " वगैरे. पण तीन वर्षापूर्वी बाबा गेले तेव्हा मला लोक भेटायला आले तेव्हा वाटलं की अरे नाही माझ्या जगातली पोकळ जागा, ते दु:ख नाही समजू शकत हे सर्व जण. ज्यांनी ते अनुभवलय पेललय तेच समजू शकतीत. हे सर्वजण सांगत आहेत तितक सोप नाहीये हे सत्य स्विकारणं. ते गेले नाहीत. ते प्रसन्न आनंदी आणि Positive energy च्या नावान माझ्या बरोबर आहेत. शरीरानं नसले तरी आर्शिवादाच्या रूपानं माझ्या आजू बाजूसच आहेत. हे मला कसं लिहाव वाटलं माहितीय ताई? तुझी "Still alive post" वाचून. फेसबुकवरची पोस्ट वाचल्यावर एवढं सगळं comment मधे देणे शक्यच नव्हतं पण भावना पोचणं गरजेच होतं आणि सहज पेन उचललं गेल.
त्यामुळे ज्यांचे बाबा गेले अस समजत ना ताई तेव्हा काहूर माजतं मनात. कोणतीही व्यक्ती असो तडक जावून घट्ट मिठी मारावी वाटते. पण ते सहज शक्य नसतं. एखादी व्यक्ति शेवटची घटका मोजतानाचा साक्षिदार होणं फार अवघड आहे. माझ्या समोर एक-एक श्वास माझ्या बाबांचा कमी होत होत शून्य होताना मी पाहिलाय अनुभवताय....
तो जगात कोणाच्याच वाट्याला येवू नये असं वाटतं. गेलेल्या प्रत्येक बाबांच्या मूलीत मला मीच दिसते. काही तासानी मन शांत होतं. जगरहाटी चालू होते. पण मनातत मनातच राहतं. आज मात्र मी मन पानावर उतरवलय खरं, पण वाचताना एखाद्याला काय वाटेल कोण जाणे.
So ताई बाबा "Still alive with positive energy" असच म्हणेन मी. माझ्या शब्दांमुळे जर मन दुखावलं असेत तर क्षमस्व. तू आमचा आदर्श, कणा आहेस अशीच माझ्या /आमच्या पाठीशी रहा.
नमस्कार
गौरी 
३१.०७.२०१५
++++
आदरणीय बाबांना जिथे कुठे असाल तिकडे सा.न.वि.वि. पत्रास कारण तसच आहे काल तुमची तिची झाल्यापासून तुमची खूप आठवण येत आहे. त्यात सध्या एक पुस्तक वाचतेय, प्रत्येक भागात तुमची जागा शोधली जात होती. मृत्यु नंतरचा प्रवास हा कधीही चर्चा सुद्धा न केलेला विषय, जड देह सूक्ष्म देह सिल्वहर कॉर्ड हे नवीन शब्द समजले. तुमच्या अनुभवलेल्या विश्वाची कल्पनाच करू लागले.
जड देह म्हणजे शरीर आणि प्राण म्हणजे सूक्ष्म देह आत्मा. सूक्ष्म देह जड देह सोडताना सिल्वर कॉर्ड मार्फत बाहेर पडतो, तो पूर्णपणे विलग होईतोवर माणूस जीवंत असतो. तुमचा शेवटचा सहवास आणि हा भाग झर्रकन डोळ्यासमोरून गेला. या स्थितीत असताना त्या माणसाला बोलता आल नाही तरी आजुबाजुच समजत अस म्हणतात. म्हणजे मी त्या क्षणी म्हटलेली स्तोत्र, तुमच्याशी बोललेली वाक्य तुम्हालाण समजती असतील. तुमच्या अंगावरून फिरलेले हात, मायेचा स्पर्श, गायू पोथी वाचतेय बाबा तुम्हाला काही होणार नाही हे सगळ सगळ मी म्हटलेलं कळल असेल ना बाबा? त्यावेळी आम्ही कमनशिबीच होतो म्हणा हव तर तुम्ही आम्हाला समजून घेत होतात. पण मी तुम्ही झोपलेले जागे का नाही होत आहात? याचाच विचार करत हलवत होते.
जड देह सोडून जाताना दिव्य आत्मे मदत करतात. तुम्हाला नक्कीच महाराजांनी सहज सोडवत असणार अपार श्रद्धा भूक्ती तुमची त्यांच्या ठायी होतीचा ती कामी आली असणारच! सूक्ष्म देहाला जड देह असे पर्यंत समजत नाही. तो बावचळतो गोंधळतो जड देहाला शोधतो. म्हणून लगेचच अंत्यसंस्कार करतात. गायू, लीना येईपर्यंत तुमवा सूक्ष्म आत्मा आमच्या भोवती आपल्या घरात असणार, नाही नाही होताच. याची कल्पना पुस्तक वाचल्यावर आली. तुमची सग‌ळी प्रिय माणस पाहून तुम्हाला आनंदच झाला असणार. बाबा तुमची पेंडसे कंपनी पण सगळी होती बरका तेव्हा. तुमचा त्यांच्यावर भारीच जीव माहितीय मग.. कोणताही कार्यक्रम झाला आणि तेव्हा तुम्ही नसला की तुम्ही विचारत माझ्या बद्दत काय म्हटला ग तो हा ती ही... पण त्यावेळी तुम्हाला सगळे दिसत असतील आणि तुम्हीच आमच्यात नव्हतात.
अंत्यसंस्कार झाल्यावर आत्मा प्राण पंचमहाभूतांत विलीन होण्या मार्गक्रमण करतो. पंधरा दिवस तो या भूतलावर फिरतो आणि आपल्या आप्तेष्टांना दहाव्या दिवशी कावळ्याच्या रूपात भेटतो. आत्ता पर्यंत नुसता खोकला आला की आम्ही तुम्हाला शोधायचो आणि दहाव्याला दहा कोवळ्यात तुम्ही कोणते? आम्ही ओळखु शकत नव्हतो. आईवर फार जीव होता तुमचा ती एकटी कशी राहिल? याचा विचार होता ना? म्हणून काही क्षण थांबलात ना तेव्हा ? खर सांगा. अहो पण ती आख्ख्या गल्लीला सांभाळेल अशा गट्सची आहे हे विसरतात का? तुमच्यासाठी भरपूर दानधर्म आणि तुमचा पुढचा प्रवास सुखकर होवो यासाठी आईन पण सगळ करायच ठरवलं होत आणि
केलं सुद्धा.
पंच‌महाभूतात विलीन होण्यापूर्वी चुका सुख दु:ख असे बरेच हिशेब दयावे लागतात. स्वर्ग किंवा नर्क यात चार पाच पायऱ्या आधी आहेत. कर्म- कर्म चांगलं असलं की वजन वाढत ते 'चांगल' पारड्याचं. ती व्यक्ती स्वर्गाच्या आधीच्या लोकात प्रवेश करते. तिकडे फकत प्रेम, आदर, आनंद याच भावना असतात. वाइट विचार शिवतच नाहीत. द्वेश, राग, सूड बुद्धी, याच्या पलिकडे जातो माणूस असा हा लोक. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही तिकडेच गेले असणार. आयुष्यभर चांगलं वागलात, कोणाला दुखावली नाही ना? याचाच विचार करत जगलात. कोणीही चुकला तरी माफ करत गेलात. तो वाईट वागला तरी आपण चांगलच वागायचं गौरी, सुडबुद्धी चांगली नाही अस म्हणणारा माणूस याच लोकात शोभून दिसतो.
सूक्ष्म देहाच्या अस्तित्वाची जाणीव संवेदना आभास कावळ्यालाच होते. ती जाणीव इतरांपेक्षा या  पक्ष्याला तीव्रतेने जाणवते. म्हणूनच सूक्ष्म देह कावळ्याच्या रूपात दहाव्या दिवशी दर्शन देतात. आपली इच्छा पूर्ण झाली की पिंडाला शिवतात. त्याच बरोबर माणूस मरण पावणार ही वेळ जवळ आली की, जवळ कावळे ओरडतानाचे पण अनुभव आहेत. तसेच वर्षात सूक्ष्म देह मार्गस्थ होण्यापूर्वी तो कावळ्याच्या रुपात फिरू शकतो. साधारण तुमचे वर्ष श्रादध झाल्यावर किंवा आधी श्राद्ध पक्षात तुमची तिथी करतानाचा माझा अनुभव साधारण असाच आहे. सर्वपित्रीला स्वयंपाक सुरू होता बाहेर कावळा टेरेसच्या पत्र्यावर बसून खुपच ओरडत होता. मला या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती. झाडावर काहीतरी झालय may be म्हणून मी आणि अमित बाहेर डोकावलो. पाहतो तर एक कावळा सारखा आत डोकावून पाहात होता आणि ओरडत होता. काय गंमत आहे, कबुतरं येत होती आज कावळा? अस मी म्हटल तर अमित टेरेसमधून डोकवत  म्हणाला की अहो घाणेकर तुमची मुलगी सुखात आहे. काळजी करू नका. आणि ओरडू नका वहिनींचा स्वयंपाक व्हायचाय, जेवायची वेळ झाली की ठेवणार आहेत त्या तुम्हाला पण. टुकुर टुकर पाहिल त्यानं आणि चक्क उडून गेला मग मात्र कधी आला नाही. तेव्हा आमच्या दोघांच्या ध्यानी मनी पण नव्हते.
मनुष्य जन्म अनेक योनी जन्म झाला की मिळतो. जीवन अत्यंत अमूल्य आहे. त्यानंतर मुक्तीचाच मार्ग असतो. बाबा तुम्हाला मुक्तीच मिळाली असणार तुमच्या भगवंताच्या चरणी तुमचा प्राण विलीन झाला असणार यावर गायुचा पण नक्कीच दुजोरा असेल. असेच रहा तिकडून आमच्याकडे पहा आम्ही हे समजून आनंदी आहोत.
आपली आवडती माणसं त्यांच्यासारख्याच दुसऱ्या माणसाच्या रूपात दिसू शकतात, क्षणभर तो भास होतो. अस कधी होवू शकत. खुपच आठवण आली तर काही निमिष पुण्यात्मे दिसू शकतात. ती व्यक्ती काही क्षण दिसते. ती खरी-खोटी किंवा तशीच दिसणारी पण बरच साम्य असणारी दूसरी पण असू शकते. काही दिवसापूर्वी आयुर्वेद रसशाळेच्या चौकात सिग्नलला मी सर्वात पुढे होते. सिग्नल असूनही मनात धास्ती असल्या सारखा एक सेम टू सेम तुमच्यासारखाच माणूस मला दिसला. बाबा अगदी तुमच्या सारखे कपडे, चालण्याची पद्धत, थांबलेल्या गाड्या असूनही हात दाखात रस्सता क्राॅस करणारे, आनंदान हसून माझ्या बघत काही निमिष ती व्यक्ति डोळ्यासमोरून सरकली. जणू काही तुम्हीच हसून टाटा करत आहात.
एक क्षण वाटल तुम्हाला थांबवाव. पण ते तुम्ही
नाही याची पक्की खात्री होतीच. तसेच दूसरी कोणी व्यक्ती असेल तर त्यांना काय वाटेल ? आणि सिग्नल पण सुटणार होता. टचकन डोळे भरून आले. पुढच्या चौकात लोक माझ्याकडे बघू लागलेली मला समजलं. मी थांबले पहिला गायूला फोन लावला. दुदैवाने ती बोलू शकती नाही. काही क्षण मोठा श्वास घेता. गाडीवरच प्राणायाम करून मी घरी आहे. आता काही वाटत नाही पण ती व्यक्ती तुमचाच भास होती.
अशा प्रकारे योग्य कर्म करत जास्तीत जास्त पुण्य जमवत, सकारात्मक विचार करत, चुकलेल्याना माफी देत आयुष्य सुंदर जगू शकतो हा विचार पुन्हा उजळला. या पुस्त‌कामुळे मी आज शांत प्रसन्न चैतन्यदायी अनुभवत आहे. स्वतःकडे जगण्याचा आनंद घेण्याचा अजुन दृढ असा दृष्टीकोन मिळालेली मी जास्तीत जास्त आनंदाचे क्षण जमवत जाणार आहे. जाते आहे तुमचा आर्शिवाद असू द्या. भगवंताच्या चरणी विठीनल झालेल्या तुम्हाला माझा पुन्हा एकदा सा.न.
आज या पुस्तकामुळे तुमचा मृत्यु नंतस्था प्रवास समजला. त्या लेखकांना मनापासून धन्यवाद! 
तुमचीच गौरी
०७.१०.२०१५
++++++

++++++

Sunday, 9 February 2025

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

माझ्या आयुष्यातील आरसा "अंगण"

"अंगण" म्हणजे घराचा आरसा म्हणतात. घराची, त्यात जपल्या जाणाऱ्या संस्कारांची झलक अंगणात होते. माझं माहेर वाडा संस्कृतीतल असल्यामुळे अंगण म्हटलं की मला तेच आधी आठवतं. माणसांनी गजबजलेली मागे पुढे अशी दोन अंगणं असा भरगच्च वाडा होता आमचा. 

(संग्रहीत)
वाड्याच पुढच अंगण सतत दिसायचं कारण ते घरासमोर होतं. आमच्या खिडकीतून ते दिसायचं. अंगण म्हणजे दंगा, अंगण म्हणजे दुपारच्या कामाचा कारखाना, अंगण म्हणजे पत्ते; नवा व्यापार आणि शिरापुरीचे रंगलेले डाव. याच अंगणात टिपरी पाणी पण व्हायचं. याच अंगणात रात्री भिंतीवरल्या सावल्या पाहुन काल्पनिक सिनेमे चालायचे. याच अंगणात वाड्यातले लग्नाचे जागरण गोंधळ व इतर कार्यक्रम होत असत. चारी बाजुनी घरं मधे अंगण याच साजर रूप दसरा पाडव्याला असायचं. याच अंगणात टोपलीत मांजराची पिल्लं ठेवायचो; आपुलकीने आमच पुढचं अंगण ओतप्रोत भरलेल असायचं. याच अंगणात लहानांपासून मोठ्यांपर्यंतची भांडण पण होत असत. आता आठवण म्हणून फक्तं पुसटशी रेघ उरलीय त्याची.

असच चेहेलपहेल असलेल आमचं मागच अंगण. आरोळे वहिनीनी लावलेली उंबर, कापुस आंबा अशी पण मोजकीच झाडं होती. अर्थात तुळस होतीच. या अंगणात आंधळी कोशिंबीर रंगत असे. इकडे मोठी मोरी होती. जवळच विहिर होती. पूर्वी ऊघडीच होती नंतर बंद केली. याच अंगणाला होळी पेटवायचा मान होता. वाडा संस्कृतीचा वारसा आणि आमच्या मनाचा आरसाच होती ही दोनही अंगणं'.

आता चित्र वेगळ पण तितकच मनमोहक. फलॅट संस्कृतीचा आरसा अंगण म्हणजे टेरेस. अंगणाची जागा जागा टेरेसनी घेतलेली, पण ती पण हक्काची जागा. पण हे आधुनिक अंगण पण काही कमी नाही. याच अंगणात माझे लेकरू दुडु दुडू धावताना पाहिलय. तुळशीतली माती खाणं, दिवाळीत किल्ला करणं हे मी आणि त्याया लेकरानं याच अंगणात अनुभवतय. मोठी नाही पण लहान वाळवणं इकडे होतातच. ब्रम्हकमळाला भरपुर फुल येतात तेव्हा त्याची पुजा इकडे होते, जणु गर्भार बाईच झोकातल डोहाळजेवणच सुरू आहे.

या माझ्या छोट्याश्या अंगणात तुळस, कढीपत्ता, लाल-  पिवळा जास्वंद, तगर, मोगरा, अनंत, मिरची, झेंडू, शेवंती आनंदान गुण्या गोविंदान नांदत आहेत. मधे मधे एकवेळ पुरेल एवढी मेथी येतेच. तो आनंद काय वर्णावा, आपण लावलेलं झाड, त्याच आलेलं फळ काय आनंद.

  हा आनंद मला माझ हे छोटसं अंगण देतं. सूर्योदय पाहात, वाचन, लिखाण, व्यायाम इकडेच होतो. याच अंगणात कॅरम पत्ते डाव भिडतात. अलिकडेच या अंगणात मी रांगोळ्या पण काढते. माहेरी अंगणात रांगोळी काढण्याची उर्वरित ईच्छा आता एकडे पुरी झाली. माझ्या या सोनपावलाच्या अंगणात केन वुडचा झोका बांधुन किती तरी डोहाक जेवण झाली.

मला जितक स्वयंपाकघर आवडतं आवडतं तितकच अंगणही निटनेटकच आवडतं. जे आहे त्यात आनंद मानून आपण सुखी होऊ शकतो हे मला या माझ्या पिटुकल्या अंगणानी शिकवलं. लहान लहान गोष्टीतला आनंद शोधायला शिकवलं. मी या माझ्या आयुष्यातल्या दोन्ही अंगणांची खूप खुप आभारी आहे. एकाने माहेरचं सुख दिलं तर दुसऱ्याने सासरचं!
धन्यवाद! तुम्हाला आठवतय का तुमच अंगण? दोन चार वाक्यात कमेंट बॉक्स मधे लिहा. मला आवडेल.

सौः गौरी पाठक.
०३.०४.२०२०
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++


अंगण ईतिहास 
*अंगणाचे स्थापत्य नियोजन सिंधू संस्कृतीच्या काळापासून सुरू झालेल दिसतं. *भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंगणांना वेगवेगळी नावे आहेत. केरळमध्ये, त्याला नालुकेट्टू (खोल्यांच्या संचाने वेढलेले मध्यवर्ती अंगण), राजस्थानमध्ये हवेली , गुजरातमधील वाडा घरे ,अहमदाबादमधील पोलमधील घरे इत्यादी म्हणून संबोधले जाते. रोमन संस्कृतीत घराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेला कर्णिका असे संबोधले जाते , जिथे ते बागकाम करतात आणि पावसाचे पाणी गोळा करतात. *गोव्यात, ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही अनेक "राजंगन" किंवा अंगणातील घरे आहेत. या प्रकारची वास्तुकला कर्नाटकातील थोट्टीमाने शैली, तामिळनाडूतील चेट्टीनाड शैली आणि राजस्थानातील हवेलींच्या वंशावळीत येते . *अंगण इमारतीचा कार्बन फूटप्रिंट अधिक प्रभावीपणे कमी करते.  
(संग्रहित)