शब्दकळी विजया बरोबर लेखन उपक्रम २
अधिकमासा निमित्त १७ मै ते १५ जून २०२६
१) मी नेमकी कोण?
२) माझे कुटुंब माझी ताकाद
३) मी आणि समाज
४) माझी रंगांची दुनिया
५) पर्याय
६) परीक्षा
७) मी अशी कशी? वेगळी..
८) माझ्या स्वप्नातील एक हलकाफुलका क्षण
९) मैत्रीच्या राज्यातली मी राणी
१०) जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा..
आधीच ठरल होतं सगळं तो आज येणार होता. खरतर सकाळीच येऊन थबकण अपेक्षित होतं. काय झालं असेल? तस पाठवणारी व्यक्ती वेळेची पक्की आहे आणि तो येणार म्हणून मी पण खुप खुप ऊत्सुक होते सकाळपासून.
तो आला की दिवसभर त्याला कसा वेळ देऊ ? कसा असेल तो? आपण वाट बघत असलेल कोणी आल नाही की काहूर माजतं मनात. मग मी ठरवल ही भावनाच लिहून काढू कारण एरवी ही भावना निर्माण होण अवघडच.
चाळीसेक जणींनी यांच्याबरोबर दंगा करायच योजलेल पण हा पठ्ठा आलाच नाही अजून.
अहो कोण म्हणून काय विचारताय? तोच तो विजयाताईचा "विषय".
२१ दिवस तो रोज येणार आहे आणि आमचा अधिकमास माधवांना अर्पित मोहून जाणार आहे तोच "तो - विषय!"
प्रतिक्षेतली..
गौरी पाठक
१८ मे २०२६
#####
दिवस पहिला
अधिकमास विशेष ...
शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2
*मी* ....*नेमकी कोण?*
----------------------------------
कोण आहे मी? असा प्रश्न मी मला कधी विचारलाच नव्हता गं! बावीस वर्षे रुपाली आणि पंचवीस वर्षे मी गौरी आहेच पण ती नावं माझ्या व्यक्तिमत्त्वाची झाली.
पण माझ्यातली मी रसिक आहे, हळवी आहे, आनंद झाला कि तो वाटलाच पाहिजे आणि वाटला की खुलणारी कळी आहे, कान्हाजींच्या विश्वासाची छडी आहे, ठरवलेल पुर केलच पाहिजे या या हट्टाची गोणी आहे.
माझ्यातली मी देववेडी आहे, जे आहे ते देत रहा यावर जगणारी नागाची फणी आहे, मायेच्या ताकावरच दाणेदार लोणी आहे.
मी... नेमकी कोण आहे? माणसांना आपल करण्यात राम मानणारी फक्त छोटीशी दोर आहे. सनबाबाची फॅन आहे आणि कान्हाजींना पाहणं हे एकच ध्यान आहे.
मी कोण आहे ? तर सुंदर विश्वाच्या कपाटातला सकारात्मकतेन चमचमणारा एक काजवा आहे.
मी जी काही आहे ती परमेश्वराची देणच आहे.
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
१८ मे २०२६
####
*दिवस दुसरा*
अधिकमास विशेष शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्र 2...
माझे कुटुंब माझी ताकद....
नुकतंच एकदिवसीय सहलीसाठी गेलो होतो तिकडे हे फणसाच झाड बघून ही कविता आठवली होती. आजचा विषय वाचला आणि मला माझ कुटुंब या फणसासारखं भासलं. आतले गरे जसे एकमेकांना सामावून बसतात, वाढतात, परिपक्व होतात. हळुहळू कालांतराने गोडी चढत जाते. एकोप्याने राहून एकमेकांना सामावून घेत वाढतात हीच खरी तकाद हेच खरं कुटुंब.
जन्म झाल्यापासून आधी कुटुंब आईनी सुरू होतं. कालांतराने विश्वची माझे घर समजू लागल की ते वाढतं. माझ कुटुंब माझी ताकाद आहे हे मी पण आज अभिमानाने सांगू इच्छिते. माझ कुटुंब आठ जणांच, आम्ही तिघं सासू -सासरे, दीर -जाऊ -पुतणी. कुटुंब बांधून ठेवताना मी सासूबाईंना बघितलं, ते कष्ट ते प्रेम ती आपुलकी देण सोप काम नाही. मी ते बाळकडू त्या़च्या सहवासात आत्मसात करू शकले.
माझ्या आईकडून संस्कार लाभले आणि सासूकडून संस्कारानं घर बांधून ठेवायला शिकायला मिळालं. सासू नावाच दूधच ईतक मस्त होत की सून नावाची साखर कधी विरघळली समजलच नाही. माझ्या प्रत्येक यशात या कुटुंबाचा मला कायमच आधार लाभला आहे. कान्हाजी ऊगाच कोणास भेटवत नाहीत त्यांचे आयोजन फक्कड असतं. ज्याची जी क्षमता त्याला तो ते ते काम देतो. त्यामुळे कुटुंबाकडून किंवा कुटुंबातील कोणाकडून झालेल कोणतही काम आम्ही केल नसून ते परमेश्वरानीच करून घेतल म्हणायला हरकत नाही.
कुटुंब माझा आधार म्हणताना पारदर्शकता महत्त्वाची. आपली जबाबदारी पण समजणं गरजेच असतं. जर समजत नसेल तर जाणीव करून देण आणि दिल्यावर त्याचा आनंदाने स्विकारण्याची कला कुटुंबत समजते. माझी आवडती कविता जी "माझा कुटुंब माझी ताकद" याबाबतची भावना पूर्णपणे दर्शवते ती नक्कीच आवडेल तुम्हाला पण, बघा आणि कळवा मला नक्की!
गौरी पाठक
९९७०१६८०१४
१९ मे २०२६
####
चयन किया किसने भला, अपना घर परिवार
यह तो है भगवान का, हम सब को उपहार।१।
बन्धन केवल रक्त से, रखना कब आसान
जोड़े घर परिवार को, प्रीत, खुशी सम्मान।२।
पूरखों ने हम को दिया, इस जीवन का सार
प्रीत निभाकर नित करो, जग को घर परिवार।३।
दुआ करो परिवार सिर, रहे ईश का हाथ
बिना शर्त जो आपका, सुख दुख में दे साथ।४।
जैसे मोती गूँथ कर, बनता सुन्दर हार
त्यों रिश्ते की डोर से, बँध बनता परिवार।५।
पाता घर परिवार से, जीवन सुन्दर रूप
देता कोमल छाँव जो, रोके तपती धूप।६।
घर जाकर परिवार सह, कर भोजन आराम
उससे ऐसा सुख मिले,ज्यों लिये ईश का नाम।७।
जिनको लोगों इस समय, मधुशाला से प्यार
कोरोना की गोद में , डाल रहे परिवार।८।
एकाकी जीवन सदा, बैठा दुख की छाँव
पड़ जाते परिवार में, बरबस सुख के पाँव।९।
रोग रहित हो कर स्वयं, पहुँचो घर के द्वार
देना निज परिवार को, सुखद मिलन उपहार।१०।
रहे शान्ति परिवार में, वन-वन भटके राम
आज समय घर में रहो, करो न वैसा काम।११।
खुशियों का आँगन बड़ा, करता घर परिवार
आज नगर से जा रहे, करके यही विचार।१२।
- लक्ष्मण धामी 'मुसाफिर'
######
दिवस तिसरा
*अधिकमास विशेष ..
शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2*
*मी आणि समाज*
----------------------------------
अनेक "मी" मिळून समाज होतो. माझ्यामते एकाच विचिरसरणीचे आणि मनास पटणाऱ्या दिव्यतेस अग्रस्थान देणारे अनेक मी जेव्हा एकत्र एका समूहात येतात तो झाला "समाज". समाजात संरक्षण, समानता, सत्यनिष्ठा टिकून राहण्यासाठी तो सुद्ढ राहण्यासाठी अनुशासन महत्वाचा भाग असतो.
मी एका ठराविक समाजचा भाग आहे अस म्हणताना त्यात सगळ्या जातीचे भाषेचे असणारच. सगळ्या प्रांतीयांना समाज बांधून ठेवतो.
मी आणि समाज विषय असेल तर मला सांगायला आवडेल की माझ्या लहानपणी आजुबाजुला असलेल्या माणसांकडून ऊर्फ समाजाकडून खुप छान अनुभव आले. एकोप्याने कसे राहावे, शेजारधर्म कसा पाळावा, संस्कृती कशी जपावी हे शिकायला मिळालं. माणुस बनताना घडताना आजुबाजुला बघुन मोठा होतो. तेव्हा हा समाजच बघतो ना - म्हणून मी समाज या तळ्यातला एक थेंब आहे अस म्हणेन.
माझ्या नशिबाने माझ्या समज येत्या वयात अनुशासित व्यक्ती समाजात सतत बघत आल्याने तो पगडा जास्त आहे. जो जगताना आधार आहे. आपण एकत्र आलो की समाज होतो. समाज आला की संस्कृती वाढते. संस्कृती टिकली की एकी वाढते आणि सुदृढ राष्ट्र यानेच बनते.
माझ्या परीने संस्कृती टिकवणे तसेच एकोप्याने राहणे करत राहणे हे प्रत्येक 'मी'च समाजाप्रती देणं आहे अस म्हणेन. प्रत्येकाची क्षमता, कार्यक्षमता आणि कौशल्य वेगळे त्यामुळे प्रत्येक 'मी' ने आपापल्या सोईने ते करावे अर्थात करतच असतात.
लहानपणापासूनच अनुशासित समाज बघत आल्याने मी मला त्या ढाच्यातच बघत राहवे / बघावे असे नेहमी वाटते. यावर मज जवळ शब्द नाहीत कारण समाज हा विषय मोठ्ठा, बौद्धिक आणि मोलाचा आहे माझा यावर फार अभ्यास नाही.
तरी आज किंचित तरी विचार केला गेला हे मात्र खरे. सकाळी विषय समजल्या पासून एक शब्द पुसटसा समोर येत होता... तो सापडला "अनुशासन " बस्स माझ्या मते समाज म्हणजे अनुशासन ईतकीच झेप माझी.
धन्यवाद
गौरी पाठक
२० मे २०२६
दिवस चौथा*
*अधिकमास विशेष ...
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2
माझी रंगांची दुनिया
----------------------------------
रंग....आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळे रंग असतात...रंग नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात...प्रत्येक रंगाचे काहीतरी वेगळेपण असते....वेगवेगळ्या रंगांशी आपल्या वेगवेगळ्या भावभावना जोडलेल्या असतात....कपडे, लहान मोठ्या वस्तू असे काहीही खरेदी करत असताना आपण रंगांना विशेष महत्व देतो ....
तर मग आज आपल्याला लिहायचं आहे..
रंगांसोबत जोडलेल्या आपल्या वेगवेगळ्या भावना ....
*माझी रंगांची दुनिया*
रंग अहा! काय सुरेख विषय. रंग म्हटल की शामसुंदर आठवणारच... प्रकृतीचे सात काय आठ रंग आपल्या जीवनात खुप मोलाचे. त्याचे गुण त्यांचे पडसाद आपण दैनंदिन दिनचर्येत वापरतो पण आज त्यावर प्रकाशझोत पडेल.
तांबडा रंग शुरता, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती आणि निर्भयता दाखवतो. ऑफिसमध्ये निघताना देवघरात झपकन डोकवतानाच कुंकू मला या तांबड्या रंगाच विचारताच डोळ्यासमोर आलं. नवरात्रीतल कुंकूमार्चन करतानाची भावना अगदी हीच असते ही भावना जागृत झाली आणि पुतळाबाईंचे कुंकू आणि मेणाबद्दलचे संवाद आठवले.
नारंगी रंग ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व ऊजागर करतो, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे सुखी समाधानाचे संकेत देणारा. मला नारंगी रंग म्हणताच रोज बघत आनंद मिळणारा माझा सनबाबाच आठवला. अहो, नारंगी रंगाच्या असंख्य छटा तो दाखवतो. जगण्याची ऊमेद देतो. गुरु ठाकूर म्हणतात तेच जणू तो मला रोज सांगतो -"ये पुन्हा नव्या दिवसाची चल घडी मोडून पाहू."
पिवळा रंग जगण्यातला ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो. हा मनामध्ये नवे विचार निर्माण करतो. मी रोज सकाळी स्वयंपाकघरात गेले की गॅस सुरू करताच तो मला रोज दिसतो ज्योतीच्या स्वरूपात. भाईश्री रमेशभाई ओझा म्हणतात, "एक माटी का दिया सारी रात अंधियारे से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू किस बात से डरता है?"
हिरवा रंग सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद सांगतो. मग मला बेssबी का नाही आठवणार. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि फक्त माझा असा कोपरा माझी झाडं ऊर्फ माय बेबीssज. मी रोज टेरेसमधे जाताना बेssबी हाक मारते. सगळे माझी मी त्यांची वाट बघतो अस मला वाटत कारण मन गुंतलय त्यांच्यात, पेरलेल ऊगवून बहरेपर्यंत मी बरोबर असते. कढिपत्ता आजारी होता तो आता पालवी फुटतोय कालच मी खुप जोरदार ओरडले होते. प्रत्येक पानाला हात लावणं कळी धरली की काळजी घे कानात कुजबुजणं सगळ सगळं अजबच आहे. ती सगळी मंडळी मला सांगतात, "रोज बाॅंटे .. रोज बढेगी... एक मुस्कुराहट.. दुसरी दुआ!"
निळा रंग अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक आहे. निळा रंग मला रोज घरी जाताना आकाशातला भावतो.
सूर्यास्तानंतरचा निळे पणा.. मला सांगतो.. गो विथ द फ्लो...
पांढरा रंग ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतकच की, पवित्रता, शांतता संयम व ध्यान सुचक आहे हा. मला पांढरा रंग दुधात सापडतो. भावनांना ऊचंबळु न देता शांत बसत जा गं. तरच तरशील हे रोज दुध वर आल की शिताफीन गॅस बंद करताना तो रंग सांगतो. पण आनंद दुःख दोन्हींनी उच्च कोटीची सीमा गाठली तरी ऊतू न जाण मला काही अजून जमलेल नाही. जमल पाहिजे अति आनंद झाला तरी संयम ठेवायला.
ज़िंदगी सस्ती मै साहब, जीने के तरीके महेंगे है... गुलजार.
जांभळा रंग आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा. आद्ध्यात्मिक जगाशी संबंधित हा रंग नुसता ऐकून वाचून आहे. अजून अनुभूती आलेली नाही. मी वाट पाहितेय हा कधी सापडेल मला.
"हमें खुद अपनें सितारे तलाशने होंगे, ये एक जुगनू ने समझा दिया चमकें मुझें.."
काळा रंग सगळ्यांचा राजा रांगोळी काढली की काळ्या रंगाची कड दिली कि ती खुलून दिसते तसच आहे. अगदी बाळाच्या तीटेसारखी. या रंगाच्या कपड्यात आपण खुलून दिसतो. हे खरय पण मी त्रस्त आहे कारण ही पुढची पिढी फक्त काळेच कपडे जास्त घालते. "मेरी दुनिया है सबसे हसीन" अस म्हणतात वर. घ्या... आता बोला...
रंगात रंगूनी सार्या रंग माझा वेगळा!
गौरी पाठक
२१ मे २०२६
###
*दिवस पाचवा...* *अधिक मास विशेष*
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
पर्याय
----------------------------------------
*योग्यवेळी योग्य पर्याय निवडता आला तरच आयुष्यात यशस्वी होता येते
*याउलट कधीतरी पर्याय नाही असं समजून चिकाटीने एखादी गोष्ट करूनच यशस्वी होता येते ....
*त्यामुळे पर्याय समजून घेतले तरच आनंदी, सुखी, समृध्द जगण्याला कोणताच पर्याय नाही इतकं नक्की .....
आजचा विषय आहे... *पर्याय* 😍
काय जबरदस्त धगधगत्या विषय आहे हा! आपण आपल्या आयुष्यात शोधलेल्या पर्यायांना सांगणं किंवा ते जगलेलं व्यक्त होणं महा कठिण आणि धैर्याच काम.
कसं? समजेल हळूहळू मला काय म्हणायचे आहे ते.
धैर्यान योग्य पर्याय निवडून जगण जमल तरच आपण चांगले आरोग्य, मन:शांती आणि अर्थपूर्ण नात्यांनी जगू शकतो.
रोज जगताना नात्यांमधे आपण एकमेकांना आपल समजतो त्यात काहींच्या मानसिक अक्षमतेमुळे आपण आपलेपणानं वागत आलो असलो तरी आपल्याच माथी खापर फोडलं जातं.यावर स्वतः ला बदलण्या शिवाय पर्याय नाही हे जेव्हा समजत तेव्हा आपण शांतीत जगू शकतो. आपण आपल समजतो त्या परमेश्वराच्या अंशाची क्षमता जोखण आपण कमी पडलो अस म्हणायच आणि एकदाच समक्ष न आवडलेली गोष्ट सांगून मनमोकळेपणाने पुढ जायचं. कारण नाती टिकवायची आहेत. माणूस प्रगल्भ होतो तो असाच ना. अशा आलेल्या अनुभवावरून योग्य विचार करून योग्य पर्याय शोधतोच शोधतो. यात नातं या शीर्षकाखाली अगणित लोकं येतात. हा झाला नात्यांतला पर्याय.
आता वैयक्तिक जगताना एक स्त्री म्हणून जे जे करण गरजेच ते करताना पण आपण स्वतः ला सारून पर्याय निवडतो आणि स्वतः च समाधान करून देतो की करून घेईन. ही विचारसरणी छापलीय मनावर पिढी दर पिढी. कामावर जाताना सगळ्यांना नाश्ता पुरेल मी काय कालची पोळी चहात संपवेन अशी मानसिकता...
आधीच्या पिढीतली पर्याय निवडण्याचा दृष्टीकोन आता थोडा बदलून पण सकारात्मकपणेच बरं का, जगलो तर आपण आनंदी खुप खुप मनमुराद जगू शकतो. काही फरक पडत नाही आपण एखाद्या नकारात्मक नात्याला किंवा दृष्टीकोनाला पर्याय निवडला तर. कारण जगातला प्रत्येक जण झगडतोय स्वतः शी, स्वतः ला सिद्ध करताना जगण्यासाठी जगाशी मग का मन भारी करून जगायचं?
मग अर्थपूर्ण नात टिकवायच तसेच आनंदी उद्देश पूर्ण जीवन जगायच तर पर्याय योग्य निवडण्याची सक्रिय क्षमताच आधी वाढली पाहिजे. एखाद्या नात्यात त्रस्त झालो दहा पंधरा दिवस लांब राहायचा पर्याय निवडण मला चूक वाटत नाही. कारण ती व्यक्ती टामटुमित असते आपण का नकारात्मकता मनास चिकटवून स्वतः चा र्हास करायचा.
आपणही आपल्याला समोर ठेवून स्वतः साठी जगताना, व्यक्ती वस्तू काम यावर आपले जगतानाचे पर्याय बदलू शकतो आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण घेतलेला कोणत्याही निर्णय कालांतराने चुक होता अस वाटून खचून न जाणे कारण तो त्यावेळी योग्य होता.
विजयाताई म्हणाली तस वस्तू, व्यक्ती आणि काम यात पर्याय निवडताना पर्याय बदलू शकतात. आज एकविसाव्या शतकात जगताना मला वाटतंय की सगळ्या सुंदर स्त्रीयांनी आधी स्वतः मानसिक आरोग्यावर ऊपकारक पर्याय निवडले जावेत. कारण आपण ठणठणीत तर घर ठणठणीत हे सूत्र काहीही झाल जग पलटल तरी बदलेल अस वाटत नाही.
योग्य वेळी योग्य पर्याय सकारात्मक तेने निवडला की आपोआप च नाती वस्तू काम सुसंगत चालेल.
पर्याय म्हणाल तर मी स्वतः माझ्या मानसिक आणि ओघानं येणार्या शारिरीक पातळीवर जे योग्य तेच निवडेन यासाठी माझ मन सशक्त करणार... करतेय...
काही वेळा निर्माण करावा लागतो पर्याय हे पण शंभर टक्के बरोबर. धगधगता विषय अशासाठी म्हटल कारण आपण का आणि कोणता पर्याय निवडला सांगताना भक्कम मानसिक बैठक लागते. समोरचा हे कस घेईल याची परवा न करता शब्द लिहणं जोखीम असते पण यातुनच आपले कळतात. मग आपले ते सोबत घेऊन आणि तुपले ते जमेल तसे कोड सोडवत पण तरी बरोबर घेऊ जगायची सवय लागेल. कारण जगताना काहीवेळा कोणताही पर्याय नसतो.
शुभं भवतु!
गौरी पाठक
२२ मे २०२६
###
*दिवस सहावा*
*अधिक मास विशेष*
*शब्दकळी सोबत लेखन उपक्रम 2*
*आजचा विषय - परीक्षा*
पदोपदी परीक्षा आहेच मग ती व्यक्ती कोणी असू दे. जन्म घेताना बाहेर येतानापासून परत जाताना पर्यंत परीक्षा.
काल तर चित्रपटाचा ट्रेलर पण हाच "देवाची परीक्षा".
जगण्यासाठी कायम परीक्षा देत राहायच. पास नापास मधून सुधारत आवृत्ती बाहेर पडते.
प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो — कधी संयम, कधी स्वतःची किंमत, कधी नात्यांची ओळख, तर कधी स्वतःवर प्रेम करायला.
परीक्षा नसती तर सरळ आयुष्यात मजा नसती नीट विचार केला तर ऊमगेल.
आपण कितीही सुधारून वागा वावरा कोणती तरी परीक्षा पार पाडत जगा लोक परीक्षा करतातच.
मग कशाला रडा? स्वतः कस बरोबर सिद्ध करायचा झगडा त्यातसुद्धा परीक्षा. जगताना घर माणस नोकरी समाज यात सेट होताना पण परीक्षा यात शंभर वेळा पास झालो तरी एकदा झालेला नापास शिक्काच सतत दाखवणारे भेटणार तो सोडून देत जगायची पण परीक्षाच.
मी हल्ली फार मनावर घेण सोडलय. आला पेपर दिला पेपर मग ती कोणतीही असो परीक्षा.
फक्त एकच करायच प्रत्येक परीक्षेनंतर नवीन गोष्टी मिळतायत ना.
आज मला गमतीदार किस्सा आठवला. जे स्वप्न मला लहानपणी कायम पडायचं. मी पेपरला गेलेय आणि पेपर वेगळयाच विषयाचा आहे. आठवल ना मे की बारीकसं हसू फुटतच.
हल्ली मी पेपर देते आणि कान्हाजींवर परीक्षेचं भवितव्य सोपवते.
मंदार कवींची एक कविता आठवली..
झुगारून दे सगळ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
अडवतील ही लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला ऊजळायचे पुन्हा,
मंत्र आहे हा एकला,
थांबला जो इथे तो संपला.
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
२३ मे २०२६
###
दिवस सातवा : अधिक मास विशेष :
शब्दकळी बरोबर उपक्रम २
आजचा विषय : मी अशी कशी? वेगळी...
मला सकाळपासून चौकटराजा मधला दिलीप प्रभावळकर यांचृया तोंडच वाक्य आठवतय."मी असा कसा वेगळा?" खर तर प्रत्येक जण वेगळा असतोच. मला सगळ्यांमधे राहायला आवडतं, घरात दिवे कमी असावेत पण माणसं जास्त हवी तरी मी म्हणतेच की सगळे आपलेच असतात पण आपलं बिपलं कोणी नसतं. मी अशी कशी? वेगळी...
जगतानाची एवढी वर्षे जर मी तपासली तर खरच मी मलाच ओळखणार नाही. रडूबाई, धांदरट सतत धाक मनात दडपण अशी वावरणारी पण सहवास, अनुभव आणि वय सगळ शिकवतं. त्यामुळे मी अशीच आहे आता वेगळी. पटल तर हो म्हणेन नाही पटल तर मागे बोलणार नाही एकदा दोनदा सोडून देऊन समोर सांगेन. अशीच आहे मी वेगळी.
एखाद्या नात्यातील व्यक्तीबद्दल एकत्र तिटकारात्मक बोलताना ईतर मात्र ती व्यक्ती आली की खर मन झाकून बोलतात. तू अस नको करूस हे वयान मोठे पण सा़गत नाहीत. कारण काय तर वाईटपणा कोण घेईल. अशांना सामोर जायला गौरीचा खांदा बंदूक यांची. आता मी खांदा देण बंद करून चारेक वर्षे झाली असतील. मी आता जवळची पण हेवा वाटणारी पण तरी मनान मला चांगल चोखणारी पण ओळखून वागते आणि वेळ पडली तरचौकटीत पण ठेवते, हो मी आहेच अशी वेगळी.
मुखवटे लाऊन जगत नाही. आपल मानल त्याला कोण बदाबद गंडवत असेल तर बाजू घेते, पुढे अस होणार नाही याचा विचार करत बसत नाही किंवा एवढे मोठे समोर असताना मी कस मधे बोलू असा पप्पू विचारही करत नाही. हो मी आहेच थोडीशी वेगळी.
सणवार, पुजापाठ संस्कृती मानते मी आवडतच मला संस्कृती ही पाळलीच पाहिजे पण मी पाळी आलेल्या बाईला छी तू वागणूक देत नाही. हो मी आहे अशीच वेगळी - परंपरा पाळताना मुरड कुठं आणि कुठवर घालायची याची चौकट माझी वेगळी.
लहानपणी सर्वसाधारण आयुष्य जगले पण अडल नाही कुठं. जेवढी सुबत्ता घरात होती तेवढी ताटात पडत होती. एकावेळी चार चटण्यांच अवडंबर मी कधी जगलेच नाही किंवा छोट्या वाडा संस्कृतीत असूनही कोणाला मान आणि कोणाला पान हे सदर सोडल नाही. आता बघते ना मी पुरूषांचा निर्णय शिरसावंद्य माना आणि सगळ्याच्या सारख्या तयार्या करून द्या मी त्या साच्यात कधी ढळलेच नाही. अग बाई हो अशी कशी मी? वेगळीच!
ताई बदल हा निसर्गाचा नियम आहे हे मात्र अगदी खरं. मला हे कळून सहा वर्ष झाली आता काहीही वाटत नाही. ऊलट यामुळे मी खंबीर, कणखर, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करणारी, स्वतः ची आवड जपत, नैतिक जबाबदारी चा पदर ही घट्ट सांभाळणारी, चुक ला चुक बरोबर ला बरोबर म्हणत नवीन पिढीला आपलस करण्याची भक्कम तयारी करत म्हणाल तेव्हा ऊंच भरारीस तयार अशी मी वेगळी! अश्शीच मी मला स्वतःला खुप खुप आवडते.
भरपूर शिकत राहावं, सतत नवीन गोष्टी माहित शोधत जगावं, रोज एका तरी माणसास मनापासून आनंद देत जगावं, आनंदाचे सुखद क्षण शोधावे तो आनंद वाटावा, न जमणार्यांना तो प्रोत्साहन व्हावा त्यांनी पण तसच जगावं, घरात भरपूर जण यावेत, खाऊन पिऊन जावेत, जीवनाच्या पाटीवरची माती सारत हवे ते दगड ऊचलत छान अक्षर लिहावी -"मी अशीच आहे - वेगळीच"
"हर पल में प्यार है, हर लम्हें में ख़ुशी,
कह दो तो यादे ह़ै, जी लो तो जिंद़गी ||"
गौरी पाठक
२४ मे २०२६
###
*दिवस आठवा*
*अधिक मास विशेष*
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
---------------------------------------
माझ्या स्वप्नातील एक हलका फुलका निवांत दिवस* ....
अगsss बाई, "तुझ्या स्वप्नातला हलका फुलका निवांत दिवस काय आहे?" आजवर एक्कानही असा प्रश्न मला विचारलेला नाही. थांबा ह्रदय धडधडू लागलय आणि स्वप्नांची पानं फडफडू!
हवं तस जगू देण्यावर कधीही निर्बंध न घालणाराच जोडीदार लाभलाय पण हा प्रश्न वेगळाच आहे. आपण बरेच चित्रपट बघतो त्यासारखे पडसाद म्हणा नाहीतर काहीही म्हणा मी मुलाला एक दोनदा सहज म्हटलेल. मी जर अचानक कुठं सापडले नाही तरी काळजी नसावी. माझी ईच्छा आहे मी दहा बारा पुस्तकं, दोन वह्या पेन आणि ब्रह्मविद्येच्या पाठांसकट बस पकडून पुस्तकांच गाव भिलारला जावं. सहा सात दिवस मी जग विसरावं. भिलारगावच्या होम स्टे मधे राहायचय आणि हवं तेव्हा हवं तेवढा वेळ पुस्तकं वाचायची आहेत.
पहाटे ब्रह्मविद्येच्या अभ्यासानंतर सुंदर सनबाबा बघून महाबळेश्वरच्या कृष्णाबाई देवळासमोर हव तेवढा ध्यान सराव करायचा आहे. नंतरचा सगळा वेळ पुस्तकं आणि घरच्या भाकरीनी हाक मारली की जेवायचं परत वाचायचं. संध्याकाळी मंद वारा गावतल्या झाडांचा वास आणि चहा, अंधाराआधी परत खोलीत वाचन.
संध्याकाळी तासभर चालत फेरफटका जवळपास मारायचा. गावातली घरं रस्ते दिवेलागणीला खुप वेगळे दिसतात हे फक्त वाचलय ते अनुभवायचय.
(केरळमधे हा अनुभव वाडीत आलेला आहे तोपुन्हा केव्हातरी सांगेन.).
ना घड्याळाची घाई, ना वेळेची काही रीत,
वाचनात रमलेलं मन आणि ध्यानात सापडते प्रीत.
(कवी ठाऊक नाही )
सहा सात दिवस मी माझी पुस्तकं, माझा आणि कान्हाजींचा एकांतात संवाद आणि निसर्ग ईतकं...
कोणतीही नैतिक जबाबदारी पाळण्याच दडपण नाही - मी, पुस्तकं वही पेन आणि माझे कान्हाजी....
*तळटीप* : एक मात्र ठरवलय हा प्रश्न दरमहा कोणाला तरी विचारणारच. कोणजाणे कोणाला तरी खरच गरज असेल..
सौ. गौरी पाठक
२५ मे २०२६
###
*दिवस नववा*
*अधिक मास विशेष*
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------
*विषय - मैत्रीच्या राज्यातील मी राणी* ...
आज आपल्या एका किंवा अनेक मैत्रिणींबद्दल लिहायचं आहे .. एखादा प्रसंग, सुंदर आठवण, एखाद्या मैत्रिणीचे कौतुक, एखाद्या मैत्रिणीची सोबत, मदत.....काहीही लिहा...मैत्रीबद्दल लिहा...आज स्वतः ला मैत्रीच्या राज्यातील राणी समजून मनातलं लिहा....आणि हो आठवणींने आपल्या मैत्रिणींना ते पाठवा.....
आज मला माझ्या एका मैत्रिणीला पत्र लिहावे वाटते आहे .. तेच लिहिते मी...
प्रिय पल्लवीस,
एक घट्ट मिठी! आजवर प्रत्यक्ष भेटीतून, लाभलेल्या सहवासातून, आवडी - विचार समजून मग माणूस मैत्री या बिरूदाखाली आलीय माझ्या आयुष्यात. पण आपण तर चार वर्षात तीनदाच प्रत्यक्ष भेटलो. ध्यान वर्गाच्या अभ्यासात एकमेकांना मदत करत वर्ग चालु राहिला ईतकीच काय ती ओळख आणि सहवास!
पण तुझी गोष्ट वेगळी आहे, कधी मैत्रिण म्हणवली गेलीस समजलच नाही. वर्ग घेतानाच्या किंवा कधी कधी वैयक्तिक क्षुल्लक अडचणी पण शेअर केल्या जाऊन तोडगा सापडला आहे मला. एखाद माणूस अस असत आयुष्यात की तो हलकासा पडदा सरकवतो फक्त आणि आपल्या ला लख्ख दिसतं. खरं खरं सांगते मनाच मनाशी नातं कस असतं आणि आपली मैत्रीण तीच्या बद्दल ओढ प्रेम वाटत ते मी तुझ्या मैत्रीत अनुभवलं.
तुझ्या गरोदरपणाच्या सर्व प्रवासात मी तुझ्याबरोबर एका बारीकशा किनारीसारखी होते. तुझा डोहाळजेवण आहे सुटी टाका आणि या गौरी मॅडम हा फोन मला हक्काच सोनेरी बोट लावून मनास स्पर्शून गेला.
"ऑफिस चा दिवस असूनही पुण्याहून मुंबईला फक्त डोहाळजेवण आहे म्हणून तू जाणार आहेस? " हा प्रश्न मला नवर्यानी जेव्हा विचारला तेव्हा मला समजल की तू माझी किती जवळची मैत्रीण आहेस ते.
मुंबईत जायच कस ? कुठं? जमेल का? अनेक प्रश्न होते पण ईच्छा तीव्र होती. मी बसनी जाईन अस स्वतः ला धीरान समजवलं. आपल्याला ओढ वाटतेय भेटाव वाटतय कौतुक कराव वाटतय त्यात वाहन आणि प्रवास अडथळा नाही बनवायचा. तसही मी हल्ली ठरवलय आणा पोचवा सोडा अस कोणी नसल तरी अडकून न पढता एकट लहान सहान ठिकाणी जायचच. एकट पण कसही कुठही नवख्या जागी जायची सवय हवीच. कोणी गाडीन सोडणारं नसल तरी अडता कामा नये. मी अशी दहा बारा वर्षांपूर्वी एकटी चार वरषाच लेकरू घेऊनही गेलेली आहे हे आठवल आणि बसच तिकीट काढलं. मुंबईत जायचय तर एक चान्स घेऊन पुतणी आहे का फ्री विचारलं आणि आनंदाने हो म्हणाली.
आणि दोघी तुझ्या डोहाळजेवणाला मस्त आवरून पोचलो सुद्धि! तो गुरूवार फार छान होता. तुझ्या मैत्रीमुळे मला तो आत्मविश्वास परत आठवता झाला.
मी तुमच्या घरच कोणीही ओळखत नसतानाही तुमची बनून तो कार्यक्रम सुरेख अनुभवला. आज तुझ्या पदरात गोंडस कान्हाजी आले आहेत ही कल्पनाच खुप सुंदर आहे मला. कान्हाजी प्राप्ती ची तुझी इच्छा, त्या पूर्तीचा तुझा ध्यास, मिळालेली जोडीदाराची आईची साथ तुझ्यातल्या आईचा गगनात न मावणारा आनंद, आज कान्हाजी येत आहेत ही उच्च कोटीची आनंदी वार्तेता कम धकधक ते थेट कान्हाजी कुशीत... सगळ्याची मी साक्षिदार.... कसल मस्त वाटलं सांगू का! मुलगा झाला वाचून. मी तत्काळ मोनिका आणि पुतणी दोघींबरोबर तो आनंद वाटला.
पल्लवी तू खुप मनमोकळी आहे. सतत भरभरून बोलत असतेस, तत्वासाठीचा झगडा, अन्यायाची चीड मी तुझ्यात जेव्हा बघते तेव्हा मला मी तुझ्यात मलाच काही वर्षांपूर्वी ची बघते आणि हसते. एक लक्षात ठेव की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल समजत चालायचच पण मधे काही क्षण दम घ्यायचा स्वतः साठी विश्राऊसाठी जी आपोआपच सिंहावलोकन करवते. मला हे जरssरा उशिरा समजलं.
तर मग पल्लवीताई खोचा पदर कारण कान्हाजी हवेत म्हणण ठिक पण त्यांना सांभाळायच आता. आईपण खुप खुप भरभरून जग. या जगण्यातल्या क्षणांचा पुढे खुप छिन आधार होतो आपण हे क्षण आठवून वाट्टेल ते करायची ऊभारी भरू शकतो. दोन महिन्यांनी ध्यानसत्रात भेटूच.
आई बाबा झाल्याच्या उभयतांना अनंत शुभेच्छा!
आराम कर आळजी घे.
आज मैत्रीच्या राज्यातली राणी बनून मनान मनाशी संवाद साधताना तु मला सापडलीस यासाठी खुप खुप आभार.
तुझीच,
सौ. गौरी मॅडम
२६ मे २०२६
###
*दिवस दहावा*
*अधिक मास विशेष*
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------
स्त्री होणं म्हणजे नक्कीच सुख आहे... पण या स्त्रित्वाची खरी कहाणी प्रत्येकीची वेगळीच.. मग लिहा आज याच तुमच्या जन्माबद्दल.
*विषय - जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा...* ...
सकाळी विषय आला आणि डोक्यात शब्दांची मंडई झाली. "गौरी शांत बस आधी हातची कामं ऊरक." अस मनाला समजवत मी कामं केली. हो मी स्वतःला पण हाक मारते. कामाचा ढिग असला तरी चहा पीत टेरेसमधे बेबीज बरोबर चहा घेते आणि थोड्यावेळाने म्हणते,"गौरी उठ.. तुलाच तुझी कामं करायची आहेत. मै तो चssलीss" खरय मी अशीच बागडते घरी याला साक्षीदार फक्त सासूबाईच! (खर तर ती काम मलाच माझी वाटत असतात फक्त, जगास त्याचे काहीही पडलेले नसते.) सकाळ उठल्यापासून रात्री पलंगावर पाठ टेके पर्यंत जगाचाच विचार डोक्यात असतो. आता हल्ली हल्ली मी थोडा का होईना माझा पण विचार करतेच.
आपण कितीही आठवणीनी घरच्यासाठी सगळ केलं तरी एक क्षण आपण एखाद चुकून आठवण करणं सुटलेल्या गोष्टीवर ऐकवले जातो. मग वाटत का आठवणी केल्या मी? का अट्टाहास करते जागच्या जागी असण्याचा? का बघितील त्यांच ते म्हटल नाही मी? माझ्या मानणार्यांना कोण बोलत असेल तर मी का ऊसळले? यासगळ्याचा ईतरांवर काय फरक पडला? काहीही नाही... पण गंमत सांगू का शान्ता शेळकेंच्या कवितेच्या या ओळी वाछा जन्माला बाई माणूस येतानाच रक्तात टोचून आलेलं असतं बाईपण.
"जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच रहावे." काही जगतात आठवत आणि नाही सुचत नाही या पांघरूणाखाली. अपवाद पण बघितल्यात मी बायका.
सृष्टीकर्त्यानं बनवतानाच हे स्त्री पात्र अस बनवलय की ते दमूच शकणार नाही. ती क्षमता विसरेल पण ती असणारच. आता मुद्दा आला घाईचा. का कोण जाणे पण सगळ पटापट आवरायच हे वाक्य आमच्या पाचवीला पुजलेलं. त्यात युनिवर्सल मानसिक शांतता केव्हा लाभते -- "झाला बाई ओटा धुवून!" आज सकाळी ऑफिसला पोचले आणि ऑफिस असिस्टंट ला, हो दोस्त आहे तो आपला त्याला आजची काढलेली रांगोळी दाखवली. तो पटकन म्हटला, "बापरे, रांगोळी डबा घरच आवरून कामावर येता, एवढ सगळ कस करता सकाळी तीन तासात?" मी, "नेहमीच करते" मी इतक सहज ऊत्तरले. मग लक्षात आलं ही खुप कौशल्य कौतुकाची बाब आहे हे जग ओळखत पण आपण बायकाच लक्षात घेत नाही. कधीतरी क्रेडिट घ्यायला शिका गौराक्का! ही वाक्यं कोणे एके काळची एका शुभचिंतकाची गपकन आठवली.
जन्म बाईचा कायम घाईचा असतो खरय... एकाचवेळी अनेक नात्यांना न्याय देण्याची कला तीला अवगत असल्याने ती सतत घाईत असते. पण बाई माणूस घरी दारी सतत करत राहते तीला गृहित धरल जातं. त्यात काही काम बायकांची असा शिक्काच दिलाय का कोण जाणे आपल्याकडे. कशी ना संस्कृती समाज आपला? चुक दाखवली बाईनी, तत्वान वागताना बोट दाखवल की ती ऊद्धट स्वतः ला जास्त शहाणी समजणारी आणि नकारघंटा बिरूदाची. मग त्यावर पुरूषांनी आवाज चढवला की शांत बसायच. का? तर ऊगाच वाद नकोत म्हणून. अडाणी गावाकडील घरी तर हे रोजचच असेल.
बाईचा दिवस घाईचा असतो यावरच एक गमतीदार किस्सा. माझ्या मुलाला कायम न ऊलगडलेला प्रश्न, "सारखे पडदे का धूतेस? तुला रविवारी आराम करायची अॅलर्जी आहे का? बस की जरा. सारख काही तरी धुवत पुसत नाही तर आवरत असतेस." सुटीच्या दिवशी हाक मारली की लगेच "हवेत वाटत पडदे काढून?" झिजतील ते आता... आणि हशा पिकलाच समजा. त्याला माझा अभिमान आहे कारण मी दोन वाजेतोवर स्वयंपाक घरात नसते. सगळ आवरून ईतर ई बरच करते. पण दर रविवारी स्वच्छतेची घाई करते याचा भयंकर राग आहे. अहो पण खर कारण घरातली जळमटं, आटाळा, विस्कटलेली कपाटं हे फक्त बायकांनाच दिसतं. मी या घाईच्या कामांना एक दिवस महिन्यातला दिलेला असतो.
वयाच्या बावीस वर्षात जर मी आईला असच घरात काय आणि बाहेर काय सतत घाईतच बघितलय तर मी तशीच असणार ना! पण अगदी खर सांगते मला माझ्यातली बाई घाईच्याच जन्माची आवडेल कारण तो मी माझा प्लस पॉईंट समजते. त्या घाईत मी माझ्या आजूबाजूची नाती प्रगल्भ करते, माया करायची सवय माझी वाढते, समोरचा कसाही वागला तरी मी काही क्षणात आहे तशीच छान आहे आणि आनंदी आहे बघायला मला आवडेल. शेवटी बाईपण भारी देवा! बाई पण भारी देवा!
जन्म बाईचा ss बाईचा ss खुप घाईचा!
तो मायेचा मायेचा जसा गंधच जाईचा!
गौरी पाठक
२७ मे २०२६