Wednesday, 27 May 2026

विषय अधिकातले.

शब्दकळी विजया बरोबर लेखन उपक्रम २
अधिकमासा निमित्त १७ मै ते १५ जून २०२६

१) मी नेमकी कोण?
२) माझे कुटुंब माझी ताकाद 
३) मी आणि समाज 
४) माझी रंगांची दुनिया 
५) पर्याय 
६) परीक्षा
७) मी अशी कशी? वेगळी..
८) माझ्या स्वप्नातील एक हलकाफुलका क्षण
९) मैत्रीच्या राज्यातली मी राणी
१०)  जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा..






काहूर
आधीच ठरल होतं सगळं तो आज येणार होता. खरतर सकाळीच येऊन थबकण अपेक्षित होतं. काय झालं असेल? तस पाठवणारी व्यक्ती वेळेची पक्की आहे आणि तो येणार म्हणून मी पण खुप खुप ऊत्सुक होते सकाळपासून.
तो आला की दिवसभर त्याला कसा वेळ देऊ ? कसा असेल तो?  आपण वाट बघत असलेल कोणी आल नाही की काहूर माजतं मनात. मग मी ठरवल ही भावनाच लिहून काढू कारण एरवी ही भावना निर्माण होण अवघडच.
चाळीसेक जणींनी यांच्याबरोबर दंगा करायच योजलेल पण हा पठ्ठा आलाच नाही अजून.
अहो कोण म्हणून काय विचारताय? तोच तो विजयाताईचा "विषय". 
२१ दिवस तो रोज येणार आहे आणि आमचा अधिकमास माधवांना अर्पित मोहून जाणार आहे तोच "तो - विषय!"
प्रतिक्षेतली..
गौरी पाठक 
१८ मे २०२६
#####

दिवस पहिला
 अधिकमास विशेष ...
 शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2

*मी* ....*नेमकी कोण?* 
----------------------------------
कोण आहे मी? असा प्रश्न मी मला कधी विचारलाच नव्हता गं! बावीस वर्षे रुपाली आणि पंचवीस वर्षे मी गौरी आहेच पण ती नावं माझ्या व्यक्तिमत्त्वाची झाली.
पण माझ्यातली मी रसिक आहे, हळवी आहे, आनंद झाला कि तो वाटलाच पाहिजे आणि वाटला की खुलणारी कळी आहे, कान्हाजींच्या विश्वासाची छडी आहे, ठरवलेल पुर केलच पाहिजे या या हट्टाची गोणी आहे.
माझ्यातली मी देववेडी आहे, जे आहे ते देत रहा यावर जगणारी नागाची फणी आहे, मायेच्या ताकावरच दाणेदार लोणी आहे.
मी... नेमकी कोण आहे? माणसांना आपल करण्यात राम मानणारी फक्त छोटीशी दोर आहे. सनबाबाची फॅन आहे आणि कान्हाजींना पाहणं हे एकच ध्यान आहे.
मी कोण आहे ? तर सुंदर विश्वाच्या कपाटातला सकारात्मकतेन चमचमणारा एक काजवा आहे.
मी जी काही आहे ती परमेश्वराची देणच आहे.
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
१८ मे २०२६
####
*दिवस दुसरा* 
 अधिकमास विशेष शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्र 2...

 माझे कुटुंब माझी ताकद....
नुकतंच एकदिवसीय सहलीसाठी गेलो होतो तिकडे हे फणसाच झाड बघून ही कविता आठवली होती. आजचा विषय वाचला आणि मला माझ कुटुंब या फणसासारखं भासलं. आतले गरे जसे एकमेकांना सामावून बसतात, वाढतात, परिपक्व होतात. हळुहळू कालांतराने गोडी चढत जाते. एकोप्याने राहून एकमेकांना सामावून घेत वाढतात हीच खरी तकाद हेच खरं कुटुंब.
जन्म झाल्यापासून आधी कुटुंब आईनी सुरू होतं. कालांतराने विश्वची माझे घर समजू लागल की ते वाढतं. माझ कुटुंब माझी ताकाद आहे हे मी पण आज अभिमानाने सांगू इच्छिते. माझ कुटुंब आठ जणांच, आम्ही तिघं सासू -सासरे, दीर -जाऊ -पुतणी. कुटुंब बांधून ठेवताना मी सासूबाईंना बघितलं, ते कष्ट ते प्रेम ती आपुलकी देण सोप काम नाही. मी ते बाळकडू त्या़च्या सहवासात आत्मसात करू शकले.
माझ्या आईकडून संस्कार लाभले आणि सासूकडून संस्कारानं घर बांधून ठेवायला शिकायला मिळालं. सासू नावाच दूधच ईतक मस्त होत की सून नावाची साखर कधी विरघळली समजलच नाही. माझ्या प्रत्येक यशात या कुटुंबाचा मला कायमच आधार लाभला आहे. कान्हाजी ऊगाच कोणास भेटवत नाहीत त्यांचे आयोजन फक्कड असतं. ज्याची जी क्षमता त्याला तो ते ते काम देतो. त्यामुळे कुटुंबाकडून किंवा कुटुंबातील कोणाकडून झालेल कोणतही काम  आम्ही केल नसून ते परमेश्वरानीच करून घेतल म्हणायला हरकत नाही.
कुटुंब माझा आधार म्हणताना पारदर्शकता महत्त्वाची. आपली जबाबदारी पण समजणं गरजेच असतं. जर समजत नसेल तर जाणीव करून देण आणि दिल्यावर त्याचा आनंदाने स्विकारण्याची कला कुटुंबत समजते. माझी आवडती कविता जी "माझा कुटुंब माझी ताकद" याबाबतची भावना पूर्णपणे दर्शवते ती नक्कीच आवडेल तुम्हाला पण, बघा आणि कळवा मला नक्की!
गौरी पाठक 
९९७०१६८०१४
१९ मे २०२६
####
चयन किया किसने भला, अपना घर परिवार
यह तो है भगवान का, हम सब को उपहार।१।
बन्धन केवल रक्त से, रखना कब आसान
जोड़े घर परिवार को, प्रीत, खुशी सम्मान।२।
पूरखों ने हम को दिया, इस जीवन का सार
प्रीत निभाकर नित करो, जग को घर परिवार।३।
दुआ करो परिवार सिर, रहे ईश का हाथ
बिना शर्त जो आपका, सुख दुख में दे साथ।४।
जैसे मोती गूँथ कर, बनता सुन्दर हार
त्यों रिश्ते की डोर से, बँध बनता परिवार।५।
पाता घर परिवार से, जीवन सुन्दर रूप
देता कोमल छाँव जो, रोके तपती धूप।६।
घर जाकर परिवार सह, कर भोजन आराम
उससे ऐसा सुख मिले,ज्यों लिये ईश का नाम।७।
जिनको लोगों इस समय, मधुशाला से प्यार
कोरोना की गोद में , डाल रहे परिवार।८।
एकाकी जीवन सदा, बैठा दुख की छाँव
पड़ जाते परिवार में, बरबस सुख के पाँव।९।
रोग रहित हो कर स्वयं, पहुँचो घर के द्वार
देना निज परिवार को, सुखद मिलन उपहार।१०।
रहे शान्ति परिवार में, वन-वन भटके राम
आज समय घर में रहो, करो न वैसा काम।११।
खुशियों का आँगन बड़ा, करता घर परिवार
आज नगर से जा रहे, करके यही विचार।१२।
- लक्ष्मण धामी 'मुसाफिर'
######
दिवस तिसरा
 *अधिकमास विशेष ..
 शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2* 
 *मी आणि समाज* 
----------------------------------
अनेक "मी" मिळून समाज होतो. माझ्यामते  एकाच विचिरसरणीचे आणि मनास पटणाऱ्या दिव्यतेस अग्रस्थान देणारे अनेक मी जेव्हा एकत्र एका समूहात येतात तो झाला "समाज". समाजात संरक्षण, समानता, सत्यनिष्ठा टिकून राहण्यासाठी तो सुद्ढ राहण्यासाठी अनुशासन महत्वाचा भाग असतो.
मी एका ठराविक समाजचा भाग आहे अस म्हणताना त्यात सगळ्या जातीचे भाषेचे असणारच. सगळ्या प्रांतीयांना समाज बांधून ठेवतो.
मी आणि समाज विषय असेल तर मला सांगायला आवडेल की माझ्या लहानपणी आजुबाजुला असलेल्या माणसांकडून ऊर्फ समाजाकडून खुप छान अनुभव आले. एकोप्याने कसे राहावे, शेजारधर्म कसा पाळावा, संस्कृती कशी जपावी हे शिकायला मिळालं. माणुस बनताना घडताना आजुबाजुला बघुन मोठा होतो. तेव्हा हा समाजच बघतो ना - म्हणून मी समाज या तळ्यातला एक थेंब आहे अस म्हणेन.
माझ्या नशिबाने माझ्या समज येत्या वयात अनुशासित व्यक्ती समाजात सतत बघत आल्याने तो पगडा जास्त आहे. जो जगताना आधार आहे. आपण एकत्र आलो की समाज होतो. समाज आला की संस्कृती वाढते. संस्कृती टिकली की एकी वाढते आणि सुदृढ राष्ट्र यानेच बनते.
माझ्या परीने संस्कृती टिकवणे तसेच एकोप्याने राहणे करत राहणे हे प्रत्येक 'मी'च समाजाप्रती देणं आहे अस म्हणेन. प्रत्येकाची क्षमता, कार्यक्षमता आणि कौशल्य वेगळे त्यामुळे प्रत्येक 'मी' ने आपापल्या सोईने ते करावे अर्थात करतच असतात.
लहानपणापासूनच अनुशासित समाज बघत आल्याने मी मला त्या ढाच्यातच बघत राहवे / बघावे असे नेहमी वाटते. यावर मज जवळ शब्द नाहीत  कारण समाज हा विषय मोठ्ठा, बौद्धिक आणि मोलाचा आहे माझा यावर फार अभ्यास नाही. 
तरी आज किंचित तरी विचार केला गेला हे मात्र खरे. सकाळी विषय समजल्या पासून एक शब्द पुसटसा समोर येत होता... तो सापडला "अनुशासन " बस्स माझ्या मते समाज म्हणजे अनुशासन ईतकीच झेप माझी.
धन्यवाद 
गौरी पाठक
२० मे २०२६
दिवस चौथा*
*अधिकमास विशेष ...
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2
माझी रंगांची दुनिया
----------------------------------
रंग....आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळे रंग असतात...रंग नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात...प्रत्येक रंगाचे काहीतरी वेगळेपण असते....वेगवेगळ्या रंगांशी आपल्या वेगवेगळ्या भावभावना जोडलेल्या असतात....कपडे, लहान मोठ्या वस्तू असे काहीही खरेदी करत असताना आपण  रंगांना विशेष महत्व देतो ....
तर मग आज आपल्याला लिहायचं आहे..
रंगांसोबत जोडलेल्या आपल्या  वेगवेगळ्या भावना ....
*माझी रंगांची दुनिया*
रंग अहा! काय सुरेख विषय. रंग म्हटल की शामसुंदर आठवणारच... प्रकृतीचे सात काय आठ रंग आपल्या जीवनात खुप मोलाचे. त्याचे गुण त्यांचे पडसाद आपण दैनंदिन दिनचर्येत वापरतो पण आज त्यावर प्रकाशझोत पडेल.
तांबडा रंग शुरता, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती आणि निर्भयता दाखवतो. ऑफिसमध्ये निघताना देवघरात झपकन डोकवतानाच कुंकू मला या तांबड्या रंगाच विचारताच डोळ्यासमोर आलं. नवरात्रीतल कुंकूमार्चन करतानाची भावना अगदी हीच असते ही भावना जागृत झाली आणि पुतळाबाईंचे कुंकू आणि मेणाबद्दलचे संवाद आठवले.
नारंगी रंग ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व ऊजागर करतो, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे सुखी समाधानाचे संकेत देणारा. मला नारंगी रंग म्हणताच रोज बघत आनंद मिळणारा माझा सनबाबाच आठवला. अहो, नारंगी रंगाच्या असंख्य छटा तो दाखवतो. जगण्याची ऊमेद देतो. गुरु ठाकूर म्हणतात तेच जणू तो मला रोज सांगतो -"ये पुन्हा नव्या दिवसाची चल घडी मोडून पाहू."
पिवळा रंग जगण्यातला ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो. हा मनामध्ये नवे विचार निर्माण करतो. मी रोज सकाळी स्वयंपाकघरात गेले की गॅस सुरू करताच तो मला रोज दिसतो ज्योतीच्या स्वरूपात. भाईश्री रमेशभाई ओझा म्हणतात, "एक माटी का दिया सारी रात अंधियारे से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू किस बात से डरता है?"
हिरवा रंग सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद सांगतो. मग मला बेssबी का नाही आठवणार. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि फक्त माझा असा कोपरा माझी झाडं ऊर्फ माय बेबीssज. मी रोज टेरेसमधे जाताना बेssबी हाक मारते. सगळे माझी मी त्यांची वाट बघतो अस मला वाटत कारण मन गुंतलय त्यांच्यात, पेरलेल ऊगवून बहरेपर्यंत मी बरोबर असते. कढिपत्ता आजारी होता तो आता पालवी फुटतोय कालच मी खुप जोरदार ओरडले होते. प्रत्येक पानाला हात लावणं कळी धरली की काळजी घे कानात कुजबुजणं सगळ सगळं अजबच आहे. ती सगळी मंडळी मला सांगतात, "रोज बाॅंटे .. रोज बढेगी... एक मुस्कुराहट.. दुसरी दुआ!"
निळा रंग अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक आहे. निळा रंग मला रोज घरी जाताना आकाशातला भावतो.
सूर्यास्तानंतरचा निळे पणा.. मला सांगतो.. गो विथ द फ्लो...
पांढरा रंग ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतकच की, पवित्रता, शांतता संयम व ध्यान सुचक आहे हा. मला पांढरा रंग दुधात सापडतो. भावनांना ऊचंबळु न देता  शांत बसत जा गं. तरच तरशील हे रोज दुध वर आल की शिताफीन गॅस बंद करताना तो रंग सांगतो. पण आनंद दुःख दोन्हींनी उच्च कोटीची सीमा गाठली तरी ऊतू न जाण मला काही अजून जमलेल नाही.  जमल पाहिजे अति आनंद झाला तरी संयम ठेवायला.
ज़िंदगी सस्ती मै साहब, जीने के तरीके महेंगे है... गुलजार.
जांभळा रंग आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा. आद्ध्यात्मिक जगाशी संबंधित हा रंग नुसता ऐकून वाचून आहे. अजून अनुभूती आलेली नाही. मी वाट पाहितेय हा कधी सापडेल मला.
"हमें खुद अपनें सितारे तलाशने होंगे, ये एक जुगनू ने समझा दिया चमकें मुझें.."
काळा रंग सगळ्यांचा राजा रांगोळी काढली की काळ्या रंगाची कड दिली कि ती खुलून दिसते तसच आहे. अगदी बाळाच्या तीटेसारखी.  या रंगाच्या कपड्यात आपण खुलून दिसतो. हे खरय पण मी त्रस्त आहे कारण ही पुढची पिढी फक्त काळेच कपडे जास्त घालते. "मेरी दुनिया है सबसे हसीन" अस म्हणतात वर.  घ्या... आता बोला...
रंगात रंगूनी सार्या रंग माझा वेगळा!
गौरी पाठक
२१ मे २०२६

###
*दिवस पाचवा...* *अधिक मास विशेष* 
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2* 
पर्याय
---------------------------------------- 
 *योग्यवेळी योग्य पर्याय निवडता आला तरच आयुष्यात यशस्वी होता येते
 *याउलट कधीतरी पर्याय नाही असं समजून चिकाटीने एखादी गोष्ट करूनच यशस्वी होता येते ....
 *त्यामुळे पर्याय समजून घेतले तरच आनंदी, सुखी, समृध्द जगण्याला कोणताच पर्याय नाही इतकं नक्की .....
आजचा विषय आहे... *पर्याय* 😍

काय जबरदस्त धगधगत्या विषय आहे हा! आपण आपल्या आयुष्यात शोधलेल्या पर्यायांना सांगणं किंवा ते जगलेलं व्यक्त होणं महा कठिण आणि धैर्याच काम.
कसं? समजेल हळूहळू मला काय म्हणायचे आहे ते.

धैर्यान योग्य पर्याय निवडून जगण जमल तरच आपण चांगले आरोग्य, मन:शांती आणि अर्थपूर्ण नात्यांनी जगू शकतो.

रोज जगताना नात्यांमधे आपण एकमेकांना आपल समजतो त्यात काहींच्या मानसिक अक्षमतेमुळे आपण आपलेपणानं वागत आलो असलो तरी आपल्याच माथी खापर फोडलं जातं.यावर स्वतः ला बदलण्या शिवाय पर्याय नाही हे जेव्हा समजत तेव्हा आपण शांतीत जगू शकतो. आपण आपल समजतो त्या परमेश्वराच्या अंशाची क्षमता जोखण आपण कमी पडलो अस म्हणायच आणि एकदाच समक्ष न आवडलेली गोष्ट सांगून मनमोकळेपणाने पुढ जायचं. कारण नाती टिकवायची आहेत. माणूस प्रगल्भ होतो तो असाच ना. अशा आलेल्या अनुभवावरून योग्य विचार करून योग्य पर्याय शोधतोच शोधतो. यात नातं या शीर्षकाखाली अगणित लोकं येतात. हा झाला नात्यांतला पर्याय.
आता वैयक्तिक जगताना एक स्त्री म्हणून जे जे करण गरजेच ते करताना पण आपण स्वतः ला सारून  पर्याय निवडतो आणि स्वतः च समाधान करून देतो की करून घेईन. ही विचारसरणी छापलीय मनावर पिढी दर पिढी. कामावर जाताना सगळ्यांना नाश्ता पुरेल मी काय कालची पोळी चहात संपवेन अशी मानसिकता... 
आधीच्या पिढीतली पर्याय निवडण्याचा दृष्टीकोन आता थोडा बदलून पण सकारात्मकपणेच बरं का, जगलो तर आपण आनंदी खुप खुप मनमुराद जगू शकतो. काही फरक पडत नाही आपण एखाद्या नकारात्मक नात्याला किंवा दृष्टीकोनाला पर्याय निवडला तर. कारण जगातला प्रत्येक जण झगडतोय स्वतः शी, स्वतः ला सिद्ध करताना जगण्यासाठी जगाशी मग का मन भारी करून जगायचं?
मग अर्थपूर्ण नात टिकवायच तसेच आनंदी उद्देश पूर्ण जीवन जगायच तर पर्याय योग्य निवडण्याची सक्रिय क्षमताच आधी वाढली पाहिजे. एखाद्या नात्यात त्रस्त झालो दहा पंधरा दिवस लांब राहायचा पर्याय निवडण मला चूक वाटत नाही. कारण ती व्यक्ती टामटुमित असते आपण का नकारात्मकता मनास चिकटवून स्वतः चा र्हास करायचा.
आपणही आपल्याला समोर ठेवून स्वतः साठी जगताना, व्यक्ती वस्तू काम यावर आपले जगतानाचे पर्याय बदलू शकतो आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण घेतलेला कोणत्याही निर्णय कालांतराने चुक होता अस वाटून खचून न जाणे कारण तो त्यावेळी योग्य होता. 
विजयाताई म्हणाली तस वस्तू, व्यक्ती आणि काम यात पर्याय निवडताना पर्याय बदलू शकतात. आज एकविसाव्या शतकात जगताना मला वाटतंय की सगळ्या सुंदर स्त्रीयांनी आधी स्वतः मानसिक आरोग्यावर ऊपकारक पर्याय निवडले जावेत. कारण आपण ठणठणीत तर घर ठणठणीत हे सूत्र काहीही झाल जग पलटल तरी बदलेल अस वाटत नाही.
योग्य वेळी योग्य पर्याय सकारात्मक तेने निवडला की आपोआप च नाती वस्तू काम सुसंगत चालेल.
पर्याय म्हणाल तर मी स्वतः माझ्या मानसिक आणि ओघानं येणार्या शारिरीक पातळीवर जे योग्य तेच निवडेन यासाठी माझ मन सशक्त करणार... करतेय...
काही वेळा निर्माण करावा लागतो पर्याय हे पण शंभर टक्के बरोबर. धगधगता विषय अशासाठी म्हटल कारण आपण का आणि कोणता पर्याय निवडला सांगताना भक्कम मानसिक बैठक लागते. समोरचा हे कस घेईल याची परवा न करता शब्द लिहणं जोखीम असते पण यातुनच आपले कळतात. मग आपले ते सोबत घेऊन आणि तुपले ते जमेल तसे कोड सोडवत पण तरी बरोबर घेऊ जगायची सवय लागेल. कारण जगताना काहीवेळा कोणताही पर्याय नसतो.
शुभं भवतु!
गौरी पाठक 
२२ मे २०२६

###

*दिवस सहावा* 
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी सोबत लेखन उपक्रम 2* 

 *आजचा विषय - परीक्षा*

पदोपदी परीक्षा आहेच मग ती व्यक्ती कोणी असू दे. जन्म घेताना बाहेर येतानापासून परत जाताना पर्यंत परीक्षा.
काल तर चित्रपटाचा ट्रेलर पण हाच "देवाची परीक्षा". 
जगण्यासाठी कायम परीक्षा देत राहायच. पास नापास मधून सुधारत आवृत्ती बाहेर पडते.
प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो — कधी संयम, कधी स्वतःची किंमत, कधी नात्यांची ओळख, तर कधी स्वतःवर प्रेम करायला.
परीक्षा नसती तर सरळ आयुष्यात मजा नसती नीट विचार केला तर ऊमगेल.
आपण कितीही सुधारून वागा वावरा कोणती तरी परीक्षा पार पाडत जगा लोक परीक्षा करतातच.
मग कशाला रडा? स्वतः कस बरोबर सिद्ध करायचा झगडा त्यातसुद्धा परीक्षा. जगताना घर माणस नोकरी समाज यात सेट होताना पण परीक्षा यात शंभर वेळा पास झालो तरी एकदा झालेला नापास शिक्काच सतत दाखवणारे भेटणार तो सोडून देत जगायची पण परीक्षाच.
मी हल्ली फार मनावर घेण सोडलय. आला पेपर दिला पेपर मग ती कोणतीही असो परीक्षा.
फक्त एकच करायच प्रत्येक परीक्षेनंतर नवीन गोष्टी मिळतायत ना.
आज मला गमतीदार किस्सा आठवला. जे स्वप्न मला लहानपणी कायम पडायचं. मी पेपरला गेलेय आणि पेपर वेगळयाच विषयाचा आहे. आठवल ना मे की बारीकसं हसू फुटतच.
हल्ली मी पेपर देते आणि कान्हाजींवर परीक्षेचं भवितव्य सोपवते.
मंदार कवींची एक कविता आठवली..
झुगारून दे सगळ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
अडवतील ही लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला ऊजळायचे पुन्हा,
मंत्र आहे हा एकला,
थांबला जो इथे तो संपला.

जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
२३ मे २०२६
###
दिवस सातवा : अधिक मास विशेष :
शब्दकळी  बरोबर उपक्रम २
आजचा विषय : मी अशी कशी? वेगळी...
मला सकाळपासून चौकटराजा मधला दिलीप प्रभावळकर यांचृया तोंडच वाक्य आठवतय."मी असा कसा वेगळा?" खर तर प्रत्येक जण वेगळा असतोच. मला सगळ्यांमधे राहायला आवडतं, घरात दिवे कमी असावेत पण माणसं जास्त हवी तरी मी म्हणतेच की सगळे आपलेच असतात पण आपलं बिपलं कोणी नसतं. मी अशी कशी? वेगळी...
जगतानाची एवढी वर्षे जर मी तपासली तर खरच मी मलाच ओळखणार नाही. रडूबाई, धांदरट सतत धाक मनात दडपण अशी वावरणारी पण सहवास, अनुभव आणि वय सगळ शिकवतं. त्यामुळे मी अशीच आहे आता वेगळी. पटल तर हो म्हणेन नाही पटल तर मागे बोलणार नाही एकदा दोनदा सोडून देऊन समोर सांगेन. अशीच आहे मी वेगळी. 
एखाद्या नात्यातील व्यक्तीबद्दल एकत्र तिटकारात्मक बोलताना ईतर मात्र ती व्यक्ती आली की खर मन झाकून बोलतात. तू अस नको करूस हे वयान मोठे पण सा़गत नाहीत. कारण काय तर वाईटपणा कोण घेईल. अशांना सामोर जायला गौरीचा खांदा बंदूक यांची. आता मी खांदा देण बंद करून चारेक वर्षे झाली असतील. मी आता जवळची पण हेवा वाटणारी पण तरी मनान मला चांगल चोखणारी पण ओळखून वागते आणि वेळ पडली तरचौकटीत पण ठेवते, हो मी आहेच अशी वेगळी.
मुखवटे लाऊन जगत नाही. आपल मानल त्याला कोण बदाबद गंडवत असेल तर बाजू घेते, पुढे अस होणार नाही याचा विचार करत बसत नाही किंवा एवढे मोठे समोर असताना मी कस मधे बोलू असा पप्पू विचारही करत नाही.  हो मी आहेच थोडीशी वेगळी.
सणवार, पुजापाठ संस्कृती मानते मी आवडतच मला संस्कृती  ही पाळलीच पाहिजे पण मी पाळी आलेल्या बाईला छी तू वागणूक देत नाही. हो मी आहे अशीच वेगळी - परंपरा पाळताना मुरड कुठं आणि कुठवर घालायची याची चौकट माझी वेगळी.
लहानपणी सर्वसाधारण आयुष्य जगले पण अडल नाही कुठं. जेवढी सुबत्ता घरात होती तेवढी ताटात पडत होती. एकावेळी चार चटण्यांच अवडंबर मी कधी जगलेच नाही किंवा छोट्या वाडा संस्कृतीत असूनही कोणाला मान आणि कोणाला पान हे सदर सोडल नाही. आता बघते ना मी पुरूषांचा निर्णय शिरसावंद्य माना आणि सगळ्याच्या सारख्या तयार्या करून द्या मी त्या साच्यात कधी ढळलेच नाही. अग बाई हो अशी कशी मी? वेगळीच!
ताई बदल हा निसर्गाचा नियम आहे हे मात्र अगदी खरं. मला हे कळून सहा वर्ष झाली आता काहीही वाटत नाही. ऊलट यामुळे मी खंबीर, कणखर, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करणारी, स्वतः ची आवड जपत, नैतिक जबाबदारी चा पदर ही घट्ट सांभाळणारी, चुक ला चुक बरोबर ला बरोबर म्हणत नवीन पिढीला आपलस करण्याची भक्कम तयारी करत म्हणाल तेव्हा ऊंच भरारीस तयार अशी मी वेगळी!  अश्शीच मी मला स्वतःला खुप खुप आवडते.
भरपूर शिकत राहावं, सतत नवीन गोष्टी माहित शोधत जगावं, रोज एका तरी माणसास मनापासून आनंद देत जगावं, आनंदाचे सुखद क्षण शोधावे तो आनंद वाटावा, न जमणार्यांना तो प्रोत्साहन व्हावा त्यांनी पण तसच जगावं, घरात भरपूर जण यावेत, खाऊन पिऊन जावेत, जीवनाच्या पाटीवरची माती सारत हवे ते दगड ऊचलत छान अक्षर लिहावी -"मी अशीच आहे - वेगळीच"
"हर पल में प्यार है, हर लम्हें में ख़ुशी,
कह दो तो यादे ह़ै,  जी लो तो जिंद़गी ||"
गौरी पाठक 
२४ मे २०२६
###
*दिवस आठवा* 
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2* 
---------------------------------------
माझ्या स्वप्नातील एक हलका फुलका निवांत दिवस* ....

अगsss बाई, "तुझ्या स्वप्नातला हलका फुलका निवांत दिवस काय आहे?" आजवर एक्कानही असा प्रश्न मला विचारलेला नाही. थांबा ह्रदय धडधडू लागलय आणि स्वप्नांची पानं फडफडू!
हवं तस जगू देण्यावर कधीही निर्बंध न घालणाराच जोडीदार लाभलाय पण हा प्रश्न वेगळाच आहे. आपण बरेच चित्रपट बघतो त्यासारखे पडसाद म्हणा नाहीतर काहीही म्हणा मी मुलाला एक दोनदा सहज म्हटलेल. मी जर अचानक कुठं सापडले नाही तरी काळजी नसावी. माझी ईच्छा आहे मी दहा बारा पुस्तकं, दोन वह्या पेन आणि ब्रह्मविद्येच्या पाठांसकट बस पकडून पुस्तकांच गाव भिलारला जावं. सहा सात दिवस मी जग विसरावं. भिलारगावच्या होम स्टे मधे राहायचय आणि हवं तेव्हा हवं तेवढा वेळ पुस्तकं वाचायची आहेत. 
पहाटे ब्रह्मविद्येच्या अभ्यासानंतर सुंदर सनबाबा बघून महाबळेश्वरच्या कृष्णाबाई देवळासमोर हव तेवढा ध्यान सराव करायचा आहे. नंतरचा सगळा वेळ पुस्तकं आणि घरच्या भाकरीनी हाक मारली की जेवायचं परत वाचायचं. संध्याकाळी मंद वारा गावतल्या झाडांचा वास आणि चहा, अंधाराआधी परत खोलीत वाचन.
संध्याकाळी तासभर चालत फेरफटका जवळपास मारायचा. गावातली घरं रस्ते दिवेलागणीला खुप वेगळे दिसतात हे फक्त वाचलय ते अनुभवायचय.
(केरळमधे हा अनुभव वाडीत आलेला आहे तोपुन्हा केव्हातरी सांगेन.).
ना घड्याळाची घाई, ना वेळेची काही रीत,
वाचनात रमलेलं मन आणि ध्यानात सापडते प्रीत.
(कवी ठाऊक नाही )
सहा सात दिवस मी माझी पुस्तकं, माझा आणि कान्हाजींचा एकांतात संवाद आणि निसर्ग ईतकं...
कोणतीही नैतिक जबाबदारी पाळण्याच दडपण नाही - मी, पुस्तकं वही पेन आणि माझे कान्हाजी....
 *तळटीप* : एक मात्र ठरवलय हा प्रश्न दरमहा कोणाला तरी विचारणारच. कोणजाणे कोणाला तरी खरच गरज असेल..
सौ. गौरी पाठक 
२५ मे २०२६

###
*दिवस नववा*
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------

 *विषय - मैत्रीच्या राज्यातील मी राणी* ...

आज आपल्या एका किंवा अनेक मैत्रिणींबद्दल लिहायचं आहे .. एखादा प्रसंग, सुंदर आठवण, एखाद्या मैत्रिणीचे कौतुक, एखाद्या मैत्रिणीची सोबत, मदत.....काहीही लिहा...मैत्रीबद्दल लिहा...आज स्वतः ला मैत्रीच्या राज्यातील राणी समजून मनातलं लिहा....आणि हो आठवणींने आपल्या मैत्रिणींना ते पाठवा.....

आज मला माझ्या एका मैत्रिणीला पत्र लिहावे वाटते आहे .. तेच लिहिते मी...

प्रिय पल्लवीस,
एक घट्ट मिठी! आजवर प्रत्यक्ष भेटीतून, लाभलेल्या सहवासातून, आवडी - विचार समजून मग माणूस मैत्री या बिरूदाखाली आलीय माझ्या आयुष्यात.  पण आपण तर चार वर्षात तीनदाच प्रत्यक्ष भेटलो. ध्यान वर्गाच्या अभ्यासात एकमेकांना मदत करत वर्ग चालु राहिला ईतकीच काय ती ओळख आणि सहवास!
पण तुझी गोष्ट वेगळी आहे, कधी मैत्रिण म्हणवली गेलीस समजलच नाही. वर्ग घेतानाच्या किंवा कधी कधी वैयक्तिक क्षुल्लक अडचणी पण शेअर केल्या जाऊन तोडगा सापडला आहे मला.  एखाद माणूस अस असत आयुष्यात की तो हलकासा पडदा सरकवतो फक्त आणि आपल्या ला लख्ख दिसतं. खरं खरं सांगते मनाच मनाशी नातं कस असतं आणि आपली मैत्रीण तीच्या बद्दल ओढ प्रेम वाटत ते मी तुझ्या मैत्रीत अनुभवलं.
तुझ्या गरोदरपणाच्या सर्व प्रवासात मी तुझ्याबरोबर एका बारीकशा किनारीसारखी होते. तुझा डोहाळजेवण आहे सुटी टाका आणि या गौरी मॅडम हा फोन  मला हक्काच सोनेरी बोट लावून मनास स्पर्शून गेला.
"ऑफिस चा दिवस असूनही पुण्याहून मुंबईला फक्त डोहाळजेवण आहे म्हणून तू जाणार आहेस? " हा प्रश्न मला नवर्यानी जेव्हा विचारला तेव्हा मला समजल की तू माझी किती जवळची मैत्रीण आहेस ते.
मुंबईत जायच कस ? कुठं? जमेल का? अनेक प्रश्न होते पण ईच्छा तीव्र होती. मी बसनी जाईन अस स्वतः ला धीरान समजवलं.  आपल्याला ओढ वाटतेय भेटाव वाटतय कौतुक कराव वाटतय त्यात वाहन आणि प्रवास अडथळा नाही बनवायचा. तसही मी हल्ली ठरवलय आणा पोचवा सोडा अस कोणी नसल तरी अडकून न पढता एकट लहान सहान ठिकाणी जायचच. एकट पण कसही कुठही नवख्या जागी जायची सवय हवीच. कोणी गाडीन सोडणारं नसल तरी अडता कामा नये. मी अशी दहा बारा वर्षांपूर्वी एकटी चार वरषाच लेकरू घेऊनही गेलेली आहे हे आठवल आणि बसच तिकीट काढलं. मुंबईत जायचय तर एक चान्स घेऊन पुतणी आहे का फ्री विचारलं आणि आनंदाने हो म्हणाली. 
आणि दोघी तुझ्या डोहाळजेवणाला मस्त आवरून पोचलो सुद्धि! तो गुरूवार फार छान होता. तुझ्या मैत्रीमुळे मला तो आत्मविश्वास परत आठवता झाला. 
मी तुमच्या घरच कोणीही ओळखत नसतानाही तुमची बनून तो कार्यक्रम सुरेख अनुभवला. आज तुझ्या पदरात गोंडस कान्हाजी आले आहेत ही कल्पनाच खुप सुंदर आहे मला. कान्हाजी प्राप्ती ची तुझी इच्छा, त्या पूर्तीचा तुझा ध्यास, मिळालेली जोडीदाराची आईची साथ तुझ्यातल्या आईचा गगनात न मावणारा आनंद, आज कान्हाजी येत आहेत ही उच्च कोटीची आनंदी वार्तेता कम धकधक ते थेट कान्हाजी कुशीत... सगळ्याची मी साक्षिदार.... कसल मस्त वाटलं सांगू का! मुलगा झाला वाचून. मी तत्काळ मोनिका आणि पुतणी दोघींबरोबर तो आनंद वाटला.
पल्लवी तू खुप मनमोकळी आहे. सतत भरभरून बोलत असतेस, तत्वासाठीचा झगडा, अन्यायाची चीड मी तुझ्यात जेव्हा बघते तेव्हा मला मी तुझ्यात मलाच काही वर्षांपूर्वी ची बघते आणि हसते. एक लक्षात ठेव की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल समजत चालायचच पण मधे काही क्षण दम घ्यायचा स्वतः साठी विश्राऊसाठी जी आपोआपच सिंहावलोकन करवते. मला हे जरssरा उशिरा समजलं.
तर मग पल्लवीताई खोचा पदर कारण कान्हाजी हवेत म्हणण ठिक पण त्यांना सांभाळायच आता. आईपण खुप खुप भरभरून जग. या जगण्यातल्या क्षणांचा पुढे खुप छिन आधार होतो आपण हे क्षण आठवून वाट्टेल ते करायची ऊभारी भरू शकतो. दोन महिन्यांनी ध्यानसत्रात भेटूच.
आई बाबा झाल्याच्या उभयतांना अनंत शुभेच्छा!
आराम कर आळजी घे.
आज मैत्रीच्या राज्यातली राणी बनून मनान मनाशी संवाद साधताना तु मला सापडलीस यासाठी खुप खुप आभार.
तुझीच,
सौ. गौरी मॅडम 
२६ मे २०२६
###

*दिवस दहावा*
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------
स्त्री होणं म्हणजे नक्कीच सुख आहे... पण या स्त्रित्वाची खरी कहाणी प्रत्येकीची वेगळीच.. मग लिहा आज याच तुमच्या जन्माबद्दल.
 *विषय - जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा...* ...

सकाळी विषय आला आणि डोक्यात शब्दांची मंडई झाली. "गौरी शांत बस आधी हातची कामं ऊरक." अस मनाला समजवत मी कामं केली. हो मी स्वतःला पण हाक मारते. कामाचा ढिग असला तरी चहा पीत टेरेसमधे बेबीज बरोबर चहा घेते आणि थोड्यावेळाने म्हणते,"गौरी उठ.. तुलाच तुझी कामं करायची आहेत. मै तो चssलीss" खरय मी अशीच बागडते घरी याला साक्षीदार फक्त सासूबाईच! (खर तर ती काम मलाच माझी वाटत असतात फक्त, जगास त्याचे काहीही पडलेले नसते.) सकाळ उठल्यापासून रात्री पलंगावर पाठ टेके पर्यंत जगाचाच विचार डोक्यात असतो. आता हल्ली हल्ली मी थोडा का होईना माझा पण विचार करतेच.
आपण कितीही आठवणीनी घरच्यासाठी सगळ केलं तरी एक क्षण आपण एखाद चुकून आठवण करणं सुटलेल्या गोष्टीवर ऐकवले जातो. मग वाटत का आठवणी केल्या मी? का अट्टाहास करते जागच्या जागी असण्याचा? का बघितील त्यांच ते म्हटल नाही मी? माझ्या मानणार्यांना कोण बोलत असेल तर मी का ऊसळले?  यासगळ्याचा ईतरांवर काय फरक पडला? काहीही नाही... पण गंमत सांगू का शान्ता शेळकेंच्या कवितेच्या या ओळी वाछा जन्माला बाई माणूस येतानाच रक्तात टोचून आलेलं असतं बाईपण.
"जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच रहावे." काही जगतात आठवत आणि नाही सुचत नाही या पांघरूणाखाली. अपवाद पण बघितल्यात मी बायका.
सृष्टीकर्त्यानं बनवतानाच हे स्त्री पात्र अस बनवलय की ते दमूच शकणार नाही. ती क्षमता विसरेल पण ती असणारच. आता मुद्दा आला घाईचा. का कोण जाणे पण सगळ पटापट आवरायच हे वाक्य आमच्या पाचवीला पुजलेलं. त्यात युनिवर्सल मानसिक शांतता केव्हा लाभते -- "झाला बाई ओटा धुवून!" आज सकाळी ऑफिसला पोचले आणि ऑफिस असिस्टंट ला, हो दोस्त आहे तो आपला त्याला आजची काढलेली रांगोळी दाखवली. तो पटकन म्हटला, "बापरे, रांगोळी डबा घरच आवरून कामावर येता, एवढ सगळ कस करता सकाळी तीन तासात?" मी, "नेहमीच करते" मी इतक सहज ऊत्तरले. मग लक्षात आलं ही खुप कौशल्य कौतुकाची बाब आहे हे जग ओळखत पण आपण बायकाच लक्षात घेत नाही. कधीतरी क्रेडिट घ्यायला शिका गौराक्का! ही वाक्यं कोणे एके काळची एका शुभचिंतकाची गपकन आठवली.
जन्म बाईचा कायम घाईचा असतो खरय... एकाचवेळी अनेक नात्यांना न्याय देण्याची कला तीला अवगत असल्याने ती सतत घाईत असते. पण बाई माणूस घरी दारी सतत करत राहते तीला गृहित धरल जातं. त्यात काही काम बायकांची असा शिक्काच दिलाय का कोण जाणे आपल्याकडे. कशी ना संस्कृती समाज आपला?  चुक दाखवली बाईनी, तत्वान वागताना बोट दाखवल की ती ऊद्धट स्वतः ला जास्त शहाणी समजणारी आणि नकारघंटा बिरूदाची. मग त्यावर पुरूषांनी आवाज चढवला की शांत बसायच. का? तर ऊगाच वाद नकोत म्हणून. अडाणी गावाकडील घरी तर हे रोजचच असेल.
बाईचा दिवस घाईचा असतो यावरच एक गमतीदार किस्सा. माझ्या मुलाला कायम न ऊलगडलेला प्रश्न, "सारखे पडदे का धूतेस? तुला रविवारी आराम करायची अॅलर्जी आहे का? बस की जरा. सारख काही तरी धुवत पुसत नाही तर आवरत असतेस." सुटीच्या दिवशी हाक मारली की लगेच "हवेत वाटत पडदे काढून?" झिजतील ते आता... आणि हशा पिकलाच समजा. त्याला माझा अभिमान आहे कारण मी दोन वाजेतोवर स्वयंपाक घरात नसते. सगळ आवरून ईतर ई बरच करते. पण दर रविवारी स्वच्छतेची घाई करते याचा भयंकर राग आहे.  अहो पण खर कारण घरातली जळमटं, आटाळा, विस्कटलेली कपाटं हे फक्त बायकांनाच दिसतं. मी या घाईच्या कामांना एक दिवस महिन्यातला दिलेला असतो.
वयाच्या बावीस वर्षात जर मी आईला असच घरात काय आणि बाहेर काय  सतत घाईतच बघितलय तर मी तशीच असणार ना! पण अगदी खर सांगते मला माझ्यातली बाई घाईच्याच जन्माची आवडेल कारण तो मी माझा प्लस पॉईंट समजते. त्या घाईत मी माझ्या आजूबाजूची नाती प्रगल्भ करते, माया करायची सवय माझी वाढते, समोरचा कसाही वागला तरी मी काही क्षणात आहे तशीच छान आहे आणि आनंदी आहे बघायला मला आवडेल. शेवटी बाईपण भारी देवा! बाई पण भारी देवा!
जन्म बाईचा ss बाईचा ss खुप घाईचा!
तो मायेचा मायेचा जसा गंधच जाईचा!
गौरी पाठक 
२७ मे २०२६



Monday, 18 May 2026

ओघवत मन


"ते" चार दिवस "त्या" चार आठवणी 

वसंत ऋतूच्या आगमनानं कसं पालवी मार्फत निसर्गातील बदलांची चाहूल लागते. अगदी तस्सच त्या दिवसा आधी व्यष्टीच्या आतमध्ये पेशी गोल गोल फिरू लागल्याची चाहूल लागली कि समजायचं ती येतेय. तिच्या आगमनाची पावती पूर्वी त्रासदायक असायची पण व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने ती आता सहज समजते. तर अशी हि ती चार दिवस आली आणि तिच्या बरोबर चार आठवणी देऊन गेली. चार दिवस वेगळे विचार आणि अनुभव.
हल्ली ती आली कि काही वेळ आधी घुटमळते, मगच येते. पण चार दिवस छान नवनवीन अनुभव देऊन जाते. यावेळी आली ती पण थोडी घुटमळतच पण खुश होती. तिच्या व्यष्टीमधल्या सगळ्या नातलगांना सांभाळून ती आलेली. आज तिचा पहिलाच दिवस होता. तिच्या बरोबर व्यष्टीपण दिवसभर खूप आनंदात होती. तिला सकारात्मकतेने सामोरे गेल्यामुले दिवसाअखेर काय एव्हरग्रीन आहेस तू? असे कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले. तिला बरोबर घेऊनच तो दिवस वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेलाही. आईच्या भाषेत मुडद्या
यासारखी झोपही लागली.
तीनं दुसरा दिवस गाजवलाच, व्यष्टीतल्या सगळ्यांना सकाळीच बजावलं होत कि काय कोण जाणे. लवकर उठायचं भरपूर चालायचं आणि आज दिवसभर खूप कामही उरकायचीत आहेत. आणि काय आश्चर्य ! तिने व्यष्टीबरोबर जे जे काही ठरवलं होतं ते ते सर्व पार पाडलंच. आज तीच खूप खुप कौतुक वाटलं. तीन पाठ थोपटायला कोणाचीही वाट बघितली नाही. या कामासाठी तीच तिला खूप पुरेशी आहे. तू स्वतः पुरेशी आहेस यासाठी कारण तू व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवली आहेस. 
तिचा आज येऊन झालेला तिसरा दिवस होता. आज सकाळपासून मनात विविध विचार होते. भावनिक कल्लोळ होता. आज व्यष्टीला वेळ हवा होता तिचा स्वतःचा असा खास. तिनं तो घेतला. ती आणि व्यष्टी मिळून अवांतर गप्पा मारल्या एकमेकींशी सुसंवाद साधला, माया केली आणि मनमुराद हवा तसा सकाळचा वेळ घालवला. तीन ठरवलं आणि विश्वानी पण मग पदर खोचून तिला साथ दिली. आज तिला तो वेळ घालवणं गरजेचं होतं कारण दिवसा अखेर तिला त्यातून चार्जरची भूमिका बजावायची होती. दुपार कामात गेली. संध्याकाळी भावनांचा न सुटू शकणारा गुंता तिला समोरा जाणार होता. तीन केलेली कामं, ती करत असलेलं कामं आणि तिला भावी आयुष्यात करावं लागणारी कामं या सगळ्याचा लेखाजोखा ती उजळणी करत होती. ती संध्याकाळी तिच्या खूप जवळच्यांना भेटली पण दिवसाअखेर तिला जड वाटत होत. व्यष्टीच्या बाह्य मनाला ते उलघाल वाटत होत. मग  सातत्यान चिंत्तन करायची सवय लावलेल अंतर्मन सरसावल त्यानं गोंजारले, थोपटलं, समजावलं, हलक्या आवाजातल्या अंगाईनी ते बाह्यमन कधी झोपी गेलं समाजलच नाही. तिचा येऊन झालेला आजचा तिसरा दिवस जास्त शिकवून गेला.
ती दरवेळी येते ना तेव्हा काही ना काही वानवळा आणतेच बरोबर. यावेळी व्यष्टीमधील संप्रेरकांवर फुंकर मारून संतुलन कसं साधायचं त्याची कुपी आणली होती.
आज होता तिचा चौथा दिवस. ती सकाळपासूनच जायचं परत म्हणून आपापलं आवारतच होती, पण वानवळा खूपच मस्त असल्यानं तिची व्यष्टीशी झालेली गट्टी तिला त्यातही मदत करत होती. जे जे आज सकाळपासून केलं त्यात त्यात ती भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जगू लागलेलं दिसत म्हणा किंवा जाणवत होत. मग तिनंच सुचवलं आज जाताना चार दिवसांच कोंदण नोंदच करून टाक सं सुचवलं. कस वाटत ना! खरं तर आज तिचा वर्षातला अतिशय दुःखद दिवस पण ती सकाळ पासूनच बरीच बरी होती. हा तिच्यातला बदल होता. चौदा वर्षातला. तिनं भावनिकतेवर मात करून अनुभवाची शिदोरी कशी वापर हे वाणं जाताना पदरात घातलं होत. ती आणि व्यष्टी दोघीही खूप खुश होत्या. 
ये परत वेळेवर गं ... अस  म्हणत कधी दिवस संपला आणि निघायची वेळ झाली समजलच नाही. व्यष्टीन तिचे आभार मानले, तिच्यामुळे सक्रियपणे समष्टीत मुक्त संचार करू शकते याबद्दल. तसेच व्यष्टीत पण योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने व्यवस्थित ठेवली आहेस  यासाठी तिनसुद्धा पाठ थोपटली. छान न्ऊहा माखू घालून ती परत जायला निघाली. जाताना Do and Don'ts ची यादी पण देऊन गेली. 
ती आली आणि चार दिवस मोलाच्या आठवणी अनुभव आणि शिकवणं देऊन गेली. त्या कोणत्या? हे तीच आणि व्यष्टीचं  गुपितच आहे. 
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
९९७०१६८०१४
११ मे २०२६
#####

आई ची आई होताना...
आई हि आपली आई जेव्हा असते तेव्हा ती काय काय करते आपल्यासाठी. अचानक ४० वर्ष मी मागे गेले हो कारण तेच कळतं वय असत. आई जेवू घालते, केसांची निगा राखते, स्वच्छता शिकवते, चांगलं वाईट वागण्यातला फरक शिकवते, रट्टे देते, रागावते सुद्धा. आईशिवाय त्या वयात पानही हालत नाही. काहीही झालं कि आधी भडाभडा आईला सांगायचं हे वय. तिनी सांगितलेली काम करताना अनेकदा धांदरटपणा होतो तो ती निस्तरते, लेकराला कोणीही काही बोलल तर धावून जाते, कपडे कसे घालायचे? शिकायचं महत्व काय ? नातेवाईक का महत्वाचे? कोणते किती महत्वाचे ? अचानक कोण आलं घरी तर काय काय करायचं? आपली माणसं आपली का असतात यावर आईच तिच्या बरोबरीच्यांशी होणार वागणं बघून ८ वयापुढं मुलगी जगत असते. आता ती आईकडून चापून चुपून वेण्या घालायच्या वयात आलेली असते. आई खेरीच कोणाचीही घालून दिलेली वेणी तेव्हा रास्त नसते. नंतरच्या वयाच्या टप्प्यात आईचे इथंवरचे कष्ट समजू लागतात. तिची घराप्रतीची तळमळ समजू लागते. तिनी अनुभवलेल्या गोष्टीवरून सुधारित आवृत्ती ती मुलीस सांगू लागते. काळजी पोटीच म्हणा पण आता ते वय आलेले असते. नंतर येते ती पाळी, जीवणातला अत्यंत महत्वाचा टप्पा पाळी. ४० वर्षांपूर्वी मुलींना १४-१५ व्य वर्षी पाळी यायची. तेव्हा तर आईशिवाय कोणीच नकोसे वाटते. आता कपडे कोणते घालायचे यावरही संशोधन सुरु होते. पचनी पडायला जड अश्या अनंत घटना या वयात येतात, तेव्हा आई हि आई न राहता विश्वासू  मैत्रीणच होते. अशा आणि अश्या अनंत गोष्टी जेव्हा एक मुलगी आईला बघताना अनुभवते. पुढे
हीच लेक कालांतरानं आई होऊ लागते.
आईची आई होतानाचे मुलींच्या आयुष्यातले हे अत्यंत महत्वाचं वळण जगताना उच्च कोटीची सहनशीलता परमेश्वर आपोआपच अंगी देतो. धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय अस होतं मुलीच आयुष्य. उतार वयातल्या आईचे कोणाही समोर काही बोलणे वागणे जेव्हा होते तेव्हा तिची बाजू सावरताना होणारी भंभेरी वर्णन करणे जगातली अश्यक्य गोष्टच आहे. हि आधी अशी नव्हती हे ती मुलगी सतत सिद्ध करू पाहू लागते. आपल्या आईला समोरचे काय म्हणतील? तीचं बोलणं वागणं कसं घेतील? तिला जे म्हणायचं तेच समजतील का? याची सिद्धता करतानाची आईची आई होतानाची लेक फार फार घामाघूम असते. "अस नसतं आई अगं " ... हे सांगताना तिला तिच्यावर ओरडावे लागतेच. यावरच त्याच दुसऱ्या क्षणी भयंकर काहूरही मनात माजते ते मात्र पाहायला कोणीच नसते. आई असतानाचा समंजस पणा, ती समोरच्याशी पारखून बोलायची वृत्ती असणारी आई आणि हि आताची आई बराच फरक असतो. अस बोलून तूच वाईट किंवा चुकीची दिसतेयस हि गोष्ट काही केल्या तिला समजत नाही. तिला त्याची गरजच नसते. यावर आजूबाजूचे अचानक "का ग आईला असं म्हणतेस?"  म्हणत दुजोरा देणारे तर काळकूट विषाचे नमुनेच वाटतात तेव्हा. भिजलेला स्पंज पिळला कि कसा दिसेल तसे आतडे पिळवटून जाते तेव्हा पण त्यास कोणीही बघायला नसतेच.  पण यावर उपाय नाही. आईची आई होताना हे मी बऱ्याच मुलींना बघितले आहे कि तेव्हा अचानक पोटची लेक आईला आगाऊ आहे असे वाटू लागलेलं असते. हसू नका खरय हे. या वयात तिला "हे तुला सांगतेय कारण तू तिथे गडबड करशील. आधीच कोणास बोलू नको " असे सांगणे तर महा धोक्याचे असते. कारण सगळं सोडून तेच नेमके सर्वाना सांगून झालेले असते. आईला जगात सर्वानी नीट जोखावे यासाठीच हा आईची आई होतानाचा सर्वच मुलींचा प्रयत्न ९९ टक्के फसलेलाच असतो.  असे जेव्हा होते तेव्हा मी तरी मनापासून खळखळून हसलेली मला आता आठवते आहे. लोकांसमोर व्यक्त होणारी आताची वयस्क आई आणि तिला जोखणारे समोरचे पाहून होणारी आताच्या मुलीची मनातली खळबळ ती मुलगीच जाणो. ती उकळत्या पाण्यासारखी मनाची स्थिती त्या परिस्थितीतली मुलगीच फक्त समजू शकेल. 
आईची आई होतानाचे हे वळणं सगळ्याच मुलींना कठीण असेल असे नाही पण सहज सुकर असेल हे पण नक्कीच नाही. वयाच्या मोठ्या टप्प्यावर असतानाच्या आईची आई होणे हे फार फार जोखमीचे काम आहे रे बाबा. यावर उपाय एकच शांतीस धरणे. जगाचे ताशेरे दुर्लक्ष करून स्मितहास्यात सर्वाना सामोरे जाणे.  आता मुद्दा हा कि असे त्या वयातल्या आईला का होत असेल किंवा का वाटत असेल? बुद्धी ज्या प्रमाणात कार्यान्वयीत असेल त्यावर हे असावे. स्मरणशक्ती आणि बुद्धीचा समन्वय असेल तर या गोष्टी कमी होत असाव्यात. पण एकंदरच या वयात तीन प्रकारची भीती मनात येत असावी. एक माझं करायची वेळ आली तर कोण असेल ना? माझ्यासाठी मी जपलेली माणसं वेळ पडली तर तितक्याच संवेदनशीलतेने सहकार्य करतील ना? मी केलेलं माझ्यावर वेळ आली तर विसरणार तर नाहीत ना? यासगळ्यासाठी या वयात कदाचित मन ते सतत सिद्ध करू पाहत. काळाची गरज असेलही ती. म्हणूनच मगाशी म्हटलं कि बुद्धी आणि स्मरणशक्तीच्या समन्वयावरच हे जे काही वाटणं आहे ते अवलंबून असावं. जगात आपलं असं कोणी आहे हि भावना किती मौल्यवान आहे हे या नात्यात दिसतं. आहे तोवर भूतलावर हा या आई टू आई नात्याचा आनंद घ्यायचा मग काय तर काळान सयोर हाडामासाची आई दाखवलीय तोवरच हे मग काय आठवणीच तर असणारेत.
एकंदरच एका मुलीचं आयुष्य मुलगी ते आई / सासू जे काही असेल तोवर अनेकानेक गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्यां युक्त तसेच मल्टि टास्किंग (हो ईकडे मराठी शब्द सापडेचना)असतेच असते. हे मात्र खरे!
सौ. गौरी पाठक 
९९७०१६८०१४
१२ मे २०२६

Monday, 4 May 2026

लवली फिलींग

५ मे २०२६
आज अशा एका सासुचा वाढदिवस आहे जी घर आणि नोकरी दोन्हीत संतुलनात जगून पुढच्या पिढीच्या सुनांना आदर्श आहेत. माझी यांची खरी ओळख मे २०११ ची मुलाच्या मुंजीतली जवळपास १५-१६ वर्ष सहवास. तोवर मी नावापुरतच ओळखत होते. सणासुदीचे मेसेज करत होते तो नंबर होता पांढुर्णा पाठक ईतकच. मुंजीत खरी दोस्ती झाली कारण तेव्हाच आईंचा साठावा होता मी वाढदिवस शुभेच्छा पत्र मागवली होती. काकूंचा मनाचा मोठेपणा मी तेव्हा बघितला अनुभवला. त्यांच्या लग्नाच्या गप्पा, जगतानाचे चढ उतार खुप खुप मोकळ्या झालो. मला पण हक्काच मायेच स्थान मिळालं. माझ्या प्रत्येक यशात त्यांचे कौतुकाचे शब्द मला पोचतातच. एक गोष्ट खुप छान आहे त्यांची त्या परिवर्तनाला सामोर जायला सदैव तत्पर असतात. आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण कस जमवायच हे मी त्यांच्यात नेहमीच बघत आलेय.
एक गोष्ट त्यांची भारीय ती म्हणजे कोणत्याही लवाजम्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे लग्न मुंज अस काहीही असलेल्या ठिकाणी मग भरल घर म्हणा कार्यालयातली गडबड म्हणा त्या चुमडीत उठून आंघोळ कपडे आवरून एकदम तयार आसतात. आणि यजमान घरी म्हणतात सांगा काय काम आता करायचय मी तयार आहे. तोवर ईतर आम्ही कुठ न्हाऊ? कुठ आवरू? आधी काय करायच? कोण आधी जातय ? यातच तोवर सौ. वंदना काकु साडी नेसून तयार, कपडे आवरून बॅग बिग आवरून रेडी. काही मिळालं नाहीचा बाऊ नाही की कुठं पसारा नाही की कुठं गाजावाजा नाही कशाचाच!
आपल्यासारखीच नोकरी-घर सांभाळून जगणार्या  मोठ्या जावेच कौतुक असणारी ही धाकटी जाऊ मनानं मोठी आणि धैर्यवान म्हटली पाहिजे.
मला कौतुक वाटलेली आणखी एक गोष्ट - त्यांच्या मुलांच्या लग्नात मी गेलेले तेव्हा त्यांनी प्रचंड गडबडीत असूनही मला त्यांच्या ऑफिसमधल्या सहसाधीका मैत्रिणीची भेट करवली होती. तूच समजू शकतेस ही मैत्रिण मला किती मोलाची आहे म्हणून मला तीला तुला भेटवायच होतं.
आज वंदना काकुचा वाढदिवस म्हटल चला जरा माणसं वाचुया. मग मन श्रीमंतीची मोजदाद पाहून सुखावतं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार वंदना काकु!
तुमचीच सौ. गौरी 
++++++
२७ एप्रिल २०२६
आज मी साठ वर्षे पूर्ण सुखासमाधानाने घालवलेल्या व्यक्ती बरोबर आमचा २५ वर्ष मैत्रीचा दिवस साजरा करतेय. कळल नाही ना? थांबा सांगते.  ही आमची नीलूताई आज तीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमची ओळख २५ वर्षांपूर्वी माझ्या लग्नात झाली म्हणून आमचा २५ वा मैत्री दिवस! आहे की नाही मजा. खरतर ही नणंद कमी आणि सखीच जास्त होती. घरातल्या प्रत्येकाच्या स्वभावाचे पैलू सांगत तीनं मला कधी आपलसं केलं कळलच नाही. आज खुप छान वाटल जेव्हा विचार आला की एका ६० पूर्ण करत असणार्याच्या आयुष्यातली आपण २५ वर्ष त्याला ओळखतोय! खुपच वेगळी अनुभूती, असो. या व्यक्तीनं आम्हा भावजयांना सासरच्या गराड्यात कधीच तिराईत भासू दिलं नाही. नीटनेटक राहायची  फार आवड असणारी, भावांवर जीव ओवाळून टाकणारी, घरासाठी खंबीर ऊभी राहणारी, कौतुकानं खाऊ घालणारी, वेळ आली तर तडफदार बोलणारी पण फणसासारखी अशी ही खुप प्रेमळ आणि हक्काची आहे.  ताई माहेरवाशीण म्हणून घरी आल्यावर ओटी भरल्याखेरीज मी कधीच जाऊ दिलेल नाही. ती आमची जुळलेली वेगळीच नाळच म्हणा हवं तर! लहानपण हट्ट करत मामा मामींकडून लाड पुरवत घालवलेली ही नीलू -  मामींच्या तोंडी (आईंच्या) नेहमीच असते. मी तीला तीच्या अरुणा मामींच्या आठवणींतून नेहमीच बघत आलेय आणि येतेय. आज २००१ सालच्या पुतण्याच्या मुंजीपासून ते २०२५ मधल्या आई बाबांच्या कार्यक्रमातला तीच्याबरोबरचा सगळा काळ आठवला. दिवस जात राहतील आम्ही पण वयान मोठ्या होऊ पण या सुंदर आठवणी हृदयाच्या कुपीतच राहतील.  माहेरवाशीण म्हणून ये, रहा आणि ओटी भरू दे हे आमंत्रण ताई तुला कायमचच बरं का! आजच्या तुझ्या सुंदर दिवसासाठी तुला अनंत शुभेच्छा व नमस्कार आणि मिठी २५ व्या मैत्री दिवसासाठी!
तुझीच गौरी
+++++++
९ एप्रिल २०२६
माझ्या आयुष्यातील २०१० मधला ट्वीनस डेचा हा आमचा हा फोटो.  खर वाटणार नाही आमच एकमेकींच मोजुन दोन महिन्यांत जे सुत जुळलं तेआज १९-२० वर्ष जवळजवळ आहे तस्सच आहे. मागची दोन वर्ष आम्ही रोज भेटण शक्य नसल तरी ते आहे तसच आहे. आज मिताला ५८ वर्ष सुरू झालं पण ती आजही ४० शीच वाटते मला.
गरजेपेक्षा ईतरांचा विचार जास्त करणारी, कोणाच्या कोणी केलेला पदार्थ त्याची कृती लक्षात ठेवणारी, घरातल्या  मुंग्याना छोटा ढीग साखर उंबरठ्यावर ठेवणारी, जगातलं कोणी येऊ दे गरम करून वाढायची कायम तयारी असणारी, मनातल दु:ख कधीही डोळ्यांच्या किनारीवरही दिसू न देणारी, माझ्या फुसक्या सहलीचे फोटोही दुसर्या दिवशी तितक्याच तन्मयतेनं पाहणारी, कामाला दैवत मानणारी, आद्ध्यात्माची आवड असणारी मिता मला अशीच अखंड ९० पर्यंत पाहायची आहे. हो जाऊ ना आम्ही तेव्हाही ९०-८०च्या असू तरी विष्णू जी की रसोईला. तीच्या माझ्या आयुष्यातील ही १९-२० वर्ष आमच्या आयुष्यातील चंगळ होती. ती सोबत होती तेव्हा तीला बघून बघून मी पण अनेक गोष्टीत तयार झाले ती अजुन  काही गोष्टीत मात्र मला बघून तयार होण बाकी आहे. तीला वाढदिवसाच्या अमोघ शुभेच्छा आणि पापी😘 
तुझीच गौरी
++++
७ एप्रिल २०२६
सुप्रभात! 
ही माझ्या आयुष्यातील बालपणीचा काळ कसा सुखद होता हे सांगणारी आणि त्यात सहभागी असणारी व्यक्ती - छाया काकू! कायम हसतमुख, आल्या गेल्या सगळ्यांच कायम स्वागत करणारी, जे घरात असेल ते मायेन खाऊ घालणारी, इतरांपेक्षा जरा कमी चपळ पण त्याची तमा न बाळगता सतत सतत घरासाठी कष्ट करणारी, आहे त्यात मन:पूर्वक समाधानी राहून जगणारी अशी माझी काकु खुप मायाळु तर आहेच पण ती आजही माझ्यासाठी तश्शीच आहे. मी माॅन्टेसरीत असताना भावे प्राथमिक शाळेत सोडायला येणारी काकू ते कालपर्यंतची म्हणजे तीच्या पुतणीच्या मुलाच्या मुंजीत गेटपर्यंत बरोबर चालत येणारी काकु आहे तशीच आहे. खरतर मला तेव्हाच हा प्रवास आठवला होता..
काहीवेळा आपण सुद्धा खुप काही करतो, जे फार मोलाच असत पण जगात त्याची ऊचल किंवा दखल घेतली जात नाही, झाकोळलं राहत एखादं व्यक्तिमत्त्व पण तस असल तरी त्याचीही दखल घ्यायची गरज न वाटणारं अथवा त्याची गरजच नाही असा विचार करणारी निर्मळ अशी ही खरच मोलाचा साथीदार होती माझ्या काकाची... माझ्या आदराच्या माणसांच्या सूचीत ही कायमच असतेच असते. काकानंतर माझ तीच्याकडे जाणं तस कमी झालय ती बरेचदा घरी नसते. मला वाटल की मी काकाकडे जाऊन तीला भेटण आता शक्य होत नाही. पण मला आनंदच आहे कारण ती आता मस्त फिरतेय, ट्रीप करते, आनंदी राहते. तीचा आजी आजोबा गट भन्नाट आहे. भारीच वाटत मी भेटते त्यांना आणि त्यांच्या प्रवासाच्या कथा ऐकायचा ग्राहकही बनते. हे कान्हाजी माझ्या लहानपणच्या चंदेरी पानावरच्या या सोनेरी माणसाचा आशिर्वादाचा हात मला अनंतकाल लाभावा.
छायाकाकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🫂
तुझीच (चप्पल शेणात भरली म्हणून ती तिथच सोडून एकच चप्पल घालून घरी येणारी आणि हे अस केल म्हणून मला बघून पोट धरून हसणार्या छायाकाकूची लाडकी)
गौरी
++++++
२७ मार्च २०२६
प्रिय कान्हाजींना माझा नमस्कार 
मला या भूतलावर येऊन ईकडच सौंदर्य पाहण विविध नात्यांमधील प्रेम अनुभवणं यासाठी जन्म देणाऱ्या म्हणजेच माध्यम असणाऱ्या आईला अनेक धन्यवाद.आज आईची वयाची ७० वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या कळत्या वयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास ४० वर्ष मी तीला सतत काहीना काही करतानाच बघत आले आहे. बाबांसारखी आद्ध्यात्माची गोडी पण माझ्यात हीच्याच मुळे आली आहे. आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावर ऊभं राहायला शिकावं यासाठीची तीची धडपड आम्हाला मोलाची शिकवण होती. त्या सवयीमुळे आजही मी खंबीरपणे ऊभी आहे. आई... ती स्पष्टवक्ती आहे. भरभरून करण्याची, देण्याची दानत तीच्यामधे आहे. ती स्वावलंबी आहेच पण खमकेपणा आणि सतत कोणाला न कोणाला काहीतरी नोंद दाखवणे या गोष्टींवर ती बाबांच्या माघारी स्वतः च स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून ऊभी आहे. खरतर सहज कोणाला समजेल अस व्यक्तीमत्व अजिबात नाही. त्यामुळे दरवेळी ती वेगळी वाटणं साहजिकच आहे. बाबांच्या आठवणी आम्ही दोघी व ती माझ्या पूर्ण माहेरची चौकट आहे. माझ्या चौकटीच्या या टोकावर लक्ष ठेवा कान्हाजी.
आईला वयाच्या सत्तर वर्ष पूर्तीच्या अनंत शुभेच्छा आणि माझा मन:पूर्वक नमस्कार 🙏🏻
सौ. गौरी पाठक

Thursday, 16 April 2026

वहिनी मी पोचले बरं का!

"वहिनी मी पोचले बर का घरी."
काय सुखद कल्पना आहे ही आपण सुखरूप घरी पोचलो याची पोच देणारी व्यक्ती आज आयुष्यात आहे. माझ्या आधीच्या पिढीनी केलेल्या गोष्टींच  हे अनुकरण आहे. आपण कोणाही कडे गेलो तर उपस्थित वशिष्ठांना नमस्कार करणं, तसच ओळखीचे असोत नसोत घरात कोणी मोठ आलं तर पटकन उठून नमस्कार करणं, आपण गावाहून निघताना जिकडे जाणार आहोत तिकडे कोण आणखी असेल तर काही  पोचवायच का? विचारणं. पोचल्यावर "पोचले हं वहिनी मी घरी” ही पोच देणं.

या सगळ्या सोपस्कारांमुळे नात्यांमधे ओलावा राहतो. मला आठवतय माझ्या चुलत मावस बहिणी सुट्टीत आल्या की त्यांची सरबराई करणं, खाऊ घालणं, परत जाताना फ्रॉक घेऊन देणे हे आमची आई करायची. दहावी बारावी पास झाली की आपणहून कौतुकान कपडे घेऊन देणं. कोणाकडे जाताना साधारण आवडीचा अंदाज घेऊन घरचा पदार्थ "हा घे मी तुझ्यासाठी आणलाय." म्हणत हातात देणं. काय सुरेखा संकल्पना होती आदर दाखवण्याची, धन्यवाद मानण्याची. म्हणूनच तर कोणीही न सांगता कोणाच्याही माहेरी हक्कानं भाच्या - पुतण्या नेत असायच्या. मी पण काकूच्या माहेरी, मावशीच्या जावेकडे भरपूर हक्काने गेलेलं आजही मला आठवतय. वाड्यातल्या शेजारणीच्या गावाकडच्या नणंदा - जावांच पण असच. आपलेपणानं घरात वावर असणं. त्यांच्या गावचा टोपल भरभरून वानवळा येणं. अत्यंत सुखद अशी आपलेपणाच्या भावनेची नाळ घट्ट होती.

या सगळ्या गोष्टींचं सुख आणि महत्व का? आणि कस? कोण जाणे लोप पावत चाललय. ते पूर्ण संपुष्टात येणार नाही याची खात्री आहेच पण तरी  हे पुढची पिढी समजू शकेतच अस ठाम म्हणता येत नाहीये. कोणी कोणाकडे दोन दिवस जात नाही की कोण आपल्याकडे येण्यासाठी पण कारण शोधणं कमीच दिसतं. एका खोलीत सहा सात लेकर झोपायचो. आता माझी खोली कुठली विचारणारे ५०% सापडतील. आपण स्वतःहून मी तुमच्या गावात येतोय कामासाठी तर तुमच्याकडे उतरेन म्हणणारी मनं खुप कमी झाली आहेत. यात कोणाच्याही वागण्यावर बोट/ अंकुश ठेवण हा उद्देश नसून एक सुंदर भावना आपुलकीच्या झालरीची कमी होतीय अस वाटतं. 

आपण आपल्या पिढीत म्हणताना पाहिलय की
"या बरं आमच्याकडे, ताईला सांग मी बोलवलय." यावर ताईला सांगण्या आधीच उत्तर येत असे, "हो हो नककी निरोप देईन. येईल ती." आपल्याला कोणीतरी प्रेमाने आग्रहाने हक्काने ये म्हणणारं आहे. याबद्दल नशिबवान समजायचो आपण. आताची पिढी इतकी व्यवहारी झालीय की हा निरोप देणार्याच्या प्रेमाचा, ओलाव्याचा आपुलकीचा शब्द व्यावहारिकद्वष्टीनं  ती घेते आणि सरळ सांगते. "ती खुप Busy असते तीला जमणार नाही." याप्रसंगी तत्काळ त्या बोलण्या मागचा प्रेमळ, हक्काचा, आपलेपणाचा हेतू विचारात द्यावा ही बाब सकारात्मकपणे  निदर्शनास आणून देणे केले पाहिले. या पिढीनं आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं नात्याचं वैभवच बघितलेलं नाही तर त्यांना ही वैचारिक चौकर समजणार तरी कशी?

असे अनेक कंगोरे या "पोचले मी वहिनी बरं का." या  वाक्यामुळे मला प्रकर्षानं लिहावेसे वाटले. आमच्या पर्यंत आम्ही मायेची, प्रेमाची, आपुलकीची गडगंज श्रीमंती अनुभवती आहे त्यामुळे ती या पुढच्या पिढीला मिळणं कमी होताना पाहून जीव तीळ तीळ तुटतो. असो मी नशिबवान आहे कारण मी न विचिरता डायरेक्ट राहायला  येतेय म्हणायला मला माणसं आणि घरं आहेत आणि माझ्या कडे हक्कानं येतोय म्हणणारी व प्रेमानं पोचलो घरी कळवणारी सोन्यासारखी माणसं मला आहेत. आज मी हेच म्हणेन की मी हेच कमावलं.

सौ. गौरी पाठक 

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"काकू, मी पास झाले. ९५ टक्के पडले." 
"अरे व्वा! मस्तच. खूपच मस्त. शाब्बास! काकूंकडून पार्टी लागू."
"काय करायच ठरवल पुढे?"
"काकू मला सीए करायचय."
"अच्छा. मस्तच की. होईल सगळ नीट. ये आता घरी."
"हो हो, मी येणारच आहे पुढच्या महिन्यात काकू."
हि  कालची माझ्या आयुष्यातली वाक्यं. काय सुंदर भावना आहे ना! आपलं कौतुक सांगायला आपल्याला आपली माणसं आहेत आणि कौतुक सांगणारे पण आहेत. तो आनंद साजरा करायला, व्यक्त व्हायला कोणीतरी आहे. आपला तो आनंद बघून आनंदी होणार याची खात्री या वाक्यात दिसते. त्या वयात आपलं कौतुक करून पाठ थोपटणारी माणसं असणं,  त्यांचं यावर  "बोल काय हवाय तुला ?" विचारणं. काय मोलाचा क्षण असतो ना हा. हाच तो क्षण मी काल माझ्या पुतणीबरोबर अनुभवाला. दिराशी बोलताना back of the mind मी आठवत होते कि हि वाक्य मी पूर्वी कधीतरी ऐकली आहेत. त्याचा फोन होताच मला माझी आई आणि तिची पुतणी यांचं हेच संभाषण आठवलं. पेढे द्यायला आलेल्या आणि कौतुकाला सरसावलेल्या आईला मी स्वतः बघितलं आहे. आपल्या घरच लेकरू ऊंच ऊडायच्या तयारीत असताना, जमिनीवर कोणीतरी आहे वाट बघायला, कौतुकाला, सहारा द्यायला यामुळे ऊभारी येते आई नेहमीच म्हणायची, आजही म्हणते. आई नेहमीच पास झालेल कोणाचही कळल की भरभरून कौतुक करताना, मस्त मस्त फ्राॅक घेताना, हवं त्या हाॅटेलात खाऊ घालताना बघत आलेय मी. त्यांनाही आज हे वाचताना आठवेलच याची खात्री आहे आणि... अचानक जाणीव झाली बापरे! आपण किती मोठे झालो आणि आपण अगदी आईसारखच बोललो की. आता हे काय शिकवलय का कोणी? तर नाही ते पिढीला बघून आपसुकच अनुसरण केलं गेलय ना. आज फार भाग्यवान असल्यासारखं वाटतयं.  "का?"  ते नाही सांगता येणार....क्रमश:
सौ. गौरी पाठक 
१६ एप्रिल २०२६

Thursday, 12 March 2026

फुकेत - फी फी बेटावरची समुद्र सफर

"फुकेत" थायलंडमधल एक सर्वात जुनं शहर जे अंदमान समुद्रात आहे. हेरीटेज इमारतींचे दहा रस्ते असलेलं पश्चिमेकडील महत्वाच बंदर. निसर्गाच्या कुशीत वसलेल समुद्रानी वेढलेलं हे जागतिक वारसा स्थळ पर्यटकांनी कायम गजबजलेल असतं.
खरतर मला या जागेबाबत काही ठाऊक नव्हतं पण जेव्हा २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज  म्हणून ईकडे जायचय अस समजल तेव्हा जरा शोधलं. आयुष्यात आजवर फक्त थायलंड हा शब्द ओळखीचा होता. पण थायलंडमधल फुकेत शहर आणि फी फी बेटावरची सफर अनुभवल्यावर मात्र निसर्ग आणि त्याच्या छटा पाहून डोळ्याच पारण फिटलं.
शुक्रवारी रात्री मुलानं आम्हाला मुंबई विमानतळावर पोचवलं. तिकडे आणखी दोन ऊत्साही जोडपी एकत्र मिळून प्रवास सुरू झाला.
कायम नैतिक जबाबदारी पार पाडत आयुष्यातली लग्नानंतरची २५-३५ वर्षे  एकत्र कुटुंबात आनंदाने नांदलेले हे तीन जीव फक्त स्वतः साठी जगायला, स्वच्छंद भटकायला कान्हाजींनीच एकत्र आणलेले असावेत.
ऊगाचच कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नसतं परमेश्वराची योजना असते ती. अशी ही सहा स्वच्छंद मनं सकाळी दहाला फुकेत विमानतळावर पोचली आणि आमची आनंदी सफर सुरू झाली.
विमानतळावरून बाहेर आलो आणि मग आमची आम्हाला कॅब बुक करायची होती. काय सांगाव? कॅबचा पिक अप पाॅइंट ईतका लांब होता. त्यात गाडी सहा जणांची बुक न झाल्याने सोडावी लागली. नेत नाही म्हणे अस मोठी व्हॅनच बुक करा. तोवर आमची दोन त्रिकुटं फुकेतच्या मोमो टपरीवर स्थिरावली.
चेहरेपट्टीची एकच छाप अशी बरीच माणसं होती. एकान परदेशी पर्यटक आहोत हे समजून ऊमजून कॅब बुकिंग मधे पिक अप पाॅइंट सांगायला मदत केली. अबब! आतून केवढी शानदार व्हॅन होती ती. एकदम आरामदायक कॅबनी तासाभरात आम्ही हाॅटेल मॅरियटस् माई खाओ रिसाॅर्टला पोचलो. जातानाची चर्चा ही होती की रूमवर मस्त गरमागरम चहा करायचा. चेक इन तीन वाजता असणार होत तस असेल तर सामान टाकुन भटकंती सुरू करायची होती. पण गेल्या गेल्या स्मितहास्य करत दोन मुलींनी स्वागत केलं, सामान ऊतरवणं आणि आमच्या बसण्याची सोय जातीन केली. 
वाफाळत्या चहाची जागा तीन दिलेल्या मनमोहक वेलकम ड्रिंक नी घेतली. लगेचच चेक इन होतय समजल आणि हुश्श झालं. रूमवर पोचलो आणि मग निघाले तीन प्रांतांतले भारतीय नाश्ते. 
पोटभर नाश्ता झाला गिरनार चहा झाला. आवरून दोन त्रिकुट फिरायला तयार झाली.
२८ फेब्रुवारी 
रिसाॅर्टच्या गाडीनी आधी माई खाओ बीचवर गेलो. मोजुन पाचव्या मिनीटात रिसॉर्टच्या गाडीनी बीचजवळ सोडलं. मऊसूत पांढरी वाळु,  झाडाला झोका आणि ऊन. पुढे जाऊन वाळूत चालून आलो. गणपतीपुळे सारखा एकाबाजूनी खोल बीच आहे अस लक्षात आलं. तरी दोघ जण डुबकी मारून आले. बाकीचे फोटोत रमले. 
ओळखीच्या असल्यासारख्या या चिमण्या बरोबर चालत होत्या.
बीचवर निवांत वेळ देऊ म्हणत आम्ही कॅबनी कमला बीचला निघालो. आम्ही खुप हसलो मराठी नावाचा बीच आहे म्हणून. मस्त समुद्र, मग वाळू, मग एकावेळी एक रीक्षा जाईल एवढा पाथ वे आणि लगेचच रेस्टॉरंटस्. ईतका मस्त नजारा होता. दोन तीन एक अशा मन मानेल त्या गटानी आम्ही बीचवर सुटलो. ओपन मसाज सेंटर पण वाटेत होती. एक नवीन पद्धत ईकडे दिसली ती म्हणजे रेस्टॉरंटच्या बाहेरच स्टॅडवर मेनू कार्ड लावलेली. ती वाचुन हव तरच आत जगयचं आणि चालताना ऊजव्या बाजुनी चालायच.
आम्ही पाॅण्ड रेस्टॉरंट मधे गरम काॅफी घेऊ म्हणून घुसलो पण आइस टी आणि ईतरवरच सुखावलो. ईकडे सगळ्या बायकाच सगळ सांभाळताना दिसत होत्या.  वेटरपासून गल्ल्यापर्यत सगळा कारभार कडक शिस्तीत, बायका सगळ सांभाळताना पाहून छान वाटलं.
कॅबसाठी कुठ ऊतरलो? कुठ चढायच?  यासाठी हा बंगला खुण फोटोत पकडली. मला फार आवडला हा. अशी घरच दुकानात रूपांतरित अशी बरीच दिसली. चार शब्द यांच्या भाषेतले शिकून गेले होते त्याचा पुरेपूर वापर झाला. त्या शब्दांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
कमला बीचवर विविध प्रकारची माणस दिसली. फुकेतला आल्यावर भरपुर माणस त्यांच राहणीमान न्याहाळण्याचा हा पहिलाच प्रसंग.
कपड्यांचा एवढा कंटाळा यांना का असेल? असा बाळबोध प्रश्न ऊगाचच मला पडला. तेवढ्यात जोरात आवाज आला घोड्यावर धावणारी मुलगी आपटली आणि आधी त्या घोड्याच्या चालकाच्या हातून घोडा निसटून गेला. क्षणभर सगळा बीच तेच बघत होता. सनबाबाला टाटा करून नंतर आम्ही परत कॅबच्या मागे. कमला बीच पासून पताॅग बीच जवळ आहे. या दोन्ही जवची राहण्याची सोय झाली तर प्रवास वाचेल हे आम्हाऊनंतर समजलं. आम्ही मॅरिएटस् ला ऊतरलो होतो जे होतं ऊत्तमच वादच नाही पण गावाबाहेर होतं.

इथून पुढे ओल्ड फुकेत टाऊन, थलांग रोड आणि व्हिक एण्ड स्ट्रीटकडे गेलो. 
आपल्याकडच्या हॅपी स्ट्रीट सारखा माहोल. लाइटिंग, म्युझिक विविध प्रकारची गिफ्ट ची दुकानं. तरी हा कमी ऊत्साह होता म्हणे का? तर चायनीज ईयरच काही होतं. मी नेहमीप्रमाणे काहीतरी घेऊ म्हणून मस्त किचेन फ्रीज मॅग्नेट घेतली. मोठ्या दुकानांपेक्षा स्ट्रीट मार्केट मला नेहमीच आवडत कारण सर्वसामान्य विक्रेत्याला जास्त गरज असते ग्राहकाची माॅलपेक्षा. एका अत्तराच्या दुकानात लताबाईंचा आवाज कानी पडला फारच छान वाटलं.
आपल्या लक्ष्मीरोडवर जसे गणपतीत फुटपाथवर बसतो तस लोक बसत होती. १०-८-५ मीटरची पळायची शर्यत  होती. एवढच काय क्रिकेटच्या मॅच सारख्या चीअर्र गर्लस पण होत्या. हॅलो बार्बी सारखी दोनचार गाणी ओळखू आली आम्ही पण जरा थिरकून घेतलं.
या पूर्ण रोडवर चौकाचौकात श्री गणपतीच, श्री ब्रह्मदेवाच श्री दत्ताच सोनेरी देऊळ पाहून आश्चर्य वाटलं.
अशीच चौकाचौकात देवळ आहेत पण प्रत्येक देऊळ एका खांबावर जमिनीपासून वर. सगळेजण या थलांगरोडवरच फिरलो. कॅबचा वापर बराच जाणवला स्वतः च्या वाहनापेक्षा.
आम्ही नंतर पोटातले कावळे शांत करू चला म्हटलं म्हणून कॅबवाल्यानीच राया रेस्टॉरंट ला सोडलं. व्हेजिटेरीयन साठी वेगळं मेनु कार्ड होतं आम्ही खुष. ही वास्तू हेरिटेज कॅफे आहे. जेवायला आलेल्यांच आदरातिथ्य वाखाणण्या जोगं होतं. आपल्याला काय हव ते समजुन घेत ती ऑर्डर घेत होती. कित्ती सुंदर घर असेल हे जेव्हा राहत असेल. त्याकाळच्या वैभवाची कल्पना आजही येते.
मालकीणबाई जातीनं लक्ष घालत होत्या. त्यांचे त्याकाळचे फोटो लावलेले त्या दाखवत गोष्टी सांगत होत्या.भाषा ही अडचण नव्हती ईकडे कारण चेहराच बोलत होता. आम्ही एक ग्रुप फोटो घेतला. काय ऊत्साहात फोटोला ऊभया राहिल्या.
जेवल्यानंतर परत कॅब बुकिंग... हे राम ती काही मिळता मिळेना. गुडलक चौकात आर्चीसच्या समोर फुटपाथवर बसल की कस वाटेल तस मला या चौकात वाटलं. साधं पाणी ही व्याख्या या थायलंडकरांमधे नाहीये अस वाटतं. दमलं भागलं माणूस पाणी विकत घेतं तर बाटल्या एकदम गारेगार. हे होतं कोजीमाॅन कॅफे. चुणचुणीत दोन वीस बावीस वयाच्या मुली ते सांभाळत होत्या.
दिवसभराचे थकलेलो देवाक काळजी. एक व्हॅन बुक झाली आणि आम्ही मेरिएटस् रिसॉर्ट वर पोचलो ते साडे अकरा वाजता. जीव कधी गुडुप झाला समजलच नाही. आजच्या अनुभवावरून ऊद्या फिरायला गाडीच बुक केली दिवसभराची. ड्रायव्हरच नाव मिस्टर बर्ड!
१ मार्च
सकाळी साडे आठला मिस्टर बर्ड दारात हजर. आज आमचया गॅगला आधी सीटी व्हू पाॅइंट पाहायला मिस्टर बर्डनी नेलं. संपूर्ण शहर दिसतं. याच नाव होतं खाओ रांग ब्रीझ पाँइंट.
मंद वारा, हलकसं ऊन, कोणत्याश्या पक्षांचा किलबिलाट, पारीजातकापेक्षा मोठ्या नाजुक फुलांचा सडा आणि वर निळंशार आकाशाच विस्तिर्ण क्षितिज!
अत्यंत मनमोहक... मध्यभागी एक डोम होता त्यावर कापड टाकून उन्हापासून जपला होता. आत वर त्यांच्या भाषेत काहीतरी लिहलेलं होतं. इकडची माकड फार जोरात चावतात खाऊ घालू नका वस्तू सांभाळा हे मिस्टर बर्डनी आधीच सांगितलं होतं. पण आम्हाला माकडं कमी दिसली.

चिनॅप्राचा हाऊस म्यूझिअम
पुढ आम्हाला त्यानं एक जुन बैठ घर हेरिटेज बंगला दाखवायला नेलं. आम्ही आधी काय आहे? कोणाच आहे बघु म्हणून दोघीच आत गेलो. तोवर बाहेरचे स्टाॅल ईतर बघायला गेले. मला त्यांचं देवघर आवडलं.
पोर्तुगीज पद्धतीचा हा बंगला. बान हा वाडा १८८३ च्या आसपास राजा राम च्या कारकिर्दीत चिनप्राचा यांनी वयाच्या विशीत हा बांधला. बान चिनप्राचा चित्रपट सृष्टी संबंधित पण होते. ऑलिव्हर स्टोनस् व्हिएतनाम वाॅर सिनेमाचे शूटिंग पण ईकडे झाले आहे. 
जुन्या काळचे पलंग, खिडक्या, कपाटं, पाळणे, कोठी, मोठ्ठ स्वयंपाकघर, त्यांचे कपडे, बैठकीची खोली जुना टेलिफोन सगळ संग्रहालय स्वरूपात होतं. पाचवी पिढी वर राहते म्हणे. बाहेर भाड्यानी कपडे घेऊन घालून फोटो ची सोय होती. चपला बाहेर काढणं क्रमप्राप्त होतं. राजाच नाव शोधते आता मी.

हत्तीखाना
आता मात्र ऊन वाढत होत. घरून करून आलेली ठिकाणांची यादी तपासण सुरू झालं. लहानपणच्या पेशवेपार्कातले वाघ हत्ती मला आठवु लागले. कारण आता जंगल सफारी होती हत्तीखाना. 
फुकेत एलिफंट कंझर्वेशन यात आपण हत्तीवरून फेरी करू शकत नाही. फेरीची जागा वेगळी आहे. ईकडे तीन पॅकेज होती. एक हत्तीला खाऊ घालणे आणि बरोबर फोटो काढणे, हत्तीला आंघोळ घालणे आणि खाऊ घालणे आणि फुल डे विथ हत्ती. आम्ही मस्त खाऊ घातलं न्हाऊ घातलं आणि एक तासभर जवळजवळ त्यातच होतो. चार पाच मोठे हत्ती दोन डुबुक डुबुक लुडकणारी पिल्लं होती. त्यांना हात लावत केळी रताळी काकाडी खाऊ घालत होतो. खाऊ घालण ईतपत ठिक वाटतं पण दोन हत्तींच्या मधे ऊभं राहा फोटो काढायला मग सटारते. हळुहळू आपण निर्ढावतो. हत्तीचे गोल गरगरीत मातकट तर काहीसे भुरकट डोळे दोन पेर एवढ्या पापण्या नीट न्याहाळले तर समजतं ते पण भाऊक होते. काहीसे माणसाळलेले होते तो त्यांचा स्वभावच आहे म्हणा. आपण देऊ ते तो खाईल अस नाही. सोंडेत दिल्याक्षणी नको ती वस्तू तो फेकतो.
नंतर माहुत हत्तीला आंघोळीच्या जागेवर घेऊन आला. मोठ्ठे पाईप हातात थमवले आणि एकावेळी चार जण भिडवले. काय आनंद विचारता. आमचे रांगडे गडी मस्त न्हाऊ घालत होतेच ईतकच काय डोलत डोलत पुढचे मागचे पाय हलवत तो पण हव तिथ पाणी मागत होता. हा अनुभव बघण्यासारखाच होता. लहानपणापासूनच हत्ती या प्राण्यांविषयी आपसुकच एक जिव्हाळा मनात असतो. त्याच्या बरोबर असताना भिती वाटत नाही. आज मला हाथी मेरे साथी सिनेमा आठवला.
(हत्ती नहाण कोलाज)

मधे आम्ही फ्रुट मार्केटला थांबुन भरपुर फळं खाल्ली. कलिंगड, आंबा, अंनस, जॅकफ्रुट आणि पपई. मनसोक्त फलाहार झाला. (आंबा तोतापुरी)
वेगळेच गोटी आंबे होते. नंतर ते घरी पण आणले झाडावरचे. सांगेन आहे पुढे. पपनस पण होतं जे मी कधीही बघितलेल नव्हतं. 

टायगर किंग्डम
हे मी पाहिलेल पहिल ठिकाण आहे जिकडे वाघाला चित्त्याला हात लाऊ देतात.  हे कस शक्य होतं तो विचारच मी केला नाही. आजवर वाघ हा फक्त आणि फक्त पिंजऱ्यातच बघितलाय. खुप उत्सुकता होती सगळ्यांना की आपली प्रतिक्षिप्त क्रिया कशी असेल?
यात आपण लहान मोठा किंवा पिल्लू वाघाबरोबरच १० मिनीटे वेळ घालवू शकतो. खलास विषयच संपला आता पुढचा तास थरार जाणार होता.
आम्ही वाघाचे आकार पाहुन मध्यम वाघाबरोबरच वेळ घालवु ठरवलं. नियोजनबद्ध पद्धतीने आम्हाला आत सोडत होते. एकावेळी दोघ एका वाघाकडे जायचं. इलेक्ट्रिक करंट असलेल्या जाळीच्या दारातून सगळे आत गेलो. सवाssदी म्हणत लेडी इन्स्ट्रकटर आत जायचा रस्ता दाखवत होती. उजवीकडे चित्ता हे भलामोठा तीन फुट लांब फैलावून पहूडला होता. सगळी ओळ वाघाकडेच होती तो निवांत होता. तिकीट काउंटर वरूनच सगळे वाघ दिसतात. वाघाचा ताबा ते काळे कपडे घातलेले लोकं हातात फुटभरच लांबीची काठी घेऊन करताना दिसले. बहुतेक काठीवर दोन रंगाचे लहान दिवे होते. आत जायच्या आधी वाघाला कुठ आणि कसा हात लावायचा? ओलांडून कस जायचं? समोर किती अंतरावरून फोटो काढु शकतो? एकदम घाबरून काय चुका करायच्या नाहीत हे सगळ शिकवलं.
थोडक्यात शाळा घेतली आणि आमच्या दोघांचा नंबर आला. दोन वाघांना हात लावणे कुरवाळणे फोटो काढणे अस होतं. आपणही फोटो काढायचा त्यांचा पण फोटो काढणारा असतो. शिकवल तस आधी आपण पाठीवर हात फिरवायचा बाकी बघु पुढच पुढे मी तरी ठरवल होतं. आधी माझा फोटो आणि क्लिपसाठी नंबर घेतला. अनिरूद्धनी मस्त हात फिरवला शेपटी ऊचल ना म्हणत मी मस्त क्लिप केली. वाघोबा मस्त गुरगुरत पण असतो बरं का. जस काही म्हणतोय घ्या लावा हात. दिली संधी तुम्हाला असा लुक होता. ही क्लिप बघायलाच मजा येईल. 
मी तर आधी गुडघ्यात वाकून मग ओंडव बसून हात लावला बाई. फरच्या टोपीसारखा स्पर्श पाठीवर पण शेपटी मात्र मऊ मऊ पण जड होती. बापरे! जड रबरी पाइप ऊचलल्या सारखीच अगदी. आता भिती चेपली होती.  हे त्यालाही समजलं असावं म्हणून महाशयांनी सगळे दात दाखवत मोठ्ठा आ केलेला जबडा मागे बघुन मला दाखवला. खाटकन् टेकलेले गुगघे ऊचलून मी ओंडवी ऊभी. कुल कुल अस म्हणत इन्ट्रकटर खाली बसा नो ईश्यु म्हटला. गौरीचा जीव भांड्यात....  मग हाताचे पंजे दाखवत फोटोला पोझ दिली बाई मी. मांजरं कशी बारीक गुरssगुर आवाज करतात तस बसलेला. आतल्या भागात पण कुठुन कस जा हे ठरलेल बरका. आता दुसरा वाघोबा बाकड्यावर बसलेला. तो खाली ऊतरलाच नाही. आता याचे फोटो काढायचे पण निर्ढावतो ना माणूस तसं पाठीवर आम्ही हात ठेवले खिडकीतून खाली बघितल्या सारखे. तो फक्त मागचा बदललेला माणूस मान हलकीच हलवून तिरकच बघत होता. जस काही आवरा लवकरच म्हणतोय. या वाघोबाचे पंजे पण हात लावता आले तो तसा बसलाच होता. मधेच ९०° मागे वळला कारण आत यायच्या दारात वर्दळ जाणवली. तत्काळ तिकडे शांत बसा ईशारे केले गेले.
कोणी पाठ शेपटी पावल कुरवाळतय तर कोणी क्लोज अपच्या फोटो मागे. हा वाघोबा जबरदस्त मोठ्ठ्या जबड्याचा होता. यानी तर बसण्याची पोझिशन पण बदलली. एकंदर २० मिनिटे वाघोबा बरोबर अफलातून गेली. आयुष्यातला हा अनोखा अनुभव तो स्पर्श आम्ही कधीच विसरणार नाही. नंतर नचुकता हात धुवा सूचना आली. नंतर बाकीचे वाघ बघत फिरलो. तान्ह्या वाघोबाला लांबन बघताना मस्त वाटलं. एकंदरच सगळ नियोजन स्वच्छता सहकार्य या सगळ्याला पूर्ण मार्क.

वाघोबाच्या आपापल्या आलेल्या अनुभवांची चर्चा करत होतोच तेवढ्यात मिस्टर बर्डनी वॅट चलांग बुद्ध देवळात गाडी पोचवली. रखरखीत ऊन.

वॅट चलोंग : 
हे फुकेतमधील सर्वात मोठे, सर्वात महत्त्वाचे बौद्ध मंदिर आहे, जे बेटाचे आध्यात्मिक केंद्र आणि मुख्य सांस्कृतिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. १८७६ च्या बंडात दोन बौद्ध भिक्षुंनी केलेल्या मदतीमुळे तसेच भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी अवशेषाच्या इकडे झालेल्या स्थापनेमुळे हे मंदिर ऊर्फ चेदी ऊर्फ स्तूप प्रसिद्ध आहे. भगवान बुद्धांच्या भूमिस्पर्ष मुद्रेचा पुतळा ईकडे आहे.
६० मीटर ऊंच अशा स्तूपात ऊर्फ तीन मजली वास्तूत सर्वात वर भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिचा तुकडा जतन केलेला आहे.

दोन्ही बौद्ध भिक्षूंच्या पुतळ्यावर सोन्याचा वर्खाचा कागद लावतात. ही थाई बौद्ध परंपरा आहे. ही कृती सुख समाधानाची प्राप्ती आणि धर्माप्रती एकनिष्ठता दर्शवते. जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात आरोग्य संपत्ती समृद्धी चा आशिर्वाद मागतात. सोन्याचा वरृख किंवा कागद हे शुद्धता आणि सौभाग्याचे प्रतिक मानतात.
विटांच्या मोठ्या भट्टीत ईच्छा पूर्ण झालेले लोकं फटाके ऊडवतात. मोठा आवाज करून आभार मानणे हा हेतू.
ईकडच्या सर्व बुद्धांच्या मूर्तीला पांढरा दोरा गुंडाळून ठेवलेला दिसला. या धाग्याला साई सीन किंवा पवित्र धागा जो संरक्षण करतो अस म्हणतात. जो धागा बुद्धांच्या आद्ध्यात्मिक ऊर्जेस जोडतो अस समजतात. जस भारतात मौली बांधतात तस हे पांढरा धागा साई सीन बांधतात. ही कृती बंधनकारक नाही पण तिकडे कार्यात हा धागा बांण्याची पद्धत आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष मला भगवान बुद्धांची ईकडे सणजली जी मला कधीच ठाऊक नव्हती. ती म्हणजे भगवान बुद्धांच्या डोक्यावर कुरळे केस नसून त्या गोगलगाई आहेत. समाधीत लीन असताना बुद्ध भिक्षू मुंडन करून ध्यानस्थ होते. त्यांच्या डोक्यावर तळपते ऊन येताना एका गोगलगाईनी बघितल. तीन त्यांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर सावसीसाठी बसायच ठरवलं. तीच अनुकरण १०८ गोगलगाईंनी केलं. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जेव्हा बुद्ध समाधीतून बाहेर आले तेव्हा कडक ऊन्हामुळे त्या वाळून पडल्या. तेव्हा त्यांना ते समजले. मुळात थंड प्रवृत्तीमुळे त्या बुद्धांना गारवा देऊ शकल्या. कथेप्रमाणे १०८ गोगलगाई ऊल्लेख असला तरी १०८ गठ्ठ्यांचा अर्थ कुरळे केस हे त्यांच्या राजेशाही जीवनाचा त्याग दर्शवतात.
भगवान बुद्धांनी त्यांच्या बलिदानाचा आदर केला. मूर्तीच्या डोक्यावरील हे कुरळे केस बलिदान आणि निसर्गाची करूणा दाखवतात.
भगवान बुद्धांच्या जीवनाविषयी आदर आणि कौतुक तर होतच पण याठिकाणी भेट दिल्याने त्यांच्या विचारांचा जगभरातला प्रसार समजला.

बिग बुद्ध टेम्पल :
ही जागा बघायला निघालो  नंतर खुप ऊंच वळण घेत आम्ही गेलो. नाक्केर्ड टेकडीवरची ४५ फुट ऊंचीची बुद्धांची मूर्ती संगमरवरी आहे. शांती आणि समृद्धी च फुकेतच ती प्रतिक आहे.  सद्ध्या डागडुजीच काम सुरू असल्याने जवळ जाता आलं नाही. या मूर्तीच्या भवती सोनेरी मूर्त्या आहेत. वरून मस्त व्हू आहे. 
कोणत्याही बुद्धांच्या देवळात अंगभर कपडे लागतात. खांदे गुडघे ऊघडे चालत नाही. मुख्य देवळाबाहेरच चपला काढणे क्रमप्राप्त आहे. मस्त नियम. आवडले मला. आता सगळ्यांना चहा काॅफीची तल्लफ आलेली मग काय तर मधे लागलेला रा वाई बीच चा सगळा भाग नजरा काॅफी शाॅप शोधत होत्या.
काय विचार करतो आणि काय पदरी पडतं सांगू शकत नाही. गरम काही मागुन उपयोग नसतोच पदरी भ्रमनिरास पडतो. मग काय आइस टी जिंदाबाद 

प्राॅम्थेप केप :
हे फुकेतच शेवटच टोक जस आपलं कन्याकुमारी. जबरदस्त सन सेट दिसतो. विस्तीर्ण परीसर समुद्राजवळ जायला टायवाट तसेच ऊंचावर लाइट हाऊस आणि देऊळ दोन्ही आहे.
वर मोठी सोनेरी ब्रह्म देवाची चार तोंडाची आठ हाताची मूर्ती आहे. प्रत्येक चेहरा वेगळा पैलू दर्शवतो. अनेक आकारांचे हत्ती म्हणजे मातीचे पितळी असे बरेच होते.

कॅरोन व्हू पाॅइंट :
आम्हाला कॅफे द मार बीचला सनसेट बघायचा होता पण तो आधीच करोन व्हू ऊला गाठून मिस्टर बर्डनी सुंदर दाखवला.
तरी तो माहोल बघुच म्हणून कॅफे द मार रिसॉर्ट बीचवर गेलो. पण थखले भागले जीव तीथ रमले नाहीत.
आता जेवायच कुठं? व्हेज फुड, थाय फुड आणि मेक्सिकन कोणत रेस्टॉरंट एकाच छत्राखाली देईल शोधत आमच्या मेरिएट च्या जवळच पोचलो.
वाटेत स्ट्रीट मार्केट लागल पण जेवणाची जागा शोधु या मुद्द्यावर भर होता मग काय सोडली भटकंती. या पर्टिक्युलर वेळी सहा जणांचे सहा विचार होते.  प्रत्येकाची प्राधान्य वेगवेगळी होती.
मग काय डिनर- माई खाओ गार्डन अण्ड सी फुड ला गेलो, जे मेरिएटस् च्या अगदी जवळ होतं. ईकडे दुकानं सातला बंद, जेवणाची ऑर्डर साडेनऊ ला शेवटची. साडेदहाला सगळं सामसुम. सगळ्या दुकानात वुमन पावर अग्रेसर आणि कुठही जा हात जोडूनच नमस्कार होणार. रस्ते स्वच्छ कॅब तर मालकीच्या वाहनाला तोंडात मारेल अशा. मॅरेथॉन संपल्यावर काल तर एकेकट्या मुली दुचाकी कॅब बोलवून भुर्र. रस्त्यात कचरा कोण फेकणार नाही तीन रंगाच्या केराच्या कंटेनरमधेच टाकणार.
असो आमच जेवण आज भारी होतं कारण हवा तसा मासा आणि फ्रेंच फ्राईज मिळाल्या.
नंतर सेवन ईलेवन मधून मॅग्नम घेतलं खात खात रिस्टार्ट वर पोचलो.
 आणि अशाप्रकारे फुकेतमधला दुसरा दिवस सफल संपूर्णम.
मॅरिएटस् चा फ्रंट नाईट व्हू.
ऊद्याचा दिवस सकाळ दुपार रिसॉर्ट वर मजा करू आणि संध्याकाळी परत भटकू अस ठरलं. मस्आत दोन तीन डाव पावलो खेळलो आणि निद्राधीन झालो.

२ मार्च
आज जरा निवांत ऊठलो. रिसाॅर्टच्या किचनमधे पोहे केले. दोनदा चहा काॅफी घरच्यांशी फोन सगळ झालं. नंतर कोणी स्विमिंग पुलवर गेले तर कुणी सायकल राइड मारून आले तर कुणी रिसॉर्ट चा परिसर चालुन आले. ब्रेड बटर जॅम पोहे ज्याला जे हव ते ज्यान त्यांन घेतलं. नंतर थाड करी स्टिकी राइस विथ सलाद बनवलं. 

मग काय मस्त थाय मसाजची वेळ झाली. तिघीही मस्त शरीर रगडून आलो.आपल्या सततच्या धावपळीच्या आणि नैतिकतेच्या पठडीत आपण नीट बसतोय ना याच्या गडबडीत स्वतः कडे बघतच नाही. रेटत राहतो स्वतची क्षमता सिद्ध करत स्वतः ला बक अप करत जगतो. पण अशा प्रकारे मसाजमधे समजत की कुठल्या अवयवावर, हाडावर आपण जोर देत जगलोय. परमेश्वराच्या या मंदिराला आपण खाण पिण नीट करून जपतोच पण त्याला वंगणही गरजेच आहे हे या आयुर्वेदिक मसाज नंतर समजत. मसाज करून देणारी व्यक्ती त्यांचे हात पाय गुडघा वापरून ऊर्जेच्या पेशींवर खोल आणि योग्य दाब देतात त्यामुळे मज्जासंस्था उत्तेजित होऊन खोल विश्रांतीची अनुभूती येते आणि झोप लागते. या पारंपरिक मसाजमधे मंद पण लयबद्ध स्ट्रेचिंग करतात. यामुळे सांध्यांची गतिशीलता आणि लवचिकता सुधारते अस म्हणतात. 
जे कोणी ईकडे येतील त्यांनी यांच्या पारंपरिक मसाजचा आनंद नक्कीच घ्यायला हवा.
साधारण चारला शेवटची दोघ जेवलो. आराम करून सगळेच माई खाओ बीचवर निघालो.
मनसोक्त भिजलो रील्स केल्या. सनबाबा निघाले परत फार ऊदास वाटतं सनसेट नंतर बीचवर. पुन्हा रीसाॅर्टच्या गाडीनी रूमवर आलो. फक्कड चहा झाला नंतर तासभर गप्पा झाल्या. आजचा दिवस कसा सुंदर गेला, नंतर ऊद्या काय कस करायच? मग आम्ही रसादा बंदरावरून फी फी बेटिवर जाण्याची बोट राइड बुक केली. अगदी युद्धाबद्दही गप्पा झाल्या. कसे नऊ वाजले समजलच नाही.
ऊद्या सकाळी ९ ला निघायच त्यामुळे जेऊन आल्यावर पॅकिंग आवरण मगच झोपण दिसत होतं. जवळच्या रेस्टॉरंट मधेच जेऊ अस ठरलं. बिल बेंटली पबमधे हव ते  मिळालं. ईकडचा कॅरम फारच वेगळा होता.
निवांत हवातसा शांत दिवस घालवून चालत रिसॉर्ट वर आलो.

३ मार्च
आज सकाळी सगळ आवरलं. ग्रुप फोटो तर बनता ही है. मॅरिएटस् पासून रसादा बंदर दीडतासावर होतं. ही व्हॅन ईतकी आरामदायी होती की ड्रायव्हरच कौतुकच वाटलं.
रसादा बंदराजवळच पोणत होतो तेव्हा एक दुकान दिसल अफलातून नाव "ओs तेरीs" हलका निळा आणि पिवळा रंग बदकांच कोलाज जबरदस्त आवडलं मला. हो हो सांगते ते दुकान लाॅन्ड्री होती. भिंतच भिंतभर वाॅशींग मशीन. आधीच विथभराचे तीन कपडे घालतात यांना का लागत असेल लाॅन्ड्री?  भयकर विनोद घडले यावरून. साडेदहाच्या सुमारास आम्ही रसादा बंदरात पोचलो.
आता खरी समुद्र सफर सुरू होणार होती. मागे त्सुनामी आलेल तेव्हा मी मुरूडला अडकलेले किल्ल्यात. तिकडून भराभर बाहेर काढलेलं तो प्रसंग फार डोक्यात बसलेला. त्यामुळे मी फार बोटी बीटीत जायच टाळत होते. पण जेव्हा मला सरप्राइजच समुद्र सफरीच मिळालं तेव्हा ठरवल कान्हाजी भिती त्याग हीच संधी आहे अस सांगत कशावरून नसतील?
रसादा बंदरावर आम्हाला एक छोट स्टिकर लावलं तेच तिकीट. कॅटामरन क्रूझ ही स्थिर, आरामदायी आणि सुरक्षित असतात. आमची रसादा बंदर ते टोन साई बंदर अकरावाजताची फेरी होती. च्युरेंग ट्रवल कडुन आम्ही ती बुक केली होती. क्रूझचा ईतका सुंदर अनुभव आला.
आत छोटा फुड स्टाॅल आणि आरामदायी खुर्ची आणि लाकडी टेबल खुर्च्या अस आहे. सुरवातीला बोट हळूहळू चालते आणि नंतर जबरदस्त स्पीड पकडते. वाटेत दिसणारे पाण्यातले डोंगर, ऊधळणार पाणी आणि तुषार यांच्या सह आम्ही फी फी बेटाकडे सरसावत होतो. एकदम मस्त प्रवास, ना डचमळ ना मळ मळ. पहिला तासतर मी डेकवरच होते. काय सुरेख अनुभूती होती चहुकडे अंदमान समुद्र आणि मधे बोटीत आम्ही! अहाहा! 
पाण्या नितळ निळा रंग मनमोहक होता. आता तासभर फक्त वारा समुद्राच कापलेलं पाणी आणि बोटीच्या मशिनचा आवाज हेच होतं. साडेबाराच्या सुमारास डेकच्या वरच्या केबिनमध्ये बसलो आणि फराळ सुरू.  ईतके दिवस कल्पनेस आखलेला हा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला. बरोबर दोनला टोन साई बंदरावर आम्हाला पोचवलं.
या बंदरावर ईतका कलकलाट आणि कोलाहल होता काय सांगू? घामाच्या धारा सामान आणि आम्ही. फायनली आमच्या बर्ड व्हू रिसॉर्ट चा माणुस दिसला. त्यानं सांगितलं की तीनवाजता टॅक्सी बोटीन जायचय तोवर इथच थांबा. मग काय केल ऊभ एका ठिकाणी आणि आमची उत्साही जोडी फी फी ची वन डे टुरची चौकशी करायला भिडली. मांजर सात घर बदलत तस चार ठिकाणी सामान घेऊन तीन वाजेपर्यंत फिरलो.
नंतर समजलं की आणखी एक बोट येतेय मग एकत्र पंधरा वीस जणांना टॅक्सी बोट रिसॉर्ट वर नेणार आहे.
या त्या टॅक्सी बोट. मी विचार केला कशात नंबर लागतो देव जाणे आता. पण किनाऱ्यावरून किमान गुडघाभर पाण्यात जाऊन मग या बोटीत चढलो पण भारीच अनुभव होता. ईतका नम्र होता तो माणूस बाकडा ओला होता तर बसु दिल नाही तो कोरडा केला. चारपाच जण आमच सामान न भिजु देता डोक्यावरून बोटीत आणत होते. बोटीत बसुन समुद्राचा तळ त्यातले दगळ स्पष्ट दिसत होते. मोटरबोटीन पंधरा मिनीटात आम्ही रिसॉर्ट च्या बीचवर पोचलो. पायी चालत यायच तर येऊ शकतो तासभर चालाव लागतं. वाहन उपलब्ध नाही. फक्त बोटच. पायी यायचा रस्ता पण मस्त आहे. फी फी बेटाच्या मुख्य वर्दळीच्या भागातुन आहे.
हाच तो सागरी किनारा जो पुढचे तीन दिवस दोन रात्र आमचाच होता. समुद्रकिनाऱ्या लगतच रिसॉर्ट आहे. मोठा परिसर आणि एकेक बेडरुमची काॅटेजेस पण खुप लांबच मिळाल्यान रीसेप्शनवर यायला १५-२० मिनीट लागायची.
चार तरी वाजले असतील रूमवर सेट होईपर्यंत. ईकडेच रेस्टॉरंट पण होत तो एक प्रश्न सुटलेला. परत गिरनार चहा खाकरा लाडु निघाले. मधल्या वेळात सनसेट पॉईंट आहे अस समजल्यामुळे पाचला आवरून तो बघण ठरलं.
मस्त बुट घालुन चालायला तयार होतो पण प्रत्यक्षात समजल की तो सनसेट पॉईंट अडीच किलोमीटर चालून गेल्यावर आहे. दुसरीकडून ऊतरलो त्या पर्वती सारख्या चारशे तरी पायऱ्या असतील अस होतं. मधे किती दुर आहे सनसेट पॉईंट विचारल तर मिश्र ऊत्तरं आली. एकान ठाऊक नाही सांगितल, एकान नुसत बोट दाखवलं, एकीन दहा मिनिटे फक्त अस सांगितलं. सनसेट पॉईंट ला पोचल्यावर समजल यांची दहा मिनिटे कशी आहेत ते. जेवढा दिवस भर आराम केला तेवढाच घाम गाळला सधबाबाचा टाटा बघायला. पण 
पण सनसेटचा नजरा बघुन मन शांत झालं. हीच निसर्गाची कमाल म्हणावी.
भरपूर पाणी प्यायलं. ऊतरताना पायथ्याशी पायरीनी आलो. परतीचा रस्ता धरला तेव्हा च फी फी बेटावरची सेव्हन आयलंड फेरी फायनल केली. गजबजलेल्या शहरी भागातून दीडतास चालत वाटेतले व्हिडिओ काढत परत आलो. रमत गमत ऊतरलो आम्हीच शेवटचे ऊतारू असू बहुतेक.
मधे सेवन इलेवनमधुन कोल्ड्रिंक्स आणि कर्ड घेतलं. लाइवली जाग आणि म्युझिक आणि भरपुर वर्दळीच्या रस्त्यामुळे बेटावरच रोज च आयुष्य बघता आलं.
रीसाॅर्चटवर पोचलो सव्वानऊ तरी झाले असतील. 
वाटेतच कोल्ड्रिंक्स फिनीश. वाळुतचं टेबल लाऊन डिनर मागवलं. हळुवार लाटांचा आवाज ऐकत कोणी बिन बॅगवर तर कोणी आरामखुर्चीत पहुडलो.
हा ग्रुप फोटो काढून फी फी बेट टुर कंपनी ला पाठवला. वनडे समुद्र सफारीचा इन्शुरन्स करतात म्हणे. इतके दमलेलो की आपोआपच पावल झपाझप पडत काॅटेज गाठलं. दुसरा दिवस सकाळी सातला ऊठुन चालणार होतं. नऊला रिसॉर्ट च्या किनाऱ्यावरूनच पिक अप होता.

४ मार्च
आज सकाळी आठला आम्ही ब्रेकफास्ट ला खाली भेटलो. इतका छान नाश्ता होता. उकडून फ्राइड केलेला बटाटा, ब्रेड, काॅनफ्लेक्स, नूडल्स, अननस, कलिंगड पप ई, फॅनकेक, ताजा ऑमलेट स्टाॅल, स्टिकी जास्मिन राइस एक  ना दोन वीस स्टाॅल. चहा काॅफीचे सहा प्रकार आणि ज्युस वेगळ. अपनी तो चल पडी. गंमत माहितीय का लहान बाळाला आंघोळीनंतर जस दुपट्यात आवळून बांधतात ना तसं ऑमलेट होतं. एकदम भन्नाट स्टाइलमे..
 मिस्टर पुल परफेक्ट न ऊच्या डोक्याला हजर. आधी आमची सवारी बोटीत चढली नंतर टोन साइ बंदराजवळ आणखी दहा जण चढले. तिकडे आम्हाला हाताला लाल लोकर बांधली नावं माणुस हात वर करणे झालं. फुडपण तेच देणार होते मग कोण व्हेज कोण नाॅनवेज टिक झाली आणि आम्ही सोळाजणं पंचवीसजणांची क्षमता असलेल्या फेरी बोटीत फायनली चढलो. आज दिवसभर समुद्रात असणारोत कसा असेल दिवस मी मनात मांडे भाजत होते. आधी थोडी ढम्म फण नंतर स्टंट करत मारली की बोट चालकानी. हे धुवाधार पाणी कापत सपासप चाललो की. ऊगाचच आपण काहीतरी भारी करतोय असा फिल आलेला. कारण माझा पहिलाच अनुभव होता. मी मनोमन आभार मानत होते मला ही समुद्र सफर घडवल्याबद्दल.

माया बे
माया वबे ही थायलंडच्या कोह फी फी ले बेटावरील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध खाडी आहे. ईकडे पांढरी वाळू होती. कातळ निळं पाणी आणि (लिमस्टोनच्या उंच कड्यांनी) उंच चुनखडीचे कडे आहेत. नजरच हटेना. दोन कातळ कड्यांमधला नीळाशार पाण्याचा वाळुकडे येताना पांढरट होणारा रंग... अवाक् होतो मनुष्य हा नजारा बघून. 'द बीच चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध आहे ही जागा आमचा टुर गाइड अमन सांगत होता. एकदम हसरा आणि खूपच हेल काढून बोलणारा होता. जमिनीशी परत मिलाप होईतोवर हाच दुवा होता आमचा. मिस्टर पुल बोटीवरच.
पर्यटनामुळे झालेल्या नुकसानामुळे तसेच नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्यासाठी हा परिसर काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. आपल बुकिंग करण्या आधी हे तपासा मगच ट्रीप ठरवा.
शार्क माशांच्या आणि कोरलचे संरक्षणासाठी पोहणे वर्ज्य आहे. पोटरीपर्यंतच पाण्यात जायच. लाल झेंडा लावला ती खुण ओळखायची. पुढे शार्कची भिती असते. बेबी शार्क ईकडे सहज दाखवले मिस्टर पुलनी जंगलातून आत येतानाच. दररोज येणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. आपल्या बोटी माया बेच्या मागच्या बाजूला निळ्या प्लासटीकसारख्या गदागद हलत्या प्लॅटफॉर्म ऊर्फ घाटावरच आपल्याला सोडतात. आपण माया बे कडे जाण्यासाठी जंगलाच्या वाटेवरून जावं लागतं. आधी लाकडी जीना मग लोखंडी पुल आहे. यापुलावरून खाली बघितलं की लहान शार्क दिसतात. ईथ बघू तिथ बघू की पुढे जाऊ. काय काय एकदम करायच होतं.
 माया बे चा निसर्ग पाहणे, फोटो काढणे आणि उथळ पाण्यात ऊधळणे हे आपण करू शकतो. लोखंडी पुलानंतर जंगलाची पायवाट पण मस्त आहे गारगार.. निसर्गाला त्रास द्यायचा नाही लगेच शिटी वाजते फाइन बसतो. आत जंगलातील पायवाटेजवळ एक देऊळ होतं आम्ही लांबनच बघु शकलो कारण मिस्टर पुलनी दिलेली तासभराची वेळ संपत आली होती. ईच्छा असूनही थांबु शकले नाही. तासभर कमी पडतो राव ईकडे. ड्रोन आणू नका कारण ते निषिद्ध आहे. 
थोडक्यात काय जीवाच माया बे केलं. हो कारण ईतक्या प्रकारच्या पोझेस मधे फोटो काढले आई शप्पथ काय सांगू.
बोटीतली क्युरीक आमचा ग्रुप फोटो काढुन तर गेलीच मिस्टर अमननी पण काढला. मला धुरंधर रील करायच होतं. महत्कष्टान त्याला एवढच समजल की मला क्लिप करायची आहे. फोटो नंतर त्यानच त्याला हवं तस रील बनवलं.
हा पहिलाच पाॅइन्ट होता आणि कालच्या अनुभवामुळे माझी पण भिती चेपली होती. एक नियम होता बोटीतून चढताना एका बास्केटमधे चपला ठेवणे. उतरता ती बास्केट आधी खाली रीती होत होती. माया बे बघुन निघालो तेव्हा पाण्याचा पाइप लाऊन रंगपंचमी सारखे सगळ्यांचे फराफर पाय धुतले. आपली ३ नंबरची निळी बोट ओळखायची खुण. फार भारी होतं केजीची पिकनीक रूल वाटत होते पण खरतर अत्यंत नियोजनबद्ध होतं.

मंकी बे
ही जागा जंगली प्राण्यांच घरच जणू. दोन कड्यांच्या मधे खाडीसारखा पाण्याचा मार्ग. या कड्यांवर लांब शेपटीची रागिष्ठ माकडं होती. चारफुट पाण्यात उतरून आत जायच होतं. फक्त एकच जण आत गेला. मिस्टर पुल ओरडले do not feed and heart monkeys जर ते चावरे तर फेरी रद्द करून हाॅस्पिटल गाठाव लागतं. पोहायला येणारे हे sss धपाधप ऊड्या मारून आत पसार. आम्ही काहीजण मात्र ते बाहेर येईपर्यंत कड्यांवरची माकडं आणि परत परत ऊसळेल्या समुद्राच्या लाटांच पाणी त्यांची नजाकत तसेच बोटीतली माणस बघत होतो.

वायकिंग गुहा 
कोह फी फी लेहवरील वायकिंग गुहा ही सद्ध्या  प्रवेश नसलेली चुनखडीची गुहा आहे जी प्राचीन, वायकिंगसारख्या जहाजांच्या चित्रांसाठी आणि अत्यंत मौल्यवान स्विफ्टलेट पक्ष्यांच्या घरट्‌यांसाठी प्रसिद्ध आहे. ही गुहा मिस्टर पुल नी वर्णन करून करून सांगितली. प्रंचड वार त्यामुळे हेलकावे घेणारी बोट होती. तरी सगळ्यांच लक्ष आहे ना तपासून ते सांगत होते.
जवळच्या पाण्यात स्नाॅरकेलिंग करायला साहित्य पण पुरवण्यात आली. गुहेतली चित्र सुरक्षित राहावी यासाठी आत प्रवेश नाही. ४०० वर्षे जुनी चित्र आहेत. पक्ष्यांच पण काहीस सांगितलं पण मला नीट समजलं नाही. दिवसभराच्या फेरीत हा स्पाॅट निसर्गरम्य म्हणून  आणि फोटो-स्पाॅट म्हणून नेतात. त्याच्या जवळच्या स्वच्छ पाण्यात स्नॉर्कलिंगची मजा येते. आमच्यापैकी काहीजण फोटो काढत होतो तर काही जण खाली जाऊन मासे कासव बघुन आनंद लुटून आले.

पिलेह लॅगून
स्विमिंग ला सोडलं ती जागा होती पिलेह लॅगून.  इकडे पाणी शांत आणि नीळ हिरवं होतं. याठिकाणी नुसतं बघत राहाव वाटत होतं. समोर निळाई पाण्याची मागे हिरवे पण चुनखडीचे कडे. मी ना पोहायला गेले ना बोटीत बसले शांत समुद्र न्याहाळला आणि डोळ्यात साठवला. ईतकी माणस होती पण कलकलाट नाही शांतता होती.

लोह समह बे
फिश सीन पाॅइंट आहे हा. थोडा ऊथळ कडून खोलकडे पाणी आहे. आपली बोट थांबली की काळे पिवळे, काळे लाल तसेच काळे पोपटी रंगाचे पट्टे असलेले माशांचे झुंड आले. इकडे पाण्यात डोलत बोट अर्धातास थांबते. हा स्पाॅट जब्रा आहे. ईकडे किनाऱ्यावर बोट जातच नाही आपण स्नार्केलिंग करत मासे बघायचे. हा बीच छोटुसा होता आणि शेजारी मोठा हिरवा डोंगर आणि एक समोर कार व्हू होता आम्ही भरपूर फोटो काढले. आज प्रथमच मी ईतका वेळ पाण्तुहोते आणि प्रथयच पोहण येत नसल्याची खंत जाणवली.
हा होता हाफ डे टूर. यानंतर परत जिकडून चढलो त्या किनाऱ्यावर गेलो. फस्ट हाफ वाले गेले पुढचा हाफ डे चे चढले. मधल्या वेळात आम्हाला फ्राइड राईस काकडी अस लंच दिल. दीड ते अडीच हा ब्रेक होता. बोटीवर असताना कलिंगड अनननस कोल्ड्रिंक्स केक अस मधून मधून मिस्टर अमन देतच होते.

मंकी बीच
आधी बघितलेल्या मंकीच्या खाडीमागचा हा मंकी बीच वर्णास अशक्य आहे. ईथ पोचायला आधीच्या खाडीच्या डोंगराला वळसा घालताना बोटीची काय कमाल होती.
अक्षरशः शेट्टीच्या सिनेमानल्या गाड्या कशा भुर्रकन धावतात ना कधी फक्त उजवीकडे कलून तर कधी डावीकडे. बाई गsss भारीच अगदीच वेगळा आणि ऊच्च दर्जाचा अविस्मरणीय अनुभव.  या दुपारच्या फेरीत हा चारपाच वेळा हा अनुभव घेतला. 
मंकी बीचवर अमनला आमचा पाठिराखा तासभर सोडून बोट गेली. मंकी बीचवर स्नाॅर्केलिंग स्विमींग काहीही करू शकतो. आम्ही मनमुराद डुंबुन घेतलं. माकडांचा थरार बघत मधे वेळ गेला. यंदाची रंगपंचमी मंकी बीचवरच केली. महत्वाच म्हणजे आमच धुरंदर रीलचा याच जागेवर योग होया तो पण मिस्टर अमनच्याकडूनच!
खांदे डुबतील एवढ पाण्यात गेले तर तेच मासे आजुबाजुला. मला तर लेकाच्या फिश टँकमध्ये आपण कसे दिसू तेच डोळ्यासमोर आलं. हसलात ना?  मला माहितीय. पण नीट विचार करा मगच समजेल. पावणेतीन झाल्यानंतर मात्र कधी एकदा बोट येतेय आणि कपडे बदलू अस झालेलं.
आपल्याला किती ऊन लागतय? आपण कसे दिसतोय? अशा खुप गोष्टी चा विचारच आला नाही मनात.
समुद्र आहे स्वच्छ नितळ तळ आहे सगळे एकत्र आहोत. भिजाsss बस ईतकच!
बांबु बीच
मंकी बीच पासून बांबु बीचला पोचायला चार वाजले. आजवर मी माझी माणस बोटीत फेरीला गेलेली परत येताना दिसणं तो आनंद घेतलेला पण आयुष्यात प्रथमच मी समुद्रातून जमिन दिसण्याचा आनंद या बांबु बीचवर घेतला. ईकडे बोटीतून उतरताना जवळपास मांडीच्या निम्म पाणी असतानाच ऊतरवं. या पाण्यातून चालताना किनाऱ्यावर पोहचे पर्यंत चा पाण्याचा तळ ईतका स्पषूहोता की पांढरे दगडही दिसत होते. इकडच्या वाळुतले दगड हाडांच्या तुकड्यासारखे पण कोरीवकाम केलेले होते. ते इथून बाहेर न्यायला परवानगी नव्हती. मग काय जमा केले आणि फेकले.
बांबु बीच टापू हा कदाचित एक स्वतंत्र बेट असावा. वाळुतर जणु काही मिक्सनी बारीक केलीय ईतकी सपीठ. चार ते सहा दोन तास या बांबु बीच कम बेटावर आम्ही आणि मिस्टर अमन होतो.
ईकडे एक मोठा एक लहान फुड स्टाॅल होता. तिघींनी कष्ट करून आम्हाला गरम पाणी आणि कप द्या हे तीथल्या मालकीण वजा मुलींच्या गळी ऊतरवलच. आनंद काय तर गिरनार चहा पिता येणार. आपण भारतीय चहा वेडे तेऊगाच नाही. जवळपास सगळ्यांनीच कपडे बदलले. मग सामान रक्षण कर अस अमनला सांगून चालू लागलो. विस्तीर्ण समुद्र नंतर ओल्या वाळुचा पट्टा नंतर कोरडी वाळू आणि नंतर जंगल आणि आम्ही बोटीवरचे १२-१४ जण फक्त. मस्त वाळूत बसून फोटो सेशन झालं. सनबाबा निघायची तयारी करत होता. ते बेट अर्ध सर्कल फक्त चाललो. पावणेसहाला जिथ सोडल तिथ पोचायला हवं होतं. जंगल होतं ते पण खर सांगू का एकही बांबूच झाड दिसल नाही. मागच्या बाजूला असेल कदाचित. झाडं भरपूर हिरवीगार होती वेली होत्या. बांबुपासुन बनवलेल्या दोन झोपड्या होत्या. फुड स्टूजवळचा बसायचा बाकडे खुर्चीहवजा भाग होता आणि कापलेल्या ओंडक्यांची स्टलं होती. दोन खोल्यांमधली एक मुस्लिम प्रार्थना खोली जी बंद होती आणि चौकशी खिडकी अस होतं. पण वर्दळ तुरळकच. शोधल पाहिजे ऊरलेल्या अर्ध्या भागात काय आहे. निघण्यापूर्वी तीन धुरंधर माणसांचा फोटो काढला आणि बोट आली तसे धावलो. परत मांडीभर पाण्यात भिजायला सामोरे जायला.
सनसेट 
आता हे सनसेटला कुठं नेणारेत? अंधार झाला तर? वेळेत किनारा दिसेल ना? ऊगाचच मनात आलं. बांबु बीच ते बर्ड व्हू रिसॉर्ट पाण्यातून पाऊण तासावर म्हणेजे जवळपास आठ किलोमीटरवर. पण हा पाण्याच्या लहरींवर नाचत, बागडत, गाणं म्हणत, निसर्ग डोळ्यात सामावत, सनसेट बघत, फोटो काढत, समुद्राच्या मध्यभागी कलिंगड खात घालवलेला हा कालावधी  आजच्या समुद्र सफारीचा ऊच्चांक होता. हा आनंद शब्दबद्ध करणे नाही.
माझ्या जीवनातील ही समुद्र सफर माझ्या कायमच स्मरणात राहिल.
आनंदित सहा मनं आमच्या रिसॉर्ट च्या बीचवर ऊतरणार होती पण पाणी जास्त की कमी काही तरी झालं म्हणून टान साई बंदरावरच ऊतरवलं. मग काय तासभर चालत मार्केट बघत सहा गडी ओढत अडखळत पोचलो.
शार्प ९ वाजता ट्विनींग ड्रेस मधे डिनरला भेटायच ठरलं. आम्ही तिघी मस्त दिसत होतो पण फोटो हा शब्द जरी उच्चारला तरी प्रत्येक जण ईकड तिकड बघु घतके दमलो होतो . दिवसभरात चारशे तरी फोटो काढले असतील एकंदर. तरी न कुरकुर करता काढले आमचे फोटो आणि मग मात्र गादी दिसू लागली होती. काही मिनिटांतच सगळे गुडूप.
५ मार्च
आज मी पण सहाला ऊठले. काल अनिरुद्ध असाच ऊठुन जवळचा बीच फिरून आलेला ती जागा मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या रीलसाठी आवडली होती. मस्त आरामदायी पसरट आसनावर बसून चहा घेतला. निघताना चा ड्रेस आणि कालचे ओले कपडे जे आजुनही ओलसर होते ते सोडून बॅग आवरून घेतली. दोघही त्या बीचवर गेलो. दोन मोठ्या घोरपडी भांडण बघितलं. झोका नंतर किनारा.. खडक करत फिरत फिरत रिसॉर्ट च्या समोर पोचलो. तिकडे दुसरी जोडी भेटली. क्लिकचा पाऊस पडला. आता वाजले होते नऊ मग काय होऊन जाऊ द्या ब्रंच म्हणत आवडीनुसार ऊरकलं. साडेदहा ते साडेबारा आराम करून चेक आउट करायच ठरलं.
फुकेतची फेरी तीनची होती. दोनला टॅक्सी बोटीतून सोडणार होते. टाटा फी फी फोटो मसट होता.
दोनजण बोटीतून सामाना बरोबर आणि चारजण चालत खरेदी करून टोन साई बंदरात पोचलो. साडेतीनची फेरी बोट निघाली. आज कोणीही बाहेर जाऊन पाणी बघु म्हटल नाही.
साडेचारला बोटीच्या टेबलवरच रूम वरून करून आणलेल ऊपीट, चिवडा, फरसाण जे वर होतं त्याचा फडशा पाडला. आणलेल थर्मासमधल गरम पाणी होतच परत जय गिरनार झाला. एक झपकी पण मारली मी. पाणी बघत खिडकीतून टाटा फी फी मनी म्हणत होते.
साडेपाचला रसादा बंदरावर आलो. या प्रवासातल शेवटच टॅक्सी बुकिंगच काम करावच लागणार होतं. 
हा टॅक्सीचालक डेंजर होता. एवढी लांब ऊभी केलेली गाडी काय सांगावं.
साडेसातला फुकेत विमानतळावर पोचलो. पूर्ण प्रवासात दोन शब्द कोडवर्ड ठरले. तेच चघळत हसत खळखळाट करत बोर्डींगपण झालं. आज सकाळी आरामात चहा पित असताना छतावर पडलेले आंबे  जे आनंदाने गोळा केले होते ते पण इंटिग्रेटेड झाले मुंबईत. ६ मार्चला पहाटे पावणे दोन ला मुंबई आणि चार वाजता के के ट्रॅव्हल्सच्या कृपेने सात वाजता पुण्यात घरात....
खुप आठवणी आणि पुढचे प्लॅन आखत भेटीची आश्वासने देत शरीरं घरी आली पण मनं मात्र समुद्राच्या किनाऱ्यावरच घुटमळत होती बहुतेक.

सर्वात एक गोष्ट जी मला आवडली थायलंडची ती म्हणजे कोणत्याही श्रीमंत गरीब किंवा कोणत्याही पदावर असा हात जोडू मान झुकवूनच सामोरे जाणे. तसेच स्वतःच्या संस्कृतीला पकडून ठेवणे ही कृती जी आज सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे.

शुभं भवतु.
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
९९७०१६८०१२