Friday, 28 June 2019

अनुभवाची खाण - आजी




"आजी " माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात आजी असावीच. आईची आई असो, बाबांची आई असो अथवा नुसती आजी. "आजी " या नात्याच्या टप्प्यावर पोचलेली स्त्री अनुभवाची खाणच  असते. आयुष्यात आलेल्या गणितांची उत्तरं योग्य कशी सोडवायची हे करताना आपल्यासाठी गाईड असते. कोणता फॉर्मुला कधी वापरायचा ते आपण ठरवायचं पण ती अनलिमिटेड सोल्युशन असणारी गुगलच असते. 

माझ्या आयुष्यात पण अशी एक आजी आहे. गेली २३ वर्ष ती मला योग्य वेळी भेटली जाते. जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा ती भरभरून देते. कोणताही आडपडदा न ठेवता देते. आधी वाटायचं कि रक्ताच्या नात्याचीच आजी नातवंडांना खरा प्रेम देते. पण हि आजी वेगळीच आहे. तिची स्मरणशक्ती तल्लख आहे. आताच्या जगाशी ती बरोब्बर अपडेट असते. कोणत्याची विषयावर आपण तिच्याशी मनमुराद गप्पा मारू शकतो.  सहज बोलताना ती आपली मनातली दबती, दुखती  नस ओळखून त्यावर झपकन मलम पण शोधून देते. आपण काहीच सांगायची गरज पडत नाही आणि उत्तर समोर असतं. सकारात्मकतेचे सचोटीचे असतात ते उपाय.
ती दूर दूरच्या आपल्या नातेवाईकांना पण लक्षात ठेवते. कसा कळतं तिला कोण जाणे आम्ही येतोय पण प्रेमानी खाऊ हातावर ठेवते. आठवणींनी लावून ठेवते. सतत नवनवीन पदार्थ करत असते. एकटी आहे म्हणून करायचा कंटाळा अजिबात नाही. 

२३ वर्षातल्या माझ्या प्रत्येक भेटीत मी काही ना काही शिकूनच तिच्या घरून निघाले आहे. माझा नवीन संसार मांडला होता तेव्हा स्वतःच्या घरातली  सोलणी, लहान पातेल्या वरच्या झाकण्या अशा दोन तीन वस्तू तिनं मला दिल्या होत्या. त्याच महत्व मला तेव्हा समजलच नव्हत. त्या अजूनही वापरात आहेत आणि बायकांचा घरातल्या चमच्यात पण जीव असतो अशा संसारातून त्या वस्तू देतानाचं मोठं मन मला हळूहळू उमगलं. 

पूर्वी आप्पा असताना आम्ही जायचो तेव्हा पेप्सीकोला आणून ठेवलेला असायचा. शनिवारचा रतीबचं जणू. आजीच्या सगळ्या चाली रीती पण पाठ असायच्या. मुलींना कमी लेखायचं नाही आणि घरटी दोन तरी लेकरं हवीतच हे सांगायचं जणू त्यांनी वसाचं घेतलाय. अजूनही त्या हे सांगताना मी पाहते. माझ्या बरोबर येणाऱ्या मित्र मैत्रिणींना पण त्यांचा लळा लागला होता. कॉलेज नंतर कुठं कुठे गेले सगळे तरी आजीची चौकशी हमखास करत असतात. 

कोणाचा कोण तो.. काय शिकतो?, कोणाच्या माहेरचं कोणीतरी त्यांचं काय विशेष आहे ते, कोण पास झालं , कोणाला हि माहित पोचावं, उपयोगी पडेल, कोण बरेच दिवसात आलं नाही खुशाली पण नाही, कोणाचं नाव पेपर मध्ये आलं त्याला फोन करायला हवा, अशा अनेक अनंत गोष्टी त्या आधी करायच्या त्या अजूनही करतात. 

८० चा पुढे वय असणारी हि आजी १८ वर्षाच्या मुलाच्या उत्साहाला लाजवेल अशी आहे.  शरीर थकलय थोडं पण मनं भक्कम आधीसारखच आहे. 

वेळेला खंबीर पणे सामोरं जाणं , कचऱ्यातून कला करून वस्तू बनवणं त्या जपणं त्यांना छान जमतं. कोणत्याही कामासाठी , प्रवास साठी , कार्यासाठी, यौग्य क्लुप्त्या त्यांच्याकडे भन्नाट आहेत. गवले करणं , वाती करून देणं हा सध्याचा साईड बीसीझनेस.  पण रिकामं बसणं नाही. आपल्या छोट्याश्या पेन्शन मधून अजूनही काही रक्कम सियाचीनच्या जवानांना त्या पाठवतात. जवानांना ऑक्सिजन हवा ना आपणच  द्यायला हवं आपल्यातला थोडं असं नेह्मीच म्हणतात. ऐकलं कि वाटत अशा भरपूर आज्ज्या जगात हव्या. आपण गेलो कि आनंद  होतो अशी हि आजी. आपण चुकलो असू वाटलं तिला तर गुपचूप मनात शिरुन  पटवणारी आजी, आपण केलेलं कर्तृत्व समाजलंं कि न चुकता फोन करणारी आजी, आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी योग्य तिथं उभी सापडणारच. 

अशी हि आजी मी खूप सल्ले देते पंतवंडे ऐकून कंटाळून जातात हे पण समजणारी आजी.  पण त्या पंतवंडानाही मनात "कधी जायचं पणजी आजीकडे?" हा विचार करायला लावणारी मायाळू पणजी आजी .  देवांनी एक भलताच चुंबक घालून पाठवलाय जणु ! एकदा भेटलेला माणूस पुन्हा भेटण्याची इच्छा धरणारच .

आजी हे एक आनंदी, सतत हसतमुख व्यक्तिमत्व. माझ्या नात्यातली हि आजी नाही तर मनानी जुळलेल्या नात्याची आजी आहे.  खर तर माझ्या चुलत सासऱ्यांच्या ऑफिसमध्ये आजोबा होते. त्या आजोबांच्या या सौ. संबंध तसे दूरचे , नाळ जोडली गेली ती नागपुरात. पण ती घट्ट असण्याचं कारण फक्त आजीच "साने आजी "

या आजीची भरपूर नातवंड असतील जगात त्यांना हे वाचून नक्की समजेल आणि आवडेल पण.

आजीला उदंड असे आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभो !




सौ. गौरी अनिरुद्ध पाठक

Wednesday, 8 May 2019

पाहिलं वाहिलं - श्रमदान !

पाहिलं वाहिलं - श्रमदान 
१ मे कामगार दिवस आणि  महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. यावर्षी आयुष्यात प्रथमच हा दिवस खऱ्या अर्थानी अनुभवाला, तो महाश्रमदानात भाग घेऊनच. मागच्या वर्षी पासून पाणी फौंडेशनच काम कानावर होताच. बऱ्याच क्लिप बघून झाल्या होत्या. मागच्या वर्षी मी यात सहभागी होण्याचं ठरवलं होत. श्रमदानाचा हा मार्ग पाणी फौंडेशन मुले मिळाला.
मागच्या महिन्यात मी पाणी फौंडेशन मध्ये नाव नोंदवला. चार जणांचं श्रमदान पुरंदर तालुक्यासाठी नोंदवलं . यात नवरा आणि मुलगा सोबत असेल याची खात्रीच होती . चौथं बघू कोणीतरी असा विचार होता. कोथरुडपासून पुरंदर तालुका जायला जवळ आणि सोयीचा हॊत. २७ एप्रिलला गावाचं नाव ईमेलवर समजणार होत. मी खूप आनंदात होते. माझ्या विशलिस्ट मधलं एक स्वप्न पूर्ण होणार होत. आज पर्यंत श्रम म्हणजे कष्ट हेच तौक होत. कामावरून दमून घरी आलो कि श्रम झाले असाच वाटायचं. दिवसभर किती कास्ट करतो असा समाज होता. बैठं काम असल्यानी श्रम, कष्ट याचा खरा अर्थ माहितीच नव्हता बहुतेक.
३० एप्रिलला समजले कि उदाची वाडी सासवड हे गाव मिळालाय. चौथा मेम्बर पुतणी ठरली. सगळे जण पहाटे साडे तीन वाजता उठलो. आवरून घर सोडला ते साडेचारला. पाणी फौंडेशनच्या आधीच्या क्लिप बघून ते अनुभवायचा ध्यासच  होता त्यामुळे पहाटे उठण्याचा त्रास वाटलाच नाही. पाणी फौंडेशनच
व्यवस्थापन चोख होतं. रस्ता विचारणं किंवा अडचणीच्या निराकरणासाठी योग्य व्यक्तीचे नंबर एस एम एस द्वारा पोचले होते. याच गावात श्रमदानासाठी पी एम आय मध्ये नाव नोंदवलेले चार सहकारी पण आमच्या बरोबर होते. संस्था दोन पण काम एकाच. पी एम आय ची मला फारशी माहिती नव्हती . दोन गाड्या एकत्रच निघाल्या. भोपदेव घाटाचा रस्ता निवडला. पहाटेची बारीकशी चंद्रकोर सोबत घेऊन श्रमिक निघाले - कोथरूडहून!

गुगल मॅप मुले पहाटे रस्ता सोपा गेले. जस जसं सासवड जवळ आलं तास तसं आकाशात चंद्रकोरीच्या जागा सूर्यनारायण घेऊ लागले. सुंदर मोकळी गावाची हवा नुकताच फुटलेले तांबडं फारच सुंदर वाटत होतं . सासवड येताच स्वागत फलक दिसले. उदाची वाडी श्रमदान फारच सुरेख वातावरण, अगदी घरचाच कार्य जणु . काही अंतरावरच गाव लागल. २४ तास पाण्यातले शहरी आणि पाण्यासाठी २४ तास धावणारे गावकरी  सरमिसळ झाले होते. लहान मुली छानशी साडी नेसून श्रमिकांना तिलक करून स्वागत करत होत्या. त्याच फारच कौतुक वाटलं . स्वागत करणारे आनंदी गावकरी पाहून कष्टाची अशीही किंमत असते हा वेगळाच अनुभव आला.
सुसंगतपणे गाडी पार्क करायचे ठिकाण दाखवाव्यात आले. लहान लहान मुलं पण स्वयंसेवक झालेली पाहून भारी वाटलं . ऑन लाईन नाव नोंदणी असली तरी वैयक्तिक नाव नोंदवून आठ जणांचा एक असा गट करून काम मिळणार होत. मजा वाटत होती एक गटाला एक फावडं, एक कुदळ आणि दोन घमेली देत होते. शूर वीर लढायला चालल्याच भासत होतं . पुढे एका लहानश्या गावातल्याच मुळीं आम्हाला डोंगराच्या अगदी पायथ्याला नेलं. ती जमीन, ते काम याबद्दल तिला असलेल्या कामाची माहितीची कल्पना तिच्या चेहऱ्यावरून अजिबात येत नव्हती. त्याक्षणी ती आम्हाला सरस होती. तिनं आमचा खड्डा खणण्याची जागा दाखवली. पांढरी रेघ असलेली आयताकृती जागा, खणून माती कुठं आणि कशी टाकायची याची जुजबी माहिती देऊन ती गेली.

आता खरं एकी हेच बळ दाखवायची वेळ होती. पांढऱ्या रेगेजवळून आम्ही कुदळीने काम सुरु केलं. साधारण साडेसहा वाळजे होते. आलटून पालटून कुदळीन खड्डा खणंण सुरु केलं . फावड्याने माती जमा करून घमेल्यानी जवळच मातीचे डोंगर कारण सुरु झालं . साडेसातला चॅन जम बसला. हुरूप आला. शेजारच्या गटाचे अनोळखी असूनही दोस्ती होऊ लागली. आटा पर्यंत हात हा अखंड एक अवयव आहे असा वाटत होती. आज हाताचे लहान लहान अवयव आणि स्नायू  प्रथमच काम करत होते याची जाणीव झाली. बोटाच्या पेरांची कुदळी वरची पकड , खांद्यातून होणारी लयबद्ध हालचा, जमिनीवर रोवले जाणारे पाय, अश्या हात पाय कंबरेच्या विशिष्ठ हालचाली ज्या रोजच्या आयुष्यात कमी होतोत त्या जाणवल्या. फावड्याने माती ओढून तळहातावर येणार गट्टे , दंडावरचा फुगीरपणा असे बरेच बदल शरीरावर जाणवत होते. वर्षभर चोवीस तास पाणी मिळत ते सुख इतरांना गावातल्यान मिळावं यासाठी एकदा तरी श्रमदान करायला मिळावं हा हेतू मनातला. श्रमदानाचा खरा अर्थ समजून सफल होत होता . श्रमाचा कष्टाचा खरा अर्थ खरी व्याख्या आज उमगत होती ती पाणी फौंडेशन मुळेच. आपल्याला धान्य पिकवून देतो त्या शेतकऱ्यांसाठी दिलेले हे तीन तास मौल्यवान होते. जगण्यासाठी प्रकाश जसा महत्वाचा तसं पाणी पण महत्वाचं. जे सुख आपण उपभोगतो ते दुसऱ्यास मिळण्यासाठी हा खारीचा वाटा. आम्ही निसर्गाच्या नियमच - "जेवढं द्याल त्याच्या चौपट मिळवलं " या  तत्वच पालन करत होतो.  इतर रहिवाश्यांच्या हा नियम पाळावा आणि श्रमदान करून मानसिक आनंदाचा लाभ घ्यावा हेच आज सांगावासा वाटतंय.




या निसर्गाच्या नियमच, श्रमदानाचं महत्व मला पाणी फौंडेशनमुळे समजलं, मी आभारी आहे. या ठिकाणी पी एम आय चे पण लोक होते. गावकरी योग्य मदत करत होते खड्डा खणून होताच तो योग्य आहे ना ? पाहण्यासाठी दोन तज्ज्ञ येऊन गेले. गावकर्यांनी सुंदर मुगाच्या खिचडीचा श्रमपरिहार दिला. त्याक्षणी पंचपक्वान्नाला लाजवेल असा त्याचा स्वाद होता. १२' x ४' x १' फूट खड्डा खणून आमचं संपवून आम्ही परत निघालो. श्रमदान करूनही आनंदी उत्साही आणि काहीतरी जिंकल्याच्या भावात परत निघताना उदाची वाडी चे गावकरी धन्यवाद म्हणायचे पण विसरले नाहीत. माझ्या आयुष्यातलं पाहिलं वाहिलं श्रमदान अविस्मरणीय होत. पुन्हा एकदा जलमित्र पाणी फौंडेशनचे आणि गटातल्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
सौ गौरी अनिरुद्ध पाठक
(01.05.19)

Monday, 3 August 2015

तेरी मेरी यारी

श्री 
जुन  १९९७ मध्ये एस पी कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात माझी आणि ईश्वराची ओळख अकरावीच्या वर्गात झाली. नवीन रुटीन कसं  असेल ? कसे मित्र मैत्रिणी भेटतील ? असाच विचार मनात असताना सहजच ईश्वराची माझी ओळख झाली, ती दोघींच्या मनमोकळ्या स्वभावामुळे. मग काय रोज कॉलेजला भेटलो कि मजा करायचो. स्वभाव जुळले, विचार जुळले. हळुहळू एकमेकांचं प्रतिबिंबच झालो. 

पुढे कॉलेज संपलं, लग्न  झाली, मुलं झाली तरी तेव्हाची मैत्रीची विण  घट्टच आहे. गेली आठ नऊ वर्ष ती परदेशात आहे पण लांब आहे असा वाटतच नाही. अजुनही सर्व गोष्टी पुर्वी  सारख्याच शेअर करतो, मग तो आनंद असो वा दुःख. गणपतीत तर तीची उणीव मला फार भासते. अजुनही एस एस चा  वडापाव आठवुन तासन तास बोलतो आम्ही. कॉलेजच्या सुट्टीत पुण्यातल्या पुण्यात पत्रं  लिहायचो ते आठवलं  कि हसू येतं.  ती पुण्यात आली कि एक एक संद्याकाळी फक्त माझी असते. आम्ही देहानं  लांब असलो तरी मनानं आधी सारखाच जवळ आहोत. 

आमच्या आयुष्यात एकमेकींच्या आठवणींचा एक कप्पाच आहे जो सतत अपडेट होत राहील. हि आमच्या मैत्रीची ठेव आज पर्यंत जतन केली तशीच  अनंत काळ राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आज मी म्हणेन "'तेरी मेरी यारी, मुझे जान से है प्यारी "

तुझीच रुपाली 
मे २०१५