Sunday, 7 June 2026

विषय अधिकातले.

शब्दकळी विजया बरोबर लेखन उपक्रम २
अधिकमासा निमित्त १७ मे ते १५ जून २०२६
* काहूर १७ मे
१) मी नेमकी कोण? १८ मे
२) माझे कुटुंब माझी ताकाद १९ मे
३) मी आणि समाज २० मे
४) माझी रंगांची दुनिया २१ मे
५) पर्याय २२ मे
६) परीक्षा २३ मे
७) मी अशी कशी? वेगळी..२४ मे
८) माझ्या स्वप्नातील एक हलकाफुलका क्षण २५ मे
९) मैत्रीच्या राज्यातली मी राणी २६ मे
१०) जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा.. २७ मे
११) मी आणि माझे लेखन... नातं २८ मे
१२) माझे वेळेचे गणित २९ मे
१३) ज्या ऊद्या साठी मी थांबलेय मी सांगा बरं नक्की तो येणार कधी? ३० मे
१४) वाट पाहणं ३१ मे
१५) माझा वाढदिवस १जून
१६) पुन्हा पुन्हा सुरूवात करताना.... २ जुन
१७) मी सद्ध्या काय करते? ३ जुन
१८) शब्दाविन संवादू ४ जुन
१९) जेव्हा काहीतरी बिघडतं.. ५ जुन
२०) माझ्या कमतरतेसोबत माझ्या स्त्रीत्वाचा स्विकार ६ जुन
२१) पाऊस ७ जुन
२२) २१ दिवसांची लेखन संकल्प पूर्ती ८ जुन
*#*#*#*

काहूर
आधीच ठरल होतं सगळं तो आज येणार होता. खरतर सकाळीच येऊन थबकण अपेक्षित होतं. काय झालं असेल? तस पाठवणारी व्यक्ती वेळेची पक्की आहे आणि तो येणार म्हणून मी पण खुप खुप ऊत्सुक होते सकाळपासून.
तो आला की दिवसभर त्याला कसा वेळ देऊ ? कसा असेल तो?  आपण वाट बघत असलेल कोणी आल नाही की काहूर माजतं मनात. मग मी ठरवल ही भावनाच लिहून काढू कारण एरवी ही भावना निर्माण होण अवघडच.
चाळीसेक जणींनी यांच्याबरोबर दंगा करायच योजलेल पण हा पठ्ठा आलाच नाही अजून.
अहो कोण म्हणून काय विचारताय? तोच तो विजयाताईचा "विषय". 
२१ दिवस तो रोज येणार आहे आणि आमचा अधिकमास माधवांना अर्पित मोहून जाणार आहे तोच "तो - विषय!"
प्रतिक्षेतली..
गौरी पाठक 
१८ मे २०२६
#####

दिवस पहिला
 अधिकमास विशेष ...
 शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2

*मी* ....*नेमकी कोण?* 
----------------------------------
कोण आहे मी? असा प्रश्न मी मला कधी विचारलाच नव्हता गं! बावीस वर्षे रुपाली आणि पंचवीस वर्षे मी गौरी आहेच पण ती नावं माझ्या व्यक्तिमत्त्वाची झाली.
पण माझ्यातली मी रसिक आहे, हळवी आहे, आनंद झाला कि तो वाटलाच पाहिजे आणि वाटला की खुलणारी कळी आहे, कान्हाजींच्या विश्वासाची छडी आहे, ठरवलेल पुर केलच पाहिजे या या हट्टाची गोणी आहे.
माझ्यातली मी देववेडी आहे, जे आहे ते देत रहा यावर जगणारी नागाची फणी आहे, मायेच्या ताकावरच दाणेदार लोणी आहे.
मी... नेमकी कोण आहे? माणसांना आपल करण्यात राम मानणारी फक्त छोटीशी दोर आहे. सनबाबाची फॅन आहे आणि कान्हाजींना पाहणं हे एकच ध्यान आहे.
मी कोण आहे ? तर सुंदर विश्वाच्या कपाटातला सकारात्मकतेन चमचमणारा एक काजवा आहे.
मी जी काही आहे ती परमेश्वराची देणच आहे.
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
१८ मे २०२६
####

*दिवस दुसरा* 
 अधिकमास विशेष शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्र 2...
 माझे कुटुंब माझी ताकद....
नुकतंच एकदिवसीय सहलीसाठी गेलो होतो तिकडे हे फणसाच झाड बघून ही कविता आठवली होती. आजचा विषय वाचला आणि मला माझ कुटुंब या फणसासारखं भासलं. आतले गरे जसे एकमेकांना सामावून बसतात, वाढतात, परिपक्व होतात. हळुहळू कालांतराने गोडी चढत जाते. एकोप्याने राहून एकमेकांना सामावून घेत वाढतात हीच खरी तकाद हेच खरं कुटुंब.
जन्म झाल्यापासून आधी कुटुंब आईनी सुरू होतं. कालांतराने विश्वची माझे घर समजू लागल की ते वाढतं. माझ कुटुंब माझी ताकाद आहे हे मी पण आज अभिमानाने सांगू इच्छिते. माझ कुटुंब आठ जणांच, आम्ही तिघं सासू -सासरे, दीर -जाऊ -पुतणी. कुटुंब बांधून ठेवताना मी सासूबाईंना बघितलं, ते कष्ट ते प्रेम ती आपुलकी देण सोप काम नाही. मी ते बाळकडू त्या़च्या सहवासात आत्मसात करू शकले.
माझ्या आईकडून संस्कार लाभले आणि सासूकडून संस्कारानं घर बांधून ठेवायला शिकायला मिळालं. सासू नावाच दूधच ईतक मस्त होत की सून नावाची साखर कधी विरघळली समजलच नाही. माझ्या प्रत्येक यशात या कुटुंबाचा मला कायमच आधार लाभला आहे. कान्हाजी ऊगाच कोणास भेटवत नाहीत त्यांचे आयोजन फक्कड असतं. ज्याची जी क्षमता त्याला तो ते ते काम देतो. त्यामुळे कुटुंबाकडून किंवा कुटुंबातील कोणाकडून झालेल कोणतही काम  आम्ही केल नसून ते परमेश्वरानीच करून घेतल म्हणायला हरकत नाही.
कुटुंब माझा आधार म्हणताना पारदर्शकता महत्त्वाची. आपली जबाबदारी पण समजणं गरजेच असतं. जर समजत नसेल तर जाणीव करून देण आणि दिल्यावर त्याचा आनंदाने स्विकारण्याची कला कुटुंबत समजते. माझी आवडती कविता जी "माझा कुटुंब माझी ताकद" याबाबतची भावना पूर्णपणे दर्शवते ती नक्कीच आवडेल तुम्हाला पण, बघा आणि कळवा मला नक्की!
गौरी पाठक 
९९७०१६८०१४
१९ मे २०२६
####
चयन किया किसने भला, अपना घर परिवार
यह तो है भगवान का, हम सब को उपहार।१।
बन्धन केवल रक्त से, रखना कब आसान
जोड़े घर परिवार को, प्रीत, खुशी सम्मान।२।
पूरखों ने हम को दिया, इस जीवन का सार
प्रीत निभाकर नित करो, जग को घर परिवार।३।
दुआ करो परिवार सिर, रहे ईश का हाथ
बिना शर्त जो आपका, सुख दुख में दे साथ।४।
जैसे मोती गूँथ कर, बनता सुन्दर हार
त्यों रिश्ते की डोर से, बँध बनता परिवार।५।
पाता घर परिवार से, जीवन सुन्दर रूप
देता कोमल छाँव जो, रोके तपती धूप।६।
घर जाकर परिवार सह, कर भोजन आराम
उससे ऐसा सुख मिले,ज्यों लिये ईश का नाम।७।
जिनको लोगों इस समय, मधुशाला से प्यार
कोरोना की गोद में , डाल रहे परिवार।८।
एकाकी जीवन सदा, बैठा दुख की छाँव
पड़ जाते परिवार में, बरबस सुख के पाँव।९।
रोग रहित हो कर स्वयं, पहुँचो घर के द्वार
देना निज परिवार को, सुखद मिलन उपहार।१०।
रहे शान्ति परिवार में, वन-वन भटके राम
आज समय घर में रहो, करो न वैसा काम।११।
खुशियों का आँगन बड़ा, करता घर परिवार
आज नगर से जा रहे, करके यही विचार।१२।
- लक्ष्मण धामी 'मुसाफिर'
######
दिवस तिसरा
 *अधिकमास विशेष ..
 शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2* 
 *मी आणि समाज
----------------------------------
अनेक "मी" मिळून समाज होतो. माझ्यामते  एकाच विचिरसरणीचे आणि मनास पटणाऱ्या दिव्यतेस अग्रस्थान देणारे अनेक मी जेव्हा एकत्र एका समूहात येतात तो झाला "समाज". समाजात संरक्षण, समानता, सत्यनिष्ठा टिकून राहण्यासाठी तो सुद्ढ राहण्यासाठी अनुशासन महत्वाचा भाग असतो.
मी एका ठराविक समाजचा भाग आहे अस म्हणताना त्यात सगळ्या जातीचे भाषेचे असणारच. सगळ्या प्रांतीयांना समाज बांधून ठेवतो.
मी आणि समाज विषय असेल तर मला सांगायला आवडेल की माझ्या लहानपणी आजुबाजुला असलेल्या माणसांकडून ऊर्फ समाजाकडून खुप छान अनुभव आले. एकोप्याने कसे राहावे, शेजारधर्म कसा पाळावा, संस्कृती कशी जपावी हे शिकायला मिळालं. माणुस बनताना घडताना आजुबाजुला बघुन मोठा होतो. तेव्हा हा समाजच बघतो ना - म्हणून मी समाज या तळ्यातला एक थेंब आहे अस म्हणेन.
माझ्या नशिबाने माझ्या समज येत्या वयात अनुशासित व्यक्ती समाजात सतत बघत आल्याने तो पगडा जास्त आहे. जो जगताना आधार आहे. आपण एकत्र आलो की समाज होतो. समाज आला की संस्कृती वाढते. संस्कृती टिकली की एकी वाढते आणि सुदृढ राष्ट्र यानेच बनते.
माझ्या परीने संस्कृती टिकवणे तसेच एकोप्याने राहणे करत राहणे हे प्रत्येक 'मी'च समाजाप्रती देणं आहे अस म्हणेन. प्रत्येकाची क्षमता, कार्यक्षमता आणि कौशल्य वेगळे त्यामुळे प्रत्येक 'मी' ने आपापल्या सोईने ते करावे अर्थात करतच असतात.
लहानपणापासूनच अनुशासित समाज बघत आल्याने मी मला त्या ढाच्यातच बघत राहवे / बघावे असे नेहमी वाटते. यावर मज जवळ शब्द नाहीत  कारण समाज हा विषय मोठ्ठा, बौद्धिक आणि मोलाचा आहे माझा यावर फार अभ्यास नाही. 
तरी आज किंचित तरी विचार केला गेला हे मात्र खरे. सकाळी विषय समजल्या पासून एक शब्द पुसटसा समोर येत होता... तो सापडला "अनुशासन " बस्स माझ्या मते समाज म्हणजे अनुशासन ईतकीच झेप माझी.
धन्यवाद 
गौरी पाठक
२० मे २०२६
दिवस चौथा*
*अधिकमास विशेष ...
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम क्रमांक 2
माझी रंगांची दुनिया
----------------------------------
रंग....आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळे रंग असतात...रंग नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात...प्रत्येक रंगाचे काहीतरी वेगळेपण असते....वेगवेगळ्या रंगांशी आपल्या वेगवेगळ्या भावभावना जोडलेल्या असतात....कपडे, लहान मोठ्या वस्तू असे काहीही खरेदी करत असताना आपण  रंगांना विशेष महत्व देतो ....
तर मग आज आपल्याला लिहायचं आहे..
रंगांसोबत जोडलेल्या आपल्या  वेगवेगळ्या भावना ....
*माझी रंगांची दुनिया*
रंग अहा! काय सुरेख विषय. रंग म्हटल की शामसुंदर आठवणारच... प्रकृतीचे सात काय आठ रंग आपल्या जीवनात खुप मोलाचे. त्याचे गुण त्यांचे पडसाद आपण दैनंदिन दिनचर्येत वापरतो पण आज त्यावर प्रकाशझोत पडेल.
तांबडा रंग शुरता, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती आणि निर्भयता दाखवतो. ऑफिसमध्ये निघताना देवघरात झपकन डोकवतानाच कुंकू मला या तांबड्या रंगाच विचारताच डोळ्यासमोर आलं. नवरात्रीतल कुंकूमार्चन करतानाची भावना अगदी हीच असते ही भावना जागृत झाली आणि पुतळाबाईंचे कुंकू आणि मेणाबद्दलचे संवाद आठवले.
नारंगी रंग ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व ऊजागर करतो, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे सुखी समाधानाचे संकेत देणारा. मला नारंगी रंग म्हणताच रोज बघत आनंद मिळणारा माझा सनबाबाच आठवला. अहो, नारंगी रंगाच्या असंख्य छटा तो दाखवतो. जगण्याची ऊमेद देतो. गुरु ठाकूर म्हणतात तेच जणू तो मला रोज सांगतो -"ये पुन्हा नव्या दिवसाची चल घडी मोडून पाहू."
पिवळा रंग जगण्यातला ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो. हा मनामध्ये नवे विचार निर्माण करतो. मी रोज सकाळी स्वयंपाकघरात गेले की गॅस सुरू करताच तो मला रोज दिसतो ज्योतीच्या स्वरूपात. भाईश्री रमेशभाई ओझा म्हणतात, "एक माटी का दिया सारी रात अंधियारे से लड़ता है, तू तो भगवान का दिया है, तू किस बात से डरता है?"
हिरवा रंग सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद सांगतो. मग मला बेssबी का नाही आठवणार. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि फक्त माझा असा कोपरा माझी झाडं ऊर्फ माय बेबीssज. मी रोज टेरेसमधे जाताना बेssबी हाक मारते. सगळे माझी मी त्यांची वाट बघतो अस मला वाटत कारण मन गुंतलय त्यांच्यात, पेरलेल ऊगवून बहरेपर्यंत मी बरोबर असते. कढिपत्ता आजारी होता तो आता पालवी फुटतोय कालच मी खुप जोरदार ओरडले होते. प्रत्येक पानाला हात लावणं कळी धरली की काळजी घे कानात कुजबुजणं सगळ सगळं अजबच आहे. ती सगळी मंडळी मला सांगतात, "रोज बाॅंटे .. रोज बढेगी... एक मुस्कुराहट.. दुसरी दुआ!"
निळा रंग अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक आहे. निळा रंग मला रोज घरी जाताना आकाशातला भावतो.
सूर्यास्तानंतरचा निळे पणा.. मला सांगतो.. गो विथ द फ्लो...
पांढरा रंग ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतकच की, पवित्रता, शांतता संयम व ध्यान सुचक आहे हा. मला पांढरा रंग दुधात सापडतो. भावनांना ऊचंबळु न देता  शांत बसत जा गं. तरच तरशील हे रोज दुध वर आल की शिताफीन गॅस बंद करताना तो रंग सांगतो. पण आनंद दुःख दोन्हींनी उच्च कोटीची सीमा गाठली तरी ऊतू न जाण मला काही अजून जमलेल नाही.  जमल पाहिजे अति आनंद झाला तरी संयम ठेवायला.
ज़िंदगी सस्ती मै साहब, जीने के तरीके महेंगे है... गुलजार.
जांभळा रंग आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा. आद्ध्यात्मिक जगाशी संबंधित हा रंग नुसता ऐकून वाचून आहे. अजून अनुभूती आलेली नाही. मी वाट पाहितेय हा कधी सापडेल मला.
"हमें खुद अपनें सितारे तलाशने होंगे, ये एक जुगनू ने समझा दिया चमकें मुझें.."
काळा रंग सगळ्यांचा राजा रांगोळी काढली की काळ्या रंगाची कड दिली कि ती खुलून दिसते तसच आहे. अगदी बाळाच्या तीटेसारखी.  या रंगाच्या कपड्यात आपण खुलून दिसतो. हे खरय पण मी त्रस्त आहे कारण ही पुढची पिढी फक्त काळेच कपडे जास्त घालते. "मेरी दुनिया है सबसे हसीन" अस म्हणतात वर.  घ्या... आता बोला...
रंगात रंगूनी सार्या रंग माझा वेगळा!
गौरी पाठक
२१ मे २०२६

###
*दिवस पाचवा...* 
*अधिक मास विशेष* 
*शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2* 
---------------------------------------- 
 *योग्यवेळी योग्य पर्याय निवडता आला तरच आयुष्यात यशस्वी होता येते
 *याउलट कधीतरी पर्याय नाही असं समजून चिकाटीने एखादी गोष्ट करूनच यशस्वी होता येते ....
 *त्यामुळे पर्याय समजून घेतले तरच आनंदी, सुखी, समृध्द जगण्याला कोणताच पर्याय नाही इतकं नक्की .....
आजचा विषय आहे... *पर्याय* 😍
काय जबरदस्त धगधगत्या विषय आहे हा! आपण आपल्या आयुष्यात शोधलेल्या पर्यायांना सांगणं किंवा ते जगलेलं व्यक्त होणं महा कठिण आणि धैर्याच काम.
कसं? समजेल हळूहळू मला काय म्हणायचे आहे ते.
धैर्यान योग्य पर्याय निवडून जगण जमल तरच आपण चांगले आरोग्य, मन:शांती आणि अर्थपूर्ण नात्यांनी जगू शकतो.
रोज जगताना नात्यांमधे आपण एकमेकांना आपल समजतो त्यात काहींच्या मानसिक अक्षमतेमुळे आपण आपलेपणानं वागत आलो असलो तरी आपल्याच माथी खापर फोडलं जातं.यावर स्वतः ला बदलण्या शिवाय पर्याय नाही हे जेव्हा समजत तेव्हा आपण शांतीत जगू शकतो. आपण आपल समजतो त्या परमेश्वराच्या अंशाची क्षमता जोखण आपण कमी पडलो अस म्हणायच आणि एकदाच समक्ष न आवडलेली गोष्ट सांगून मनमोकळेपणाने पुढ जायचं. कारण नाती टिकवायची आहेत. माणूस प्रगल्भ होतो तो असाच ना. अशा आलेल्या अनुभवावरून योग्य विचार करून योग्य पर्याय शोधतोच शोधतो. यात नातं या शीर्षकाखाली अगणित लोकं येतात. हा झाला नात्यांतला पर्याय.
आता वैयक्तिक जगताना एक स्त्री म्हणून जे जे करण गरजेच ते करताना पण आपण स्वतः ला सारून  पर्याय निवडतो आणि स्वतः च समाधान करून देतो की करून घेईन. ही विचारसरणी छापलीय मनावर पिढी दर पिढी. कामावर जाताना सगळ्यांना नाश्ता पुरेल मी काय कालची पोळी चहात संपवेन अशी मानसिकता... 
आधीच्या पिढीतली पर्याय निवडण्याचा दृष्टीकोन आता थोडा बदलून पण सकारात्मकपणेच बरं का, जगलो तर आपण आनंदी खुप खुप मनमुराद जगू शकतो. काही फरक पडत नाही आपण एखाद्या नकारात्मक नात्याला किंवा दृष्टीकोनाला पर्याय निवडला तर. कारण जगातला प्रत्येक जण झगडतोय स्वतः शी, स्वतः ला सिद्ध करताना जगण्यासाठी जगाशी मग का मन भारी करून जगायचं?
मग अर्थपूर्ण नात टिकवायच तसेच आनंदी उद्देश पूर्ण जीवन जगायच तर पर्याय योग्य निवडण्याची सक्रिय क्षमताच आधी वाढली पाहिजे. एखाद्या नात्यात त्रस्त झालो दहा पंधरा दिवस लांब राहायचा पर्याय निवडण मला चूक वाटत नाही. कारण ती व्यक्ती टामटुमित असते आपण का नकारात्मकता मनास चिकटवून स्वतः चा र्हास करायचा.
आपणही आपल्याला समोर ठेवून स्वतः साठी जगताना, व्यक्ती वस्तू काम यावर आपले जगतानाचे पर्याय बदलू शकतो आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपण घेतलेला कोणत्याही निर्णय कालांतराने चुक होता अस वाटून खचून न जाणे कारण तो त्यावेळी योग्य होता. 
विजयाताई म्हणाली तस वस्तू, व्यक्ती आणि काम यात पर्याय निवडताना पर्याय बदलू शकतात. आज एकविसाव्या शतकात जगताना मला वाटतंय की सगळ्या सुंदर स्त्रीयांनी आधी स्वतः मानसिक आरोग्यावर ऊपकारक पर्याय निवडले जावेत. कारण आपण ठणठणीत तर घर ठणठणीत हे सूत्र काहीही झाल जग पलटल तरी बदलेल अस वाटत नाही.
योग्य वेळी योग्य पर्याय सकारात्मक तेने निवडला की आपोआप च नाती वस्तू काम सुसंगत चालेल.
पर्याय म्हणाल तर मी स्वतः माझ्या मानसिक आणि ओघानं येणार्या शारिरीक पातळीवर जे योग्य तेच निवडेन यासाठी माझ मन सशक्त करणार... करतेय...
काही वेळा निर्माण करावा लागतो पर्याय हे पण शंभर टक्के बरोबर. धगधगता विषय अशासाठी म्हटल कारण आपण का आणि कोणता पर्याय निवडला सांगताना भक्कम मानसिक बैठक लागते. समोरचा हे कस घेईल याची परवा न करता शब्द लिहणं जोखीम असते पण यातुनच आपले कळतात. मग आपले ते सोबत घेऊन आणि तुपले ते जमेल तसे कोड सोडवत पण तरी बरोबर घेऊ जगायची सवय लागेल. कारण जगताना काहीवेळा कोणताही पर्याय नसतो.
शुभं भवतु!
गौरी पाठक 
२२ मे २०२६

###

*दिवस सहावा
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी सोबत लेखन उपक्रम 2* 
 *आजचा विषय - परीक्षा*
पदोपदी परीक्षा आहेच मग ती व्यक्ती कोणी असू दे. जन्म घेताना बाहेर येतानापासून परत जाताना पर्यंत परीक्षा.
काल तर चित्रपटाचा ट्रेलर पण हाच "देवाची परीक्षा". 
जगण्यासाठी कायम परीक्षा देत राहायच. पास नापास मधून सुधारत आवृत्ती बाहेर पडते.
प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जातो — कधी संयम, कधी स्वतःची किंमत, कधी नात्यांची ओळख, तर कधी स्वतःवर प्रेम करायला.
परीक्षा नसती तर सरळ आयुष्यात मजा नसती नीट विचार केला तर ऊमगेल.
आपण कितीही सुधारून वागा वावरा कोणती तरी परीक्षा पार पाडत जगा लोक परीक्षा करतातच.
मग कशाला रडा? स्वतः कस बरोबर सिद्ध करायचा झगडा त्यातसुद्धा परीक्षा. जगताना घर माणस नोकरी समाज यात सेट होताना पण परीक्षा यात शंभर वेळा पास झालो तरी एकदा झालेला नापास शिक्काच सतत दाखवणारे भेटणार तो सोडून देत जगायची पण परीक्षाच.
मी हल्ली फार मनावर घेण सोडलय. आला पेपर दिला पेपर मग ती कोणतीही असो परीक्षा.
फक्त एकच करायच प्रत्येक परीक्षेनंतर नवीन गोष्टी मिळतायत ना.
आज मला गमतीदार किस्सा आठवला. जे स्वप्न मला लहानपणी कायम पडायचं. मी पेपरला गेलेय आणि पेपर वेगळयाच विषयाचा आहे. आठवल ना मे की बारीकसं हसू फुटतच.
हल्ली मी पेपर देते आणि कान्हाजींवर परीक्षेचं भवितव्य सोपवते.
मंदार कवींची एक कविता आठवली..
झुगारून दे सगळ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
अडवतील ही लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला ऊजळायचे पुन्हा,
मंत्र आहे हा एकला,
थांबला जो इथे तो संपला.

जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
२३ मे २०२६
###
दिवस सातवा : अधिक मास विशेष :
शब्दकळी  बरोबर उपक्रम २
आजचा विषय : मी अशी कशी? वेगळी...
मला सकाळपासून चौकटराजा मधला दिलीप प्रभावळकर यांचृया तोंडच वाक्य आठवतय."मी असा कसा वेगळा?" खर तर प्रत्येक जण वेगळा असतोच. मला सगळ्यांमधे राहायला आवडतं, घरात दिवे कमी असावेत पण माणसं जास्त हवी तरी मी म्हणतेच की सगळे आपलेच असतात पण आपलं बिपलं कोणी नसतं. मी अशी कशी? वेगळी...
जगतानाची एवढी वर्षे जर मी तपासली तर खरच मी मलाच ओळखणार नाही. रडूबाई, धांदरट सतत धाक मनात दडपण अशी वावरणारी पण सहवास, अनुभव आणि वय सगळ शिकवतं. त्यामुळे मी अशीच आहे आता वेगळी. पटल तर हो म्हणेन नाही पटल तर मागे बोलणार नाही एकदा दोनदा सोडून देऊन समोर सांगेन. अशीच आहे मी वेगळी. 
एखाद्या नात्यातील व्यक्तीबद्दल एकत्र तिटकारात्मक बोलताना ईतर मात्र ती व्यक्ती आली की खर मन झाकून बोलतात. तू अस नको करूस हे वयान मोठे पण सा़गत नाहीत. कारण काय तर वाईटपणा कोण घेईल. अशांना सामोर जायला गौरीचा खांदा बंदूक यांची. आता मी खांदा देण बंद करून चारेक वर्षे झाली असतील. मी आता जवळची पण हेवा वाटणारी पण तरी मनान मला चांगल चोखणारी पण ओळखून वागते आणि वेळ पडली तरचौकटीत पण ठेवते, हो मी आहेच अशी वेगळी.
मुखवटे लाऊन जगत नाही. आपल मानल त्याला कोण बदाबद गंडवत असेल तर बाजू घेते, पुढे अस होणार नाही याचा विचार करत बसत नाही किंवा एवढे मोठे समोर असताना मी कस मधे बोलू असा पप्पू विचारही करत नाही.  हो मी आहेच थोडीशी वेगळी.
सणवार, पुजापाठ संस्कृती मानते मी आवडतच मला संस्कृती  ही पाळलीच पाहिजे पण मी पाळी आलेल्या बाईला छी तू वागणूक देत नाही. हो मी आहे अशीच वेगळी - परंपरा पाळताना मुरड कुठं आणि कुठवर घालायची याची चौकट माझी वेगळी.
लहानपणी सर्वसाधारण आयुष्य जगले पण अडल नाही कुठं. जेवढी सुबत्ता घरात होती तेवढी ताटात पडत होती. एकावेळी चार चटण्यांच अवडंबर मी कधी जगलेच नाही किंवा छोट्या वाडा संस्कृतीत असूनही कोणाला मान आणि कोणाला पान हे सदर सोडल नाही. आता बघते ना मी पुरूषांचा निर्णय शिरसावंद्य माना आणि सगळ्याच्या सारख्या तयार्या करून द्या मी त्या साच्यात कधी ढळलेच नाही. अग बाई हो अशी कशी मी? वेगळीच!
ताई बदल हा निसर्गाचा नियम आहे हे मात्र अगदी खरं. मला हे कळून सहा वर्ष झाली आता काहीही वाटत नाही. ऊलट यामुळे मी खंबीर, कणखर, कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करणारी, स्वतः ची आवड जपत, नैतिक जबाबदारी चा पदर ही घट्ट सांभाळणारी, चुक ला चुक बरोबर ला बरोबर म्हणत नवीन पिढीला आपलस करण्याची भक्कम तयारी करत म्हणाल तेव्हा ऊंच भरारीस तयार अशी मी वेगळी!  अश्शीच मी मला स्वतःला खुप खुप आवडते.
भरपूर शिकत राहावं, सतत नवीन गोष्टी माहित शोधत जगावं, रोज एका तरी माणसास मनापासून आनंद देत जगावं, आनंदाचे सुखद क्षण शोधावे तो आनंद वाटावा, न जमणार्यांना तो प्रोत्साहन व्हावा त्यांनी पण तसच जगावं, घरात भरपूर जण यावेत, खाऊन पिऊन जावेत, जीवनाच्या पाटीवरची माती सारत हवे ते दगड ऊचलत छान अक्षर लिहावी -"मी अशीच आहे - वेगळीच"
"हर पल में प्यार है, हर लम्हें में ख़ुशी,
कह दो तो यादे ह़ै,  जी लो तो जिंद़गी ||"
गौरी पाठक 
२४ मे २०२६
###
*दिवस आठवा* 
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2* 
---------------------------------------
माझ्या स्वप्नातील एक हलका फुलका निवांत दिवस* ....

अगsss बाई, "तुझ्या स्वप्नातला हलका फुलका निवांत दिवस काय आहे?" आजवर एक्कानही असा प्रश्न मला विचारलेला नाही. थांबा ह्रदय धडधडू लागलय आणि स्वप्नांची पानं फडफडू!
हवं तस जगू देण्यावर कधीही निर्बंध न घालणाराच जोडीदार लाभलाय पण हा प्रश्न वेगळाच आहे. आपण बरेच चित्रपट बघतो त्यासारखे पडसाद म्हणा नाहीतर काहीही म्हणा मी मुलाला एक दोनदा सहज म्हटलेल. मी जर अचानक कुठं सापडले नाही तरी काळजी नसावी. माझी ईच्छा आहे मी दहा बारा पुस्तकं, दोन वह्या पेन आणि ब्रह्मविद्येच्या पाठांसकट बस पकडून पुस्तकांच गाव भिलारला जावं. सहा सात दिवस मी जग विसरावं. भिलारगावच्या होम स्टे मधे राहायचय आणि हवं तेव्हा हवं तेवढा वेळ पुस्तकं वाचायची आहेत. 
पहाटे ब्रह्मविद्येच्या अभ्यासानंतर सुंदर सनबाबा बघून महाबळेश्वरच्या कृष्णाबाई देवळासमोर हव तेवढा ध्यान सराव करायचा आहे. नंतरचा सगळा वेळ पुस्तकं आणि घरच्या भाकरीनी हाक मारली की जेवायचं परत वाचायचं. संध्याकाळी मंद वारा गावतल्या झाडांचा वास आणि चहा, अंधाराआधी परत खोलीत वाचन.
संध्याकाळी तासभर चालत फेरफटका जवळपास मारायचा. गावातली घरं रस्ते दिवेलागणीला खुप वेगळे दिसतात हे फक्त वाचलय ते अनुभवायचय.
(केरळमधे हा अनुभव वाडीत आलेला आहे तोपुन्हा केव्हातरी सांगेन.).
ना घड्याळाची घाई, ना वेळेची काही रीत,
वाचनात रमलेलं मन आणि ध्यानात सापडते प्रीत.
(कवी ठाऊक नाही )
सहा सात दिवस मी माझी पुस्तकं, माझा आणि कान्हाजींचा एकांतात संवाद आणि निसर्ग ईतकं...
कोणतीही नैतिक जबाबदारी पाळण्याच दडपण नाही - मी, पुस्तकं वही पेन आणि माझे कान्हाजी....
 *तळटीप* : एक मात्र ठरवलय हा प्रश्न दरमहा कोणाला तरी विचारणारच. कोणजाणे कोणाला तरी खरच गरज असेल..
सौ. गौरी पाठक 
२५ मे २०२६

###
*दिवस नववा*
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------

 *विषय - मैत्रीच्या राज्यातील मी राणी* ...

आज आपल्या एका किंवा अनेक मैत्रिणींबद्दल लिहायचं आहे .. एखादा प्रसंग, सुंदर आठवण, एखाद्या मैत्रिणीचे कौतुक, एखाद्या मैत्रिणीची सोबत, मदत.....काहीही लिहा...मैत्रीबद्दल लिहा...आज स्वतः ला मैत्रीच्या राज्यातील राणी समजून मनातलं लिहा....आणि हो आठवणींने आपल्या मैत्रिणींना ते पाठवा.....
आज मला माझ्या एका मैत्रिणीला पत्र लिहावे वाटते आहे .. तेच लिहिते मी...

प्रिय पल्लवीस,
एक घट्ट मिठी! आजवर प्रत्यक्ष भेटीतून, लाभलेल्या सहवासातून, आवडी - विचार समजून मग माणूस मैत्री या बिरूदाखाली आलीय माझ्या आयुष्यात.  पण आपण तर चार वर्षात तीनदाच प्रत्यक्ष भेटलो. ध्यान वर्गाच्या अभ्यासात एकमेकांना मदत करत वर्ग चालु राहिला ईतकीच काय ती ओळख आणि सहवास!
पण तुझी गोष्ट वेगळी आहे, कधी मैत्रिण म्हणवली गेलीस समजलच नाही. वर्ग घेतानाच्या किंवा कधी कधी वैयक्तिक क्षुल्लक अडचणी पण शेअर केल्या जाऊन तोडगा सापडला आहे मला.  एखाद माणूस अस असत आयुष्यात की तो हलकासा पडदा सरकवतो फक्त आणि आपल्या ला लख्ख दिसतं. खरं खरं सांगते मनाच मनाशी नातं कस असतं आणि आपली मैत्रीण तीच्या बद्दल ओढ प्रेम वाटत ते मी तुझ्या मैत्रीत अनुभवलं.
तुझ्या गरोदरपणाच्या सर्व प्रवासात मी तुझ्याबरोबर एका बारीकशा किनारीसारखी होते. तुझा डोहाळजेवण आहे सुटी टाका आणि या गौरी मॅडम हा फोन  मला हक्काच सोनेरी बोट लावून मनास स्पर्शून गेला.
"ऑफिस चा दिवस असूनही पुण्याहून मुंबईला फक्त डोहाळजेवण आहे म्हणून तू जाणार आहेस? " हा प्रश्न मला नवर्यानी जेव्हा विचारला तेव्हा मला समजल की तू माझी किती जवळची मैत्रीण आहेस ते.
मुंबईत जायच कस ? कुठं? जमेल का? अनेक प्रश्न होते पण ईच्छा तीव्र होती. मी बसनी जाईन अस स्वतः ला धीरान समजवलं.  आपल्याला ओढ वाटतेय भेटाव वाटतय कौतुक कराव वाटतय त्यात वाहन आणि प्रवास अडथळा नाही बनवायचा. तसही मी हल्ली ठरवलय आणा पोचवा सोडा अस कोणी नसल तरी अडकून न पढता एकट लहान सहान ठिकाणी जायचच. एकट पण कसही कुठही नवख्या जागी जायची सवय हवीच. कोणी गाडीन सोडणारं नसल तरी अडता कामा नये. मी अशी दहा बारा वर्षांपूर्वी एकटी चार वरषाच लेकरू घेऊनही गेलेली आहे हे आठवल आणि बसच तिकीट काढलं. मुंबईत जायचय तर एक चान्स घेऊन पुतणी आहे का फ्री विचारलं आणि आनंदाने हो म्हणाली. 
आणि दोघी तुझ्या डोहाळजेवणाला मस्त आवरून पोचलो सुद्धि! तो गुरूवार फार छान होता. तुझ्या मैत्रीमुळे मला तो आत्मविश्वास परत आठवता झाला. 
मी तुमच्या घरच कोणीही ओळखत नसतानाही तुमची बनून तो कार्यक्रम सुरेख अनुभवला. आज तुझ्या पदरात गोंडस कान्हाजी आले आहेत ही कल्पनाच खुप सुंदर आहे मला. कान्हाजी प्राप्ती ची तुझी इच्छा, त्या पूर्तीचा तुझा ध्यास, मिळालेली जोडीदाराची आईची साथ तुझ्यातल्या आईचा गगनात न मावणारा आनंद, आज कान्हाजी येत आहेत ही उच्च कोटीची आनंदी वार्तेता कम धकधक ते थेट कान्हाजी कुशीत... सगळ्याची मी साक्षिदार.... कसल मस्त वाटलं सांगू का! मुलगा झाला वाचून. मी तत्काळ मोनिका आणि पुतणी दोघींबरोबर तो आनंद वाटला.
पल्लवी तू खुप मनमोकळी आहे. सतत भरभरून बोलत असतेस, तत्वासाठीचा झगडा, अन्यायाची चीड मी तुझ्यात जेव्हा बघते तेव्हा मला मी तुझ्यात मलाच काही वर्षांपूर्वी ची बघते आणि हसते. एक लक्षात ठेव की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल समजत चालायचच पण मधे काही क्षण दम घ्यायचा स्वतः साठी विश्राऊसाठी जी आपोआपच सिंहावलोकन करवते. मला हे जरssरा उशिरा समजलं.
तर मग पल्लवीताई खोचा पदर कारण कान्हाजी हवेत म्हणण ठिक पण त्यांना सांभाळायच आता. आईपण खुप खुप भरभरून जग. या जगण्यातल्या क्षणांचा पुढे खुप छिन आधार होतो आपण हे क्षण आठवून वाट्टेल ते करायची ऊभारी भरू शकतो. दोन महिन्यांनी ध्यानसत्रात भेटूच.
आई बाबा झाल्याच्या उभयतांना अनंत शुभेच्छा!
आराम कर आळजी घे.
आज मैत्रीच्या राज्यातली राणी बनून मनान मनाशी संवाद साधताना तु मला सापडलीस यासाठी खुप खुप आभार.
तुझीच,
सौ. गौरी मॅडम 
२६ मे २०२६
###

*दिवस दहावा*
 *अधिक मास विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2*
----------------------------------
स्त्री होणं म्हणजे नक्कीच सुख आहे... पण या स्त्रित्वाची खरी कहाणी प्रत्येकीची वेगळीच.. मग लिहा आज याच तुमच्या जन्माबद्दल.
 *विषय - जन्म बाईचा..बाईचा...खूप घाईचा...* ...

सकाळी विषय आला आणि डोक्यात शब्दांची मंडई झाली. "गौरी शांत बस आधी हातची कामं ऊरक." अस मनाला समजवत मी कामं केली. हो मी स्वतःला पण हाक मारते. कामाचा ढिग असला तरी चहा पीत टेरेसमधे बेबीज बरोबर चहा घेते आणि थोड्यावेळाने म्हणते,"गौरी उठ.. तुलाच तुझी कामं करायची आहेत. मै तो चssलीss" खरय मी अशीच बागडते घरी याला साक्षीदार फक्त सासूबाईच! (खर तर ती काम मलाच माझी वाटत असतात फक्त, जगास त्याचे काहीही पडलेले नसते.) सकाळ उठल्यापासून रात्री पलंगावर पाठ टेके पर्यंत जगाचाच विचार डोक्यात असतो. आता हल्ली हल्ली मी थोडा का होईना माझा पण विचार करतेच.
आपण कितीही आठवणीनी घरच्यासाठी सगळ केलं तरी एक क्षण आपण एखाद चुकून आठवण करणं सुटलेल्या गोष्टीवर ऐकवले जातो. मग वाटत का आठवणी केल्या मी? का अट्टाहास करते जागच्या जागी असण्याचा? का बघितील त्यांच ते म्हटल नाही मी? माझ्या मानणार्यांना कोण बोलत असेल तर मी का ऊसळले?  यासगळ्याचा ईतरांवर काय फरक पडला? काहीही नाही... पण गंमत सांगू का शान्ता शेळकेंच्या कवितेच्या या ओळी वाछा जन्माला बाई माणूस येतानाच रक्तात टोचून आलेलं असतं बाईपण.
"जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवनगाणे गातच रहावे." काही जगतात आठवत आणि नाही सुचत नाही या पांघरूणाखाली. अपवाद पण बघितल्यात मी बायका.
सृष्टीकर्त्यानं बनवतानाच हे स्त्री पात्र अस बनवलय की ते दमूच शकणार नाही. ती क्षमता विसरेल पण ती असणारच. आता मुद्दा आला घाईचा. का कोण जाणे पण सगळ पटापट आवरायच हे वाक्य आमच्या पाचवीला पुजलेलं. त्यात युनिवर्सल मानसिक शांतता केव्हा लाभते -- "झाला बाई ओटा धुवून!" आज सकाळी ऑफिसला पोचले आणि ऑफिस असिस्टंट ला, हो दोस्त आहे तो आपला त्याला आजची काढलेली रांगोळी दाखवली. तो पटकन म्हटला, "बापरे, रांगोळी डबा घरच आवरून कामावर येता, एवढ सगळ कस करता सकाळी तीन तासात?" मी, "नेहमीच करते" मी इतक सहज ऊत्तरले. मग लक्षात आलं ही खुप कौशल्य कौतुकाची बाब आहे हे जग ओळखत पण आपण बायकाच लक्षात घेत नाही. कधीतरी क्रेडिट घ्यायला शिका गौराक्का! ही वाक्यं कोणे एके काळची एका शुभचिंतकाची गपकन आठवली.
जन्म बाईचा कायम घाईचा असतो खरय... एकाचवेळी अनेक नात्यांना न्याय देण्याची कला तीला अवगत असल्याने ती सतत घाईत असते. पण बाई माणूस घरी दारी सतत करत राहते तीला गृहित धरल जातं. त्यात काही काम बायकांची असा शिक्काच दिलाय का कोण जाणे आपल्याकडे. कशी ना संस्कृती समाज आपला?  चुक दाखवली बाईनी, तत्वान वागताना बोट दाखवल की ती ऊद्धट स्वतः ला जास्त शहाणी समजणारी आणि नकारघंटा बिरूदाची. मग त्यावर पुरूषांनी आवाज चढवला की शांत बसायच. का? तर ऊगाच वाद नकोत म्हणून. अडाणी गावाकडील घरी तर हे रोजचच असेल.
बाईचा दिवस घाईचा असतो यावरच एक गमतीदार किस्सा. माझ्या मुलाला कायम न ऊलगडलेला प्रश्न, "सारखे पडदे का धूतेस? तुला रविवारी आराम करायची अॅलर्जी आहे का? बस की जरा. सारख काही तरी धुवत पुसत नाही तर आवरत असतेस." सुटीच्या दिवशी हाक मारली की लगेच "हवेत वाटत पडदे काढून?" झिजतील ते आता... आणि हशा पिकलाच समजा. त्याला माझा अभिमान आहे कारण मी दोन वाजेतोवर स्वयंपाक घरात नसते. सगळ आवरून ईतर ई बरच करते. पण दर रविवारी स्वच्छतेची घाई करते याचा भयंकर राग आहे.  अहो पण खर कारण घरातली जळमटं, आटाळा, विस्कटलेली कपाटं हे फक्त बायकांनाच दिसतं. मी या घाईच्या कामांना एक दिवस महिन्यातला दिलेला असतो.
वयाच्या बावीस वर्षात जर मी आईला असच घरात काय आणि बाहेर काय  सतत घाईतच बघितलय तर मी तशीच असणार ना! पण अगदी खर सांगते मला माझ्यातली बाई घाईच्याच जन्माची आवडेल कारण तो मी माझा प्लस पॉईंट समजते. त्या घाईत मी माझ्या आजूबाजूची नाती प्रगल्भ करते, माया करायची सवय माझी वाढते, समोरचा कसाही वागला तरी मी काही क्षणात आहे तशीच छान आहे आणि आनंदी आहे बघायला मला आवडेल. शेवटी बाईपण भारी देवा! बाई पण भारी देवा!
जन्म बाईचा ss बाईचा ss खुप घाईचा!
तो मायेचा मायेचा जसा गंधच जाईचा!
गौरी पाठक 
२७ मे २०२६

##
दिवस अकरावा* 
*अधिक महिना विशेष* 
 *शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम -*
 *मी आणि माझे लेखन....लेखन आणि तुमचं नातं....असं सगळं लिहा...
मी लिहीत लहानपणापासूनच होते पण ती खुप मोलाची गोष्ट आहे हे मलाच ठाऊक नव्हतं. ते सांगणारही कोणी नव्हतं. तेव्हाच लिहलेल जपल पण नाही गेलं.  हरकत नाही कान्हाजींची ईच्छा योग्यच.
२०१२ मधे धीटाईनी लिहलेल महाराष्ट्र टाइम्समध्ये छापायला पाठवलं. तेव्हा बाबा सोडून गेलेले. तोपर्यंत वाट्टेल ते मनमुरादपणे श्रोता म्हणून ऐकणारे कान बाबा होते. तोवर वहिपेन विसरूच गेले होते मी. पण बाबांना गमावलं आणि परत वहिपेन हाती आलं.
२०१२ ते आजतागायत वहिनीच बाबांच्या कानाच काम केलय. त्यात रोजनिशी कशी लिहावी? वर्ग केल्यामुळे  जे जे मनात जस आलय तस्स लिहायची सवय झाली आहे. लिहलेले वाचून कोण काय म्हणेल ही भीती चेपली आहे कारण त्या त्या वेळचा तो तो अनुभव असतो आणि तो पुढे बदलू शकतो मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक ही पक्की खुणगाठ डोक्यात बसली आहे. आपल्यालाच ऊगाचच वाटत असतं आपल वाचलेल बोललेल वाचून ऐकून कस वाटे ल समोरच्याला. पण किहीही नाही अस नसतं. साध सरळ माणूस ओळखून बोललेल समजणारे नसतात कधीकधी समोरचे (अशांचयाबद्दल मनात अजिबात रोष नाही ऊलट  इगनोर करायला शिकते मी अशांकडून) त्यामुळे अशा किरकोळ गोष्टी त अडकायच नाही. मी अडकतही नाही.
लिहायच खुप लिहायचं मन मोकळं करायचं. कधीकधी तेच ऊत्तर असत.
वाढदिवसाच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीबद्दलच्या सुंदर भावना लिहून पाठवतेय मी. छान प्रतिसाद मिळाला आहे. ग्रुपमधील प्रत्येक माणसांचे गुण शोधून लिहून नववर्ष शुभेच्छा कार्ड बनवून पाठवली, नववर्षात १९ स्पंद मनिकडे भरधाव वेगाने आलेली जाणवली आणि मी श्रीमंत झाले. लिखाणाचे खुप संकल्प करत आलेच आहे.
चर्चमधल्या कन्फेशन बाॅक्सच काम माझं  लिखाण मला करतं. मन हलकं झालं की मोरपिसासारखं फुलतं. मी मनाला वाट्टेल तेव्हा लिहते.
म्हणून मी २०१२ सालीच म्हटलय "बाबा तुम्ही गेलात पण जाताना मला मोठं करून गेलात..."
लिखाण आणि मी आत्मियतेच नातं आहे.
** 
जसजसे सुचेल तुला
तू लिहीत जा मनातलं
केव्हातरी भिजेल पावसात
घर तुझं ऊन्हातलं."
शब्द अनिकेत
गौरी पाठक 
२८ मे २०२६
###
दिवस बारावा : 
विषय : माझे वेळेचे गणित 
सुप्रभात मंडळी,
काय योग आला आहे राव, मी हा विषय लिहणार माझ मत सांगणार आणि आजच वेळ न पाळू शकणार नाही असा माझा काल मेसेज. भयंकर त्रास होतो मी स्वतः वेळ पाळली नाही की. म्हणून तर आधीच सूचित करते कारण मी ते माझं कर्तव्य समजते. 
आता दोन दिवसांची भरपाई करणे सुरू आहे. मला तर वाटतं माझ्या आईनी मी पोटात असताना वेळ पाळणे या विषयाचा धस्का  घेतलेला की काय कोण जाणे. कोणालाही दिलेली वेळ पाळणं मी अत्यंत महत्त्वाचा भाग माझ्या आयुष्यातला समजते. साधा चित्रपट बघायला जायच तर तो सहाचा असेल तर मी पालणेसहालाच पोचणं पसंत ठरते. काही करणानं कोणा ईतरांमुळे मी तेव्हा वाटेत असेन तर मी दंगा करते. पहिल्या अक्षरापासूनच तो बघायचा. मूहुर्त नऊ पंचावन्न... मी साडेनऊ लाच पोचणारी. शिस्त ही वेळेच्या बाबतीत असलीच पाहिजे. वेळेच्या किमान दहा मिनिटे आधीच आपण हजर हवे. 
जगात असे बरेच आहेत आठला तयार रहा पोचतोच आणि जर मी आठला तयार आहे आणि ती व्यक्ती पोचली नसेल तर येरझारी सुरू होते. मला हसतात घरी कारण सातला पोचा म्हणणारे पण स्वत कार्यालयात आलेले नसतात मग बडबड ऐकावी लागते. मला फरक पडत नाही मी दिलेल्या वेळी पोचले.
सातला या सांगून स्वतः आठला पोचण अक्षम्य अपराध आहे. 
मी स्वतः ऑफिसमधे कायम ठोक्याला हजर राहात आलेय. सहाला निघणार तर पावणेसहाला टेबल आवरण सुरू असणार. साहेब फण म्हणालेलेत एकीला पावणे सहा झालेत आता गौरीच्या टेबलवर जाऊन ऊपयोग नाही. ती ऊद्या करते म्हणेल. सहा एकला ती जागेवर नसते. मी खुप हसलेले हा किस्सा मला ऐकायला मिळालेला. त्या वर्षी मला वेळ पाळणारी परफेक्शनीस्ट ऑफ आवर ऑफिस अवाॅर्ड मिळालेलं. काहीही वेळ पाळायच बक्षिस... असो पावती होती ती माझ्या स्वत्वाची, शिस्तीची.
वेळेच गणित बसवूनच जगायची सवय  माझ्या पालकांकडूच अंगी आलीय. वेळेच गणित पाळताना ९९% आपण आखतो तस होतच पण ईतरांवर अवलंबून असलेलं आपण काहीही करू शकत नाही ऊलट काय घाई आहे तुला हेच ऐकावं लागतं.
दिवसभरात ईतक्या गोष्टी करण होतं की झालेल्या गोष्टी एकदम वेळेत झाल्या त्या रात्री आढावा घेतल्या की  समजतं. शिस्त विषय आधी लिहलाय त्यात सगळ आलय हेच वेळेच गणित.
मी माझ्या वेळेच्या गणिताबद्दल ईतकच म्हणेन की वेळ आहे तोच वेळ पाळावी. तो क्षण जपावा, ती वेळ परत नसते... वेळेला फार फार महत्त्व आहे ते ती गेल्यावर समजण्यापेक्षा आधीच जपावी.
एकच दिशा माझी,
मला येत नाही वळता,
एकच गती माझी,
मला येत नाही पळता.
एकदा निघून गेले की
मी पुन्हा येत नाही
असताना लवकर माझी
किंमत कळत नाही.
(कवी ठाऊक नाही)
वेळ पाळण अशक्य असेल तर त्याची खबरदारी आधी घेतली की मला झोप लागते. वेळ टाळण बरोबर आहे पण मीहत्याच टेन्शन घेते अस मला माझी मैत्रीण म्हणते. असेलही...
चला पळते... पुढची वेळ पाळायची आहे.
गौरी पाठक 
२९ मे २०२६
##
*दिवस तेरावा* 
 *अधिक मास विशेष* 
 शब्दकळी विजयासोबत लेखन उपक्रम 2 
*आजचा विषय
ज्या उद्यासाठी थांबलेय मी सांगा बरं नक्की तो येणार कधी???
खरय कामं करण्याचा क्रम ठरवताना हे माझ्या बाबतीत होतं. कोणालातरी जाऊन भेटण यातच मोडतं माझ्याकडून.‌ कारण "मी खुप बिझी आहे" हे वाक्य माझ्या शब्दकोशात मला आवडतच नाही. याकारणासाठीच ते फक्त आज नाही ऊद्या करते अस असतं. ते वेळ बघून विचार करून परिस्थिती अनुरूप मी करतेच अर्थात ती क्षमता परमेश्वराची कृपाच. आपण ठरवून आ
काही ई होत नसतं पण कर्म करण तर हातात आहे. तसच सकारात्मक बोलत जगण हे पण काम आहे. आपणच आपली वाट जमत नाही जमणार नाही म्हणून आणण्यापेक्षा आज नाही ऊद्या करेन या दुधावरची तहान ताकावर भागवली जाते माझ्याकडून. बाकी कान्हाजी घेतील बघून. 
ज्या उद्यासाठी थांबलेय मी तो ऊद्या येतोच येतो. कसल भारी आहे ना? विजयाताईमुळे आपण कसे आहोत हे आपणच ठोकून बघतोय. कारण आपण काय करतो कसे आहोत हे लिहूनच घेत आहेत त्या! मग ते होणारच कारण दोन इंद्रुय ते नोंद करत आहेत.
अनेक धन्यवाद विजयाताई.
ज्या उद्यासाठी थांबलेय मी,
सांगा बरं नक्की तो येणार कधी?
आजच्या क्षणांना कवटाळताना,
कळलं उद्या तर येतो रोज नवा आधी.
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
३० मे २०२६
###
दिवस चौदावा
अधिकमास विशेष
शब्दकळी विजयाबरोऊलेखन उपक्रम २
 *विषय : वाट पाहणं*

वाट पाहुनी जीव शिणला
दिसा मागूनी दिसं टळला
सुर्व्या आला, तळपून गेला
मावळतीचा खळीगाल आला
गडणी, सखे गडणी
काय सुरेख बोल आहेत ना!  वाट पाहणे यात ओढ आणि आर्तता दोन्ही आलच.
लहानपणी वाड्यात एक कुटुंब राहत होतं पाच भावंडं आणि पालक. आप्पा साधं कुठतरी कामाला होते. कापडाची शिवलेली पिशवी ते वापरत. संध्याकाळी घरी पोचले की मुलं वाट पाहत असायची. ओढ हीच की पिशवीत खाऊ काय असेल? चणे फुटाणे खारीचा पुडा काहीही असायच ते त्यांना फार मोलाच असायचं. त्यांचा आनंदानं ऊजळलेला चेहरा आजही लक्षात आहे.
नंतर वाट बघण अनेकदा आल पण हे फार ह्रदयाजवळच.
आणि... बाबांना स्वर्गात जगा मिळताना इथून जाताना त्रास होत होता ते सुटकेची वाट बघत होते जणू ही आर्तता... फारच वाईट...
एकंदरच वाट पाहणे ही भावना आनंद चिंता कसलीही असू शकते. पण ह्रदयाचा कस लागतोच लागतो. मग तो परीक्षेचा निकाल असो, दिवसभरलेली माऊली असो, भिशीचा नंबर असो, परगावचा माणूस असो, नंबर लावलेला सिलेंडर असो अथवा येणारी पाळी असो मन विस्कटलेल असतच.
पण वाट पाहू्णं संपलं की होणारा आनंद पाहून ते सगळ सगळं निवळतं मग ती कशासाठी का असेना....
या या रे सकळ गडी ! 
'कृष्ण कृष्ण' गाऊ ॥ कुंजवनी यमुनेतिरि,
वाट पाहतो श्रीहरि ॥ जाउ धावु पाहु तया,
रंगि रंग लावू ॥१॥ संत तुकडोजी.
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
३१ मे २०२६
###
दिवस पंधरावा : अधिकमास विशेष शब्दकळी विजया बरोबर लेखन उपक्रम २ :
विषय : माझा वाढदिवस 
जब्रा! मी माझ्या वाढदिवसाला काय करायचं? यासाठी महिनाभर आधीच विचार सुरू करते अजूनही. हो आज माझ वय ४७ तरी मी खुप वाट बघते माझ्या वाढदिवसाची. नवरा कायमच विचारतो बोला काय घ्यायच यंदा? काय डोक्यात आहे? कारण वाढदिवस साजरा करताना साधसुधं घर नसण हेच माझ मत ना! जे मनात आहे ते करायला सहकार्य मिळणं हे फार भाग्याचच की ग सख्यांनो..
मी माझ्यासाठी मस्त नवीन ड्रेस घेते किंवा वेळेत शिऊन मिळेल याची खबरदारी घेते. दिवसभरात काय काय करायच चक्र डोक्यात असतं.
मी कोणाचाही वाढदिवस असो घरच्यांचा ते दोनतास त्या व्यक्तीला ऊच्च स्पंद आपण खुप खास आहोत ही पूरेपूर जाणीव देण यासाठी काम करतेच. सासर माहेरचे साठ सत्तर सारखे वाढदिवस तर यात मोलाचे. त्यांनी  बोलावल नसलं किंवा त्यांच्या घरच्यांनी काही ठरवल असो नसो मी माझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन त्या व्यक्तीला तो दिवस खास अनुभव यावा यासाठी काहीतरी करतेच. आवड आहे मला ती. माझा वाढदिवस आहे या बरका! असं म्हटल की कोणीही आणतोच भेटवस्तू फुलं. मला तस नात नको असतं. नगाला नग नसावं मी कोणासाठी. एखाद्या बद्दल जर मनापासून वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातला तो क्षण आणखी ऊजागर व्हावा हे मनातून आतून येण होणं, ही भावना मला येते. या कर्म करण्याच्या बुद्धीसाठी कान्हाजींचे विशेष आभार.
तर माझा वाढदिवस हा अस कोणी येऊन खास करेल अशी वाटच मी कधी बघत नाही कारण मला खुप आधीच समजलय की वाटण आणि करण यातली दरी सगळेच भरून काढण्यासाठी सक्षम नसतात.
घरातला कोणाचाही वाढदिवस असो ओवाळताना सगळे उपस्थित हवेत, मस्त आवडीचा केक हवा, सगळ्यांनी छान आवरूनच असायला हवं, घरीच तर आहोत म्हणून घरातल्या मळक्या रोजच्या कपड्यात असणं चालणार नाही. अहो खरय हा धाकच आहे माझा घरी. लागेल तर मस्त थीम ठरवायची, घरी कार्ड बनवायची, मुलांना हाती घेऊन अशा अनंत गोष्टी गेल्या २५ वर्षात केल्या आहेत. हे बघून घरचे पण मला हाच आनंद देतातच मुलं पण प्रेमानं करतात.या सगळ्यांत साथ असतेच. सांगतो ते करताना ऐकणारे हात आहेत म्हणून माझी किंमत!
माझ्यासाठी वाढदिवशी भरपूर फुलं जमतात, फोन येतात. मला रूपाली घाणेकर कडून एक पुस्तक येतं. (हे माझं माहेरच नाव, ती मला माझ्या मनात जे असेल ते घेऊन देते.)
माझा जन्म जानेवारीतला कायम शाळेत तिळगुळच वाटला जायचा आणि घरी गाजर हलवा!  कालांतराने तोच आवडता पदार्थ झाला. अक्कल कुठ होती? स्वतः ला काय आवडतं विचार करायची.
आईकडे वाढदिवसाच्या दिवशी किलोनी मैत्रिणी असायच्या. दोनदा चुल पेटवावी लागायची पण आई आनंदाने करायची. खळखळाट हास्यात गजबजलेल्या घरात वाढदिवस साजरे झालेत बावीस... घर तसं दहा बाय दहा पण माणसांचा राबता दे दणादण...
मला माझा वाढदिवस फार आवडतो, त्या दिवशी पाठीवरून अपसुकच बाबांचा हात फिरल्याचा भास अजूनही होतो...  कोण कस करेल याची वाट न बघता आपला दिवस आपणच मस्त जगायचा, मोठ्ठा श्वास भरायचा आणि ऊंच भरारी घ्यायची, जीवनाखेरपर्यंत अशीच ठणठणीत ठेवा ओ कान्हाजी म्हणायचं आणि भरपूर फोटो काढायचे. हो शास्त्रं असतं ते.
"आपल्या सावली पासून आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणून प्रत्येक नात्याला ह्रदयातून जपावे..."
गौरी पाठक 
१ जुन २०२६
##
दिवस सोळावा
विषय - पुन्हा पुन्हा सुरूवात करताना....

तर पुन्हा पुन्हा सुरू करताना काय असतं नेमकं मनात....उत्साह?? भीती?? दडपण? आतुरता...? आपण करूच हा विश्वास?? अजून काय काय .???


आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर अशा दोनतीन गोष्टी असतातच की सुरू करून मागे पडतात मग आपण त्या निगुतीने पकडून परत सुरू करतो. जस पावसाळा आला की चालण बंद पडतं, गणपती आले की दहा दिवसात सकाळचा व्यायाम वंद पडतो नंतर ते सुरू करताना नाकेनऊ येतात.

मला हे दोन अनुभव आहेत. शरीर नीट राहण आपली पहिली जबाबदारी आहे हे मनात ठोकत पीटत पावसाळ्यानंतर ते चालायला जायचं रूटीन आणताना मनाला अनेक प्रलोभन किंवा भिती दाखवावी लागते. तसच गणपतीचे दहा दिवस ब्रह्म विद्येची सरावाची दा़डी ऊडालेली असते. नंतर पित्रवड्यातले पंधरा दिवस सकाळच हे श्लसनप्रकार करायची वेळेची घडी बसवणं महा जोखमीच काम. मग मनाला दाखले देत ताळ्यावर आणायच की आपण हे करत होतो म्हणून कोरोना शिवला नाही आठव आणि गौरी ऊठ शारीरिक मानसिक दोन्ही श्लसनप्रकार कर.

अनेकदा एखाद वेगळ काम हाती घेतल की ही सकाळची शरीराला लक्ष देण्याची काम माझ्याकडून मागे पडतातच. पण कोणी ना कोणी कान टोचणारा येतोच आयुष्यात येतो म्हणजे काय कान्हाजीं पाठवतात. "हलव बाई हीला जरा" म्हणत. पण त्याच महत्व अनुभवल असल्या कारणानं आणि ते मनापासून आवडत असल्यान मी ते उचलून धरण होतं.

आजच सहसाधिकेचा फोन होता की गौरी ताई मला जरा धक्का स्टार्ट दे सराव होत नाही ये. म्हटलं घ्या ऊघड्याला भेटलं नागडं. (हसू नका गावाकडची स्पष्ट म्हण आहे ही.) मी जर करत नाही तर तू कर कस म्हणू सुंदरी. पण दोघींनी आजच दुपारी ठरवल काय तोडगा काढायचा. या अभ्यासाची एक खासीयत आहे कोणी ओळखीण असो नसो कोणीच कोणाला ऊपेक्षित सोडत नाही. सराव जरी मागे पडला तरी ऊभारी आणि सकारात्मक विचार करण आता चिकटलय जय लिंग डे मी (तिबेटीयन गुरूंच नाव आहे हे आमच्या).

तर अशाप्रकारे परत पदर खोचून ते सुरू करतेच....

जय श्रीकृष्ण 

गौरी पाठक ©️®️

२ जुन २०२६

###

दिवस सतरावा : मी सद्ध्या काय करते? 

कित्ती छान गं! मला तु काय करतेस(प्रश्नार्थक)? तु केल नाहीस? असलेच प्रश्न ईतक्यात माझ्या ऐकण्यातले. एखादवेळेसच बाहेरच कोण आल तर हा प्रश्न विचारला जातो. मी नोकरी करते यावरच तो थबकतो.

आज खुप प्रेमाने विजयाताईन विचारल ती हे विचारतानाच डोळ्यासमोर आली. कोण विचारत आजकाल काय चालुय सद्ध्या? काय चालुय मनात? डोक्यात? काळजालाच हात घातला या प्रश्नानी.....

मी सद्ध्या सिंहावलोकन करतेय. आपल समजलो आपण इतरांना तरी ती का दुखावतात आपल्याला यावर त्यांना माफ करायला मनाला शिकवतेय. मस्त मनमुराद हसायला लिहायला जगायला रोजचा अविभाज्य घटक कसा बनेल यावर काम करतेय, आपण सगळ्यांना बांधून ठेवत आनंदी पण ठेवायच ही जबाबदारी फक्त माझी नाही हे अंगवळणी आणतेय, मला लोकांनी छानच म्हणाव असा माझा अट्टाहास तर होत नाही ये ना हे तपासतेय,  माणस वाचवायचीच पण त्यांनी जरातरी वाचव म्हणू दे मग मदत कर हे मनाला समजवतेय, मी सद्ध्या स्वत:ला जपायला शिकतेय, ऊभारीन जगात ऊंच भरारीसाठी पाया मजबूत करतेय, माझ्या टाॅनिकसारख्या मैत्रिणींबरोबर चार्ज होतेय, वयाचा हा निवांत टप्पा हवाहतसा जगायची शिस्त लावतेय, "मस्त हसा आणि मी ठणठणीत आहे", अस सतत म्हणा अस सर सांगायचे ते ते पदोपदी पाळतेय. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः वर प्रेम करतेय. ४५-४६ वर्ष सतत ईतरांसाठी जगले. स्वतः कशी नीटनेटकी आहे यावर भर दिला प्रत्येक नात्यात योग्य तशी मी कशी फिट बसेन यावर माझा भर होता. जगासाठी कितीही केलं तरी ते जग आपण आहोत तस बघेलच अस काही नसतं आणि त्यावर आपण वाइट वाटून घ्यायच नाही. सगळे आपलेचेत पण आपलबिपलं कोणी नसतं. पण तरी जग हे आपलच असतं. काय धरायच काय सोडून द्यायच हे जमवायचं आणि जगायचं. आता स्वतः साठी आणि आपल्यांतल्या आपल्यांसाठी जगायचं, मस्त सु़ंदर.... जग खुप सुंदर आहे ते भगळ सगळं अनुभवायचय ना मग तीच तयारी करतेय. यासाठी आधी मी सिंहावलोकन करतेय... शांत चालतेय... आणि स्वतः ला आवरून ठेवतेय..

खुप खुप धन्यवाद ताई... या प्रश्नासाठी... आणि घट्ट मिठी!!!

तुझीच गौरी 

३ जुन २०२

###

दिवस अठरावा : विषय शब्दाविण संवादू

"मनकवडी निघालीस अगदी! " अस वाक्य ऐकतो आपण कधीकधी छान वाटत ना! आपण आपल समजून विचार केला की तो पोचतोच पोचतो. (मी काल रांगोळी पाठवली आणि ताई म्हटली मी आत्ताच तुझा विचार करत होते. आहे की नाही शब्दाविण संवादू)
त्यासाठी आधी ती व्यक्ती आणि आपण बंध जुळलेले असावेत. एखाद धागा पण हे घडवू शकतो.

मी जशी आहे ती पाहून लांबुनच दुवा देणारे अनंत आहेत, ठराविक हालचाल दिसली नाही की, "चुकल्यासारख वाटलं कुठेस? बरीयेस ना? " लगेचच मेसेज येतात. भेटी महिनों महिन्यात होत नाही त पण माझी चाहुल घेणारे बरेच आहेत. मी आभारी आहे कान्हाजींची. दोन व्यक्ती आहेत ज्या मला शब्दाविण संवादू आहेत. त्यांच्या असण्यामुळे मला आधार आहे.

मागे एकदा  एका मैत्रिणीच्या आयुष्यातल्या प्रसंगात विचार आलेला की आत्ता या क्षणी मी आलेय तुझ्या कडे बॅग घेऊन तर मला कारण न विचारता घरात घेणारी काळजी घेणारी एखादी तरी व्यक्ती आहे का?  असतात किलोनी आपले आपल्या पण अशा केसमधल आपल काणं? कोणावरही ही वेळ न येवो पण तीच्यावर आली आणि मी तीचा तो प्रवास पाहिला, तीला त्यात दोन व्यक्ती सापडल्या. तेव्हा मी विचार केला  की शब्दिविण संवादू माझं कोण आहे? आहे का? आणि मला ऊत्तर सापडल की हो आहेत माझ्या आयुष्यात शब्दाविण संवादू दोन आहेत. ईतक हायस वाटलेल काय सांगू....

आपल्याबरोबर सतत असणारे किलोनी असतात पण साध बोललेल पण समजत नाही तर शब्दाविणू कधी झेपायच ? कमी लेखत नाही मी त्यांना, असतील त्यांच्या लेखी व्याख्या वेगळ्या. आपण आणि ते एकाच चष्म्यातून पाहतोय अस नसत ना! त्यामुळे बरोबर आहेत हे महत्त्वाचे समाधान मानायचे. साथ देण पण सोपं नाही. अशा परिस्थितीत दोन मनकवड्या व्यक्ती असण ही भावना आंतरीक सुख देते. यात माहेर आई वडिल तर असतातच पण या व्यतिरिक्त असलं की भारी वाटतं. योग असतो तो ठरवुन होत नाही चालायचच.

नुसतं स्माइलीचा बाॅल बघून ऊभारी येणं, सहज फोन केला की पहिल्या श्वासातच न सांगता सगळं समजणं, आपल्या लकबी, वस्तू किंवा वाक्य आठवून ठिकाण बघून आठवण येण, फोन येणं एक ना अनेक अनुभव येतात मनकवड्यांचे.
मी कोणाची शब्दाविण संवादू आहे का?  तर हो अशा काही जणी आहेत. ते त्यांनी मला सांगितले पण आहे.
तू माझी शब्दाविण संवादू आहेस हे सांगायला धाडस लागतं. तसच ते ऐकायच भाग्य पण लाभावं लागतं कारण ते समजल पण पाहिजे ना! आलं का लक्षात.

खुप वेगळा विषय हा आजचा. खर सिंहावलोकन झालं.
आभारी आहे.
४ जुन २०२६
####

दिवस एकोणिसावा 
विषय : जेव्हा काहीतरी बिघडतं...

बिघडलं म्हटल की वाइट वाटणारच... पदार्थ, नातं, वस्तू काही असो मनापासून करत असतो आपण. मग कस काय बिघडलं? हे एकतर समजत नाही. चुकल कोण? गैरसमज झाला का? की झेपच नव्हती?  ते काही असो त्रास होतो, बिघडण्याच्या वेगवेगळ्या क्षमतेप्रमाणे तो दाह असतो. अनेक दिवस सल राहते. चांगुलपणाचा / निगुतीचा / नीटनेटकेपणाचा ऊलटा तोटाच झाला वाटू लागतं.  पण ते तस नसतच मुळी आपल्यासाठी आपली स्वप्नंच ती पण कान्हाजींचं आपल्यासाठीच नियोजन त्यापेक्षा भारी असतं. आपली झेपच नाही ते समजायची.
समोर काय आहे त्यातून चांगल बघायची सवय लावली तरच त्यातून सकारात्मक सुचतं, सूचक वाटू लागतं. आपण वेगवेगळ्या दिशेन विचार प्रवाहित करू लागतो. त्यातून मस्त मार्ग मिळतो.
एक गंमत सांगते... आज आत्ता आठवली...
मी सातवी आठवीत असेन आणि  माझी बहिण तीन वर्षे लहान. माझ्या लहानपणीची पदार्थ करतानाची ही गोष्ट. त्या वयात दुसरा करू शकतो सोपच असेल बघु करून असा विचार येणं साहजिकच होतं. आम्हाला दोघींना बटाट्याचा किस फार आवडायचा.  तसही ऊपवासाचे पदार्थ जरा हवेहवेसे असतातच लहानपणी. मग काय एकदा दुपारी किसले बटाटे जरा वेगळी रेसेपी करू म्हणून त्याला तुपावर भाजुन शिजवल काजु बदाम काप घातले आणि नंतर घातली साखर. खल्लास ! खरा बट्ट्याबोळ तिकडच झाला. त्याचा झाला गोळा आणि पातल्यावर आली खरपुकडी.  काही अक्कल नव्हती तेव्हा पण तो पदार्थ प्लेट मधे घेऊन खाल्ला तेव्हा तोंडं दोघींची बघण्यासारखीच झाली होती. बटाट्याचा किस तिखटच जास्त चांगला असे मनात असलेले चेहरे. आता काय खायच गपचुप आणि भरीस भर आईची बोलणी.
साडेपाचला बाबा यायचे कामावरून. काय चालुय विचारलच लगेच कारण गोड वास भरला होता घरात. काही नाही हो बाबा काहीतरी नवीन केल पण फसलय ते. आमचे चेहरे बघण्यालायक... बाबांनी चव बघु म्हटलं आणि मी दिल डिशमधे. क्षणभर शांत होते आणि म्हटले काय आहे हे? मी क्षणाचा अवधी न देता म्हटलं "होनोलुलू" . हे कसल नाव? असू दे मी जरा रागानच म्हटल. आणि आश्चर्य ते म्हटले थोडं दुध घाल यात मला मग जरा बरं लागेल. हे ऐकताच हसु का रडू झालेलं.
या किस्स्या नंतर मी कधीही केलेल्या पदार्थाच नाव नसेल किंवा तो कसा होईल ठाऊक नसेल तर मी काय केलय ? यावर होनोलुलूच  म्हणते. आज २५ वर्ष होतील लग्नाला माझ्या सासरी माझा हा कोडवर्ड सगळ्यांना पाठ झालाय आणि हे सांगितल तेव्हा असा हशा पिकला घरी म्हणून सांगू... देवा रे... 
तेव्हाच बहुतेक मी शिकले - बिघडलेलं सकारात्मक विचार केला तर सुधरू शकतं किंवा अस म्हणूयात बिघडलेलच नसतं आपल्याला तस दिसत असतं.
तर माझ्यामते जेव्हा काहीतरी बिघडतं तेव्हा नक्की च काहीतरी चांगलं घडतं. प्रगल्भ होणं म्हणजे तरी वेगळ काय हो, हेच की!
गौरी पाठक 
५ जुन २०२६
###
दिवस विसावा
माझ्या कमतरतेसोबत माझ्या स्त्रीत्वाचा स्विकार.
मलाच का तत्वाने वागलं नाही कि त्रागा होतो? इतर कसे थंड बसू शकतात ? सहनशील असावं पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच कि. जगात जन्माला आलो म्हणजे आपल्यातल्या गुणांचा जगास पण थोडा फायदा होणं हे काम आहे आपलं. माझी कमतरता आहे कि मी सगळ्यांनाच माझं समजून वेळे आधीच सूचित करते. यामुळे मला बरेचदा गृहीत धरलेले किंवा 'समजतात आम्हालाही गोष्टी' असे कटाक्ष  मी अनुभवले आहे. त्यांना माझ्या सूचना वाटत असतात पण त्याला काहीही पर्याय नाही, असतील त्यांच्या पण बाजू म्हणायचं सोडून द्यायचं.  माझ्या या कमतरते बरोबर माझ्यातल्या काळजीवजा प्रेमळ स्त्रीत्वाचा मी स्वीकार करते.
कोणतीही गोष्ट  करताना माझ्याकडून  समोरचा आधी करतोय का पाहत बसणं होत नाही. समोरचा करतोय काय करतोय  अंदाज घेऊन मग मी माझं काय ते करायचं हे मी करू शकत नाही. समोर दिसलं कि ते झपकन करून घेऊ असच होत., मग ते काम असो, कोणासाठी काही भेट घेत असू, मग ते उतरलेल्या रिक्षाचे पैसे असो किंवा ठरवत असलेल्या कार्यक्रमाचं नियोजन असो. माझ्यातली कमतरता हि कि इतर काय करतात पाहायला मी वेळ देत नाही. मग अस होत बरेचदा कि मी करते म्हणून मी कधी करू का म्हणत नाही. अस लोकांना वाटतं (तू करतेसच ना ? म्हणून मी केल नाही अस ऐकवतात.)  मी अशी जगू शकत नाही कोणी मी करते म्हणायची वाट पाहेतोवर. जर माझी क्षमता आहे तर मी आपण हुन मी हे करते म्हणणे माझे काम आहे असे का लोकांना वाटत नाही. समोरचा करतोय मग आपण का गडबड करा असे बावळट प्रश्न माझ्या मनात येत नाही. पण हि माझ्यातली कमतरता असू शकते पण तिच्याबरोबर मी माझ्यातल्या आनंदी स्त्री व्यक्तिमत्वाचा दुसर्यांना आनंद देणाऱ्या मनापासूनची तत्वाचा स्वीकार अगदी मनापासून करते आणि तो करताच राहीन. कौतुक करून घ्यायला हवच असत पण एखादेवेळेस त्याच व्यक्ती आपल्याला तितक्याच समजून घेणे जेव्हा गरजेचे असते तेव्हा मात्र त्यांना आपली शब्दशः वाक्यच दिसतात. हि त्यांच्यातली कमतरता अस म्हणून नकारात्मकतेचं त्यांच्याबद्दलचा गाठोडं जे मनाला टोचलेल असतं ते मी मूठ बांधते आणि मुठा नदीत सोडून येते. 
माझ्यातल्या अनेक कमतरता मला जेव्हा समजतात तेव्हा मी लगेच मनात नोंद करत असते. असे आपण वागायचे  नाही. मनातली चेकलिस्ट लगेच उपडते होते. Do and don't do. thats it 
कोणीच परिपूर्ण नसतंच. पण माझ्यातल्या प्रेमळ, माणसं हवी असलेल्या स्त्रीत्वाचा मी स्वीकार करते. आज या ग्रुपमध्ये तुमच्या सारख्या सख्या श्रोते लाभल्या. अश्या गोष्टी मी मला मुठा नदीत सोडून दिल्याचे फळ समजते. कमतरता शोधत असताना माझ्यातल्या संपन्नता पण शोधात आल्या पाहिजेत. विजयाताईंचा हा विषय हेच ठोकून करून देतो. हेच तर आहे सिंहावलोकन!

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

जय श्री कृष्ण 
गौरी पाठक 
६ जून २०२६
####

दिवस एकवीसावा
पाऊस

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणांत आपोआप
सुधीर मोघे
पाऊस म्हणजे खरा तर वर्षाव! निसर्गातल्या सोन्याचा जो मानवावर होतो. तो मानवी मनावर पण होतो. निसर्गाची कमल पहा नुसतं विचार केलं तरी कानी रिमझिम भास होतो. काल विषय आल्यापासून दोन गाणी मनात रुंजी घालत आहेत.
चिंब पावसानं रान झालं आबादानी.... सगळी मरगळ झटकून टाकून नवीन निरभ्र मोकळं आकाश पहा असा सूचित करणारा हा निसर्गाचा अविष्कार! सगळी अवनी मोहरून जाते, ती मनाच्या अवनीला पण झाकोळलेल्या निराशावादी मरगळीस न्हाऊ घालते.
अचानक येऊन तारांबळ होतेच पण ती मजाच वेगळी. मला आठवलं २०२७ मधे कामावरून जाताना दोघी मैत्रिणी बरोबर निघायचो. एकदा कर्वे रोड वर पोचलो आणि जो कोसळायला लागला म्हणून सांगू. कायनॅटिक, एक्टिव्हा आणि आम्ही  दोघी जे मनसोक्त भिजत कर्वे रोड वरन घरी गेलो. क्षणभर एकमेकींकडे बघितलं काय करायच? चल म्हटल सगळे रस्त्याच्या कडेनी आहेत. ठोकायची भिती नाही. रीमझीम गघरेहसावन म्हणत बोंबलत काॅलेजकुमार वळणं घेत गाड्या दामटतात तस्सच घरी गेलो. आरपार चिंब. आज ती गुजरात ला आहे पण असा कोसळला की आजही एकमेकिंना फोन होतो. काय भारी आहे हे सगळ फक्त पावसामुळे.
एका डाॅ. मैत्रिणीनी सात आठ वर्षापूर्वी मला एक गाण आठवलय गौरी ताई आत्ता पाऊस आला आहे चाल ओळी म्हणायच्यात ऐकवू?  असा फोन केला. अहो काय भाग्य हे.  ते बोल होते "पाऊस पहिला जणु कान्हूला  बरसून गेला बरसून गेला." अहाहा! काय सुंदर वर्ण आणि चपखल अशी ऊपमा.  आज सलग पुढची सगळी वर्षे मी पहिला पाऊस आला की हे म्हणतेच म्हणजे गुणगुणतेच. तुम्ही सगळ्या नक्की ऐका. मगच समजेल.
माझ्या आयुष्यात पाऊस आणखी एका कारणासाठी मोठा आहे कारण पाऊस कोसळला आणि कान्हाजी आले.... संबंध लावायचा तसा आपापला लावा...
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
७ जुन २०२६

###
दिवस बावीसावा
२१ दिवस संकल्प पूर्ती

खरच हा अधिक महिना लक्षात राहिल. मन हलक झालं. का वाटल असाव मला हा उपक्रम करूया का? विचारावा.  का विजयाताईकडून होकार येऊन आमच्या मनाच समुद्रमंथन होऊन मनं ऊजागर व्हावी. अनेक परिस्थितीच्या अनेक जणी समोर आल्या. अनेक काम अनेक गुण समजले.  काहीतरी योजना होती ही जी घडून येण्यास सगळ्यांची कर्म कामी आली. कोणाच्या ही आयुष्यात कोणतीच गोष्ट ऊगाचच घडत नाही. हे साधुन घेण्यामागे काय हेतू असेल ना कान्हाजींचा!
रोज स्वयंपाक करताना विषय आला की लंचपर्यंत डोक्यात विचार येत होते. लंच झाला की मन रीतं होत होतं. अगदी कसलीही तमा न बाळगता मी मन छापत होते. हे २१ दिवस लंच नंतर चा वेळ कारणी लागला. हापापल्यासारखं डोकं काम करत होतं. खुप कविता गाणी प्रसंग ऊजळणी झाली. मराठी साहित्याचा खजिना बघा की माझ्याकडे अस खुणावतोय आता... बहिणाबाई़च्या कविता वाचन कार्यक्रम आठवला, शांता शेळकेंच्या हस्ते माझ्या लहानपणच्या हातात मिळालेलं बक्षिस आठवलं, किलबिल रंगभूमी मधली केलेली नाटकं त्यांच्याहतालमी आठवल्या, परवा नाट्यसंगित कलाकार सौ. अस्मिता चिंचाळकर भेटल्या तेव्हा गप्पांत मला जाणवलं की हे योग नाही काहीतरी गर्भात आहे.
एक मात्र खर की मन मोकळ होतं हा रोजनिशी चा फायदा. माझे विचार आणि लेखन जरी कोणी कुठ वापरल तरी माझ्या नावासकट असेल याची खात्री असल्यानं मनातले शब्द मी इथं तुमच्या समोर ओतलेत. पण खर सांगू मला त्याची खरच कधी भिती वाटलेली नाही कारण जे माझ आहे ते कोणी काहीही केल तर माझ्याकडे राहणार आहे आणि जे णाझ नाही ते नाही हे मला पक्क ठाऊक आहे. विजयाताईचा वर्कशॉप केला तेव्हा माझ्या या विचाराव मोहोर ऊमटली की एखाद्याची वस्तू चोरू कतो पण कला चोरताच येत नाही. कमाले की नाही.











No comments:

Post a Comment