Sunday, 17 May 2026

विषय

काहूर

आधीच ठरल होतं सगळं तो आज येणार होता. खरतर सकाळीच येऊन थबकण अपेक्षित होतं. काय झालं असेल? तस पाठवणारी व्यक्ती वेळेची पक्की आहे आणि तो येणार म्हणून मी पण खुप खुप ऊत्सुक होते सकाळपासून.
तो आला की दिवसभर त्याला कसा वेळ देऊ ? कसा असेल तो?  आपण वाट बघत असलेल कोणी आल नाही की काहूर माजतं मनात. मग मी ठरवल ही भावनाच लिहून काढू कारण एरवी ही भावना निर्माण होण अवघडच.
चाळीसेक जणींनी यांच्याबरोबर दंगा करायच योजलेल पण हा पठ्ठा आलाच नाही अजून.
अहो कोण म्हणून काय विचारताय? तोच तो विजयाताईचा "विषय".
२१ दिवस तो रोज येणार आहे आणि आमचा अधिकमास माधवांना अर्पित मोहून जाणार आहे तोच "तो - विषय!"

प्रतिक्षेतली..
गौरी पाठक 
१८ मे २०२६

No comments:

Post a Comment