Monday, 24 August 2026

प्राक्तन

प्राक्तन


प्राक्तनात आपण काय काय बघणार आहोत ते आहे. लिहताना वाचताना जितका अवघड शब्द तितकच अवघड त्याचा अर्थ, भवितव्य साठवणारा. आठवडा झाला मनात हा शब्द कुठतरी करवतीच्या पात्यानं लाकूड कापल्या सारखा कुरतडतोय.
आषाढी एकादशीला भगवान विष्णूंकडून भगवान महादेवाकडे सूत्र सोपवली गेली तोच हा दिवस. पहाटेपासूनच मन प्रसन्न होतं. सोमेश्वर देवळातला एकेक कोपरा अनुभवताना मधेच माहेरचा जुना वाडा आई बाबा सवंगडी आठवत होते.  तितक्यात एका मोलाच्या सवंगड्याचा निरोप आला, "काळानं वेळ गाठली गं, आई गेली रूपाली".... आषढीत गुंतलेल मन वार्याच्या वेगानं वैकुंठ गमनास निघालेल्या त्या स्त्री तत्वाकडे भिरभिरू लागलं. का धावले मी? ओढ होती ती, बंध होते ते... आपण आपल्या आयुष्यातली विविध स्वभावांतले आयुष्यातले हेलकावे खात झगडत जगलेली व्यक्ती जेव्हा आता दिसणार नाही समजत तेव्हा काळीज थरथरतं.  माणूस किती स्वार्थी नाही का हो? बरेच कंगोरे आहेत या वाक्याला.
आपण आपल्या मांसाचा गोळा जन्माला आला की तो लुसलुशीत जणुकाही परमेश्वराचा स्पर्श अनुभवतो ती आईपणाची भावना तत्क्षणी त्या मातेच्या आणि त्या लेकराच्या मनात आत आत नोंद होते. कालांतरान तीच भावना ऊतार वयातल्या आईच्या स्पर्शात जाणवते. हो हे मी अनुभवलय अनेकदा... हीच भावना आता एखाद माणूस कधीही अनुभवणार नाही ही नुसती कल्पनाच भयाण...
काळावर औषध नसतं, जो येतो तो जातोच, शरीर संपतं आत्मा तोच अनंत आहे. सगळ मान्य असलेली मी त्या सवंगड्यास समजवताना तोकडी पडले. "कालच भेटले ग संध्याकाळी तेव्हा पण माझीच काळजी होती तीला..". "लवकर जा, पाऊस जोरात आहे, रीक्षा मिळणार नाही." आपल्या पहिल्या श्वासापासून तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी आईच! हे वाक्य खणखणीत जगत होते मी आज..
सलग काही वर्षे आम्ही तिघी मैत्रिणी आपल्या काळातले दिवस आठवणी ऊजागर कशा राहतील हे पाहण्यासाठी मातृदिनाच्या निमित्ताने तीघींच्या आई वडिलांना एकत्र घेऊन भेटत असल्याने आमची मे महिन्यात नुकतीच भेट झाली होती. नैतिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माणूस किती पुरा पडणार.. पण तरी कुरकुरत न जगता मार्ग काढणे, जमेल तस जेवढ्यांना भेटता येईल तस भेटण हाच ऊत्तम पर्याय आहे.
जसे माझे बाबा गेल्यापासून जवळपास वर्षभर  माझ्या चालू घडामोडीबरोबरच त्यांच्या बरोबरच्या घडामोडी सतत मनात होत्या. तसच गेल्या १२ दिवसांत मी आमच्या तिघींच्या तसेच घरच्यांबरोबरच्या, लहानपणच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात होता.
भावनांचा कल्लोळ मनात माजला की तो पेनाचा पूल करून पानावर घ्यायचा म्हणजे मग मी वर्तमानात नीट जगू शकते. हे मला समजलय.
आमच्या आधीची पिढी... अनंत गोष्टी शिकवल्या, मनावर बिंबवल्या आमच्या मनावर.. कोटी कोटी धन्यवाद तर आहेतच पण अखंड ठणठणीत सहवास लाभावा हीच इच्छा आहे. ही खर तर स्वार्थी ईच्छा आहे पण ती पोकळी भरण्याच सामर्थ्य आमच्यात कमी आहे. कोणी काही म्हटल तरी जगाची रीत आई बापाशिवाय माहेरात जीव नाही. म्हणून ही वाक्यं के. बी. निकुंब यांची कोणाच्याही मनास भिडतीलच .. वादच नाही.. "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, ..."
भावनाशीलता, सहनशीलता, चिकाटी, ध्यास असे अनेक गुण आम्हाला आमच्या आईकडून मिळाले. आम्ही भाग्यवान आहोत. पुरेपूर प्रमाणात आम्ही ते पुढच्या पिढीला देण्यासाठी रीते होतच आहोत...
ऊद्या तेरावा दिवस... काकूंना माझा मनापासून नमस्कार ... तुमच्या कडून शिकलेली तीळाची वडी आणि ऊकडीचे मोदक करताना तुमची अखंड आठवण येत राहील...
परमेश्वर सवंगड्यास धैर्य शक्ती प्रदान करोत आणि सर्व नीट पार पडो. माझा ऊद्या योग नाही.

काळजी घे. भेटूच.
तुझीच रूपाली

सळसळती तरुणाई

माझ्या कामाच्या प्रवासात अनेक प्रकारच्या प्रशिक्षणार्थींशी माझा संबंध आला. या काळात वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये झालेले बदल मी जवळून पाहिले आहेतया प्रशिक्षणार्थींचे वय जवळपास २३ किंवा २४ वर्षांचे असते. ऑफिसमध्ये कसे वागावे, कसे बोलावे, कसे बसावे, कामाच्या ठिकाणी कोणत्या गोष्टी करायला हव्यात, तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी येतात. ते येण्याआधीच त्यांचा अंदाज मला येऊ लागतो. अर्ज पाठवण्यापासून ते मुलाखतीला येण्यापर्यंतची त्यांची पद्धत, त्या वेळची देहबोली, प्रत्येक विभागाचे काम समजून घेण्याची त्यांची उत्सुकता या सगळ्या गोष्टी अनुभवातून समजायला लागतातकाळानुसार या मंडळींमध्ये झालेले आमूलाग्र बदल पाहून आज मला लिहावेसे वाटले. का? ते लवकरच समजेल.

कोरोनापूर्वीचा अनुभव
या काळातले प्रशिक्षणार्थी येतानाचखूप काही शिकायचे आहे या आनंदात असायचे. स्वतःचे भवितव्य कसे घडवायचे, याचा विचार करत ते वावरताना मी पाहिले आहेमुलाखतीला येण्याआधी नम्रपणे फोन करून, “काय आणायचे? प्रक्रिया कशी असते?” असे विचारले जायचे. कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कामात कशा वापरल्या जातात, हे पाहण्याची त्यांच्यात खूप उत्सुकता असायचीआपल्या वरिष्ठांचा आदर कसा करायचा, याची त्यांची पद्धत अतिशय सुंदर होती. त्यांना शिकून काहीतरी करायचे होतेच; पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही त्यांच्या वागण्यात स्पष्ट दिसायचीमला एखादे मॉडेल बनवायला द्या.” काही काम असेल तर मला शिकवा.” असे प्रश्न ते स्वतःहून विचारायचेइंटर्नशिप म्हणजे शिकण्याचा काळ आहे, याची पूर्ण जाणीव त्यांच्या वागण्यात शंभर टक्के दिसायची. स्टायपेंड किती मिळणार, हा प्रश्न विचारण्याचीही त्यावेळी फारशी हिम्मत नसायचीवेळ कोणतीही असो, बॉस गेल्याशिवाय ऑफिसमधून निघायचे नाही, हा इंटर्नसाठी जणू एक अलिखित नियमच होता आणि तो सांगावा लागायचा नाही त्यांना तो आपोआप समजलेला असायचा.

कोरोनानंतरचा अनुभव
कोरोनानंतर आलेली इंटर्नची फळी पाहिली की कधी कधी वाटतेबाप रे, सुपर आहे! पण  त्यांना असे वाटते की आपण आधीपासूनच बरेच काही कमावले आहे. जणू आपण नोकरीच करत आहोत आणि कंपनीच्या मालकाला आपलीच गरज आहेमुलाखतीनंतरअपडेटसाठी ते दिवसांत फोन करा असे सांगितले, तरी त्यांना वाटते की आता कंपनीनेच आपल्याला फोन करायला हवाकंपनीला तुम्ही इंटर्न म्हणून यावे, अशी गरज नाही किंवा नसते. इंटर्नशिपची गरज तुम्हाला आहे, याचे गांभीर्य अनेकांना अजिबात जाणवत नाहीया ९० किंवा १२० दिवसांतमला काय मिळणार?” याची यादी त्यांना आधीपासून हवी असतेकॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करताना फरफट उडणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम कसे करून घ्यायचे, हे त्यांना लगेच समजते; पण वरिष्ठांशी कसे बोलावे, कसे वागावे, याचे साधे मॅनर्स मात्र अनेकांकडे दिसत नाहीतमी शिकणार, स्वतःच्या पायावर उभा राहणार आणि आयुष्य एन्जॉय-चिल करणार,” या तोऱ्यात ते वावरताना दिसतात.मी इंटर्न म्हणून येणार तर मला किती मिळणार?” यावर त्यांचा भर आधी असतोवेळ संपली की सरळ घरी निघायच. बॉसला सांगणे, परवानगी घेणे किंवा विचारून जाणेयापैकी काहीही आवश्यक वाटत नाही.

शेवटी एक विचार...
एकंदर विचार करता, काळ बदलतो, हे मान्य आहे. प्रत्येक पिढीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, हेही मान्यपण या पिढीतील काही मुलांची भिड चेपलेली जाणवतेशिकताना आपण नम्र असतो, कारण अजून आपल्याला अनुभव नाही, हे स्वीकारण्यात काहीही कमीपणा नाही. उलट, “मला अजून शिकायचे आहे ही जाणीवच आपल्याला पुढे घेऊन जातेपण आजच्या काही तरुणांच्या दृष्टीने लाँग टर्म जॉब म्हणजे सहा महिने, हे जेव्हा मी ऐकलं तेवहाच समजून गेले कि या तरुणाईची जगण्याची व्याख्याच बदललेली आहे. किमान दोन वर्षे एखाद्या ठिकाणी काम करून आपण स्वतःला घडवतो, अनुभव घेतो, चुका करतो, त्या सुधारतो आणि मग पुढच्या संधीसाठी तयार होतोही व्याख्या आता चलतीत नाही.

मला यांची तक्रार अजिबात करायची नाहीये; पण यांचं वागणं काही केल्या पचनीही पडत नाहीयेकॉर्पोरेट जगतात असेच मातीचे गोळे गेले तर इमारत कशी उभी राहील? आणि उभी राहिलीच, तरी ती किती काळ टिकेलखरं तर हे वाक्य माझ्या एका सहकाऱ्याने यापूर्वीही मला सांगितलं होतं; पण आजच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने पटतोय.

कोरोनाच्या काळात योग्य आणि सक्षम शिक्षक लाभल्यामुळे अर्थात परिस्थतीमुळेच कदाचित यांच्यावर ही वेळ आली असावी. हरकत नाही. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, काम करण्याच्या पद्धती बदलतातपण यात नुकसान कोणाचे आहे?

शेवटी त्यांचेच.
आणि हे त्यांना समजायला वेळ लागेल
कदाचित अनुभव आल्यावर.
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक

Tuesday, 18 August 2026

परंपरा, पिढ्या आणि परमात्मा

परंपरा, पिढ्या आणि परमात्मा
मला नेहमीच भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा आदर आणि समर्थन करण आवडत आलय. शक्य तितक्या परंपरा आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करतेच कारण माझ्या आधीच्या पिढ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर आणि त्यांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर माझा विश्वास आहे. यापैकी अनेक मूल्यांचे पालन केल्यामुळे मला स्वतःला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत, आणि म्हणूनच आजही त्या परंपरांबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्याच वेळी, पुढच्या पिढीवर याच परंपरा नियम म्हणून लादल्या जाव्यात अशा मताची मी अजिबात नाही. त्याऐवजी त्यांनी त्या परंपरांमागचा अर्थ समजून घ्यावा, त्यांचे महत्त्व अनुभवावे आणि मनापासून त्यांचे पालन करण्याची इच्छा स्वतःहून निर्माण व्हावी असे मला वाटते. काळ बदलतो, पिढ्या बदलतात आणि त्यामुळे पुढच्या पिढीच्या गरजेनुसार काही परंपरांमध्ये योग्य ते बदल किंवा सुधारणा गरजेच्या आहेत त्या होण्यात काहीही गैर नाही. मात्र, प्रथा आणि पद्धती मध्ये थोडा फार बदल झाला तरी त्यांच्या मुळाशी असलेली नैतिकता, संस्कार आणि मूल्ये आपण हलक्यात घेऊ नयेत, हे महत्त्वाचे आहे.

मी माझ्या माहेर सासरच्यांमुळे हे करू शकले, ते करण्यासाठी पोषक परिस्थिती मला लाभली, मी नशीबवान आहे हे पण मी मुद्दाम नमूद करेन. ज्यांना अशी पोषक परिस्थिती लाभली नाही तरी त्या हे करू शकत आहेत खर कौतुक त्यांच आहे. जे केल्याने आपल्याला छान अनुभव आले ते पुढील पिढीने पण करावे, गरजेपुरते बदल करूनच बर का! अस मला वाटतं. काहीच नाही तरी निदान सण, संस्कृती पद्धतींची माहिती तरी असावी.

पुढील पिढीला समजेल, महत्व पटेल, अस शास्त्रीय दृष्टीकोन ऊर्फ लाॅजिक वाचून मस्त वाटतं अस मला सांगितलं जात. ती माहिती मला पाठव मी पण पुढे पाठवते. एक दोन तर असे अनुभव आहेत की हे मराठीतल इंग्रजी मधे पाठव ते लवकर पचनी पडेल यांच्या. घ्या आता आणखी काय पावती हवी  आपण योग्य विचारधारेतून जातोय याची? 
 
याऊलट माझ्या पाठीमागे काही लोक माझ्याबद्दल नक्की मनात विचार करत असणार याची मला खात्री आहे (अनुभव आहेत गमतीदार) की, “दुसऱ्यांना सल्ला देणे सोपे असते; जेव्हा तेच स्वतःवर येईल, तेव्हा  समजेल." लोकांची अशी मतं आहेत, असणारच आहेत हेही मला माहीत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर त्याचा मला त्रास होत नाही. समाजात वेगवेगळ्या प्रकारची विचारसरणीची माणसं आणि व्यक्तिमत्त्वे असतातच.  वेगवेगळ्या दृष्टिकोनांबरोबर जगायला आपण शिकले पाहिजे. परिस्थितीने त्यांचे ते विचार असणार किंवा असावेत.

मात्र, कधी कधी मला एक प्रश्न पडतो— एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे सकारात्मक योगदान देता येत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण जेव्हा आपल्या हातात सकारात्मक विचार आणि चांगली ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी असते, तेव्हा आपण ती नक्कीच वापरायला हवी नाही का?  अशी माणस नाही का जगात कान्हाजी?

असा सगळा विचार विषयांचा गुंता मी आज मांडला. निखळ मनानं मांडला, कोणाबद्दल ही रोष नाही अशा मनान पानावर ऊतरवला. भविष्यात माझ्याबरोबर काय होईल? कस होईल? अजिबात विचार नाही आला कारण ते बघून घेणारा जो आहे त्मायाच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि कान्हाजींनी संध्याकाळी एक सुंदर अनुभव दिला तो असा-

संध्याकाळी मस्त ७०-८० वयाच जोडपं भेटलं. कुठाय पत्ता? काय लिहतेयस सद्ध्या? सहज हक्काची वाक्यं. अहाहा ! काय भाग्यवंत वाटलं. "काकू चालूय काहीतरी टुकूटुकू." मग आज नागपंचमी नैवैद्य काय असतो यावर चर्चा झाली. माझी हाताची रंगलेली मेहेंदी दाखवून झाली. काकू म्हटल्या आता आम्ही या सगळ्यातून विरक्ती घेतलीय. "बरोबर आहे." मी म्हटल काकूंना. तर काका म्हणतात "मधे मधे भेटत रहा गं. पालकाच बी आणलय घेऊन जा." "हो हो चला मी पळते म्हटल आज पुरी करायची असते." जेवढ जमेल तेवढ मी करते पुढच पुढे बघू. तत्क्षणी काकु म्हटल्या, "करशील करशील आणि पुढची पिढी काय नाही म्हणेल तुला तुमच्या सारखीच उत्साही मिळणार नाही कशावरून? नक्की ती नशिबवानच तुमच्या नशिबात असणारे" अवाक झाले मी काय सांगू.. सकाळी च कान्हाजींना प्रश्न विचारला आणि संध्याकाळी त्यांनी माणूस पेरला की ऊत्तरासकट वाटेवर! 

अहो याची देही याची डोळा म्हणजे हेच का ते?

जय श्रीकृष्ण

Tradition, Generations & The Divine

I deeply respect Indian traditions and the wisdom passed down through generations. I believe traditions should not be imposed on the next generation as rules, but understood, experienced, and embraced with meaning. Customs may evolve with time, but the values, ethics and संस्कार at their core should remain.

I also feel fortunate to have had an environment that supported me in practising many of these traditions. And if we can pass on even a little of that wisdom and positivity to the next generation, why not?

Today, I wondered: when we have the opportunity to spread positive thoughts and good energy, shouldn’t we choose to do so?

I am quite sure that there are people who think about me behind my back, perhaps saying, “It is easy to give advice to others; when the same situation happens to her, she will understand. We are here to see” like that. I have had enough amusing experiences to know that such opinions exist—and they probably always will. Honestly, though, they do not bother me.

There are all kinds of people and personalities in society, each with their own way of thinking. We have to learn to live with different perspectives. Their circumstances may have shaped the way they think, and I understand that.

But sometimes, I find myself wondering about one thing. If, for whatever reason, a person is unable to make a positive contribution, that is understandable. But when we have an opportunity to share positive thoughts, kindness, and good energy with others, shouldn’t we make the most of it? Aren’t there more people in this world who can choose to do that, Kanha ji?

Today, I simply put this whole tangle of thoughts into words. I expressed them with a pure heart, without anger or resentment toward anyone.

And while writing all this, I did not once worry about what the future holds for me, or what will happen to me tomorrow. I have absolutely no anxiety about it, because I have complete faith in the One who is watching over everything "My Kanhaji".

And then, this evening, Kanha ji gave me a beautiful experience—and it was this:

And then, in the evening, I met a beautiful 70–80-year-old couple. We spoke about traditions, Nag Panchami and life. As I was leaving, the auntie smiled and said, “You will do it. And who knows, the next generation may be just as enthusiastic as you. They will be fortunate to have you.”

I was speechless.

A question in the morning… and by evening, Kanha ji had planted a person on my path with the answer.

Maybe this is what “Yachi Dehi, Yachi Dola” truly means. ❤️

Jai Shri Krishna. 🙏

Moral: We may not control people’s opinions, but we can always choose to leave positivity wherever we go.

Walking Clocks

Walking Clocks

For the last six or seven months, I have started walking regularly— simply because I wanted to take care of my health and grow myself in a small but meaningful way. I don’t like company during my morning walk. I actually enjoy walking alone.

But over time, the people I see during my walks have become familiar faces. In a way, they have become my “walking clocks.” I don’t know most of them personally, but their presence has quietly become a part of my daily routine.

There is one military man who walks with a very royal and disciplined style—full military style and tempo. It gives me a remider how to walk. He always carries a stick in his hand. The way he walks has a certain confidence, discipline, and kadak attitude that makes him easy to recognize.

Then there is a lady who always walks with her dog. She is usually in such a hurry that I sometimes feel she is not there for her own walk, but more concerned about getting her dog to the right place for its potty time! Whenever we cross each other,  I raises my hand and says, “Hi,” and respond with a smile and in return she did the same —and vice versa. It is a very small gesture, but somehow it feels nice. Definitely it will help to grow and increase our happy hormones.

There are also three people who always walk together. They seem to be around the same age. They walk at a medium pace and are constantly discussing something in a very low voice. I often wonder what important conversations happen during those walks.

There is one lady, probably around 50, who walks with a young man. They walk according to their respective speeds, but young man's body language always shows a certain carefulness and attentiveness toward her. I notice it, and that’s it.

And then there are two elderly ajobas who have their own daily mission. They regularly pluck flowers from the bushes near the corner of the road in front of our society. Every time I see them, one thought comes to my mind: “How big must their puja ghar be? Why do they need to pluck so many flowers from all the bushes? What a habit, yaar!” Sometimes, I feel they can actually read that question on my face. When they notice me looking at them, they stop plucking the flowers for a moment. I can sense a little awkwardness on their faces. I smile slightly and continue walking, as if I have caught them doing something they know I am silently judging.

There is another lady who always walks extremely fast. she has frown lines/creases on her forehead, her face always looks full of tension, and her hands move quickly with every left-right step. Every day, I used to give her a smile. But she ignored me every single time. After some time, I understood something: a smile is one of the simplest gestures we can give, but not everyone is ready to receive it. And that’s okay. I stopped expecting anything and eventually forgot about it.

But then, suddenly, this month, something changed. The same lady with the has frown lines forehead, who had ignored my smile for months, suddenly started smiling back at me. Surprisingly, she even raised her hand and said, “Hi.”

I was genuinely surprised today. It made me realize that sometimes our small gestures take time to reach people. We may never know what someone is going through, what is happening in their mind, or why they don’t respond. But that doesn’t mean our gesture has no value. Or maybe, after seeing the same smile every day, something slowly changed. My daily sweet, simple smile makes her smile back at me.

Today, I just feel thankful to Kanhaji for teaching me, in His own way, to keep giving a smile without expecting anything in return.

Maybe that is the real benefit of my daily walk.

I started walking for my health and to grow myself. But somewhere along the way, I also started noticing people, observing little things about human nature, and learning that even a simple smile can become a beautiful connection.

And now, these familiar faces are not just people I see on my walking route.

They have quietly become a part of my journey.

My walking clocks.

19.08.2026

Sunday, 2 August 2026

पुण्यातील पेशवेकालीन २१ गणपती

ॐ श्री गणेशाय नमः 
(कसबा गणपती )
पेशवेकालीन गणपती कोणते? ते कुठे आहेत? काय इतिहास आहे? असे प्रश्न लेक विचारत होता. यावर एक शोध घेतला. यंदाच्या १७ मे २०२६ च्या अधिक महिन्याच अवचित्त साधून यांच दर्शनास प्रारंभ करू. जसे योग आणतील बाप्पा तसे होतील. ही आमच्या मनातली इच्छा त्या गणरायानच पुरी करून घेतली आणि आज चतुर्थील २ ऑगस्ट ला ती पूर्ण झाली. . 

१) मातीचा गणपती
२) मोदी गणपती
) श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
४) चिमण्या गणपती मंदिर
५) भिकारदास मारूती गणपती मंदिर
६) अमृतेश्वर सिद्धेश्वर गणपती देऊळ 
७) गणेश मंदिर चतुश्रृंगी देवी टेकडी
८) श्री पार्वतीनंदन देवस्थान 
९) वरद गुपचुप गणपती
१०) केदारेश्वर गणपती 
११) गुंडाचा गणपती
१२) त्रिशुंड गणपती
१३) जुन्या जाईचा गणपती
१४) लक्ष्मी-नरसिंह गणपती
१५) फडके गणपती 
१६) वडाचा गणपती 
१७) रमणा गणपती 
१८) सारसबाग गणपती 
१९) वृद्धेश्वर सिद्धेश्वर  देवस्थान गणपती 
२०) ओंकारेश्वर गणपती
२१) तुळशीबाग गणपती

१) गणपती चे नाव : मातीचा गणपती 
पत्ता : नारायण पेठ 
माहिती : ही मूर्ती शाडूच्या मातीपासून बनलेली अत्यंत दुर्मिळ अशी प्राचीन मुती आहे चार फूट उंच व दोन अडीच फुट रुद असलेली ही मुर्ती पूर्वी मातीचीच राहिल्याने हिला मातीचा गणपती महटले जाते. लोक माती गणपती असा चुकीचा उल्लेख करतात. या मंदिराचा इतिहास १७४० च्या सुमारास, म्हणजेच पेशवे काळातील मानला जातो. काही ठिकाणी या मुर्तीला स्वयंभू मानले जाते. पूर्वी येथे जुना वाडा होता, जिथे मोरया गोसावीनी ही मुर्ती घडवली असल्याची आख्यायिका आहे. मंदिरासमोर आवारात दगडी दीपमाळ आजही पाहता येते पूर्वी या मंदिराचे आवार प्रशस्त असल्याची ती खूण आहे. सभामंडपात शिवलिंग आणि विष्णुमूर्ती आहे. गणराय इथे चर्तुभुज स्वरुपात आहेत.
फोटो :

२) गणपती चे नाव : मोदी गणपती
पत्ता :   नारायण पेठ 
माहिती :  पुण्यातील नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिर हे सुमारे २०० वर्षांहून अधिक जुने असून, १८००-१८११ च्या सुमारास पेशवे काळातील हा गणपती जागृत मानला जातो. सुश्रूशेठ मोदी, जे पेशवे काळात दुभाषी होते, त्यांच्या नारायण पेठेतील बागेत जमिनीतून ही मूर्ती सापडली, म्हणून याला 'मोदी गणपती म्हटले जाते. रत्नागिरीचे भट नंतर पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांनी हे मंदिर बांधले. सर्वप्रथम गाभारा आणि कळस बांधण्यात आले. लाकडी मंडप नंतर १८६८ मध्ये बांधण्यात आला येथील लाकडी कोरीवकाम उत्कृष्ट असून त्यामुळे मंदिराला एक उबदार आणि प्रसन्न अनुभव येतो. पेशवेकालीन मंदिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना मोदी गणपती मंदिर.
फोटो :

) गणपती चे नाव : श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
पत्ता :   शनिवार वाडा 
माहिती :  पेशवेकालीन गणपती मंदिर ते पुण्यातील शनिवारवाड्याच्या पूर्वेकडील बाजूस आहे. ऐतिहासिकदृष्ट्‌या पेशवे, विशेषतः बाळाजी बाजीराव, गणपतीला अत्यंत पूजनीय मानत असत. किल्ल्याचा गणेश दरवाजा याच भागाकडे जातो, ज्याचा गणेश रंगमहालाशी जवळचा संबंध होता. गर्दीच्या रस्त्याच्या कडेला असूनही भगवान गणेशाची स्वयंभू लाल मूर्ती गर्भगृहाला एक गहन आध्यात्मिक वलय प्रदान करते.
फोटो :  : 

४) गणपती चे नाव : चिमण्या गणपती मंदिर
पत्ता :  सदाशिव पेठ 
माहिती : ऐतिहासिकदृष्ट्या, ही मुर्ती एका खुल्या, मोकळया चौथऱ्यावर स्थापित होती. देवतेसाठी दररोज अर्पण केल्या जाणाऱ्या धार्मिक वस्तू विशेषतः अक्षता (पवित्र तांदळाचे दाणे) यामुळे चिमण्यांचे थवे त्या ठिकाणी आकर्षित होत असत आणि त्यातूनच हे लोकप्रिय नाव पडले. १९५० च्या दशकापर्यंत, या देवस्थानात कोणत्याही औपचारिक रचनेऐवजी केवळ एका खुल्या चौधन्यावर ठेवलेली गणेशाची मुर्ती होती, आज, त्या जागी एक औपचारिक मंदिराची वास्तू उभी आहे.
फोटो : 

५) गणपती चे नाव : भिकारदास मारूती गणपती मंदिर
पत्ता :   सदाशिव पेठ
माहिती :  हे देऊळ सुमारे २०० वर्ष जुने ऐतिहासिक देऊळ आहे. १८१८ च्या सुमारास गुजराती समाजातील एक सधन सराफ 'भिकारदास' यांनी बांधले होते. हे दररोज शेकडो गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करत असत. त्यांच्या या समाजोपयोगी आणि परोपकारी कार्यामुळेच या मंदिराला 'भिकारदास मारुती' असे नाव पडले. मंदिराच्या परिसरात एकेकाळी माळी वस्ती आणि मोठी बाग होती.
फोटो : 
 

६) गणपती चे नाव : अमृतेश्वर सिद्धेश्वर गणपती देऊळ 
पत्ता :  शनिवारपेठ
माहिती :  अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरे ही पुण्यातील शनिवार पेठेत मुठा नदीच्या काठावर ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या १८ व्या शतकातील, पेशवाकालीन मंदिर संकुलाचा भाग आहेत. अ‌द्वितीय गणपती मूर्ती कलात्मक दगडी स्थापत्यकला आणि ऐतिहासिक शनिवारवाडा परिसराशी असलेले सान्निध्य ही येथील प्रमुख वैशिष्टये आहेत. अमृतेश्वर मंदिर १७८ मध्ये बांधण्यात आले आणि ते भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिराचे तोड पश्चिमेकडे आहे आणि त्यात एक भूमिगत गर्भगृह आहे. शिवाचे वाहन असलेल्या बैलाची दगडी मूर्ती आणि कळस असलेली मंडप नावाची एक ओसरीसारखी रचना, या दोन्ही गोष्टी आजही मंदिराच्या आत आहेत. भूमिगत गर्भगृहात कोरीव खांब असलेली एक लहान कमान आहे. १८२३ मध्ये, ज्या जमिनीवर अमृतेश्वर तिमेश्वर मंदिर परिसर वसलेला आहे. शिवाजी महाराजांच्या दरबारातील जवळचे नातेवाईक असलेले चित्राव घराणे यांना ती जमीन  देण्यात आली होती, जे पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्या काम करत होते. शनिवार पेठेच्या अरूंद गल्ल्यामध्ये, मुठा नदीच्या शांत काठावर अमृतेश्वर-सिदेशवर मंदिर १८२३ मध्ये गानो बाबाजी चित्राव यांनी राम मंदिराचे बांधकाम सुरू केले. यानंतर, १७३८ मध्ये पेशव्याच्या दरबारातील एक सरदर अबुजी नाईक बारामतीकर यांनी सिद्देश्वर मंदिर बांधले. हे मंदिर नागर आणि पर्शियन प्रभावासह मराठा शैलीत बांधलेले आहे. अबूजी नाईक यांनी आपल्या गुरुंची भक्ती सिद्ध करण्यासाठी त्यांच्या भुमीवर गुरुः दक्षिणा म्हणून हे सादर अर्पण केले होते. त्यामुळे हे या संकुलाचे एक विशेष वैशिष्ट्य ठरले. वास्तुकता क्या संमपरसा आणि गहरी लवचिकतेची एक बहुस्तरीय कथा आहे. हे संकुल शहराचा मध्ययुगीन भूतकाळ आणि मराठा वैभव याच्यातील दुवा साधते. त्याची मध्य रचना सत्ता आश्रय आणि भक्तीच्या कथा सांगते.
फोटो :  
 

७) गणपती चे नाव : गणेश मंदिर 
पत्ता :  चतुश्रृंगी देवी टेकडी
माहिती :  पेशवे काळात पुण्यात दुर्लभशेठ पितांबरदास महाजन नावाचे एक मोठे आणि श्रीमंत सावकार राहत होते. ते नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. नियमितपणे वणीला जाणे त्यांना उतारवयात शक्य होत नव्हते, त्यामुळे ते अत्यंत दुःखी असायचे. त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि ऊत्खलनात मूर्ती सापडली. तिकडेच त्यानंतर त्यांनी इ.स. १७८६ मध्ये तिथे एका भव्य मंदिराची स्थापना केली. सुमारे १७० हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. या टेकडीवर मुख्य देवीसोबतच भगवान गणेश आणि दुर्गामातेची मंदिरेही आहेत. गणपतीचा फोटो काढण्यास मनाई आहे.
फोटो : 

८) गणपती चे नाव : श्री पार्वतीनंदन देवस्थान 
पत्ता :  गणेशखिंड
माहिती :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि राजमाता जिजाबाई यांच्याशी संबंधित ऐतिहासिक वारसा आहे. अंदाजे ४०० वर्ष जुने हे देऊळ अतिशय रम्य आणि शांत आहे.  हा गणपती म्हणजे गावाची रक्षकदेवता मानली जात होती. पाषाणमध्ये शिवरामभट चित्राव हे सिद्धपुरुष राहात होते. त्यांच्या नजरेस मंदिराची जीर्णावस्था आली. त्यांनी मंदिराची डागडुजी केली. शिवरामभटांच्या विनंतीवरून श्रीमंत नानासाहेबांनी ते सरकार जमा करून घेतले. चित्राव यांना याची सेवा सोपवण्यात आली असा उल्लेख आहे.
फोटो : 
 

९) गणपती चे नाव : वरद गुपचुप गणपती
पत्ता :  शनिवार पेठ 
माहिती :  वरद गुपचूप गणपती मंदिर अनन्यसाधारण इतिहासाचे साक्षीदार ठरले आहे. लोकमान्य टिळक, न. चि. केळकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती येथे नियमित येत असत, असे सांगितले जाते. १९ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या देवस्थानाला वरदविनायक किंवा गुपचूप गणपती असेही म्हटले जाते. या देवळाच्या प्रवेशद्वारावर दक्षिणाभिमुख नगारखाना आहे. प्रशस्त प्रांगणात डाव्या बाजूला उत्तराभिमुख सभामंडप आणि गर्भगृह आहे, तर उजव्या बाजूला मोठी ओसरी आणि त्याला लागूनच दीक्षित कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. गर्भगृहातील गणपतीची मूर्ती मूळ काळ्या पाषाणाची आहे. त्याला शेंदूर लेपाने आकार देण्यात आला आहे. डाव्या सोंडीचे, चतुर्भुज आणि मांडी घातलेले गणेशाचे हे रूप तीन फूट उंच मूर्तीत प्रकट झाले आहे. गर्भगृहाच्या मागे शमीचे मोठे झाड असून तेही मंदिराएवढेच जुने असल्याची मान्यता आहे. येथील शंकूच्या आकाराचे ३० फूट उंचीचे शिखर सुंदर रंगवलेले आहे.
फोटो : 

१०) गणपती चे नाव : केदारेश्वर गणपती 
पत्ता :  कसबा पेठ
माहिती :  हे देऊळ बरोबर कसबा गणपतीच्या मागे आहे, हे अत्यंत प्राचीन (सुमारे ९०० वर्षे जुने) मंदिर असून येथे भगवान शिव (केदारेश्वर) यांची पूजा केली जाते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीवर श्रीगणेशाची मूर्ती देखील कोरलेली आहे. पेशवेकाळात १७३० च्या सुमारास सध्याच्या मंदिराची उभारणी झाली.
फोटो : 

११) गणपती चे नाव : गुंडाचा गणपती
पत्ता :  कसबा पेठ 
माहिती :  पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस  यांचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातले कसबा गणपतीप्रमाणेच कसब्यातील गणपतीचे दुसरे जागृत स्थान म्हणजे गुंडाचा गणपती होय. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मूर्तीवरील नजर हटत नाही आणि दर्शनाचा परिणाम दीर्घ काळ मनावर राहतो. दर्शनातच आनंद देणारी ही मूर्ती आहे. हत्तीचे शिर मानवी शरीरावर ठेवल्यावर तंतोतंत दिसेल अशी ही मूर्ती आहे. हत्तीच्या शिरोभागातील गंडस्थळे, मोठे कान आणि प्रशस्तपणा या मूर्तीमध्ये पूर्णपणे उतरला आहे. सुमारे साडेचार-पाच फूट उंचीची ही मूर्ती पूर्णपणे दगडाची असून शेंदरी रंगात आहे. चतुर्भुज, दोन्ही पाय खाली सोडून बसलेला गजानन, अशी ही मूर्ती आहे. डाव्या खालील हातात मोदक, वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश आणि उजवा खालील हात अभयहस्त असे मनमोहक रूप आहे. नागयज्ञोपवित, तसेच अंगभर पीतांबर असलेली मूर्ती दगडी बैठकीवर असून, अत्यंत प्रभावी अशा नजरेने पाहत असल्याचे दिसते.
आम्हा दोघांना तर हा बाप्पा मिश्कीलपणे हसून पाहतोय असच वाटत होतं. खरच प्रसन्न हसरी मुद्रा मनात आतवर आनंद देणारी मूर्ती.
फोटो : 
  

१२) गणपती चे नाव : त्रिशुंड गणपती
पत्ता :  कसबा पेठ
माहिती :  हे सोमवार पेठेतील एक ऐतिहासिक आणि अद्वितीय देऊळ पेशवेकालीन असून ते २६८ वर्षे जुने आहे. बाप्पाची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. या मूर्तीला तीन सोंड (त्रिशुंड), सहा हात आहेत आणि बाप्पा मोरावर बसलेले आहेत. या देवळाच्या एक तळघर आहे, जे वर्षातून फक्त एकदा गुरुपौर्णिमेला भाविकांसाठी उघडले जाते. तळघराचे वैशिष्ट्य: मुख्य मूर्तीवर केलेला जलाभिषेक थेट खाली तळघरात असलेल्या समाधीवर पडतो. मंदिराच्या तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज (दलपतगिरी गोसावी) यांची समाधी आहे. 
फोटो : 
  

१३) गणपती चे नाव :  जुन्या जाईचा गणपती
पत्ता :  शुक्रवार पेठ 
माहिती :  या गणपतीचा इतिहास पेशवे काळाशी जोडलेला आहे.  हा पुण्याच्या जुन्या पेठांमधील एक महत्त्वाचा आणि श्रद्धास्थान असलेला गणपती मानला जातो. अशी आख्यायिका आहे की, पूर्वीच्या काळी या मंदिराच्या परिसरात किंवा मूर्तीवर जाईच्या फुलांचा  भरपूर वापर होत असे, किंवा ती जागा जाईच्या वेलींनी वेढलेली होती. म्हणून नाव पडलं. राजा दिनकर केळकर म्युझियम च्या अगदी जवळ हे आहे.
फोटो: 
१४) गणपती चे नाव :  लक्ष्मी-नरसिंह गणपती
पत्ता :  सदाशिव पेठ 
माहिती : हे देऊळ सुस्थितीत, आकर्षक, सुंदर असून जुन्या काळाची जादू आणि वातावरण निर्माण करते. त्या काळात पुण्यात बांधल्या गेलेल्या पारंपरिक वास्तूंबद्दल हे मंदिर बरेच काही सांगते. हे मंदिर इ.स. १७७४ मध्ये बांधले गेले असून ते जवळपास २५० वर्षे जुने आहे. सुरुवातीच्या क्रांतिकारकांपैकी एक असलेले वासुदेव बळवंत फडके १८६५ पासून काही वर्षे या मंदिराच्या परिसरात राहिले होते. त्यामुळे या मंदिराला स्वतःचा असा एक इतिहास लाभला आहे. या देवळाला वासुदेव फडकें यांचा सहवास लाभलेला आहे. सदाशिव पेठ नाव येण्याआधीच हे देऊळ आहे. गणेश भट्ट जोशींना चालवण्यास पेशव्यांनी हे दिले. दृष्टांत झाल्याप्रमाणे काशीला गेल्यावर रमणा भागात ज्याला तेव्हा निवडुंगाच बन म्हणत तिकडे ती सापडली‌ अडीच फुट ऊंचीची पद्मासनातली ती आहे. गणपतीच पांढरी मूर्ती खुप सुबक आहेच तशीच आकर्षक आणि नीट निरखून पाहिले तर प्रभावी पण आहे.
फोटो : 

१५) गणपती चे नाव :  फडके गणपती 
पत्ता :  सिंहगड रोड राजाराम पुल
माहिती : हे गणपतीच देऊळ पेशवाईतील विख्यात सरदार हरिपंत फडके यांच्या काळात उभारले गेले असल्याचा इतिहास सांगितला जातो. पेशवेकाळात या मंदिराला मोठे ऐतिहासिक महत्त्व होते. सरदार हरिपंतांनी या परिसराच्या धार्मिक व आध्यात्मिक विकासात मोलाचे योगदान दिले होते. अतिशय प्रसन्न परिसर मन भावून जातो.
फोटो :
  

१६) गणपती चे नाव :  वडाचा गणपती
पत्ता :  सिंहगड रोड दत्तवाडी 
माहिती : ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पेशवेकालीन भव्य गणेशमूर्ती ईकडे आहे, फुले गणपती पण म्हणतात यालाच.  आख्यायिका: गोरे आडनावाच्या एका व्यक्तीने पेशव्यांना फुलांचा एक सुंदर पोशाख भेट दिला होता. पेशव्यांना तो पोशाख खूप आवडल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला ११ एकर जमीन बक्षीस दिली. याच जमिनीवर हा गणपती स्थापित करण्यात आला. गणेशाची मूर्ती पेशवेकालीन आहे. मूर्तीची उंची साडेतीन ते चार फुट असून, चार हात आहेत. मूर्तीचा उजवा गुडघा उभा असून, डावा गुडघा दुमडलेला दिसतो. वरच्या दोन्ही हातांमध्ये आयुध धारण केलेली दिसतात. खालील डावा हात हा सोंडेजवळ, तर उजवा हात आशीर्वाद देणारा आहे. मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली दिसते. मूर्तीचे डोळे अत्यंत बोलके आहेत. मूर्तीच्या समोर मोकळ्या जागेत जुना प्रचंड वडाचा वृक्ष आहे, यावरून हा गणपती वडाचा गणपती या नावाने पण प्रसिद्ध आहे.
फोटो :
  

१७) गणपती चे नाव :  रमणा गणपती 
पत्ता :  पर्वतीपायथा 
माहिती : शिवाजी महारांच्या हस्ते श्रावण महिन्यात ब्राह्मणांना दक्षिणा व भोजन देण्याचा मोठा कार्यक्रम होत असे त्यास रमणा म्हणत. आधी तो रमणबागेत होत असे. ंतर जागा कमी पडू लागली म्हणून पर्वती पायथा जागा निवडली गेली. १७५१ मध्ये हा रमणा बांधण्यात आला, तटबंदी बांधली गेली. शिवाजी महाराजांचा हा नियम पुढे पेशव्यांनी सुरू ठेवला. हा गणपती रमणा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला.
फोटो :
  


१८) गणपती चे नाव :  सारसबाग 
पत्ता :  सारसबाग 
माहिती हे पेशवेकालीन ऐतिहासिक व धार्मिक स्थान असून याला 'तळ्यातला गणपती' आणि श्री सिद्धिविनायक म्हणून ओळखले जाते. हे मंदिर १७८४ मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधले असून २५ एकर परिसरात पसरलेल्या या बागेची निर्मिती १७५० मध्ये नानासाहेब पेशवे यांनी केली. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५० मध्ये २५ एकर क्षेत्रात बांधलेला हा तलाव, सुरुवातीला नौकाविहार आणि हत्तींच्या पोहण्यासाठी वापरला जात असे.
फोटो :

१९) गणपती चे नाव : वृद्धेश्वर  सिद्धेश्वर देवस्थान
पत्ता :  शिवाजी नगर
माहिती वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट हे पुण्यातील एक ऐतिहासिक नदीकाठचे वारसा स्थळ आहे, जिथे महादेवाची दोन देवळं, एक जुना दगडी नदी घाट इथं आहे.  वृद्धेश्वर देऊळ हे पेशव्या सैन्यातील सरदार घोरपडे यांनी १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात (सुमारे १६४५-१६९६) बांधले. सिद्धेश्वर देऊळ १७६० मध्ये एका भक्ताने नंतर बांधले. या जागेवर पूर्वी एक मोठा पारंपरिक वाडा आणि अतिथीगृह होते, जिथे १८०२ मध्ये पुण्यातील लुटीदरम्यान नेते थांबले होते; १९६१ च्या पानशेत पुरामध्ये बहुतेक संलग्न निवासी वास्तू नंतर नष्ट झाल्या, तरीही मूळ दगडी मंदिरे आणि घाटाच्या पायऱ्या वाचल्या.
फोटो :
  

२०) गणपती चे नाव :  ओंकारेश्वर 
पत्ता : नारायण पेठ 
माहिती नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे  शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले हे पेशवेकालीन  ओेंकारेश्वर मंदिर अतिशय रम्य आणि जागृत आहे.
फोटो :

२१) गणपती चे नाव :  तुळशीबाग
पत्ता :  राम मंदिर तुळशीबाग
माहिती पुण्याच्या मध्यवर्ती भागातील तुळशीबाग येथील श्रीराम मंदिर ही पेशवेकाळातील महत्त्वाची वास्तू मानली जाते. १७६१ मध्ये पानिपतच्या युद्धानंतर लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सुभेदार नारो आप्पाजी खिरे यांनी हे मंदिर बांधायला सुरुवात केली. आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या या परिसरात पूर्वी तुळशीच्या अनेक बागा असल्यामुळे या भागाला ‘तुळशीबाग’ हे नाव मिळाले. सिद्धिविनायक गणपती याच कालखंडातील आहे.
फोटो :

शोध लागलेले गणपती आणि पत्ते 

कसबा गणपती : कसबा पेठ
पार्वतीनंदन गणपती : गणेश खिंड 
चतुश्रृंगी देऊळ गणपती : गणेश खिंड 
दशभुजा गणपती : कोथरूड 
फडके गणपती : सिंहगड रोड राजाराम पूलाजवळ
वडाचा गणपती : दत्तवाडी बाबुराव फुले बागेजवळ घरकुल सोसायटी सिंहगड रोड 
७ सारसबाग गणपती : 
८ नवलोबा / नर्मदेश्वर देऊळ गणपती : सारसबागेसमोरच्या तीन देवी देवळा शेजारी 
९ रमणा गणपती : पर्वती पायथा, लक्ष्मीनगर जवळ
१० पर्वती देवस्थान गणपती
११ भिकारदास मारुती देऊळ गणपती : महाराणा प्रताप बागेमागे बाजीराव रोड
१२ लक्ष्मी नरसिंह देऊळ गणपती : खजिना विहिरचौका जवळ
१३ जुन्या जाईचा गणपती : शुक्रवार पेठ, राजा दिनकर केळकर म्युझियम जवळ
१४ चिमण्या गणपती : सदाशिव पेठ सुजाता मस्तानी जवळ
१५ जोहारी महादेव देऊळ गणपती : 
१६ मातीचा गणपती : 
नारायण पेठ
१७ मोदी गणपती : 
नारायण पेठ
१८ पावसकर गणपती : 
नारायण पेठ केळकर रोड जवळ लोखंडे तालिमीच्या मागे
१९ हरिहरेश्वर देऊळ गणपती :

२० अमृतेश्वर देऊळ गणपती : शनिवार वाड्याजवळ
२१ सिद्धेश्वर देऊळ गणपती : मनपा पुलाच्या शेवटच्या टोकावर
२२ अष्टभुजा नवदुर्गा देऊळ गणपती : नारायण पेठ पोलीस चौकी जवळ नदीकिनारी 
२३ ओंकारेश्वर देवस्थान गणपती : 
२४ वृद्धेश्वर देवस्थान गणपती : 
काँग्रेस भवन समोर सावरकर भवन शेजारी  
२५ निळकंठेश्वर देऊळ गणपती : सोमवार पेठ/ 
मुजुमदार वाडा
२६ पेशवे गणपती : 
शनिवार वाड्याबाहेर लालमहाल समोर
२७ केदारेश्वर देवस्थान गणपती : 
कसबा  गणपतीच्या बरोब्बर मागे 
२८ दशभुजा वल्लभेश्व गणपती  / फडकेवाडा गणपती : 
केदारेश्वर देवळाजवळ कसबापेठेतल्या -  रविवार पेठ
२९ गुंडाचा गणपती  : कसबा गणपतीच्या मागची गल्ली
३० फडके महादेव देऊळ गणपती 
३१ नागेश्वर देऊळ गणपती : 
त्रिशुंड गणपतीच्या अगदी जवळ 
३२ त्रिशुंड गणपती :
३३ लक्ष्मेश्वर देऊळ गणपती : 
केईएम हॉस्पिटल जवळ मुदलियार रोड 
३४ डुल्या मारुती देऊळ गणपती : नागझरीजवळचा : अल्पना टाॅकिज
३५ डुल्या मारुती जवळचा  गणपती : 
शीतळा  देवी चौकात  नानापेठ 
३६ सोमेश्वर देऊळ गणपती : 
रविवार  पेठ 
३७ काळी जोगेश्वरी देऊळ गणपती : 
दत्ताच्या देवळाजवळ बाबू गेनू चॊकातल्या 
३८ रामेश्वर देऊळ गणपती : 
खासगीवाले लिमये मंडई मधील स्वामी मठा समोर शिवाजी रोड 
३९ तुळशीबाग देवस्थान गणपती देवळा जवळ : 
तुळशीबाग राम मंदिराच्या शेजारीच देऊळतला
४० महादेव देवळातला गणपती :गणपती चौक सकाळ प्रेस गल्ली 
समाप्त ......